एक्स्प्लोर

Aurangabad News : हर्सूल रस्ता अडीच दशकांनंतर घेणार मोकळा श्वास; आज होणार पाडापाडी, प्रशासनाचा तगडा बंदोबस्त

Aurangabad News: शहराच्या उत्तर दिशेला असलेल्या हर्सूलच्या अरुंद रस्त्यामुळे अडीच दशकांपासून निर्माण होणारी वाहतूक कोंडी अखेर दूर होणार आहे.

Aurangabad News: औरंगाबादकरांचे (Aurangabad) लक्ष लागलेल्या हर्सूल येथील मुख्य रस्त्यावरील बांधकाम काढण्याच्या कारवाईला आजपासून सुरुवात होणार आहे. शहराच्या उत्तर दिशेला असलेल्या हर्सूलच्या अरुंद रस्त्यामुळे अडीच दशकांपासून निर्माण होणारी वाहतूक कोंडी अखेर दूर होणार आहे. येथील रस्ता रुंदीकरणा आड येणाऱ्या 98 मालमत्तांच्या भूसंपादन प्रक्रियेला आज सुरुवात होत आहे. या सर्व मालमत्तांचे बाधित क्षेत्र पाडून लागतीच रुंदीकरणाचे काम केले जाणार आहे. त्यामुळे तब्बल अडीच दशकानंतर हा मार्ग मोकळा श्वास घेणार आहे. विशेष म्हणजे यासाठी प्रशासनाकडून तगडा बंदोबस्त पाहायला मिळत आहे. 

औरंगाबाद शहराचा उत्तरेकडील प्रवेशद्वार म्हणून समजल्या जाणाऱ्या हर्सूल गावातून जाणारा मुख्य रस्ता गेल्या अडीच दशकांपासून मोकळा श्वास घेण्याच्या प्रतीक्षेत होता. त्यासाठी यापूर्वी 2008 आणि 2012 साली महापालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने संयुक्तरित्या मोजणी करुन भूसंपादन प्रक्रिया केली होती. मात्र भूसंपादनाचा मोबदला द्यायचा कोणी यावर निर्णय न झाल्याने रुंदीकरण रखडले होते. मात्र अखेर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (न्हाई) 2017 साली हर्सूल ते फदार्पूर या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 753 एफच्या कामाला सुरुवात केल्याने आणि या मार्गावरील सर्व मालमत्तांच्या भूसंपादनाची जबाबदारी घेतल्याने हर्सल रस्त्याच्या रुंदीकरणाला सुरुवात होत आहे.

प्रशासकीय यंत्रणा घटनास्थळी दाखल...

हर्सूल येथील मुख्य रस्त्यावर असलेले बांधकाम काढून घेण्यासाठी प्रशासनाने भूखंडधारकांना 21 दिवसांचा वेळ दिला होता. तो वेळ रविवारी संपला असल्याने, आज बांधकाम पाडून रस्ता मोकळा करण्याची कारवाई केली जात आहे. यासाठी प्रशासनाचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहे.

पर्यायी रस्ता वापरावा...

13 ते 16 फेब्रुवारीदरम्यान हर्सूल गावात बांधकामे पाडण्याची कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे हर्सूल मार्गे सावंगी-फुलंब्री- सिल्लोडकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांसाठी हा रस्ता या कालावधीत बंद ठेवण्यात येणार असल्याचे वाहतूक शाखेचे निरीक्षक राजेश मयेकर यांनी सांगितले. दरम्यान, त्यांनी पर्यायी मार्ग सुचवले आहेत. औरंगाबादमधून फुलंब्री, सिल्लोडकडे जाणारी वाहतूक हर्सूल टी पॉइंटवरुन वळवून आंबेडकरनगर चौक-पिसादेवी बायपास मार्गे वळवण्यात आली आहे. तसेच, फुलंब्री-सिल्लोडकडून हर्सूल गावात येणारी वाहतूक सावंगी नाका इथून सावंगी बायपास मार्गे नारेगाव-वोखार्ड टी पॉईंट अशी वळवली आहे. तसेच गरजेनुसार बदल केले जातील, असेही पोलिसांनी सांगितले आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या: 

Aurangabad: औरंगाबादेत गुन्हेगारांची हिम्मत वाढली! पोलीस अधिकाऱ्याला शिवीगाळ, ऑडिओ क्लिप केली व्हायरल

