एक्स्प्लोर

'बिग बॉसच्या विरोधात बोलाल तर...'; जान्हवी किल्लेकरनं रुचिता जामदारला सुनावलं; रितेश भाऊंची बाजू घेत म्हणाली...

Janhavi Killekar On Ruchita:बिग बॉस हे इतकं मोठं नाव आहे की त्या घरात जायला लोक कुठल्याही लेबलला जायला तयार असतात. बिग बॉस अत्यंत मोठा शो आहे.

Janhvi killekar on Ruchita jamdar: बिग बॉसच्या घरातून बाहेर पडलेली रुचिता जामदार सध्या प्रचंड चर्चेत आहे. बिग बॉसच्या घरात जवळपास प्रत्येकाशी तिचे वाद झाले. घराच्या बाहेर आल्यानंतर अनेक ठिकाणी ती मुलाखती देताना दिसत आहे. या मुलाखतींमध्ये बिग बॉसविषयी तिने अनेक खळबळजनक  खुलासे केले आहेत. अनेक स्पर्धकांची पोलखोलही केली आहे. रुचिताच्या घरातील आणि बाहेरच्या वागण्यावर अनेक सेलिब्रेटी तसेच बिग बॉसच्या घरात जाऊन आलेले माजी स्पर्धक टीका करताना दिसत आहेत. काही जण तिच्या बाजूनेही उभे राहिल्याचे दिसत आहे. दरम्यान, बिग बॉस 5 मध्ये फिनालेपर्यंत पोहोचलेल्या जान्हवी किल्लेकरने रुचिता जामदारवर टीका केलीये. (Bigg Boss Marathi 6)

काय म्हणाली जान्हवी किल्लेकर?

जान्हवी म्हणाली, "हाय, हॅलो, नमस्कार. आज मला तुम्हा सगळ्यांना एक प्रश्न विचारायचा आहे. आपल्या महाराष्ट्रात असे अनेक कॉन्टेन्ट क्रियेटर्स आहेत, एक्टर, इन्फ्लुएन्सर आहेत ज्यांना बिग बॉसच्या घरात जायचंय. महाराष्ट्रात असे अनेक लोक आहेत जे बिग बॉस मध्ये एकदा जाण्यासाठी धडपडतायत, रडतायत, तडफडतायत- की प्लिज एकदा तरी आम्हाला बिग बॉसमध्ये घ्या. बिग बॉस हे इतकं मोठं नाव आहे की त्या घरात जायला लोक कुठल्याही लेबलला जायला तयार असतात. बिग बॉस अत्यंत मोठा शो आहे. त्या शोमध्ये जाण्याचं स्वप्न महाराष्ट्रातील प्रत्येक जण बघत असतो. पण जेव्हा तुम्हाला तिथे जायची संधी मिळते, त्या संधीचं सोनं करायचं सोडून आतमध्ये एक तर माती खाऊन बाहेर येतात. ठीक आहे, माती खाऊन बाहेर येतात तिथपर्यंत ठीक आहे. पण ज्या शोने तुम्हाला ओळख दिली, ज्यामुळे तुमचं नाव संपूर्ण महाराष्ट्राला कळलं, किमान त्या शोला तुम्ही नाव ठेवू नका - की बिग बॉस दुटप्पी आहे. विशेषतः रितेश देशमुख. रितेश सरांच्या बाबतीत कुणीही बोलायचं नाही, कारण तो अत्यंत चांगला व्यक्ती आहे. अर्थात तुम्हाला आत्तापर्यंत समजलं असेल मी कोणाविषयी बोलते. नाव घ्यायला काहीच हरकत नाही. मी रुचिताबद्दल बोलतेय."

जान्हवी पुढे म्हणाली, "ती जे आता बिग बॉसविरोधात बोलतेय ते खूप चुकीचं आहे. मला असं म्हणायचंय की कोण आहेस तू? किंवा कोण होतीस तू? पण बिग बॉसच्या निर्मात्यांनी तुला संधी दिली की बिग बॉसमध्ये ये आणि स्वतःला सिद्ध कर. बिग बॉसच्या घरात गेल्यावर चुका होतात. बरेच गेम चेंज होतात. राग येतो. सगळं होतं. मी सुद्धा त्या सगळ्या चुका केल्या आहेत. मी काही कोणाला जज करत नाही. माझा मुद्दा एवढाच आहे की आपल्याला ज्या शोमुळे नाव मिळालं, किमान त्या शोबद्दल तुम्ही वाईट बोलू नका. तुम्ही इतर स्पर्धकांविषयी बोला, काहीही बोला; पण तुम्ही बिग बॉस या शोला बोलू शकत नाही. आणि रितेश सरांना तर नाहीच नाही."

