OTT Crime Thriller: 'या' क्राईम थ्रिलरचा OTT वर दबदबा, 10 एपिसोडमध्ये माफियांचे राजकीय डावपेच अन् डोकं चक्रावणारा थरार
OTT Crime Thriller: या कथेत राजकारणातील सत्तेचे खेळ, स्थानिक माफियांचा दबदबा आणि पोलिसांची कारवाई दाखवण्यात आली आहे. त्यामुळे ही सीरीज प्रेक्षकांना खूपच आवडत आहे.

OTT Thriller Series: आजकाल OTT वर दररोज नवीन वेब सीरीज आणि चित्रपट रिलीज होत असतात. काही थ्रिलर सीरीज काही दिवस ट्रेंडमध्ये राहतात आणि नंतर त्यांची क्रेझ कमी होते. मात्र काही सीरीज अशाही असतात ज्या महिनाभर प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन करत राहतात.सध्या OTT प्लॅटफॉर्मवर एक वेब सीरीज जबरदस्त ट्रेंड होत आहे. विशेष म्हणजे, ही सीरीज एक महिन्यापूर्वी रिलीज झाली असूनही अजून ट्रेंडीग आहे. 10 एपिसोडची ही सिरीज प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसतेय.(crime thriller)
कोणती वेबसिरिज आहे ?
अशाच एका वेब सीरीजबद्दल आपण जाणून घेणार आहोत, जी सध्या ट्रेंडिंगमध्ये कायम आहे. 3 एप्रिल 2026 रोजी प्रसिद्ध OTT प्लॅटफॉर्म Amazon MX Player वर ही सीरीज रिलीज झाली होती. या सीरीजचं नाव ‘कप्तान’ असं आहे. यात मुख्य भूमिकेत साकिब सलीम आहे. ‘कप्तान’ ही 10 एपिसोडची क्राइम-थ्रिलर सीरीज आहे. प्रत्येक भागात सस्पेन्स आणि थ्रिल भरलेलं आहे. या कथेत राजकारणातील सत्तेचे खेळ, स्थानिक माफियांचा दबदबा आणि पोलिसांची कारवाई दाखवण्यात आली आहे. त्यामुळे ही सीरीज प्रेक्षकांना खूपच आवडत आहे.
सध्या ‘कप्तान’ Amazon MX Player वर टॉप-10 ट्रेंडिंगमध्ये आहे, ज्यावरून तिची लोकप्रियता सहज लक्षात येते. साकिब सलीम सोबतच सिद्धार्थ निगम, अंजूम शर्मा , कविता कौशिक, वरून बडोला आणि पूजा गोर यांसारखे कलाकार या सीरीजमध्ये आहेत . विशेष म्हणजे ‘सपने वर्सेस एव्हरीवन’ सीझन 2 रिलीज झाल्यानंतरही ‘कप्तान’ची क्रेझ कमी झालेली नाही. या सीरीजला IMDb कडून 6/10 अशी रेटिंग मिळाली आहे.
काय आहे कथानक?
‘कप्तान’ ही जवालाबाद शहराची कथा आहे. इथे नेते, गुंड आणि व्यापाऱ्यांना मालामाल करणारा बनावट दारूचा व्यवसाय हा मोठा स्रोत आहे. त्यामुळे हा व्यवसाय करण्याची सोन्यासारखी संधी कोणीही सोडायला तयार नाही.
जवालाबादमध्ये शाहीन आणि मुन्ना यांच्यात थेट लढत सुरू आहे. दोघांनाही शहरावर स्वतःचा दबदबा निर्माण करायचा आहे. मात्र त्यासाठी दारूच्या टेंडरवर ताबा मिळवणं अत्यावश्यक आहे. तब्बल 180 कोटींच्या या टेंडरसाठी दोन्ही गटांमध्ये फसवणूक, कटकारस्थान आणि रक्तरंजित संघर्ष सुरू होतो. कथेत पुढे अनेक थरारक ट्विस्ट येतात. कबीर आणि समरदीप यांच्यातील भूतकाळातील नातं समोर येतं, ज्यामुळे कथेला भावनिक वळण मिळतं. हळूहळू भूतकाळातील गुपितं उलगडत जातात आणि कथा एका धक्कादायक क्लायमॅक्सकडे वाटचाल करते.राजकारण, भ्रष्टाचार आणि न्यायासाठीची लढाई दाखवणारी ही कथा शेवटी प्रेक्षकांसमोर अनेक मोठे प्रश्न उभे करते.






















