एक्स्प्लोर

Independence Day Monuments: देशातील 5 ऐतिहासिक स्मारक, ज्यांचा भारताच्या स्वातंत्र्याशी आहे संबंध

Independence Day Monuments: देश स्वतंत्र होऊन 75 वर्षे झाली आहेत. या निमित्त, वीरांची कथा सांगणारी तसेच धैर्य आणि बलिदानाच्या असंख्य कथा सामावलेली अशी अनेक स्मारके देशात आहेत.

Independence Day Monuments: 15 ऑगस्ट 2022 रोजी देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होतील. हा स्वातंत्र्यदिन (Independence Day 2022) खास बनवण्यासाठी सर्वत्र जय्यत तयारी सुरू आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव (Azadi ka Amrit Mahotsav) सुरू आहे. 75 व्या स्वातंत्र्य दिना निमित्ताने स्वातंत्र्याशी संबंधित आणि भारताचा वारसा असलेल्या पाच ऐतिहासिक स्मारकांबद्दल जाणून घ्या.

इंडिया गेट, नवी दिल्ली
पहिले महायुद्ध 1914-1918 आणि 1919 मधील तिसऱ्या अँग्लो-अफगाण युद्धात मरण पावलेल्या भारतीय सैनिकांना श्रद्धांजली वाहण्यासाठी इंडिया गेट बांधण्यात आले. हे युद्ध स्मारक म्हणून ओळखले जाते. 1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धात बलिदान दिलेल्या सैनिकांच्या स्मरणार्थ 1972 मध्ये इंडिया गेटवर अमर जवान ज्योती बांधण्यात आली होती. तेव्हापासून या वर्षीच्या पहिल्या दिवसापर्यंत ही ज्योत इथे धगधगत होती. 21 जानेवारी 2022 रोजी, प्रजासत्ताक दिनापूर्वी, भारत-पाकिस्तान युद्धाला 50 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल अमर जवान ज्योती राष्ट्रीय युद्ध स्मारकात विलीन आली.

लाल किल्ला, दिल्ली
दरवर्षी स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान देशाला संबोधित करतात आणि दिल्लीतील लाल किल्ल्याच्यावरून तिरंगा फडकवतात. जागतिक वारसामध्ये त्याचा समावेश आहे. मुघल सम्राट बहादूर शाह जफरनेही 1857 च्या बंडात सक्रिय सहभाग घेतला होता. स्वातंत्र्याच्या पहिल्या युद्धात भारतीय क्रांतिकारकांचा पराभव झाला आणि जफरला रंगूनला पाठवण्यात आले. तेथे त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर जेव्हा-जेव्हा लाल किल्ला ताब्यात घेतला गेला, तेव्हा तो भारताच्या स्वातंत्र्याशी जोडला गेला.

जालियनवाला बाग, पंजाब
जालियनवाला बाग हत्याकांडाने देशाच्या स्वातंत्र्याची आग आणखी भडकवली होती. बैसाखीच्या दिवशी नि:शस्त्र लोकांवर गोळ्या झाडण्यात आल्याने भारताच्या स्वातंत्र्यलढ्याला नवी दिशा मिळाली. यानंतर जे झाले, त्याचा परिणाम बराच काळ दिसून आला आणि 1947 मध्ये ब्रिटिशांना भारत सोडावा लागला.

सेल्युलर जेल, अंदमान आणि निकोबार
हे जेल (सेल्युलर जेल) काला पानी म्हणून ओळखले जाते. देखमध्ये जेव्हा स्वातंत्र्य आणि क्रांतीची मागणी सुरू होती, तेव्हा ब्रिटिशांनी त्याला वसाहती तुरुंग बनवले होते. ज्या क्रांतिकारकांपासून इंग्रजांना जास्त धोका वाटत होता, त्यांना काळ्या पाण्याची शिक्षा म्हणून या तुरुंगात ठेवण्यात आले असते. बटुकेश्वर दत्त, योगेश्वर शुक्ल, विनायक दामोदर सावरकर या स्वातंत्र्यसैनिकांना या तुरुंगात ठेवण्यात आले होते. आता त्याचे संग्रहालय आणि स्मारकात रूपांतर झाले आहे.

राणीचा किल्ला, झाशी
उत्तर प्रदेशातील झाशी येथे असलेला राणीचा किल्ला बंगीरा नावाच्या टेकडीवर बांधला आहे. इंग्रजांचा समूळ उच्चाटन करण्यात मोठी भूमिका बजावणाऱ्या शूर राणी लक्ष्मीबाईंच्या अदम्य धैर्याचा हा किल्ला साक्षीदार आहे. त्यांच्या धाडसाने इंग्रजांपासून ज्या प्रकारे आघाडी घेतली, तिथूनच खर्‍या अर्थाने स्वातंत्र्याची लढाई सुरू झाली. हा लढा पुढे क्रांतीत रूपांतरित झाला आणि अनेक क्रांतिकारकांनी इंग्रजांना येथून पळून जाण्यास भाग पाडले.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

