![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Health Tips : फळं खाताना 'या' चुका कधीच करू नका; आरोग्यावर होतात गंभीर परिणाम
Health Tips : फक्त लहान मुलेच नाही तर प्रौढ देखील फळे खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिताना दिसतात. फळे खाल्ल्यानंतर पाणी प्यायल्याने पचनसंस्थेतील पीएच पातळी असंतुलित होऊ शकते.
![Health Tips : फळं खाताना 'या' चुका कधीच करू नका; आरोग्यावर होतात गंभीर परिणाम Health Tips these mistakes to avoid during eating fruits it may harm your health marathi news Health Tips : फळं खाताना 'या' चुका कधीच करू नका; आरोग्यावर होतात गंभीर परिणाम](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/14/b4e327db9bde3b5725ce7efbaaa7dfe21673709340945358_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Health Tips : निरोगी आणि हेल्दी राहण्यासाठी प्रत्येकाने फळांचं सेवन केलं पाहिजे. फळ ही निसर्गाची सर्वात सुंदर देणगी आहे. फळं अनेक गंभीर आजारांपासून संरक्षण करण्याचे काम करतात. जर तुम्ही रोज फळं खाल्ली तर तुम्हाला नक्कीच त्याचे फायदे जाणवतील. प्रत्येकाने आपल्या दिनक्रमात फळांचा समावेश करावा. फळांमध्ये जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात, ज्यांची शरीराला भरपूर गरज असते. तथापि, बरेच लोक चुकीच्या पद्धतीने फळांचे सेवन करतात, जे फायदेशीर होण्याऐवजी हानिकारक ठरू शकतात. फळांचे सेवन करताना कोणकोणत्या चुका टाळण्याचा प्रयत्न करावा ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
फळं खाताना 'या' गोष्टी टाळा
इतर अन्नापेक्षा फळे आपल्या शरीरात लवकर पचतात. फळे इतर कोणत्याही अन्नात मिसळून खाल्ल्यास शरीरात विषारी द्रव्ये तयार होतात. दोन अन्नपदार्थ मिसळल्याने पचनक्रिया मंदावते. त्यामुळे फळांपासून शरीराला मिळणाऱ्या पोषकतत्त्वांचे प्रमाणही कमी होते. म्हणूनच फळे वेगळे सेवन करणे केव्हाही चांगले.
रात्री फळ खाणं टाळा
झोपण्याच्या 2-3 तास आधी काहीही खाणे टाळावे, कारण यामुळे पचनाशी संबंधित समस्या उद्भवण्याची शक्यता नसते आणि पचनक्रियाही चांगली राहते. रात्रीच्या वेळी फळे खाणे आरोग्यासाठी अजिबात सुरक्षित नाही. झोपण्यापूर्वी फळांचे सेवन केल्याने झोपेचा त्रास होण्याची शक्यता असते. याचे कारण असे आहे की फळात गोडाचं प्रमाण असतं. ज्यामुळे झोपताना शरीरातील ऊर्जा पातळी वाढू शकते. रात्रीच्या वेळी आपली पोषक द्रव्ये शोषून घेण्याची क्षमता खूप कमी होते. याशिवाय रात्री फळे खाल्ल्याने अॅसिडिटीची लक्षणे दिसू शकतात. संध्याकाळचा नाश्ता म्हणून फळांचे सेवन तुम्ही करू शकता. मात्र, त्यानंतर फळं खाणं टाळा.
लगेच पाणी पिणे टाळा
फक्त लहान मुलेच नाही तर प्रौढ देखील फळे खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिताना दिसतात. फळे खाल्ल्यानंतर पाणी प्यायल्याने पचनसंस्थेतील पीएच पातळी असंतुलित होऊ शकते, विशेषत: टरबूज, काकडी, संत्र किंवा स्ट्रॉबेरी, कलिंगड यांसारख्या उच्च पाण्याचे प्रमाण असलेली फळे खाल्ल्याने हा त्रास होतो. कारण भरपूर पाणी असलेली फळे तुमच्या पोटातील आम्लता कमी करून पीएच संतुलन बदलू शकतात. असे केल्याने डायरिया किंवा कॉलरासारखे गंभीर आजार होण्याची शक्यताही वाढू शकते, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.
फळांची साल खाऊ नका
सफरचंदाच्या सालींमध्ये भरपूर फायबर, जीवनसत्त्वे सी आणि ए असतात. एका संशोधनानुसार फळांची साल खाल्ल्याने लठ्ठपणा आणि कर्करोगाचा धोका कमी होतो.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्त्वाच्या बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)