एक्स्प्लोर

सैराटनंतर खूप पैसे आले, अभिनेत्याची मोठी आर्थिक फसवणूक, जवळच्याच मित्रांनी पैसे उकळले अन् ...

अचानक मिळालेल्या एवढ्या पैशाचं काय करायचं हे न कळल्यामुळे अनेकांनी फसवणूक केल्याची खंतही त्याने व्यक्त केली.

Tanaji galangude: नागराज मंजुळेंच्या सैराट चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. या चित्रपटातील सर्व गाण्यांसह आर्ची - परश्या - लंगड्या अशा सगळ्याच भूमिका प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतल्या होत्या. या चित्रपटात परश्याच्या मित्राची भूमिका साकारणारा अभिनेता तान्हाजी गालगुंडे घराघरात लोकप्रीय झाला. सैराटमध्ये काम केल्यानंतर त्याला अनेक सिनेमे मिळू लागले. पैसा मिळू लागला . मात्र, त्या काळात अनेकांनी त्याला आर्थिक बाबतीत फसवल्याचं त्याने नुकत्याच एका पॉडकास्टमध्ये सांगितलं आहे. अचानक मिळालेल्या एवढ्या पैशाचं काय करायचं हे न कळल्यामुळे अनेकांनी फसवणूक केल्याची खंतही त्याने व्यक्त केली.

सैराट चित्रपटानंतर अभिनेता तानाजी गालंगुडे याचे 22 चित्रपट झाले. त्यातील 18 चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. 

काय म्हणाला तान्हाजी गालंगुडे ? 

सकाळच्या एका पॉडकास्टमध्ये बोलताना तान्हाजी गालंगुडे म्हणाला," सैराट झाल्यानंतर माझ्याकडे चांगले पैसे यायला लागले होते. चांगले सिनेमेही मी केले. पैसे मिळायला लागले. पण त्या काळात माहीत नव्हतं की एवढ्या पैशांचं करायचं काय. आपलं पैशाबाबतीत फार अज्ञान असतं. गावाकडल्या लोकांना खरंच काही माहीत नसतं. याच काळात असे काही मित्र आले. ते म्हणाले आपण काहीतरी व्यवसाय करू. मग तू मला एवढे पैसे दे. काही जण म्हणाले एवढे पैसे दे तुला एवढे करून देतो. असे काही मित्र आले की मला पैशाची गरज आहे. तू मला दे मग तुला परत देतो. यामध्ये मग अशी वेळ आली की मी माझ्याजवळ काहीच पैसे ठेवले नाहीत. मी हात वर करून सगळे पैसे देऊन टाकले. पण, ती माणसं फक्त पैशासाठी आली होती. त्यांचा इतर दुसरा काहीच उद्देश नव्हता".

पैसे घेऊन गायब झाले...

पैसे घेतल्यानंतर हे सगळेजण गायब झाले. याचा मला प्रचंड मानसिक त्रासही झाला. ते नंतर माझे फोनही उचलत नव्हते. काहींनी मला ब्लॉक केलेलं. मी त्यांना मित्र म्हणून खूप जवळचं मानलं होतं. पण मी त्यातून एक गोष्ट शिकलो की तुला लाँग टर्म रिलेशन टिकवायचंय तर तू त्यांच्याशी व्यवहार नाही केला पाहिजे. व्यवहार जरी केला तरी तो एवढाच केला पाहिजे की त्या पैशाचा तुला फरक पडता कामा नये. म्हणजे तुझ्याकडे जर 10 लाख रुपये आहेत. तर तू 5 हजार रुपयांचाच व्यवहार एखाद्यासोबत केला पाहिजे. 10 लाखातले 5 हजार गेले तरी तुला फरक पडणार नाही. पण 10 लाख देऊन टाकले तर आपल्यासारखी माणसं संपूनच जातात. कारण एवढे पैसे कमावणं खूप अवघड आहे" असं तान्हाजी म्हणाला.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सावित्रीबाईंच्या शिक्षणाची पहिली पायरी, जोतीरावांची भूमिका साकारणार 'आई कुठे काय करते' फेम प्रसिद्ध अभिनेता
सावित्रीबाईंच्या शिक्षणाची पहिली पायरी, जोतीरावांची भूमिका साकारणार 'आई कुठे काय करते' फेम प्रसिद्ध अभिनेता
‘सालबर्डी’मध्ये पूजा सावंतचा धडाकेबाज पोलिसी खाक्या, पोस्टरसह टीझरही समोर, कधी होणार रिलीज?
‘सालबर्डी’मध्ये पूजा सावंतचा धडाकेबाज पोलिसी खाक्या, पोस्टरसह टीझरही समोर, कधी होणार रिलीज?
रीलवर केलेल्या एका लाईकवरून यामी गौतम कृती सेननमध्ये कोल्ड वॉर? यामीनं थेट पोस्ट लिहिली ..
रीलवर केलेल्या एका लाईकवरून यामी गौतम कृती सेननमध्ये कोल्ड वॉर? यामीनं थेट पोस्ट लिहिली ..
Charak Fair of Faith Review: चरक ‘कांतारा’ची डुप्लिकेट नव्हे तर पायरेटेड कॉपी? पूर्ण चित्रपट पाहणंही ठरेल कठीण
चरक ‘कांतारा’ची डुप्लिकेट नव्हे तर पायरेटेड कॉपी? पूर्ण चित्रपट पाहणंही ठरेल कठीण
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Shetkari KarjMafi : कर्जमाफी मिळणार, कधी, कशी आणि किती? Special Report
Uddhav Thackeray Eknath Shinde Vidhabhavan :उद्धव ठाकरे - एकनाथ शिंदे आमनेसामने;विधानभवनात काय घडलं?
Devendra Fadnavis Budget 2026 : 2 लाखांपर्यंत कर्ज थकीत असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी, मोठी घोषणा
Sanjay Raut PC : मोदींनी इस्रायल-इराणचं युद्ध थांबवावं, युद्धाचे परिणाम भारताला भोगावे लागणार - राऊत
Gold Silver Rate Update : अमेरिका इजरायल आणि इराणमधील युद्धामुळे सोनं आणि चांदीच्या दरात मोठी घसरण

