एक्स्प्लोर

Health Tips : पेरूच्या पानांमुळे लठ्ठपणा होतो कमी, जाणून घ्या याचे अन्य फायदे

Health Tips : तुम्हालाही पटकन वजन कमी करायचे आहे ? पेरूच्या पानांचा वजन कमी करण्यासाठी चांगला उपयोग होतो.

Health Tips : बदलत्या जीवनशैलीमुळे अनेकजण शारीरिक तंदुरूस्त नसतात. वाढत्या वजनामुळे बहुतेकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. अशा स्थितीत प्रत्येकाला वजन कमी करायचे असते, त्यासाठी बरेच लोक जिममध्ये जातात आणि काही लोक घरी व्यायाम करतात. परंतु, फक्त व्यायामाने सर्व काही होत नाही. तर, वजन कमी करण्यासाठी योग्य आहार घेणे देखील खूप महत्वाचे आहे. इतकंच नाही तर, लोक वेगवेगळ्या गोष्टींचा वापर करतात जसे की वजन कमी करण्याची औषधे इ. ते अनेक प्रकारचे नुकसान करतात. अशा वेळी पेरूची पाने वजन कमी करण्यासाठी खूप प्रभावी आहेत. पेरूच्या पानांचे सेवन केल्याने अनेक प्रकारच्या समस्या दूर होतात.

पेरूच्या पानांमध्ये काय होते?

पेरूची पाने कॅलरी फ्री असतात, त्यामुळे ते वजन कमी करण्यात प्रभावी ठरतात. कारण पेरूची पाने खाल्ल्यानंतर जास्त वेळ भूक लागत नाही आणि पोट भरल्यासारखे वाटते. जेवणात पेरूची पाने चांगली दिसतात, परंतु जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही त्याचा रस बनवून पिऊ शकता. पेरूमध्ये कॅलरी फ्री आणि फायबरचे प्रमाण जास्त असल्याने वजन कमी होण्यास मदत होते. 

पेरूच्या पानांचे फायदे :

1 - पेरूच्या पानांमध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटीमाइक्रोबियल गुणधर्म आढळतात, जे शरीराला गॅस्ट्रिक अल्सरपासून संरक्षण करण्यास मदत करतात. त्यामुळे जर तुम्हाला गॅस्ट्रिक अल्सरचा त्रास होत असेल तर तुम्ही पेरूच्या पानांचे सेवन अवश्य करा.

2 - पेरूच्या पानांमध्ये अनेक घटक असतात जे अतिसार किंवा जुलाबात फायदेशीर ठरतात.

3 - जर तुम्हाला खोकला, खाज सुटणे इत्यादी त्रास होत असेल तर तुम्ही पेरूच्या पानांचे सेवन करावे, कारण त्यामध्ये अँटी-एलर्जिक गुणधर्म असतात ज्यामुळे शरीराला आराम मिळतो.

4 - पेरूच्या पानांमध्ये असे अनेक घटक असतात जे शरीराला कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतात. इतकेच नाही तर शरीरातील रक्ताभिसरण सुधारते आणि हृदयविकाराच्या समस्याही दूर ठेवतात.

5 - मधुमेहाने त्रस्त असलेल्या व्यक्तीला रक्तातील साखरेची पातळी वाढण्याची समस्या नेहमीच असते. अशा परिस्थितीत पेरूच्या पानांचे सेवन केल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते आणि शरीराला त्रासापासून दूर ठेवते. अशा स्थितीत पेरूच्या पानांचा रस पिणे सर्वात महत्त्वाचे आहे, तेही सकाळी रिकाम्या पोटी, तरच ते गुणकारी असल्याचे सिद्ध होते.

6 - पेरूच्या पानांमध्ये असे अनेक घटक असतात जे पोटाच्या सर्व समस्या दूर ठेवतात. पेरूची पाने बद्धकोष्ठता, जुलाब या सर्व गोष्टींवर खूप फायदेशीर ठरतात.

पेरूच्या पानांचे सेवन कसे करावे ?

जर तुम्ही असे खात नसाल तर तुम्ही पेरूच्या पानांपासून चहा बनवून त्याचे सेवन करू शकता. पेरूच्या पानांपासून बनवलेल्या चहाचे सेवन सकाळी रिकाम्या पोटी करावे, त्यामुळे त्याचा शरीरावर अधिक परिणाम होऊ शकतो. चला तर मग जाणून घेऊया पेरूच्या पानांचा चहा कसा बनवला जातो. 

1. सर्वप्रथम पेरूची 5-6 पाने घ्या.
2. चांगली धुवा.
3. आता एक भांडे घ्या त्यात पाणी घालून पाने व्यवस्थित धुवा.
4. आता पाने 10 मिनिटे चांगली उकळा.
5. आता ते गाळून चहाप्रमाणे सेवन करा.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

महत्वाच्या बातम्या : 

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

Health: पावसात भिजल्यानंतर मुलांचे ओले कपडे तसेच ठेवताय? वाढू शकतो युटीआय संसर्गाचा गंभीर धोका
पावसात भिजल्यानंतर मुलांचे ओले कपडे तसेच ठेवताय? वाढू शकतो युटीआय संसर्गाचा गंभीर धोका
Navi Mumbai : घशात अडकलेल्या माशाच्या काट्यामुळे जीवावर बेतले; नवी मुंबईतील मेडिकव्हरमध्ये दोन रुग्णांवर यशस्वी उपचार
घशात अडकलेल्या माशाच्या काट्यामुळे जीवावर बेतले; नवी मुंबईतील मेडिकव्हरमध्ये दोन रुग्णांवर यशस्वी उपचार
Child Health: शाळा, प्रवासात टाईप - 1 मधुमेही मुलांची काळजी कशी घ्याल? किशोरवयीन मुलांमध्ये सर्वाधिक आढळणारा आजार, डॉक्टर सांगतात...
शाळा, प्रवासात टाईप - 1 मधुमेही मुलांची काळजी कशी घ्याल? किशोरवयीन मुलांमध्ये सर्वाधिक आढळणारा आजार, डॉक्टर सांगतात...
Ear Wax : कॉटन बडने कान साफ करता? ही सवय ठरू शकते धोकादायक, तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला
कॉटन बडने कान साफ करता? ही सवय ठरू शकते धोकादायक, तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला

व्हिडीओ

Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CJP : 'जेपी नड्डा यांना लाज वाटली पाहिजे', लोकांची डोकी फोडली, हिच का तुमची चाणक्य नीती?' CJPचे मुख्य प्रवक्ते सौरभ दास संतापले, म्हणाले, सरकारकडे एकच पर्याय...
'जेपी नड्डा यांना लाज वाटली पाहिजे', लोकांची डोकी फोडली, हिच का तुमची चाणक्य नीती?' कॉक्रोच जनता पक्षाचे मुख्य प्रवक्ते सौरभ दास संतापले, सरकारला इशारा
Parth Pawar : तुम्ही आज आमच्यात नाही, ही उणीव फक्त पवार कुटुंबालाच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राला जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
प्रत्येक पावलावर तुमची उणीव जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
Sonam Wangchuk: ...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
Rahul Gandhi: मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
Embed widget