एक्स्प्लोर

Marathi Serial Updates : 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' मालिका कधी निरोप घेणार? ऐश्वर्या नारकरांनी सांगितलं

Aishwarya Narkar : मालिकेत वेगवेगळे ट्विस्ट आलेत. या ट्विस्टमुळे कथानकात बदल होत असल्याने प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली. त्यामुळे प्रेक्षकांकडूनच मालिका बंद करण्याची मागणी करण्यात येत होती.

Marathi Serial Updates :  छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' (Satvya Mulichi Satvi Mulgi) सध्या रंगतदार वळणावर आहे. नेत्रा आणि विरोचकमध्ये वार-पलटवार सुरू आहे.सस्पेन्स, थ्रिलर असलेल्या मालिकेत वेगवेगळे ट्विस्ट आलेत. या ट्विस्टमुळे कथानकात बदल होत असल्याने  प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली. त्यामुळे प्रेक्षकांकडूनच मालिका बंद करण्याची मागणी करण्यात येत होती. आता,  मालिकेत प्रमुख भूमिका साकारणाऱ्या ऐश्वर्या नारकर (Aishwarya Narkar) यांनी यावर भाष्य केले आहे. 

झी मराठीवरील 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' या मालिकेला नुकतेच 500 भाग पूर्ण झाले. या मालिकेत सध्या वरचढ ठरत असलेल्या विरोचकाला त्रिनयना देवीच्या लेकी छोबीपछाड देण्याच्या तयारीत आहे. आस्तिका कोण आणि नेत्रा कोण याचा उलगडा घरातील सदस्यांना झाला आहे. त्यामुळे आता विरोचक आणि त्रिनयना देवीची मुलगी असलेल्या नेत्रामध्ये युद्ध कधी होईल याची प्रेक्षकांनी उत्सुकता लागली आहे. 

मालिकेचा शेवट कधी होणार?

‘इट्स मज्जा’या वेब पोर्टलसोबत बोलताना अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांनी मालिकेतील आपल्या रुपाली म्हात्रे या व्यक्तिरेखेबाबत बोलताना सांगितले की, मालिकेतील सुरुवातीचे काही भाग छान होते. त्या व्यक्तीरेखेतील खलनायकी छटा बाहेर आली नव्हती. हळूहळू ही छटा बाहेर येऊ लागली.रुपालीच्या भूमिकेने खूप काही दिले. एखाद्या चौकटीबाहेरची भूमिका मिळणे हे आव्हानात्मक असते. रुपालीची भूमिका ही अशीच होती असेही ऐश्वर्या नारकर यांनी सांगितले.

'सातव्या मुलीची सातवी मुलगी' मध्ये विरोचक आणि त्रिनयना देवीच्या मुलींमध्ये युद्ध होईल. या युद्धात विरोचकाचा शेवट झाल्यानंतर मालिकेचा शेवट होईल असेही त्यांनी सांगितले. विरोचक संपल्यानंतर मालिकेला काही अर्थच राहणार नाही, त्यामुळे मालिका संपू शकते असा अंदाज त्यांनी वर्तवला. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

मालिकेत सध्या रंगतदार वळण आले आहे. खरी नेत्रा कोण आहे, याचा उलगडा घरातील लोकांना झाला आहे. त्यामुळे आस्तिकाला उघडे पाडण्यासाठी नेत्रा आणि इतर सदस्य डावपेच लढवत आहे. येत्या काही एपिसोडमध्ये आस्तिकाचा वध नेत्राकडून होणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत. 