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

AUS vs IND, 4th Test Nitish Kumar Reddy: नितीश रेड्डीने मैदान गाजवलं, वडिलांना रडू कोसळलं; तो क्षण पाहून भारतीय गहिवरले, Photo
नितीश रेड्डीने मैदान गाजवलं, वडिलांना रडू कोसळलं; तो क्षण पाहून भारतीय गहिवरले, Photo
Parbhani Crime :तिसरी मुलगीच, हैवान पतीने पेटवलं, जळत्या अंगाने पत्नी धावत राहिली, दोन दुकानंही पेटली!
तिसरी मुलगीच, हैवान पतीने पेटवलं, जळत्या अंगाने पत्नी धावत राहिली, दोन दुकानंही पेटली!
Crime : प्रॉपर्टीच्या वादातून राग अनावर, तीन जणांनी गळा दाबून एकास संपवलं, कुर्ल्यात खळबळ
प्रॉपर्टीच्या वादातून राग अनावर, तीन जणांनी गळा दाबून एकास संपवलं, कुर्ल्यात खळबळ
Anjali Damania : जोपर्यंत वाल्मिक कराडला अटक होत नाही तोपर्यंत बीड सोडणार नाही, मुंडेना मंत्रीपद सोडायला भाग पाडू; अंजली दमानियांचा बीडमध्ये एल्गार!
जोपर्यंत वाल्मिक कराडला अटक होत नाही तोपर्यंत बीड सोडणार नाही, धनंजय मुंडेना मंत्रीपद सोडायला भाग पाडू; अंजली दमानियांचा बीडमध्ये एल्गार!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 10 AM : 28 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सTOP 90 : 90 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 90 न्यूज : 28 डिसेंबर 2024: ABP MajhaManmohan Singh Funeral :माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी काँग्रेस मुख्यालयातDhananjay Deshmukh on Santosh Deshmukh Case : तपासावर समाधानी नाही, मारेकऱ्यांना तात्काळ अटक करा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
AUS vs IND, 4th Test Nitish Kumar Reddy: नितीश रेड्डीने मैदान गाजवलं, वडिलांना रडू कोसळलं; तो क्षण पाहून भारतीय गहिवरले, Photo
नितीश रेड्डीने मैदान गाजवलं, वडिलांना रडू कोसळलं; तो क्षण पाहून भारतीय गहिवरले, Photo
Parbhani Crime :तिसरी मुलगीच, हैवान पतीने पेटवलं, जळत्या अंगाने पत्नी धावत राहिली, दोन दुकानंही पेटली!
तिसरी मुलगीच, हैवान पतीने पेटवलं, जळत्या अंगाने पत्नी धावत राहिली, दोन दुकानंही पेटली!
Crime : प्रॉपर्टीच्या वादातून राग अनावर, तीन जणांनी गळा दाबून एकास संपवलं, कुर्ल्यात खळबळ
प्रॉपर्टीच्या वादातून राग अनावर, तीन जणांनी गळा दाबून एकास संपवलं, कुर्ल्यात खळबळ
Anjali Damania : जोपर्यंत वाल्मिक कराडला अटक होत नाही तोपर्यंत बीड सोडणार नाही, मुंडेना मंत्रीपद सोडायला भाग पाडू; अंजली दमानियांचा बीडमध्ये एल्गार!
जोपर्यंत वाल्मिक कराडला अटक होत नाही तोपर्यंत बीड सोडणार नाही, धनंजय मुंडेना मंत्रीपद सोडायला भाग पाडू; अंजली दमानियांचा बीडमध्ये एल्गार!
Anjali Damania : अंजली दमानिया मस्साजोगमध्ये देशमुख कुटुंबियांच्या भेटीला, 'ती' कॉल रेकॉर्डिंग ऐकवत म्हणाल्या, जोपर्यंत न्याय मिळत नाही...
अंजली दमानिया मस्साजोगमध्ये देशमुख कुटुंबियांच्या भेटीला, 'ती' कॉल रेकॉर्डिंग ऐकवत म्हणाल्या, जोपर्यंत न्याय मिळत नाही...
Bus Accident : भरधाव बस नाल्यातील केंदाळात कोसळली; दोन वर्षाच्या लेकरासह मातेसह 8 जणांचा मृत्यू, मोदींकडून आर्थिक मदत जाहीर
भरधाव बस नाल्यातील केंदाळात कोसळली; दोन वर्षाच्या लेकरासह मातेसह 8 जणांचा मृत्यू, मोदींकडून आर्थिक मदत जाहीर
Manoj Jarange Patil : संतोष भैय्याला न्याय दिल्याशिवाय एकही मराठा मागे हटणार नाही; मनोज जरांगे कडाडले, CM फडणवीसांवर आरोप
संतोष भैय्याला न्याय दिल्याशिवाय एकही मराठा मागे हटणार नाही; मनोज जरांगे कडाडले, CM फडणवीसांवर आरोप
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचं स्मारक बांधणार; काँग्रेसच्या पत्रानंतर केंद्र सरकारचा निर्णय
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचं स्मारक बांधणार; काँग्रेसच्या पत्रानंतर केंद्र सरकारचा निर्णय
Embed widget