एक्स्प्लोर

सध्याच्या बेलगाम भाजप नेत्यांनी तोंडावर जरा लगाम घालावा : अभिनेते विक्रम गोखले

राजा एकटा चांगला असून उपयोग नाही. त्याच्या हाताखालच्या फळ्यांमधील लोकांनी जरा लगाम घालावा, असेही गोखले यावेळी म्हणाले. मोदींची जी शिस्त आहे, ती शिस्त भाजपात रुजली पाहिजे. तुम्ही वैचारिक गोष्टी बोला, असा सल्लाही विक्रम गोखले यांनी यावेळी दिला.

मुंबई : आज खुलेआम बेलगाम वक्तव्य केली जातात. भाजपचे काही नेतेही अनेकदा बेलगाम वक्तव्य करतात. अशा नेत्यांना ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून शिस्त आणि सभ्यता शिकण्याचा सल्ला दिला आहे. भाजपचे सध्याचे जे नेते आहेत. त्यांनी तोंडावर जरा लगाम घातला पाहिजे.  राजा एकटा चांगला असून उपयोग नाही. त्याच्या हाताखालच्या फळ्यांमधील लोकांनी जरा लगाम घालावा, असेही गोखले यावेळी म्हणाले. मोदींची जी शिस्त आहे, ती शिस्त भाजपात रुजली पाहिजे. तुम्ही वैचारिक गोष्टी बोला, असा सल्लाही विक्रम गोखले यांनी यावेळी दिला. एबीपी माझाच्या कट्ट्यावर बोलताना त्यांनी विविध विषयांवर आपली मतं व्यक्त केली. 'लोकशाहीची गळचेपी होत आहे असं म्हणणाऱ्यांच्या मुस्काटात मारली पाहिजे' असं म्हणणं हा माझा क्षणिक उद्वेग होता, असे स्पष्टीकरण देखील त्यांनी यावेळी दिले. यावेळी त्यांनी मी असं जरी म्हटलं असं कुणीही करू नये, असेही त्यांनी सांगितले. पाकिस्तान जिंदाबाद असं म्हणणाऱ्यांना गोळ्या घातल्या पाहिजेत, अशी मी म्हटलं होतं, तो देखील माझा क्षणिक उद्वेग होता, असेही ते म्हणाले. माझ्या या विधानावर सोशल मीडियावर अश्लाघ्य भाषेत टीका झाल्या. मात्र लोकांना बोलायचे स्वातंत्र्य आहे. लोकशाही आहे. अटलजींच्या वेळचा भाजप वेगळा आणि आताच वेगळा आहे, असेही गोखले यावेळी म्हणाले. सोबतच 'चौकीदार' वरून होणार राजकारण खालच्या पातळीवरच आहे. शेतकरी आणि जवानांचा वापर राजकारणासाठी करणे अत्यंत चुकीचं आहे, असेही ते म्हणाले. राज ठाकरेंची भाषणं मनोरंजनासाठी ऐकावी आणि टाळ्या वाजवाव्या : विक्रम गोखले मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भाषणं ही केवळ मनोरंजनासाठी ऐकावी आणि टाळ्या वाजवाव्या, अशी प्रतिक्रिया विक्रम गोखले यांनी दिली.  राज ठाकरे यांच्या सभांविषयी प्रश्न विचारला असता त्यांनी राज ठाकरेंची भाषणं  केवळ मनोरंजनासाठी असल्याचे म्हटले आहे. राज ठाकरेंचे व्हिडीओ किती खरे आणि किती खोटे आहेत, याबाबत कल्पना नाही. मात्र मनोरंजनासाठी राज ठाकरेंची भाषण बघावी आणि टाळ्या वाजवाव्यात. राज ठाकरे हे छोटे आहेत. त्यांनी दाखविलेले व्हिडीओ किती खरे किती खोटे आहेत हे तपासण्याची यंत्रणा आपल्याकडे आहे, असे गोखले म्हणाले. यावेळी त्यांनी शरद पवार यांच्यावर देखील टीका केली. राष्ट्रवादीचे नेते शरद पवारांनी बारामतीचा विकास केला. मात्र बारामतीसारखा विकास त्यांनी संपूर्ण महाराष्ट्राचा करायला हवा होता. राष्ट्रवादीत एकमेव व्हिजनरी माणूस म्हणजे शरद पवार हे आहेत. मात्र त्यांनी महाराष्ट्राचा विकास का केला नाही? असा सवाल देखील गोखले यांनी केला. त्यांचे ईव्हीएमबद्दलचे विधान चुकीचे असल्याचेही ते म्हणाले. यावेळी त्यांनी सरकारच्या धोरणांवरही टीका केली. या सरकारने नोटाबंदीचा निर्णय घ्यायला घाई केली. मी अर्थशास्त्रज्ञ नाही. मात्र अर्थशास्त्रज्ञांनी नोटाबंदी ही चुकीची असल्याचं सांगितलं आहे. ही नोटाबंदी नंतरही करता आली असती. नोटाबंदीमुळे काळा पैसा कुठेही थांबणार नाही. नोटाबंदीने काहीच साध्य झालं नाही, असेही ते यावेळी म्हणाले. बुलेट ट्रेन ही प्राथमिकता नाही. या देशातला सामान्य माणूस पाणी, आरोग्य, रस्ते अशा मूलभूत सोयींसाठी झगडत आहे, त्यावेळी अशा गोष्टींची गरज नाही, असेही गोखले यावेळी म्हणाले. कुठेही हत्या होणे हे वाईटच आहे. मात्र अशा हत्या आधी कधीच झाल्या नाहीत का? विचारवंतांना कधीच अटक झाली नाही का? याचा अर्थ असा नाही की आता होतंय ते बरोबर होतं आहे, असेही गोखले यावेळी म्हणाले. नयनतारा सहगल यांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य द्यायला हवं होतं. त्यांना त्यांची भावना मांडू न देणे ही सरकारची चूकच आहे. मी या गोष्टीचा निषेध करतो, असेही ते म्हणाले.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

