एक्स्प्लोर

Ideas Of India : स्वप्नामागे जर संकल्प असेल आणि त्यामागे आपण जाऊ, तर काहीही शक्य आहे : कैलाश सत्यार्थी

Ideas of India : नोबेल पारितोषिक विजेते कैलाश सत्यार्थी यांनी एबीपी न्यूजच्या ‘आयडियाज ऑफ इंडिया समिट 2022’मध्ये सहभाग घेतला.

ABP Ideas Of India : सध्या देश स्वातंत्र्याचं 75वं वर्ष साजरं करत आहे. स्वातंत्र्याची 75 गौरवशाली वर्षानिमित्त ABP नेटवर्क विविध क्षेत्रातील भारतातील सर्वात प्रभावशाली व्यक्तिमत्त्वांना एकत्र आणत आहे. ABP नेटवर्कच्या 'आयडियाज ऑफ इंडिया' (ABP Ideas Of India) समिटमध्ये संस्कृती, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रापासून तंत्रज्ञान, व्यवसाय आणि राजकारण अशा विविध क्षेत्रातील विचारप्रवर्तक लोक आणि उत्कृष्ट विचारसरणी या मंचावर पाहायला मिळणार आहे. हे दिग्गज भारताच्या आतापर्यंतच्या प्रवासाबद्दल बोलणार असून, देशाच्या उज्ज्वल भविष्याबद्दल त्यांचे विचार शेअर करणार आहेत.

या सत्राची सुरुवात नोबेल पुरस्कार विजेते कैलास सत्यार्थी (Kailash Satyarthi) यांच्या संवादाने झाली. नोबेल पारितोषिक विजेते कैलाश सत्यार्थी यांनी एबीपी न्यूजच्या ‘आयडियाज ऑफ इंडिया समिट 2022’मध्ये सहभाग घेतला. त्यांनी 'द ह्युमनिटी इंडेक्स' या विषयावर चर्चा केली. कैलाश सत्यार्थी म्हणाले की, भारताचा खरा विकास तेव्हाच होईल जेव्हा सर्वांना समान शिक्षण मिळेल. त्याचप्रमाणे अगदी शेवटच्या रांगेत उभ्या असलेल्या प्रत्येक मुलाच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्याचे कामही आम्ही करू. 

देशातील प्रत्येक मुलाला चांगले शिक्षण मिळण्याचा अधिकार!

येत्या 25 वर्षात भारताने असे काय केले पाहिजे, की ज्यामुळे भारताकडे पुन्हा एकदा ‘सोन्याचा पक्षी’ म्हणून पाहिले जाईल?, या प्रश्नाला उत्तर देताना कैलाश सत्यार्थी म्हणाले की, देशातील प्रत्येक मुलाला निर्भयपणे शाळेत जाता आले पाहिजे. त्याला शिक्षणाचे पूर्ण स्वातंत्र्य असले पाहिजे. देशातील मोठे उद्योगपती आणि नेत्यांच्या मुलांना जसे शिक्षण मिळत आहे, त्याच पद्धतीने प्रत्येक घटकाला शिक्षण मिळाले पाहिजे. या संकल्पनेवर विचार करण्यासाठी माझ्याकडे गांधीजींनी प्रेरित केलेळा एक उपाय आहे. विचार करा, देशातील एका अत्यंत गरीब भागातील एक मुलगी, जिचा जन्म गुलामगिरीत झाला आहे, जिचे आई-वडील बंदी/गुलाम म्हणून जगतात. ज्यांच्या मुलांचा वापर सर्व प्रकारच्या लैंगिक शोषणासाठी, तस्करीसाठी केला जाऊ शकतो. आज जर आपण सर्वांनी त्या मुलीच्या चेहऱ्यावर हसू आणले, तर 25 वर्षांनंतर भारत जगातील सर्वात महान देश होईल.

