एक्स्प्लोर

Ajit Pawar: अजित पवारांना 'धरणवीर'पुरस्कार देणार, भाजप खासदाराची खरमरीत टीका, राज्यभर अजित पवारांविरोधात निदर्शनं

अजित पवार यांच्या म्हणण्यानुसार छत्रपती संभाजी महाराज जर धर्मवीर नसतील तर भाजपातर्फे अजित पवारांना 'धरणवीर' पुरस्कार देणार असल्याची खरमरीत टीका भाजपचे खासदार सुजय विखे पाटील यांनी केली आहे.

Ahmednagar News Live Updates:  राज्य विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar)  यांनी छत्रपती संभाजी महाराज (Chhatrapati Sambhaji Maharaj) यांच्याबद्दल असं वक्तव्य करायला नको होतं, विशेष म्हणजे त्यांनी स्वतःच सभागृहात असं म्हटलं होत की कुणीही महापुरुषांबद्दल चुकीची विधानं करू नये आणि त्यांनीच असं वक्तव्य केलं. त्यामुळे त्यांच्या म्हणण्यानुसार छत्रपती संभाजी महाराज जर धर्मवीर नसतील तर भाजपातर्फे अजित पवारांना 'धरणवीर' पुरस्कार देणार असल्याची खरमरीत टीका भाजपचे खासदार सुजय विखे पाटील यांनी केली आहे.

अहमदनगरच्या नामांतराचा मुद्दा पुन्हा चर्चेत आल्याबाबत त्यांना विचारले असता, आतापर्यंत अहमदनगरच्या स्थानिकांकडून नामांतराची मागणी झाल्याचे माझ्या ऐकिवात नाही, अहमदनगरची जनता जोपर्यंत अशी मागणी करत नाही तोपर्यंत जिल्ह्याबाहेरच्या एखाद्या व्यक्तींनी अशी मागणी करणं मला संयुक्तिक वाटत नाही असं खासदार विखे म्हणाले. महापालिकेत जो काही ठराव होईल त्यासोबतच आम्ही राहू असंही खासदार विखे म्हणाले.

नोटबंदीच्या निर्णय हा भ्रष्टाचार मुक्त भारत करण्याकडे पहिलं पाऊल

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतलेला नोटबंदीच्या निर्णय हा भ्रष्टाचार मुक्त भारत करण्याकडे पहिलं पाऊल होतं, या निर्णयानंतर काही सर्वसामान्य नागरिकांना त्यामुळे काही अडचणी आल्या मात्र तरीही पुन्हा भाजपचं सरकार आलं. याचाच अर्थ जनतेने नोटबंदीचा निर्णय खुल्या दिलाने स्वीकारला. काही लोकांनी निवडणुकीसाठी साठवलेला पैसा त्यांना जाळावा लागला, त्यामुळे त्यांनी वेगळ्या मानसिकतेतून काही लोकांना न्यायालयात पाठवले. मात्र आता सर्वोच्च न्यायालयाने या विषयावर पडदा पडेल आणि विरोधकांना नवीन मुद्दा शोधण्याची गरज असल्याचे खासदार सुजय विखे पाटील म्हणाले.

अजित पवार यांच्या बारामतीतील (Baramati) निवासस्थानी पोलिसांचा बंदोबस्त वाढवला

अजित पवार यांच्या बारामतीतील (Baramati) निवासस्थानी पोलिसांचा बंदोबस्त वाढवला आहे. अजित पवारांच्या सहयोग सोसायटीबाहेर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात आहे.  संभाजी महाराज हे धर्मवीर (Dharmaveer) नव्हते ते स्वराज्य रक्षक (Swarajya Rakshak) होते, असं अजित पवार विधानसभेतील भाषणात म्हणाले होते. त्यावरुन भाजपसह हिंदुत्ववादी संघटनांनी अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.  बारामतीत अजित पवारांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला (Baramati Protest against Ajit Pawar) दरम्यान, बारामतीतच अजित पवारांचा प्रतिकात्मक पुतळा जाळून निषेध करण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात  घेतलं. नागपूर अधिवेशनादरम्यान विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज यांचा धर्मवीर नव्हे तर स्वराज्य रक्षक असा उल्लेख केला होता.  भाजपच्यावतीने भिगवन चौकात (Bhigwan) आंदोलन करण्यात आले होते. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर तात्काळ बारामती शहर पोलिसांनी घटनास्थळी येऊन कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. 

 अजित पवारांविरोधात भाजपायुमोचं आंदोलन

अजित पवार यांच्या छत्रपती संभाजी महाराज यांच्या बद्दलच्या वक्तव्याविरोधात अमरावतीत भाजपा युवा मोर्चानं आंदोलन केलं. राजापेठ उड्डाणपूलावर घोषणाबाजी करत निषेध केला गेला. यावेळी विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या फोटोला चपला मारून, बॅनर फाडून  निषेध केला.