अशोक खरातवर चित्रपट, दीपाली सय्यद रुपाली चाकणकरांच्या भूमिकेत, धमक्यांबाबत गृहराज्यमंत्री योगेश कदम म्हणाले...
अशोक खरातवर चित्रपट, दीपाली सय्यद रुपाली चाकणकरांच्या भूमिकेत, धमक्यांबाबत गृहराज्यमंत्री योगेश कदम म्हणाले...
'बॉलिवूडवाले मराठी कलाकारांना किंमत देत नाहीत, घाटी म्हणतात...'; वैभव मांगलेंनी सांगितलं धक्कादायक वास्तव
'बॉलिवूडवाले मराठी कलाकारांना किंमत देत नाहीत, घाटी म्हणतात...'; वैभव मांगलेंनी सांगितलं धक्कादायक वास्तव
Mi Savitribai Jyotirao Phule: 'मी सावित्रीबाई जोतीराव फुले' मालिकेत उलगडणार इतिहासातील सर्वात मोठी क्रांती, नेमकं घडणार काय?
'मी सावित्रीबाई जोतीराव फुले' मालिकेत उलगडणार इतिहासातील सर्वात मोठी क्रांती, नेमकं घडणार काय?
Shivangi Verma: प्रसिद्ध अभिनेत्रीच्या डोक्यावरुन आईचं छत्र हरपलं, शिवांगी वर्मा खचली; दु:खद प्रसंगात चाहत्यांकडून सपोर्ट
प्रसिद्ध अभिनेत्रीच्या डोक्यावरुन आईचं छत्र हरपलं, शिवांगी वर्मा खचली; दु:खद प्रसंगात चाहत्यांकडून सपोर्ट