इतर संबंधित बातम्या: 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Monsoon Update : आनंदाच्या सरी पोहोचल्या काही तासांच्या अंतरावर; केरळसह राज्यात मान्सून वेळेवर दाखल होण्याचा अंदाज
आनंदाच्या सरी पोहोचल्या काही तासांच्या अंतरावर; केरळसह राज्यात मान्सून वेळेवर दाखल होण्याचा अंदाज
Narayan Vaghul : प्रख्यात बँकर आणि ICICI चे माजी अध्यक्ष नारायण वाघुल यांचं निधन, 88 व्या वर्षी चेन्नईत घेतला अखेरचा श्वास
प्रख्यात बँकर आणि ICICI चे माजी अध्यक्ष नारायण वाघुल यांचं निधन, 88 व्या वर्षी चेन्नईत घेतला अखेरचा श्वास
नाशिकजवळ गोदान एक्सप्रेसच्या डब्ब्याखालून धूर, जीवाच्या आकांतेने प्रवाशांच्या उड्या; गाडी रवाना
नाशिकजवळ गोदान एक्सप्रेसच्या डब्ब्याखालून धूर, जीवाच्या आकांतेने प्रवाशांच्या उड्या; गाडी रवाना
निवडणुकीनंतर अमोल कीर्तिकर भाजपसोबत जातील, 100 टक्के जाणार; प्रकाश आंबेडकरांचा मोठा दावा
निवडणुकीनंतर अमोल कीर्तिकर भाजपसोबत जातील, 100 टक्के जाणार; प्रकाश आंबेडकरांचा मोठा दावा
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Kalyan Loksabha News : कल्याण मतदारसंघात कुणाचं पारडं जड? कोण मारणार बाजी? कल्याणकरांचं मत कुणाला?Uddhav Thackeray On Police : कार्यकर्त्यांवर हल्ला करणाऱ्या पोलिसांना सोडणार नाही; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोलVibhav Kumar Arrest News : केजरीवाल यांचे पीए विभव कुमार यांना अटकChanda Te Banda Superfast News : चांदा ते बांदा: सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर : 18 May 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Monsoon Update : आनंदाच्या सरी पोहोचल्या काही तासांच्या अंतरावर; केरळसह राज्यात मान्सून वेळेवर दाखल होण्याचा अंदाज
आनंदाच्या सरी पोहोचल्या काही तासांच्या अंतरावर; केरळसह राज्यात मान्सून वेळेवर दाखल होण्याचा अंदाज
Narayan Vaghul : प्रख्यात बँकर आणि ICICI चे माजी अध्यक्ष नारायण वाघुल यांचं निधन, 88 व्या वर्षी चेन्नईत घेतला अखेरचा श्वास
प्रख्यात बँकर आणि ICICI चे माजी अध्यक्ष नारायण वाघुल यांचं निधन, 88 व्या वर्षी चेन्नईत घेतला अखेरचा श्वास
नाशिकजवळ गोदान एक्सप्रेसच्या डब्ब्याखालून धूर, जीवाच्या आकांतेने प्रवाशांच्या उड्या; गाडी रवाना
नाशिकजवळ गोदान एक्सप्रेसच्या डब्ब्याखालून धूर, जीवाच्या आकांतेने प्रवाशांच्या उड्या; गाडी रवाना
निवडणुकीनंतर अमोल कीर्तिकर भाजपसोबत जातील, 100 टक्के जाणार; प्रकाश आंबेडकरांचा मोठा दावा
निवडणुकीनंतर अमोल कीर्तिकर भाजपसोबत जातील, 100 टक्के जाणार; प्रकाश आंबेडकरांचा मोठा दावा
डॉक्टरच पोटात घ्यायचा अर्भकांचा जीव अन् शेतात पुरायचा मृतदेह; संभाजीनगरातील रॅकेटचा पर्दाफाश!
डॉक्टरच पोटात घ्यायचा अर्भकांचा जीव अन् शेतात पुरायचा मृतदेह; संभाजीनगरातील रॅकेटचा पर्दाफाश!
Girish Mahajan : भाजपने पाठिंबा दिल्याचा शांतीगिरी महाराजांचा दावा; संकटमोचक गिरीश महाजन म्हणाले...
भाजपने पाठिंबा दिल्याचा शांतीगिरी महाराजांचा दावा; संकटमोचक गिरीश महाजन म्हणाले...
Telly Masala : 'तारक मेहता...'चा सोढी 25 दिवसांनी घरी परतला ते हंसत मेहतांची 'स्कॅम 2010' वादात; जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित महत्त्वाच्या बातम्या
'तारक मेहता...'चा सोढी 25 दिवसांनी घरी परतला ते हंसत मेहतांची 'स्कॅम 2010' वादात; जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित महत्त्वाच्या बातम्या
Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीत ब्रँड मोदींसमोर कोणाचं सर्वात मोठं आव्हान? प्रशांत किशोर यांचा खुलासा
लोकसभा निवडणुकीत ब्रँड मोदींसमोर कोणाचं सर्वात मोठं आव्हान? प्रशांत किशोर यांचा खुलासा
Embed widget