एक्स्प्लोर

Ganesh Visarjan 2023 : गणेशाचे पाण्यात विसर्जन का केले जाते? जाणून घ्या त्यामागील रंजक पौराणिक कथा

Ganesh Visarjan 2023 : गणेश चतुर्थीच्या दिवशी लोक घरोघरी गणपती बाप्पाचे स्वागत करतात, त्यानंतर दहाव्या दिवशी त्यांचे विधीपूर्वक विसर्जन केले जाते.पण असे का केले जाते? जाणून घ्या पौराणिक कथा

Ganesh Visarjan 2023 : यंदा 19 सप्टेंबर 2023 रोजी गणेश चतुर्थीचा (Ganesh Chaturthi 2023) सण साजरा करण्यात आला, भाविकांनी मोठ्या थाटामाटात घरोघरी गणपतीचे स्वागत केले. हा उत्सव 10 दिवस साजरा केला जात असून लोक त्यांच्या भक्तीनुसार दीड दिवस, 3 दिवस, 5 दिवस, 7 दिवस किंवा 10 दिवस गणपतीची पूजा करतात. यानंतर विधीप्रमाणे त्यांचे विसर्जन केले जाते. यावर्षी 28 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी आहे. हिंदू धर्मात गणपतीला पहिले पूजनीय देवता मानले जाते, मग अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणेशाचे विसर्जन का केले जाते? यामागे दडलेली पौराणिक कथा जाणून घ्या.


गणेश विसर्जन पौराणिक कथा
पौराणिक कथेनुसार, अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपतीचे पाण्यात विसर्जन केले जाते कारण ते जल तत्वाचे अधिपती आहेत. पुराणानुसार, वेद व्यासजी गणपतीला महाभारत सांगत होते आणि बाप्पा ते सलग लिहीत होते. कथा सांगताना वेद व्यासजींनी डोळे मिटले. आणि ते सलग 10 दिवस महाभारत पुराण सांगत राहिले, तोपर्यंत बाप्पा ते लिहीत राहिले. पण दहा दिवसांनी जेव्हा वेद व्यासजींनी डोळे उघडले तेव्हा त्यांना दिसले की गणपतीच्या शरीराचे तापमान खूप वाढले आहे. गणेशाचे शरीर थंड करण्यासाठी, वेद व्यासजींनी त्याला पाण्यात आंघोळ घातली, ज्यामुळे बाप्पाचे शरीर थंड झाले. तेव्हापासून गणेश विसर्जन हे गणपतीच्या शरीराला थंड करण्यासाठीच केले जाते, अशी समजूत आहे.


पुढच्या वर्षी पुन्हा येण्याचे आमंत्रण

दुसर्‍या आख्यायिकेनुसार, श्रीगणेश आपला भाऊ कार्तिकेयच्या ठिकाणी काही दिवस राहण्यासाठी दक्षिणेला गेले आणि तिथल्या सर्वांना मोहित केले. त्यानंतर 10 दिवसांनी ते तेथून आपल्या निवासस्थानासाठी निघाले. त्यावेळी भगवान कार्तिकेयासह सर्वजण खूप भावूक झाले आणि त्यांनी गणपतीला पुढच्या वर्षी पुन्हा येण्याचे आमंत्रण दिले. असे म्हटले जाते की, या आख्यायिकेनुसार गणेश विसर्जनाचा सण साजरा केला जातो आणि गणपतीला पुढील वर्षी पुन्हा सुख, समृद्धी आणि आनंदाने आपल्या घरी येण्याची प्रार्थना केली जाते.

 

गणेश विसर्जन शुभ मुहूर्त
10 दिवस चालणाऱ्या या गणेशोत्सवाची सांगता गणेश विसर्जनाने होणार आहे. भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्दशी तिथी 27 सप्टेंबर रोजी रात्री 20 वाजून 18 मिनिटांनी सुरू होईल, तर 28 सप्टेंबर रोजी सायंकाळी 6 वाजून 49 मिनिटांनी समाप्त होईल. उदयातिथीनुसार गणेश विसर्जन 28 सप्टेंबर, गुरुवार रोजी होणार आहे. 28 सप्टेंबरला सूर्योदयानंतर गणेश विसर्जन सुरू होईल. 

 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या :

Ganesh Chaturthi 2023 : आजही 'या' गुहेत श्रीगणेशाचे मूळ शीर आहे सुरक्षित? जाणून घ्या यामागील रहस्य

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

जेव्हा शिक्षणाला धंदा केलं जातं तेव्हा चूक सुधारली जात नाही उलट ती अधिक वाढते आणि याची अंतिम किंमत आपली मुलं मोजताहेत; राहुल गांधींचा हल्लाबोल, सरकारच्या कमाईचं 'गणित'ही सांगितलं
जेव्हा शिक्षणाला धंदा केलं जातं तेव्हा चूक सुधारली जात नाही उलट ती अधिक वाढते आणि याची अंतिम किंमत आपली मुलं मोजताहेत; राहुल गांधींचा हल्लाबोल, सरकारच्या कमाईचं 'गणित'ही सांगितलं
Share Market Crash : सेन्सेक्स 500 अंकांनी कोसळला, निफ्टी 23400 च्या खाली, शेअर मार्केट क्रॅश, गुंतवणूकदारांचे 3.75 लाख कोटी स्वाहा...
शेअर मार्केट क्रॅश, सेन्सेक्स 500 अंकांनी कोसळला, गुंतवणूकदारांचे 3.75 लाख कोटी स्वाहा...
Supreme Court on Neet Exam: सर्वोच्च न्यायालय म्हणाले, 'नीट फेरपरीक्षा केवळ लेखी स्वरूपातच घेतली जाईल, परीक्षा यंत्रणा आधीच दबावात, सध्या परीक्षेची पद्धत बदलणे शक्य नाही'
सर्वोच्च न्यायालय म्हणाले, 'नीट फेरपरीक्षा केवळ लेखी स्वरूपातच घेतली जाईल, परीक्षा यंत्रणा आधीच दबावात, सध्या परीक्षेची पद्धत बदलणे शक्य नाही'
पुण्यात विक्रम काकडेच राष्ट्रवादीचे उमेदवार, वळसे पाटलांनी स्पष्टच सांगितले; नाराजीबाबत जय पवारही बोलले
पुण्यात विक्रम काकडेच राष्ट्रवादीचे उमेदवार, वळसे पाटलांनी स्पष्टच सांगितले; नाराजीबाबत जय पवारही बोलले

