एक्स्प्लोर

Marathwada Water Crisis : मराठवाड्याला पाणी सोडण्यासाठी प्रशासनाकडून तयारी सुरू; पाटबंधारे विभागाला आदेशाची प्रतीक्षा

Maharashtra Water Crisis : मराठवाड्याला पाणी सोडण्याचे आदेश पाटबंधारे विभागाला प्राप्त झाले नसले तरी प्रशासनाकडून तयारी सुरु झाली आहे.

अहमदनगर :  सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) आदेशानंतर आता उत्तर महाराष्ट्रातील (North Maharashtra) धरणातील पाणी मराठवाड्याला (Marathwada) सोडण्यासाठी प्रशासनाकडून तयारी सुरू करण्यात आली आहे. मात्र, पाटबंधारे विभागाला पाणी सोडण्याबाबत अद्याप कोणतेही पत्र मिळाले नाही. तर, दुसरीकडे पाणी सोडताना कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी देखील पोलीस विभागासोबत पत्रव्यवहार सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. 

अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातील धरणांचं पाणी मराठवाड्याला सोडण्याबाबत वाद पेटलेला होता. दरम्यान जरी मराठवाड्याला पाणी सोडण्याचे आदेश पाटबंधारे विभागाला प्राप्त झाले नसले तरी प्रशासनाकडून तयारी सुरु झाली आहे. स्थळ पाहणी करण्यासाठी प्रशासनाकडून पाच टीम तयार करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पाणी सोडण्यावरून सुरू असलेला वाद लक्षात घेऊन पाणी सोडण्याचे आदेश आला तर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कलम 144 लावण्यासाठी पाटबांधारे विभागाकडून पोलीस विभागासोबत पत्रव्यवहार सुरू आहे, अशी माहिती कार्यकारी अभियंता सायली पाटील यांनी दिली आहे. सोबतच शटडाऊन घेण्याबाबत महावितरण सोबत देखील पत्रव्यवहार सुरू असल्याचे पाटील यांनी सांगितले.

उत्तर महाराष्ट्राच्या धरणातून जायकवाडीला पाणी सोडलं जाणार आहे. उच्च न्यायालयाचा निर्णय सुप्रीम कोर्टाकडून कायम ठेवला आहे. उत्तर महाराष्ट्राच्या धरणातून आता जायकवाडी धरणात 8.5 टीएमसी पाणी सोडलं जाणार आहे.  

पाण्यासाठी आणखीन जीव घ्यायचे का? अशोक चव्हाण यांचा सवाल 

मराठवाडा विभागात अनेक ठिकाणी टंचाईची स्थिती आहे, अशा स्थितीत म्यायालयाचे आदेश असताना पाणी सोडले नाही तर न्यायालयाचा अवमान होणार नाही का असा सवाल काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी उपस्थित केला. तसेच पाणी सोडावे यासाठी आंदोलन करू पण लोकांचे जीव सरकारला घ्यायचे आहेत का असा सवाल चव्हाण यांनी सरकारला विचारला आहे. 

प्रादेशिक वाद व नेत्यांच्या श्रेयवादाच्या लढाईत शेतकऱ्यांचे नुकसान: विखे-पाटील 

जायकवाडीचे पाणी मराठवाड्याला द्यायला माझा विरोध मात्र पाणी सोडण्यासाठी  जायकवाडी धरणात मुबलक पाणी तर उपलब्ध असायला हवे हा मुद्दा उपस्थित करत सध्या हे प्रकरण न्याय प्रविष्ट असल्याने  त्यावर मी भाष्य करणार नाही असे मत राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केले.

न्यायालयाच्या निर्णयाचा अभ्यास करून जायकवाडीचे  पाणी कधी पर्यंत सोडायचे याचा निर्णय राज्य सरकार घेईल. मात्र यावर निर्णय घेतांना वरच्या भागात असणाऱ्या शेतकऱ्यांचा पण विचार व्हायला. वरच्या भागात मोठ्या प्रमाणात जिरायत शेती आहे. कापूस व अन्य पिकाची शेती आहे मग त्यांचा पण विचार व्हायला हवा अशी मागणी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. जायकवाडीच्या 26 टक्के डेड वापराचा निर्णय झाला हा प्रश्न सुटेल. मात्र प्रादेशिक वाद व नेत्यांच्या श्रेयवादाच्या लढाईत शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याचे मत महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केले.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Raut VIDEO : यांच्या हातात पोलीस पॉवर आहे म्हणून, नाहीतर ठाण्यातल्या रस्त्यावर यांना ठोकून काढू; संजय राऊत एकनाथ शिंदेंवर भडकले
यांच्या हातात पोलीस पॉवर आहे म्हणून, नाहीतर ठाण्यातल्या रस्त्यावर यांना ठोकून काढू; संजय राऊत एकनाथ शिंदेंवर भडकले
JD Vance : अमेरिकेनं व्हेनेझुएलात एअर स्ट्राईक केला अन् इकडं उपराष्ट्रपतींच्या घरावर हल्ला झाला, जेडी व्हॅन्स यांच्या घराच्या खिडक्या फुटल्या 
अमेरिकेत जेडी व्हॅन्स यांच्या घरावर हल्ला, घराच्या खिडक्या फुटल्या, हल्ल्याचं टायमिंगची चर्चेत
Santosh Dhuri : ठाकरेंनी उमेदवारी नाकारली, शांत असलेले संतोष धुरी प्रकटले, देवेंद्र फडवणीसांची भेट घेतली, भाजप प्रवेश ठरला
ठाकरेंनी उमेदवारी नाकारली, नाराज संतोष धुरी भाजपमध्ये दाखल होणार, नितेश राणेंसोबत देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली
Multibagger Stocks : सरकारी कंपनीच्या स्टॉकनं सहा महिन्यात पैसे केले दुप्पट, सध्या स्टॉक किती रुपयांवर?
सरकारी कंपनीच्या स्टॉकनं सहा महिन्यात पैसे केले दुप्पट, सध्या स्टॉक किती रुपयांवर?

