एक्स्प्लोर

Rajesh Tope: राष्ट्रवादी पक्ष म्हणजे 'एकनाथा'च्या विचाराने चालणारी पार्टी; राजेश टोपेंचं विधान अन् कार्यकर्ते परेशान

Rajesh Tope: राजेश टोपे यांचे भाषण सुरु असतानाच 'राष्ट्रवादी पक्ष म्हणजे 'एकनाथां'च्या (Eknath) विचाराने चालणारी पार्टी' असल्याचं त्यांनी वक्तव्य केले आहे.

Rajesh Tope: राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) औरंगाबाद दौऱ्यावर असून, त्यांच्या उपस्थितीत आज पैठणमध्ये शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला आहे. दरम्यान यावेळी माजी आरोग्यमंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते राजेश टोपे (Rajesh Tope) यांच्यासह अनेक राष्ट्रवादीचे महत्वाचे नेते उपस्थित आहे. मात्र याचवेळी राजेश टोपे यांचे भाषण सुरु असतानाच 'राष्ट्रवादी पक्ष म्हणजे 'एकनाथां'च्या (Eknath) विचाराने चालणारी पार्टी' असल्याचं त्यांच्या वक्तव्याने सर्व कार्यकर्ते आणि नेत्यांच्या भुवया उंचावल्या होत्या. 

शिवसेनेत झालेल्या बंडखोरीनंतर एकनाथ शिंदे यांच्या नावाची जगभरात चर्चा झाली आहे. विशेष गुगलवर देखील एकनाथ शिंदे नाव मोठ्याप्रमाणावर सर्च करण्यात आले. त्यातच राज्यातील गावा-गावात एकनाथ शिंदे नाव माहित झाले आहे. दरम्यान असे असताना पैठणमधील आजच्या सभेत बोलताना राजेश टोपे यांनी, 'राष्ट्रवादी पक्ष म्हणजे 'एकनाथां'च्या विचाराने चालणारी पार्टी' आहे, असे वक्तव्य केले. त्यांचे हे वक्तव्य ऐकून थोड्यावेळेसाठी कार्यकर्ते आणि नेत्यांच्या भुवया उंचावल्या होत्या. पण टोपे यांना संत एकनाथ म्हणायचं होतं असे कळताच नेते कार्यकर्त्यांच्या तोंडावर स्मितहास्य पाहायला मिळाले. मात्र याची सभास्थळी जोरदार चर्चा पाहायला मिळाली. 

नेमकं काय म्हणाले राजेश टोपे...

यावेळी बोलताना राजेश टोपे म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी म्हणजे काय तर शेतकऱ्यांची पार्टी, सर्वधर्मसमभाव मानणारी पार्टी, 'एकनाथा'च्या विचाराने चालणारी पार्टी, रंजले गाजले सर्वांना आपली म्हणणारी पार्टी आणि त्यामुळे अशा पार्टीत सर्वांना घेऊन चालण्याचे कार्य केले जाते. तसेच जे कथनी आहे तीच करणी आहे. पैठण तालुक्यात अनेक महत्त्वाची कामे फक्त राष्ट्रवादीमुळे झाली आहेत, असे राजेश टोपे म्हणाले. 

शेतकऱ्यांना मदत कधी मिळणार?

अतिवृष्टी होऊन किती दिवस झाले, पण शेतकऱ्यांना अनुदान मिळाले नाही. राज्यात आलेल्या या नवीन सरकारला आठ महिने झाले आहेत. त्यांना सर्व गोष्टींसाठी वेळ आहे, पण शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यासाठी वेळ नाही. आम्ही ज्या-ज्यावेळी विधानसभेत आवाज उठवला त्या-त्यावेळी यांनी आत्ताच देऊ असे सांगितले. मात्र आठ महिने उलटले यांनी अजूनही अनुदान मिळाले नाही. पीक विम्याचे पैसे देखील अजूनही मिळाले नाही. हजारो कोटी रुपये विमा कंपन्या खाऊन बसल्या आहेत. या कंपन्यांवर नियंत्रण ठेवून शेतकऱ्यांना जी मदत मिळाली पाहिजे, ती मदत मिळत नसल्याचा आरोप राजेश टोपे यांनी केला. 

इतर महत्वाच्या बातम्या: 

Ajit Pawar: राज्यातील महत्त्वाच्या लोकांवर हल्ले होतायत, सरकार आणि पोलीस यंत्रणा झोपली आहे का? अजित पवार संतापले

About the author मोसीन शेख

मोसीन शेख
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Nida Khan Nashik Physical Harassment Case: नाशिकमधील महिला अत्याचार धर्मांतर प्रकरणात मोठा ट्वि्स्ट, निदा खान मुख्य सूत्रधार, हादरवणारी माहिती समोर
नाशिकमधील महिला अत्याचार धर्मांतर प्रकरणात मोठा ट्वि्स्ट, निदा खान मुख्य सूत्रधार, हादरवणारी माहिती समोर
Nari Shakti Vandan Act Women Reservation Bill: महिला आरक्षण लागू करण्यासाठी आजपासून संसदेच्या विशेष अधिवेशनाला सुरुवात; 'नारी शक्ती वंदन अधिनियम' विधेयकाची A टू Z माहिती
महिला आरक्षण लागू करण्यासाठी आजपासून संसदेच्या विशेष अधिवेशनाला सुरुवात; 'नारी शक्ती वंदन अधिनियम' विधेयकाची A टू Z माहिती
RCB vs LSG :  विराट कोहलीच्या स्फोटक फलंदाजीच्या जोरावर बंगळुरुचा मोठा विजय, रिषभ पंतच्या लखनौला पराभवाचा धक्का, गुणतालिकेत कोण टॉपवर?
बंगळुरुनं घरच्या मैदानावर लखनौला पराभवाचं पाणी पाजलं, रिषभ पंतच्या टीमचा दारुण पराभव
Mumbai Water Cut : मुंबईकरांना पाण्याचा वापर जपून करावा लागणार, 1 मे पासून 10 टक्के पाणी कपात शक्य, मुंबई महापालिका मोठा निर्णय घेणार?
मुंबईकरांना पाण्याचा वापर जपून करावा लागणार, 1 मे पासून 10 टक्के पाणी कपात शक्य, मुंबई महापालिका मोठा निर्णय घेणार?