'जिस थाली मे खाते हो…'

ती पुढे म्हणाली, "तुम्ही आता असं म्हणताय की बिग बॉसने तुम्हाला चुकीचं दाखवलं. पण तुम्हाला चुकीचं दाखवून बिग बॉसला काय मिळणार आहे? जे तू आतमध्ये करणार ते बिग बॉस दाखवणार. मग याबद्दल बोलायचं झालं तर मला तक्रारींची लिस्टच लिहायला पाहिजे. मलाही त्यांनी 'वीकेंडचा वार' ला नाही बोलू दिलं. सगळ्यात जास्त ओरडा खाणारी कंटेस्टंट मी होते. पण आजपर्यंत मी बिग बॉसला कधीही नावं ठेवली नाहीत. किंवा रितेश सरांकडे नजर वर करूनही बघितली नाही. कारण ते बिग बॉसचे होस्ट आहेत. आज इतका मोठा व्यक्ती आपल्याशी बोलतोय हीच मोठी गोष्ट आहे यार. बिग बॉसने आपल्याला निवडलं, यापेक्षा आपल्याला काय हवंय एक कलाकार म्हणून? जिस थाली में तुम खाते हो उसी थाली में छेद कर रहे हो. चुकीचं आहे. तू बोल. अर्थात तुला फ्रस्ट्रेशन असेल की मी बाहेर आले. मी जे चांगलं केलं ते दाखवलं नाही, माझा गेम सुधारला होता -हे जे तिचे वाक्य आहेत."

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Jahnavi Kiran Killekar (@jahnavikillekar)

बिग बॉस आणि रितेश सरांविरोधात बोललीस तर…

ती म्हणाली, "मी घरात सगळ्यात जास्त ओरडा खाणारी व्यक्ती होते. पण जेव्हा मला रितेश सरांनी माझ्या चुका सांगितल्या तेव्हा माझा गेम चेंज केला. त्यानंतर मी ज्या चांगल्या गोष्टी केल्या त्या सगळ्या बिग बॉसने दाखवल्या. माझ्या चांगल्या आणि वाईट दोन्ही बाजू त्यांनी दाखवल्या. तुम्ही काहीही करा, पण बिग बॉसला नावं ठेऊ नका. आज त्या शोने तुम्हाला बनवलं आहे. माझ्यासाठी तो शो देवासारखा आहे. या शोमध्ये जाण्याआधी मी अनेक मालिका केल्या होत्या, पण मी इतकी फेमस नव्हते. आज मी जी काही आहे, जे काही कमावलं आहे, जे काही मिळवलं आहे ते सगळं मला बिग बॉस या शोने दिलं आहे. तुम्ही या सगळ्यांना काहीही बोला, काहीही करा; पण बिग बॉसच्या विरोधात काही बोललात तर मी खपवून घेणार नाही. रितेश सरांच्या विरोधात तर नाहीच नाही."

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Raja Shivaji First Look Teaser: 'धुरंधर 2'च्या स्क्रिनिंगमध्येच झळकला 'राजा शिवाजी'चा टीझर; टाळ्यांच्या कडकडाटानं चित्रपटगृह गजबजलं
'धुरंधर 2'च्या स्क्रिनिंगमध्येच झळकला 'राजा शिवाजी'चा टीझर; चित्रपटगृहात टाळ्यांचा कडकडाट
दिग्गज मराठी अभिनेत्याच्या निधनानंतर 3 वर्षांनी रिलीज होणार अखेरचा सिनेमा; पोस्टर पाहिलंत?
दिग्गज मराठी अभिनेत्याच्या निधनानंतर 3 वर्षांनी रिलीज होणार अखेरचा सिनेमा; पोस्टर पाहिलंत?
Gudi Padwa Girgaon Shobhayatra Viral Video: 'काय चाललंय...गाडी आधी बाजूला घे...'; गिरगावच्या शोभायात्रेत व्हायरल गर्लला पोलिसांनी झाप झाप झापलं, गाडीवरुनही उतरवलं, VIDEO
'काय चाललंय...गाडी आधी बाजूला घे...'; गिरगावच्या शोभायात्रेत व्हायरल गर्लला पोलिसांनी झाप झाप झापलं, गाडीवरुनही उतरवलं, VIDEO
Mohini Colours Marathi Serial: सेटवर सुरू झालेली कथा, अस्तित्वात उतरेल का? कलर्स मराठीवर येतेय नवी मालिका
सेटवर सुरू झालेली कथा, अस्तित्वात उतरेल का? कलर्स मराठीवर येतेय नवी मालिका
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Praful Patel On Rupali Chakankar Ashok Kharat Case मोठी बातमी: अशोक खरात अतिशय घाणेरडा, जे कुणी त्याच्यासोबत...; प्रफुल पटेल यांचं मोठं विधान
Sushma Andhare : चाकणकर रात्री दोन वाजता फोन करून पीडितांना धमक्या द्यायच्या; खरात अन् चाकणकरांमध्ये कोणत्या वेळी काय बोलणं झालं
Iran vs US Israel Conflict : नजर अमेरिकेवर, युद्ध उंबरठ्यावर? Special Report
Raj Thackeray MNS Melava Speech|इराणची बाजू,महाराष्ट्र घडवण्याचा निर्धार, प्रत्येकाने ऐकावं असं भाषण
Sudhir Mungantiwar Special Report : सुधीर मुनगंटीवार म्हणतात... मी पुन्हा येईन!