स्वप्नात मोठी शक्ती असते : कैलाश सत्यार्थी

शांततेचा नोबेल पुरस्कार मिळालेले कैलाश सत्यार्थी म्हणाले की, मी जे काही बोललो ते शक्य आहे. जेव्हा मी सुरुवात केली, तेव्हा ही समस्या नव्हती. बालमजुरी, बाल तस्करी असे शब्द ऐकू येत नव्हते. आपल्या देशात स्वतःचा कायदा नव्हता. परंतु असे असतानाही, स्वप्नांमध्ये मोठी शक्ती होती. आपण यात सामील झालो तर आपण काहीही साध्य करू शकतो. स्वप्नामागे जर संकल्प असेल आणि त्यामागे आपण जाऊ तर, आपल्यासाठी काहीही अशक्य नाही. भारत समस्यांसाठी नव्हे तर, उपायांसाठी ओळखला जातो. आपण सर्व उपायच आहोत. यासाठी आपल्या सरकारने आपल्या बजेटमध्ये मुलांना प्राधान्य दिले पाहिजे. आपली 40 टक्के लोकसंख्या 18 वर्षांपेक्षा कमी वयाची आहे. पण त्यांचे शिक्षण, सुरक्षा आणि आरोग्य मिळून आपल्या जीडीपीच्या 4 टक्क्यांपेक्षा कमी खर्च येतो. या देशात एकही मूल शिक्षणापासून वंचित राहून गुलामगिरीत जगत असेल, तर आपण स्वतःला आरशात बघितलं पाहिजे. हे समजून घेतलं पाहिजे की, ही मुलं दुसऱ्या कोणाची नसून ती भारतमातेची लेकरं आहेत.

एबीपी नेटवर्कच्या आयडियाज ऑफ इंडिया समिटमध्ये देशभरातील अनेक सेलिब्रिटी सहभागी होत आहेत आणि कार्यक्रमाच्या सुरुवातीला एबीपी नेटवर्कचे सीईओ अविनाश पांडे म्हणाले की, भविष्यातील भारताचे स्वप्न साकार करण्याचा आयडियाज ऑफ इंडियाचा उद्देश आहे. या कार्यक्रमांद्वारे भविष्यातील भारतासाठी एक रोडमॅप तयार करता येईल, अशी आशा आहे.

हेही वाचा :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
High Court Exam Issue : उच्च न्यायालयाच्या लिपिक टंकलेखन कौशल्य ऑनलाइन परीक्षेत गोंधळ, अभिजीत दिपकेंचा आंदोलक विद्यार्थ्यांना पाठिंबा, म्हणाले...
उच्च न्यायालयाच्या लिपिक टंकलेखन कौशल्य परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरु, अभिजीत दिपकेंचा पाठिंबा, फेरपरीक्षेची मागणी
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
चार भाऊ एकत्र असले तर PM किसान योजनेचा लाभ नेमका कोणाला मिळणार? काय सांगतो नियम? 24 वा हप्ता कधी मिळणार? 
चार भाऊ एकत्र असले तर PM किसान योजनेचा लाभ नेमका कोणाला मिळणार? काय सांगतो नियम? 24 वा हप्ता कधी मिळणार? 

व्हिडीओ

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारी, पोलिसांनी उचलला
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारी, पोलिसांनी उचलला
Prithviraj Chavan : गोपीनाथ मुंडेंबाबत माझ्या मनात आदर, ते काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ची निवडणूक जिंकलो असतो : पृथ्वीराज चव्हाण
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ला हारलो नसतो, मुख्यमंत्रिपदासाठी त्यांचं नाव सुचवलं असतं: पृथ्वीराज चव्हाण
Revanth Reddy: काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
Share Market : शेअर बाजारातील मंदीचा फटका, सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 5 कंपन्यांचे 1 लाख कोटी बुडाले, टीसीएसला सर्वाधिक फटका
सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 5 कंपन्यांचे 1 लाख कोटी बुडाले,टीसीएसला सर्वाधिक फटका
Manoj Jarange Patil: '29 ऑगस्टला जीव गेला तरी चालेल पण आंदोलनावर ठाम'; अभ्यासकांसोबतच्या अंतरवाली सराटीतील बैठकीत मनोज जरांगेंचा निर्धार
'29 ऑगस्टला जीव गेला तरी चालेल पण आंदोलनावर ठाम'; अभ्यासकांसोबतच्या अंतरवाली सराटीतील बैठकीत मनोज जरांगेंचा निर्धार
Embed widget