व्हिडीओ

Manoj Jarange Patil Jalna : काही मंत्री काम करतात पण 'चालक'च काम करत नाही - मनोज जरांगे पाटील
Mumbai Sanjay Raut PC : रेडे कापून आलेले सरकार कुर्बाणीला विरोध करतंय, मांसाहार करणारच! - संजय राऊत
BMC Sudhar Samiti Special Report : मध्यरात्रीच्या घडामोडी, शिंदेंवर कुरघोडी? | ABP Majha
Vidhanparishad Election Special Report : अंतिम जागावाटपावर तिन्ही पक्षाचं समाधान कधी? | ABP Majha
NCP Meeting Special Report : आव्हानांचा चक्रव्यूह सुनेत्रा पवार कसा भेदणार? | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विलासराव ते अहमद पटेलांपर्यंत, काँग्रेसचे राष्ट्रीय 'संकटमोचक', 'रिसॉर्ट पॉलिटिक्स'मध्ये भाजपची ऑपरेशन लोटसची डाळ शिजू दिली नाही; जेलमध्ये जाऊनही डगमगले नाहीत, कोण आहेत डीके शिवकुमार?
विलासराव ते अहमद पटेलांपर्यंत, काँग्रेसचे राष्ट्रीय 'संकटमोचक', 'रिसॉर्ट पॉलिटिक्स'मध्ये भाजपची ऑपरेशन लोटसची डाळ शिजू दिली नाही; जेलमध्ये जाऊनही डगमगले नाहीत, कोण आहेत डीके शिवकुमार?
Solapur Ambulance Fire : गंभीर रुग्णाला रुग्णालयात दाखल करताच ॲम्बुलन्सला भीषण आग; सोलापुरात मोठा अनर्थ टळला
गंभीर रुग्णाला रुग्णालयात दाखल करताच ॲम्बुलन्सला भीषण आग; सोलापुरात मोठा अनर्थ टळला
Instagram Influencer Death: आंतरजातीय प्रेमविवाह, पुण्यात संसार थाटला, मग गावी जाऊन हॉटेल उभारलं, रीलस्टार रोहिणीने आयुष्य का संपवलं?
आंतरजातीय प्रेमविवाह, पुण्यात संसार थाटला, मग गावी जाऊन हॉटेल उभारलं, रीलस्टार रोहिणीने आयुष्य का संपवलं?
Buldhana : जिवंत मुलीला मृत घोषित केलं, बाप आणि मुलाला तुरुंगात टाकलं; बुलढाणा पोलिसांनी निष्काळजीपणाचं रेकॉर्ड मोडलं
बुलढाणा पोलिसांनी निष्काळजीपणाचं रेकॉर्ड मोडलं; जिवंत मुलीला मृत घोषित केलं, बाप आणि मुलाला तुरुंगात टाकलं
Beed Crime News: बीडमध्ये मुलाचे सावत्र आईसोबत प्रेमसंबंध, बापाला सोडून पळून गेले, पोलिसांनी पकडलं, बदनामीच्या भीतीने दोघांनी आयुष्य संपवलं!
बीडमध्ये मुलाचे सावत्र आईसोबत प्रेमसंबंध, बापाला सोडून पळून गेले, पोलिसांनी पकडलं, बदनामीच्या भीतीने दोघांनी आयुष्य संपवलं!
Yashasvi Jaiswal : यशस्वी जयस्वालनं आता राजस्थान रॉयल्स सोडून दिलं पाहिजे, मुंबई इंडियन्सच्या माजी खेळाडूचा सल्ला, नव्या टीमचं नाव सुचवलं
यशस्वी जयस्वालनं आता टीम बदलली पाहिजे, मुंबई इंडियन्सच्या माजी खेळाडूचा सल्ला, कारण सांगितलं...
US Iran War : अमेरिकेनं केलेल्या हल्ल्याचा इराणनं घेतला बदला, IRGC कडून अमेरिकन लष्करी तळावर हल्ले, कुवेत टेन्शनमध्ये
अमेरिकेनं केलेल्या हल्ल्याचा इराणनं घेतला बदला, IRGC कडून अमेरिकन लष्करी तळावर हल्ले, कुवेत टेन्शनमध्ये
Mangalwedha Reel Star Rohini Paradhye Ends Life: इन्स्टाग्राम रिल्सनी फेमस झाले, हॉटेलचा धंदाही जोरात, मग रिलस्टार रोहिणी पाराध्येनं आयुष्य का संपवलं? कारण समोर आलं
इन्स्टाग्राम रिल्सनी फेमस झाले, हॉटेलचा धंदाही जोरात, मग रिलस्टार रोहिणी पाराध्येनं आयुष्य का संपवलं? कारण समोर आलं
Embed widget