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ashok Kharat : अशोक खरात ओशनो जल बनवून त्यात कुटून-कुटून व्हायग्रा टाकायचा, गाड्या पाठवून राजकारणी हे जल मागवून घ्यायचे, दमानियांचा नवा गौप्यस्फोट
अशोक खरात ओशनो जल बनवून त्यात कुटून-कुटून व्हायग्रा टाकायचा, गाड्या पाठवून राजकारणी हे जल मागवून घ्यायचे, दमानियांचा नवा गौप्यस्फोट
Satara : साताऱ्यात इतक्या खालच्या पातळीचं राजकारण झालं नव्हतं, फुटलेल्यांवर अपात्रतेची कारवाई करणार: मकरंद पाटील
साताऱ्यात इतक्या खालच्या पातळीचं राजकारण झालं नव्हतं, फुटलेल्यांवर अपात्रतेची कारवाई करणार: मकरंद पाटील
Rupali Chakankar : अरविंद शिंदे म्हणतात, रुपाली चाकणकरांची बदनामी करु नका, गरज पडल्यास काँग्रेसमध्ये घेण्यासाठी शिफारस करु, यावर अतुल लोंढे म्हणाले...
रुपाली चाकणकरांची बदनामी करु नका, पुणे काँग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांची भूमिका; अतुल लोंढे म्हणतात ती शिंदेंची वैयक्तिक भूमिका
Mahesh Shinde : जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाच्या निवडणुकीनंतर साताऱ्याच्या राजकारणात सध्या एकच प्रश्न,आमदार महेश शिंदे नेमके कोणाचे?”
साताऱ्याच्या राजकारणात सध्या एकच प्रश्न,आमदार महेश शिंदे नेमके कोणाचे?”
Shambhuraj Desai : सुरुवात भाजपनं केलीय, आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना शेवट करु, शंभूराज देसाईंचा जिल्हा परिषदेतील घडामोडींनंतर थेट इशारा
कामेश कांबळेंना शिवेंद्रराजे भोसले यांनी दम दिला, जिल्हा परिषदेत काय घडलं? शंभूराज देसाईंनी सगळं सांगितलं
'आगीशी खेळ खेळू नका, तुम्हाला जर खुमखुमी असेल, तर..' जयंत पाटलांनी झेडपी विजयाची 'छुपी मदत' जाहीरपणे सांगताच संजयकाका संतापले! सांगलीत वादाचा नवा अध्याय सुरु
'आगीशी खेळ खेळू नका, तुम्हाला जर खुमखुमी असेल, तर..' जयंत पाटलांनी झेडपी विजयाची 'छुपी मदत' जाहीरपणे सांगताच संजयकाका संतापले! सांगलीत वादाचा नवा अध्याय सुरु
'जर तुम्ही आमच्या रस्त्यांची नासधूस केली तर...' लंडनमध्ये सार्वजनिक ठिकाणी पान खाऊन थुंकून उकिरडा करणाऱ्या दोन भारतीयांना जबरी दणका
'जर तुम्ही आमच्या रस्त्यांची नासधूस केली तर...' लंडनमध्ये सार्वजनिक ठिकाणी पान खाऊन थुंकून उकिरडा करणाऱ्या दोन भारतीयांना जबरी दणका
Satara ZP Election : सातारा जिल्हा परिषदेत भाजप सत्तेत, राष्ट्रवादीच्या दोन सदस्यांना पोलिसांनी उचललं तर शंभूराज देसाईंना दुखापत, साताऱ्यात कोण कोण फुटलं?  
सातारा जिल्हा परिषदेत हाय व्होल्टेज ड्रामा, भाजपची सत्ता तर राष्ट्रवादीच्या दोघांना पोलिसांनी उचललं, देसाईंना दुखापत, कोण फुटलं?
Embed widget