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NCP Merger : दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा शेवटचा प्रयत्न अपयशी, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा नो रिस्पॉन्स, अखेर शरद पवार मविआचे उमेदवार बनले
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा शेवटचा प्रयत्नही फसला, अखेर शरद पवार मविआचे उमेदवार बनले, इनसाईड स्टोरी समोर
'सात बारा कोरा, कोरा ,कोरा म्हणत टाहो फोडून मते घेतली, मात्र दोन लाखांपर्यंतची तकलादू कर्जमाफी देत शेतकऱ्यांचा विश्वासघात केला, अटी आणि शर्तींमुळे..' ; राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर हल्लाबोल
'सात बारा कोरा, कोरा ,कोरा म्हणत टाहो फोडून मते घेतली, मात्र दोन लाखांपर्यंतची तकलादू कर्जमाफी देत शेतकऱ्यांचा विश्वासघात केला, अटी आणि शर्तींमुळे..' ; राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर हल्लाबोल
IND vs NZ : टी 20 वर्ल्ड कपच्या फायनलसाठी भारतीय संघात बदल? वरुण चक्रवर्तीला बाहेरचा रस्ता? कोणाला संधी मिळणार? 
टी 20 वर्ल्ड कपच्या फायनलसाठी भारतीय संघात बदल? वरुण चक्रवर्तीला बाहेरचा रस्ता? कोणाला संधी मिळणार? 
Eknath Shinde : लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार? देवेंद्र फडणवीसांसमोरचं एकनाथ शिंदे म्हणाले...
लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार? देवेंद्र फडणवीसांसमोरचं एकनाथ शिंदे म्हणाले...
Maharashtra Budget 2026:कोणतीही चालू योजना बंद केली जाणार नाही; देशातील पहिली 1 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याचे उद्दिष्ट महाराष्ट्र लवकरच पूर्ण करेल; मुख्यमंत्र्यांची ग्वाही
कोणतीही चालू योजना बंद केली जाणार नाही; देशातील पहिली 1 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याचे उद्दिष्ट महाराष्ट्र लवकरच पूर्ण करेल; मुख्यमंत्र्यांची ग्वाही
BMC : मनसेच्या यशवंत किल्लेदारांसाठी ठाकरेंच्या उमेदवाराची माघार, सहा प्रभाग समित्यांच्या निवडणुका बिनविरोध 
मनसेच्या यशवंत किल्लेदारांसाठी ठाकरेंच्या उमेदवाराची माघार, सहा प्रभाग समित्यांच्या निवडणुका बिनविरोध 
Maharashtra Budget 2026: लाडकी बहीण योजनेबाबत अर्थसंकल्पात महत्त्वाची घोषणा, 2100 रुपयांबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
लाडकी बहीण योजनेबाबत अर्थसंकल्पात महत्त्वाची घोषणा, 2100 रुपयांबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Loan Waiver : शेतकऱ्यांसाठी दोन लाखांपर्यंत कर्जमाफी जाहीर; कोणते शेतकरी पात्र? 
शेतकऱ्यांसाठी दोन लाखांपर्यंत कर्जमाफी जाहीर; कोणते शेतकरी पात्र? 
Embed widget