प्रत्येक धर्मात अशोक खरातसारखे काही सडके आंबे निघतातच, नितेश राणेंचा हल्लाबोल, पीडित महिलांना सरकारशी संपर्क करण्याचं आवाहन
प्रत्येक धर्मात अशोक खरातसारखे काही सडके आंबे निघतातच, नितेश राणेंचा हल्लाबोल
Datta Meghe Passes Away : माजी मंत्री दत्ता मेघे यांचं निधन, वयाच्या 89 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Datta Meghe Passes Away : माजी मंत्री दत्ता मेघे यांचं निधन, वयाच्या 89 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
संतापजनक! 50 वर्षाच्या नराधमाने अल्पवयीन मुलीवर केला अत्याचार, परळीत पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल
संतापजनक! 50 वर्षाच्या नराधमाने अल्पवयीन मुलीवर केला अत्याचार, परळीत पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल
Nanded : नांदेडच्या प्रफुल्ल पाटील या तरुणानं नातं जपलं, भावाच्या निधनानंतर वहिनीसोबत विवाह, पोरका झालेला संसार सावरला
प्रफुल्ल पाटील या तरुणानं नातं जपलं, भावाच्या निधनानंतर वहिनीसोबत विवाह, पोरका झालेला संसार सावरला

व्हिडीओ

Ramdas Athwale on Ashok Kharat : नाशिकमधील खरात भोंदूबाबाला फाशीची शिक्षा द्या
Vinayak Raut On Deepak Kesarkar : खरातप्रकरणी विनायक राऊतांचे खळबळजनक दावे
Jaykumar Gore Satara : पालकमंत्र्यांचे आकांडतांडव आणि पोलिसांची हरेसमेंट थांबवा, देसाईंवर प्रहार
Rupali Thombare On Rupali Chakankar : भोंदूबाबा राज्य महिला आयोग चालवत होता- रुपाली ठोंबरे
Ashok Kharat Case : खरातविरोधात आणखी तीन पीडित महिलांची तक्रार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
प्रत्येक धर्मात अशोक खरातसारखे काही सडके आंबे निघतातच, नितेश राणेंचा हल्लाबोल, पीडित महिलांना सरकारशी संपर्क करण्याचं आवाहन
प्रत्येक धर्मात अशोक खरातसारखे काही सडके आंबे निघतातच, नितेश राणेंचा हल्लाबोल
Datta Meghe Passes Away : माजी मंत्री दत्ता मेघे यांचं निधन, वयाच्या 89 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Datta Meghe Passes Away : माजी मंत्री दत्ता मेघे यांचं निधन, वयाच्या 89 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
संतापजनक! 50 वर्षाच्या नराधमाने अल्पवयीन मुलीवर केला अत्याचार, परळीत पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल
संतापजनक! 50 वर्षाच्या नराधमाने अल्पवयीन मुलीवर केला अत्याचार, परळीत पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल
Nanded : नांदेडच्या प्रफुल्ल पाटील या तरुणानं नातं जपलं, भावाच्या निधनानंतर वहिनीसोबत विवाह, पोरका झालेला संसार सावरला
प्रफुल्ल पाटील या तरुणानं नातं जपलं, भावाच्या निधनानंतर वहिनीसोबत विवाह, पोरका झालेला संसार सावरला
Maharashtra Kesari नाशिकचा हर्षवर्धन सदगीर 68 वा 'महाराष्ट्र केसरी'; फॉर्च्यूनर जिंकणारा पहिला पैलवान, चांदीची गदा अन् बक्षिसांचा वर्षाव
नाशिकचा हर्षवर्धन सदगीर 68 वा 'महाराष्ट्र केसरी'; फॉर्च्यूनर जिंकणारा पहिला पैलवान, चांदीची गदा अन् बक्षिसांचा वर्षाव
पर्यटकांला अतिउत्साह नडला, फॉर्च्यूनर थेट समुद्रात अडकली; जेसीबी बोलवून बाहेर काढली, समुद्रकिनारी पाहायला गर्दी
पर्यटकांला अतिउत्साह नडला, फॉर्च्यूनर थेट समुद्रात अडकली; जेसीबी बोलवून बाहेर काढली, समुद्रकिनारी पाहायला गर्दी
ईदनिमित्ताने नातेवाईकांकडे जाताना कारला भीषण अपघात; परभणीत एकाच कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू
ईदनिमित्ताने नातेवाईकांकडे जाताना कारला भीषण अपघात; परभणीत एकाच कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू
Australia : ऑस्ट्रेलिया भारताविरुद्ध 5 कसोटी सामने खेळणार,बॉर्डर गावस्कर ट्रॉफीसाठी भारताचा दौरा करणार, 2026-27 चं वेळापत्रक जाहीर  
ऑस्ट्रेलिया भारताविरुद्ध 5 कसोटी सामने खेळणार,बॉर्डर गावस्कर ट्रॉफीसाठी भारताचा दौरा करणार, 2026-27 चं वेळापत्रक जाहीर  
Embed widget