व्हिडीओ

Rana vs Owaisi : जास्त मुलं जन्माला घालण्याचा नेत्यांचा सल्ला, राणा Vs ओवैसी भिडले Special Report
CM Devendra Fadnavis Parbhani : लाडक्या बहणींना लखपती बनवणार, देवाभाऊची मोठी घोषणा
Aaditya Thackeray Mumbai : आदित्य ठाकरे यांची भाजपवर सडकून टीका
Kishori Pednekar Mumbai : 'भाजप आणि सेनेने धमक्या दिल्या नाहीत आजूबाजूला चाय कम किटली गरम असता'
Amit Thackeray Solapur : अमित ठाकरेंकडून बाळासाहेब सरवदेयांच्या कुटुंबियांचं सांत्वन

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut VIDEO : यांच्या हातात पोलीस पॉवर आहे म्हणून, नाहीतर ठाण्यातल्या रस्त्यावर यांना ठोकून काढू; संजय राऊत एकनाथ शिंदेंवर भडकले
यांच्या हातात पोलीस पॉवर आहे म्हणून, नाहीतर ठाण्यातल्या रस्त्यावर यांना ठोकून काढू; संजय राऊत एकनाथ शिंदेंवर भडकले
JD Vance : अमेरिकेनं व्हेनेझुएलात एअर स्ट्राईक केला अन् इकडं उपराष्ट्रपतींच्या घरावर हल्ला झाला, जेडी व्हॅन्स यांच्या घराच्या खिडक्या फुटल्या 
अमेरिकेत जेडी व्हॅन्स यांच्या घरावर हल्ला, घराच्या खिडक्या फुटल्या, हल्ल्याचं टायमिंगची चर्चेत
Santosh Dhuri : ठाकरेंनी उमेदवारी नाकारली, शांत असलेले संतोष धुरी प्रकटले, देवेंद्र फडवणीसांची भेट घेतली, भाजप प्रवेश ठरला
ठाकरेंनी उमेदवारी नाकारली, नाराज संतोष धुरी भाजपमध्ये दाखल होणार, नितेश राणेंसोबत देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली
Multibagger Stocks : सरकारी कंपनीच्या स्टॉकनं सहा महिन्यात पैसे केले दुप्पट, सध्या स्टॉक किती रुपयांवर?
सरकारी कंपनीच्या स्टॉकनं सहा महिन्यात पैसे केले दुप्पट, सध्या स्टॉक किती रुपयांवर?
VIDEO : कोण म्हणतंय चार तर कोण म्हणतंय 20 मुलं जन्माला घाला; मतांच्या नियोजनासाठी धर्माचं राजकारण सुरू
कोण म्हणतंय चार तर कोण म्हणतंय 20 मुलं जन्माला घाला; मतांच्या नियोजनासाठी धर्माचं राजकारण सुरू
Latur : लातूरमधून विलासरावांच्या आठवणी पुसल्या जातील यात शंका नाही, रवींद्र चव्हाणांच्या वक्तव्यानंतर काँग्रेसचा संताप
लातूरमधून विलासरावांच्या आठवणी पुसल्या जातील यात शंका नाही, रवींद्र चव्हाणांच्या वक्तव्यानंतर काँग्रेसचा संताप
मुंबईत 2 कोटी 33 लाखांची रोकड जप्त; निवडणूक भरारी पथकाची कारवाई, IT विभागाकडून तपास सुरू
मुंबईत 2 कोटी 33 लाखांची रोकड जप्त; निवडणूक भरारी पथकाची कारवाई, IT विभागाकडून तपास सुरू
अजित दादा जनता खुळी नाही, चंद्रकांत पाटलांची पालकमंत्र्यांवर पुन्हा टीका; 2001 पासूनचं सगळंच काढलं
अजित दादा जनता खुळी नाही, चंद्रकांत पाटलांची पालकमंत्र्यांवर पुन्हा टीका; 2001 पासूनचं सगळंच काढलं
Embed widget