एक्स्प्लोर

Agnipath Scheme : अग्निपथ योजनेला विरोध होत असताना वायुसेनेत भरती प्रक्रियेला सुरुवात, जाणून घ्या कशी असेल प्रक्रिया

Agnipath Scheme Recruitment : भारतीय वायुसेनेमध्ये अग्निपथ योजनेअंतर्गत भरतीसाठी नोंदणी केलेल्या उमेदवारांची 24 जुलै ते 31 जुलै या दरम्यान ऑनलाइन परीक्षा घेतली जाईल.

Agnipath Scheme Recruitment : केंद्र सरकारच्या नवीन अग्निपथ योजनेविरोधात (Agneepath Scheme) देशभरात आंदोलनं सुरु असताना आजपासून भारतीय वायुसेनेमध्ये आजपासून अग्निपथ योजनेअंतर्गत भरती प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. या भरतीसाठी नोंदणी केलेल्या उमेदवारांची 24 जुलै ते  31 जुलै दरम्यान ऑनलाइन परीक्षा घेतली जाईल. भारतीय वायुदलात अग्निपथ योजने अंतर्गत भरतीसाठीच्या नोंदणी प्रक्रियेला आजपासून सुरुवात झाली आहे. ही प्रक्रिया 5 जुलैपर्यंत सुरु राहील. यानंतर ऑनलाइन परीक्षा घेतली जाईल. परीक्षेमध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांना अग्निवीर बनण्याची संधी मिळेल.

30 डिसेंबरपासून प्रशिक्षणाला सुरुवात
भारती वायुसेनेसाठी अग्निपथ योजनेअंतर्गत नोंदणी केलेल्या उमेदवारांची 24 जुलै ते 31 जुलै या दरम्यान ऑनलाइन परीक्षा घेतली जाईल. यानंतर  21 ऑगस्ट ते 28 ऑगस्ट दरम्यान शारीरिक चाचणी होईल. त्यापुढे 29 ऑगस्ट ते 8 नोव्हेंबरपर्यंत वैद्यकीय चाचणी होईल. यामध्ये पात्र ठरणाऱ्या उमेदवारांची यादी 1 डिसेंबर रोजी जारी करण्यात येईल. यानंतर 30 डिसेंबरपासून त्यांच्या प्रशिक्षणाला (Training) सुरुवात होईल.

योजनेला देशभरातून मोठा विरोध
कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून तिन्ही सैन्यात भरती प्रक्रिया रखडली होती. त्यानंतर केंद्र सरकार आणि लष्कराने अग्निपथ योजनेची घोषणा केली. अग्निपथ योजनेंतर्गत भरती झालेल्या 75 टक्के सैनिकांना चार वर्षांनी निवृत्त व्हावं लागेल. लष्करात अवघ्या चार वर्षांसाठी निवडीबाबतच्या या योजनेला देशभरात विरोध होत आहे. या योजनेला सर्व राज्यातील विद्यार्थी विरोध करत रस्त्यावर उतरले आहेत. त्याचबरोबर राजकीय पक्षही सरकारच्या योजनेला सातत्याने विरोध करत आहेत. मात्र, ही योजना मागे घेतली जाणार नसून याअंतर्गत पुढील भरती होणार असल्याचं लष्कराकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