व्हिडीओ

Sandeep Deshpande On Pratap Sarnaik : मंत्रिपद धोक्यात, प्रताप सरनाईक सारखा कुंभकर्ण जागा झालाय
Anjali Damania On Ashok Kharat : अशोक खरातला कॉल, राजकीय बवाल Special Report
Nashik TCS Issue : 'कॉर्पोरेट जिहाद' नाशकात म्होरक्या मलेशियात? Special Report
Amravati Paratwada Case : बुलडोझर घरावर, राजकारण धर्मावर Special Report
Sunetra Pawar Prachar : काकींचा प्रचार, विलिनीकरणाची किनार? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nida Khan Nashik Physical Harassment Case: नाशिकमधील महिला अत्याचार धर्मांतर प्रकरणात मोठा ट्वि्स्ट, निदा खान मुख्य सूत्रधार, हादरवणारी माहिती समोर
नाशिकमधील महिला अत्याचार धर्मांतर प्रकरणात मोठा ट्वि्स्ट, निदा खान मुख्य सूत्रधार, हादरवणारी माहिती समोर
Nari Shakti Vandan Act Women Reservation Bill: महिला आरक्षण लागू करण्यासाठी आजपासून संसदेच्या विशेष अधिवेशनाला सुरुवात; 'नारी शक्ती वंदन अधिनियम' विधेयकाची A टू Z माहिती
महिला आरक्षण लागू करण्यासाठी आजपासून संसदेच्या विशेष अधिवेशनाला सुरुवात; 'नारी शक्ती वंदन अधिनियम' विधेयकाची A टू Z माहिती
RCB vs LSG :  विराट कोहलीच्या स्फोटक फलंदाजीच्या जोरावर बंगळुरुचा मोठा विजय, रिषभ पंतच्या लखनौला पराभवाचा धक्का, गुणतालिकेत कोण टॉपवर?
बंगळुरुनं घरच्या मैदानावर लखनौला पराभवाचं पाणी पाजलं, रिषभ पंतच्या टीमचा दारुण पराभव
Mumbai Water Cut : मुंबईकरांना पाण्याचा वापर जपून करावा लागणार, 1 मे पासून 10 टक्के पाणी कपात शक्य, मुंबई महापालिका मोठा निर्णय घेणार?
मुंबईकरांना पाण्याचा वापर जपून करावा लागणार, 1 मे पासून 10 टक्के पाणी कपात शक्य, मुंबई महापालिका मोठा निर्णय घेणार?
Gold Rate : आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीच्या दरात घसरण, भारतात अक्षय तृतीयेपूर्वी सोने चांदी महागली, चांदीच्या दरात 11000 रुपयांची वाढ, सोन्याचं कायं?
भारतात अक्षय तृतीयेपूर्वी सोने चांदी महागली, चांदीच्या दरात 11000 रुपयांची वाढ, सोन्याचं कायं?
केजरीवाल म्हणाले, 'न्यायमूर्तींची मुलं सॉलिसिटर जनरलसोबत काम करतात, न्यायमूर्ती त्यांच्या विरोधात आदेश कसे देऊ शकतात?' तुषार मेहता सीबीआयचे वकील
केजरीवाल म्हणाले, 'न्यायमूर्तींची मुलं सॉलिसिटर जनरलसोबत काम करतात, न्यायमूर्ती त्यांच्या विरोधात आदेश कसे देऊ शकतात?' तुषार मेहता सीबीआयचे वकील
Rohit Sharma: आयपीएलमध्ये चाचपडत असलेल्या मुंबईला तगडा झटका; रोहित शर्मा पंजाबविरुद्धच्या सामन्यातून बाहेर, उर्वरित स्पर्धेत काय होणार?
आयपीएलमध्ये चाचपडत असलेल्या मुंबईला तगडा झटका; रोहित शर्मा पंजाबविरुद्धच्या सामन्यातून बाहेर, उर्वरित स्पर्धेत काय होणार?
सरकारच्या प्रस्तावाचा महिला आरक्षणाशी काहीही संबंध नाही; हा तर मतदारसंघांची पुनर्रचना आणि सोयीस्कर मतदारसंघांची फेररचना करून सत्ता काबीज करण्याचा प्रयत्न; राहुल गांधींचा हल्लाबोल
सरकारच्या प्रस्तावाचा महिला आरक्षणाशी काहीही संबंध नाही; हा तर मतदारसंघांची पुनर्रचना आणि सोयीस्कर मतदारसंघांची फेररचना करून सत्ता काबीज करण्याचा प्रयत्न; राहुल गांधींचा हल्लाबोल
Embed widget