(Source: ECI | ABP NEWS)
Operation Sindoor :'ऑपरेशन सिंदूर' परदेश मिशनसाठी शिष्टमंडळ आज रवाना होणार; पाकिस्तानी दहशतवादाचा बुरखा फाडत 5 मेसेज जगाच्या पाठीवर दिले जाणार
Operation Sindoor : देशातील 59 जणांचे शिष्टमंडळ आज (21 मे) विविध देशांमध्ये रवाना होतील. ही एक मोठी राजनैतिक मोहीम आहे, जी आजपासून सुरू होत आहे. यामध्ये, खासदार जगातील 33 राजधान्यांमध्ये जातील.

Operation Sindoor : ऑपरेशन सिंदूरचा उद्देश आणि पाकिस्तानचा खरा चेहरा जगाला सांगण्यासाठी देशातील 59 जणांचे शिष्टमंडळ आज (21 मे) विविध देशांमध्ये रवाना होतील. ही एक मोठी राजनैतिक मोहीम आहे, जी आजपासून सुरू होत आहे. यामध्ये, खासदार जगातील 33 राजधान्यांमध्ये जातील. 59 खासदार 7 सर्वपक्षीय टीममध्ये विभागले आहेत. 8 माजी राजनैतिक अधिकारी देखील त्यांच्यासोबत असतील. परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी मंगळवारी खासदारांना या उपक्रमाबद्दल माहिती दिली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यामध्ये, ऑपरेशन सिंदूरची पार्श्वभूमी आणि या 33 देशांना राजनैतिक आणि लष्करी कारवाईचे पाच प्रमुख संदेश पाठवण्यावर भर देण्यात आला.
59 खासदार जगाला हे 5 प्रमुख संदेश देतील...
दहशतवादावर शून्य सहनशीलता
यामध्ये, ऑपरेशन सिंदूर दहशतवादी गट आणि त्यांच्या संरचनांविरुद्ध होते हे सांगितले जाईल. मोजमाप केलेल्या कारवाईत दहशतवादी तळांना लक्ष्य करण्यात आले. पाकिस्तानी सैन्याने हा हल्ला स्वतःवरचा हल्ला मानला आणि प्रत्युत्तर दिले.
पाकिस्तान दहशतवादाचा समर्थक
खासदार काही पुरावे घेत आहेत, ज्यामध्ये ते सांगतील की पहलगाम हल्ल्यात पाक-समर्थित दहशतवादी संघटना द रेझिस्टन्स फ्रंट (टीआरएफ) ची भूमिका होती. खासदार याआधी झालेल्या हल्ल्यांची संपूर्ण यादी देखील घेत आहेत.
भारत जबाबदार आणि संयमी आहे
भारताने लष्करी कारवाईतही जबाबदारी आणि संयम दाखवला. कोणत्याही निष्पाप पाकिस्तानी नागरिकाचा जीव जाऊ नये याची खात्री केली. पाकिस्तानने कारवाई थांबवण्याची विनंती केली तेव्हा भारताने ती तत्परतेने स्वीकारली.
जगाने दहशतवादाविरुद्ध एकत्र यावे
खासदार दहशतवादाविरुद्ध उघडपणे आवाज उठवण्यासाठी आणि त्याचा सामना करण्यासाठी या देशांकडून सहकार्य आणि पाठिंबा मागतील. ते भारत-पाक वादाला दहशतवादाविरुद्ध युद्ध म्हणून पाहण्याचे आवाहन करतील.
पाकिस्तानबद्दलचे भारताचे धोरण
भारताने पाकिस्तानविरुद्धचा आपला बदललेला दृष्टिकोन उघड केला आहे. सीमेपलीकडून येणाऱ्या धोक्याकडे उदासीन राहण्याऐवजी, भारत सक्रिय दृष्टिकोन स्वीकारेल आणि दहशतवादी हल्लेखोरांना आधीच निष्क्रिय करेल.
अभिषेक बॅनर्जी आता टीएमसीमधून युसूफ पठाण यांची जागा घेतील
दरम्यान, टीएमसी खासदार युसूफ पठाण यांच्या जागी आता पक्षाचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांचा समावेश शिष्टमंडळात करण्यात आला आहे. सरकारने यापूर्वी जाहीर केलेल्या यादीत युसूफ पठाण यांचे नाव होते, परंतु टीएमसी प्रमुख ममता बॅनर्जी यांनी पक्षाला न विचारता पठाण यांचा समावेश केल्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. यानंतर केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी ममता यांच्याशी चर्चा केली आणि त्यानंतर अभिषेक यांचे नाव अंतिम करण्यात आले.
इतर महत्वाच्या बातम्या
