अग्निवीरांसाठी 'या' सुविधा
भारतीय हवाई दलाकडून सांगण्यात आले आहे की, अग्निवीरांना नियमित सैनिकांप्रमाणेच भत्ता मिळेल. सर्व अग्निवीरांना वर्षातून 30 दिवसांची सुट्टी मिळेल. प्रत्येक अग्निवीरला 48 लाख रुपयांचे विमा संरक्षण मिळेल. याशिवाय सेवेदरम्यान वीरगती आल्यास त्यांच्या कुटुंबीयांना सुमारे एक कोटी रुपयांची मदत दिली जाईल. अग्निवीरांना कॅन्टीन सुविधा देण्याची घोषणाही करण्यात आली आहे. यासोबतच चार वर्षांनंतर निवृत्त होणाऱ्या अग्निवीरांना अनेक सरकारी सेवांमध्ये आरक्षण आणि प्राधान्य देण्यात येणार असल्याचंही वायू दलाने सांगितलं आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महापुरात जमीन खरडून गेली, शेतकऱ्यांचा आक्रोश संपेना; राज्य सरकारनं केंद्राला प्रस्तावच पाठवला नाही; केंद्रीय कृषीमंत्र्यांनीच दिली माहिती
महापुरात जमीन खरडून गेली, शेतकऱ्यांचा आक्रोश संपेना; राज्य सरकारनं केंद्राला प्रस्तावच पाठवला नाही; केंद्रीय कृषीमंत्र्यांनीच दिली माहिती
IND vs SA 2nd ODI LIVE Score : दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकली! टेम्बा बावुमाचा मोठा निर्णय, संघात 3 मोठे बदल; जाणून घ्या टीम इंडियाची Playing XI
IND vs SA LIVE : दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकली! टेम्बा बावुमाचा मोठा निर्णय, संघात 3 मोठे बदल; जाणून घ्या टीम इंडियाची Playing XI
China Condom Tax: चीनमध्ये कंडोमवर लावलेल्या महाकाय टॅक्सने घेणाऱ्यांना घामटा फुटायची वेळ आली! असा निर्णय का घेतला?
चीनमध्ये कंडोमवर लावलेल्या महाकाय टॅक्सने घेणाऱ्यांना घामटा फुटायची वेळ आली! असा निर्णय का घेतला?
सोनिया गांधी थेट भाजपच्या उमेदवार! उमेदवारी देत निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं, तगडा मुकाबला रंगला
सोनिया गांधी थेट भाजपच्या उमेदवार! उमेदवारी देत निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं, तगडा मुकाबला रंगला
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Devendra Fadnavis Meet Sanjay Raut : देवेंद्र फडणवीसांनी घेतली संजय राऊतांची भेट
Maharashtra Municipal Election 2025 : जिल्हा परिषदांऐवजी महापालिका निवडणूक आधी होणार?
Santosh Banger Hingoli : बांगरांचा कारनामा, बातमीनंतर गुन्हा Special Report
Nagar Panchayat, Nagar Parishad Election : चांदा ते बांदा; जिल्ह्यात कुठे कुठे राडा? Special Report
Maharashtra Local Body Election Result :निवडणुकांच्या निकालाचा नवा' कायदेशीर मुहूर्त' Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महापुरात जमीन खरडून गेली, शेतकऱ्यांचा आक्रोश संपेना; राज्य सरकारनं केंद्राला प्रस्तावच पाठवला नाही; केंद्रीय कृषीमंत्र्यांनीच दिली माहिती
महापुरात जमीन खरडून गेली, शेतकऱ्यांचा आक्रोश संपेना; राज्य सरकारनं केंद्राला प्रस्तावच पाठवला नाही; केंद्रीय कृषीमंत्र्यांनीच दिली माहिती
IND vs SA 2nd ODI LIVE Score : दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकली! टेम्बा बावुमाचा मोठा निर्णय, संघात 3 मोठे बदल; जाणून घ्या टीम इंडियाची Playing XI
IND vs SA LIVE : दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकली! टेम्बा बावुमाचा मोठा निर्णय, संघात 3 मोठे बदल; जाणून घ्या टीम इंडियाची Playing XI
China Condom Tax: चीनमध्ये कंडोमवर लावलेल्या महाकाय टॅक्सने घेणाऱ्यांना घामटा फुटायची वेळ आली! असा निर्णय का घेतला?
चीनमध्ये कंडोमवर लावलेल्या महाकाय टॅक्सने घेणाऱ्यांना घामटा फुटायची वेळ आली! असा निर्णय का घेतला?
सोनिया गांधी थेट भाजपच्या उमेदवार! उमेदवारी देत निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं, तगडा मुकाबला रंगला
सोनिया गांधी थेट भाजपच्या उमेदवार! उमेदवारी देत निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं, तगडा मुकाबला रंगला
Jay Pawar Rutuja Patil wedding: जय पवारांचा बहारीनमध्ये ग्रँड विवाहसोहळा, संगीत-मेंहदीच्या कार्यक्रमाला खास ड्रेस कोड, फक्त 400 जणांना निमंत्रण
जय पवारांचा बहारीनमध्ये ग्रँड विवाहसोहळा, संगीत-मेंहदीच्या कार्यक्रमाला खास ड्रेस कोड, फक्त 400 जणांना निमंत्रण
Palash Muchhal: सांगलीत शाही लग्न होता होता अचानक थांबल्यानंतर पलाश मुच्छल मास्क घालून कोणाच्या दरबारात पोहोचला?
सांगलीत शाही लग्न होता होता अचानक थांबल्यानंतर पलाश मुच्छल मास्क घालून कोणाच्या दरबारात पोहोचला?
Prithviraj Chavan: सरकारला पुढील 15 दिवस घालमेल करायची असेल तर करेल, लोकांचा निवडणूक प्रक्रियेवरचा विश्वास उडत चालला आहे; पृथ्वीराज चव्हाणांचा हल्लाबोल
सरकारला पुढील 15 दिवस घालमेल करायची असेल तर करेल, लोकांचा निवडणूक प्रक्रियेवरचा विश्वास उडत चालला आहे; पृथ्वीराज चव्हाणांचा हल्लाबोल
Saksham Tate case: पोलिस अन् मित्रांनी भावाला भडकवलं; आचल मामीडवारच्या वक्तव्यामुळे सक्षमच्या प्रकरणाला वेगळं वळणं, त्यादिवशी नेमकं काय घडलं होतं?
पोलिस अन् मित्रांनी भावाला भडकवलं; आचल मामीडवारच्या वक्तव्यामुळे सक्षमच्या प्रकरणाला वेगळं वळणं, त्यादिवशी नेमकं काय घडलं होतं?
Embed widget