ही बातमी देखील वाचा

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

12 राज्यांच्या SIR-ड्राफ्ट यादीत 13 टक्के मतदारांची घट; उत्तर प्रदेशात सर्वाधिक 2.89 कोटी नावांवर फुली, राजस्थानमधील प्रत्येक 13 वी व्यक्ती मतदार यादीतून गायब
12 राज्यांच्या SIR-ड्राफ्ट यादीत 13 टक्के मतदारांची घट; उत्तर प्रदेशात सर्वाधिक 2.89 कोटी नावांवर फुली, राजस्थानमधील प्रत्येक 13 वी व्यक्ती मतदार यादीतून गायब
फडणवीसांच्या इशाऱ्यानंतर भाजप-एमआयएम युती तुटली; आमदाराला नोटीस, 5 MIM नगरसेवकांनीही काढला पाठिंबा
फडणवीसांच्या इशाऱ्यानंतर भाजप-एमआयएम युती तुटली; आमदाराला नोटीस, 5 MIM नगरसेवकांनीही काढला पाठिंबा
IND vs NZ : टीम इंडियासाठी मोठी गुड न्यूज, उपकॅप्टन श्रेयस अय्यर फिट, न्यूझीलंड विरुद्ध धमाकेदार कमबॅक करणार
टीम इंडियासाठी मोठी गुड न्यूज, उपकॅप्टन श्रेयस अय्यर फिट, न्यूझीलंड विरुद्ध धमाकेदार कमबॅक करणार
काँग्रेससोबत युती, देवेंद्र फडणवीसांचा इशारा; अंबरनाथमधील भाजप नेत्यानं स्पष्टीकरण, ही युती नाहीच
काँग्रेससोबत युती, देवेंद्र फडणवीसांचा इशारा; अंबरनाथमधील भाजप नेत्यानं स्पष्टीकरण, ही युती नाहीच

व्हिडीओ

Imtiyaz Jaleel Sambhajinagar : संजय शिरसाट आणि अतुल सावे यांच्या गुंडांनी हल्ला केला, जलीलांचा आरोप
Imtiyaj Jaleel Sambhajinagar: काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Santosh Dhuri on Bala Nandgaonkar : Sandeep Deshpande जावे यासाठी नांदगावकरांचे प्रयत्न
Kolhapur Pregnant Candidate Congress : 9 महिन्यांची गरोदर महिला कोल्हापुरातून निवडणुकीच्या रिंगणात
Nilesh Rane on Thackeray Alliance : ठाकरे बंधुंची एक्सपायरी डेट संपली, निलेश राणेंचा प्रहार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
12 राज्यांच्या SIR-ड्राफ्ट यादीत 13 टक्के मतदारांची घट; उत्तर प्रदेशात सर्वाधिक 2.89 कोटी नावांवर फुली, राजस्थानमधील प्रत्येक 13 वी व्यक्ती मतदार यादीतून गायब
12 राज्यांच्या SIR-ड्राफ्ट यादीत 13 टक्के मतदारांची घट; उत्तर प्रदेशात सर्वाधिक 2.89 कोटी नावांवर फुली, राजस्थानमधील प्रत्येक 13 वी व्यक्ती मतदार यादीतून गायब
फडणवीसांच्या इशाऱ्यानंतर भाजप-एमआयएम युती तुटली; आमदाराला नोटीस, 5 MIM नगरसेवकांनीही काढला पाठिंबा
फडणवीसांच्या इशाऱ्यानंतर भाजप-एमआयएम युती तुटली; आमदाराला नोटीस, 5 MIM नगरसेवकांनीही काढला पाठिंबा
IND vs NZ : टीम इंडियासाठी मोठी गुड न्यूज, उपकॅप्टन श्रेयस अय्यर फिट, न्यूझीलंड विरुद्ध धमाकेदार कमबॅक करणार
टीम इंडियासाठी मोठी गुड न्यूज, उपकॅप्टन श्रेयस अय्यर फिट, न्यूझीलंड विरुद्ध धमाकेदार कमबॅक करणार
काँग्रेससोबत युती, देवेंद्र फडणवीसांचा इशारा; अंबरनाथमधील भाजप नेत्यानं स्पष्टीकरण, ही युती नाहीच
काँग्रेससोबत युती, देवेंद्र फडणवीसांचा इशारा; अंबरनाथमधील भाजप नेत्यानं स्पष्टीकरण, ही युती नाहीच
'लोकं कुत्र्यांच्या त्रास किती काळ सहन करतील? शाळा आणि न्यायालयाच्या परिसरात त्यांचं काय काम? त्यांच्या चावण्याने मुलं, माणसं मरत आहेत' सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
'लोकं कुत्र्यांच्या त्रास किती काळ सहन करतील? शाळा आणि न्यायालयाच्या परिसरात त्यांचं काय काम? त्यांच्या चावण्याने मुलं, माणसं मरत आहेत' सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
Share Market : सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात घसरण, सेन्सेक्स  102 अंकांनी घसरला, मिडकॅप-स्मॉलकॅपमध्ये तेजी 
सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात घसरण, सेन्सेक्स  102 अंकांनी घसरला, मिडकॅप-स्मॉलकॅपमध्ये तेजी 
Nawab Malik: मुंबईत 50 वर्षांपासून बांगलादेशींचा तपास केला जातोय, शेख हसीना यांना भारतातून पहिल्यांदा बाहेर काढावं, त्यांच्यामुळे तिथं हिंदू अडचणीत; नवाब मलिकांचा हल्लाबोल
मुंबईत 50 वर्षांपासून बांगलादेशींचा तपास केला जातोय, शेख हसीना यांना भारतातून पहिल्यांदा बाहेर काढावं, त्यांच्यामुळे तिथं हिंदू अडचणीत; नवाब मलिकांचा हल्लाबोल
व्हायरल व्हिडिओवर राहुल नार्वेकर पहिल्यांदाच बोलले; 'उमेदवारी मागे घेण्यासाठी 5-5 कोटी मागण्याचे प्रयत्न'
व्हायरल व्हिडिओवर राहुल नार्वेकर पहिल्यांदाच बोलले; 'उमेदवारी मागे घेण्यासाठी 5-5 कोटी मागण्याचे प्रयत्न'
Embed widget