Taarak Mehta Ka Ooltah Chashmah FDA Promo: तुकाराम मुंढेंच्या FDA ची 'तारक मेहता का उल्टा चश्मा'मध्ये दहशत, माधवी भिडेंना मोठा धक्का, PROMO पाहिला?
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah FDA Promo: आपल्या कारवाईनं त्यांनी नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांना धडकी भरवली आहेच, पण त्यासोबतच त्यांच्या कारवायांमुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळतोय.

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah FDA Promo: आपल्या धडक कारवाईच्या स्टाईलमुळे सध्या अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे (Food and Drug Administration Department) आयुक्त तुकाराम मुंढे (Tukaram Mundhe) चर्चेत आहे. अनेक भेसळखोरांच्या त्यांनी मुसक्या आवळल्या आहेत. तसेच, त्यांनी उगारलेल्या कारवाईच्या बडग्यामुळे नियम न पाळणाऱ्या रुग्णालयांचे आणि हॉटेल्स वाल्यांचे धाबे दणाणले आहेत. आपल्या कारवाईनं त्यांनी नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांना धडकी भरवली आहेच, पण त्यासोबतच त्यांच्या कारवायांमुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळतोय.
अशातच सध्या चर्चेत असणाऱ्या अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कारवायांना प्रेरित होऊन आता सीरिअलमध्येही यावर आधारित कथानक पाहायला मिळतंय. लोकप्रिय मालिका 'तारक मेहता का उल्टा चश्मा' मालिकेत FDA च्या कारवायांवर आधारित कथानक पाहायला मिळालं आहे. सध्या 'तारक मेहता का उल्टा चश्मा'चा प्रोमो चर्चेत आहे. यामध्ये गोकुलधाम सोसायटीचे एकमेव अध्यक्ष आत्माराम भिडे यांच्या घरी FDA चं पथक दाखल होतं.
View this post on Instagram
'तारक मेहता का उल्टा चष्मा'च्या प्रोमोमध्ये काय दाखवलंय? (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah Promo)
'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेच्या कथानकातलं प्रसिद्ध जोडपं आत्माराम आणि माधवी भिडे गृहउद्योग करत असतात. बऱ्याच वर्षांपासून त्यांचा गृहउद्योग सुरू असतो. पण, अचानक त्यांच्या घरी अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे म्हणजेच, FDA चं पथक दाखल होतं. अचानक घरात FDA चे अधिकारी आल्यामुळे भिडे कुटुंबीय हादरुन जातात. त्यानंतर ते सांगतात की, "तुमच्या लिंबू मिरचीच्या लोणच्यात काचेचा तुकडा सापडलाय, ही अत्यंत गंभीर बाब आहे आणि त्यामुळे एखाद्याचा जीवही जाऊ शकतो, त्यामुळे आम्ही तुमचं लायसन्स रद्द करतोय... तुम्हाला जे काही सांगायचं आहे ते आमच्या कार्यालयात येऊ सांगा...", त्यानंतर FDA चे अधिकारी तिथून निघून जातात.
दरम्यान, तारक मेहता का उल्टा चष्मा (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) ही संपूर्ण देशभरात अत्यंत लोकप्रिय आणि दीर्घकाळ चालणारी मालिका आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून सुरू असलेल्या या मालिकेत अनेक विनोदी किस्से दाखवले जातात. ही मालिका एवढी लोकप्रिय झालीय की, यातील प्रत्येक पात्रानं प्रेक्षकांच्या मनात घर केलंय.
महत्त्वाच्या इतर बातम्या :





