व्हिडीओ

Abdul Sattar on Shiv Sena Merger : दोन्ही शिवसेना एकत्र आल्या पाहिजे; शिंदेंचा आमदार खूप काही बोलला
Pune NCP Vidhan Parishad : पुण्यात अर्ज भरताना गोंधळ, एकाच पक्षातून 2 अर्ज भरण्यासाठी गडबड
Nitin Gadkari Speech : राजकारणातील 90 टक्के खेळाडू वाट पाहतात की कोणत्या पार्टीचे सरकार येईल?
Mahendra Dalvi : कोकणच्या जागेवर राष्ट्रवादीचा संबंधच नाही, शिवसेना ठाम - दळवी | ABP Majha
Rajasthan Dust Storm : राजस्थानात धुळीच्या वादळाचा कहर! अचानक कसं घोंघावलं संकट? | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जेव्हा शिक्षणाला धंदा केलं जातं तेव्हा चूक सुधारली जात नाही उलट ती अधिक वाढते आणि याची अंतिम किंमत आपली मुलं मोजताहेत; राहुल गांधींचा हल्लाबोल, सरकारच्या कमाईचं 'गणित'ही सांगितलं
जेव्हा शिक्षणाला धंदा केलं जातं तेव्हा चूक सुधारली जात नाही उलट ती अधिक वाढते आणि याची अंतिम किंमत आपली मुलं मोजताहेत; राहुल गांधींचा हल्लाबोल, सरकारच्या कमाईचं 'गणित'ही सांगितलं
Share Market Crash : सेन्सेक्स 500 अंकांनी कोसळला, निफ्टी 23400 च्या खाली, शेअर मार्केट क्रॅश, गुंतवणूकदारांचे 3.75 लाख कोटी स्वाहा...
शेअर मार्केट क्रॅश, सेन्सेक्स 500 अंकांनी कोसळला, गुंतवणूकदारांचे 3.75 लाख कोटी स्वाहा...
Supreme Court on Neet Exam: सर्वोच्च न्यायालय म्हणाले, 'नीट फेरपरीक्षा केवळ लेखी स्वरूपातच घेतली जाईल, परीक्षा यंत्रणा आधीच दबावात, सध्या परीक्षेची पद्धत बदलणे शक्य नाही'
सर्वोच्च न्यायालय म्हणाले, 'नीट फेरपरीक्षा केवळ लेखी स्वरूपातच घेतली जाईल, परीक्षा यंत्रणा आधीच दबावात, सध्या परीक्षेची पद्धत बदलणे शक्य नाही'
पुण्यात विक्रम काकडेच राष्ट्रवादीचे उमेदवार, वळसे पाटलांनी स्पष्टच सांगितले; नाराजीबाबत जय पवारही बोलले
पुण्यात विक्रम काकडेच राष्ट्रवादीचे उमेदवार, वळसे पाटलांनी स्पष्टच सांगितले; नाराजीबाबत जय पवारही बोलले
Abhijeet Dipke: कॉकरोच जनता पार्टीचा संस्थापक अभिजित दीपके अमेरिकेतून भारतात येणार; राजधानी दिल्लीतील जंतर-मंतरवर आंदोलनाचा मुहूर्त सुद्धा ठरला!
कॉकरोच जनता पार्टीचा संस्थापक अभिजित दीपके अमेरिकेतून भारतात येणार; राजधानी दिल्लीतील जंतर-मंतरवर आंदोलनाचा मुहूर्त सुद्धा ठरला!
Abdul Sattar: भाजप शिवसेनेचं मुंडकं उडवण्याचं काम करतंय; अब्दुल सत्तारांचा खळबळजनक आरोप; म्हणाले, दोन्ही शिवसेना एकत्र आल्या पाहिजे!
भाजप शिवसेनेचं मुंडकं उडवण्याचं काम करतंय; अब्दुल सत्तारांचा खळबळजनक आरोप; म्हणाले, दोन्ही शिवसेना एकत्र आल्या पाहिजे!
Shekhar Gore Satara : ​
​"साहेब, मी नक्की कुठे चुकलो?" विधानपरिषदेची उमेदवारी हुकल्याने शेखर गोरेंची देवेंद्र फडणवीसांना भावनिक साद
Siddharth Jadhav on Ranveer Deepika Reception: 'बायकोला 10 व्या मिनिटांतच म्हणालो .. ' रणवीर-दीपिकाच्या रिसेप्शनमधून तातडीनं बाहेर पडला सिद्धार्थ जाधव; कारणही सांगितलं ..
'बायकोला 10 व्या मिनिटांतच म्हणालो .. ' रणवीर-दीपिकाच्या रिसेप्शनमधून तातडीनं बाहेर पडला सिद्धार्थ जाधव; कारणही सांगितलं ..
Embed widget