एक्स्प्लोर

The Kerala Story : '32000 नव्हे फक्त तीन महिलांची गोष्ट"; 'द केरळ स्टोरी'च्या वादावरुन निर्मात्यांनी केला बदल

The Kerala Story : 'द केरळ स्टोरी' या सिनेमाच्या कथानकात बदल करण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतला आहे.

The Kerala Story : 'द केरळ स्टोरी' (The Kerala Story) हा सिनेमा सध्या खूपच चर्चेत आहे. हा सिनेमा सत्य घटनेवर आधारित असल्याचा दावा निर्मात्यांनी केला होता. तर दुसरीकडे या सिनेमाचं कथानक खोटं असल्याचं म्हटलं जात आहे. या सिनेमाच्या कथानकावर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे. केरळ सरकारदेखील या सिनेमाला विरोध करत आहे. त्यामुळे निर्मात्यांनी या सिनेमाच्या कथानकात मोठा बदल करण्यचा निर्णय घेतला आहे. 

'द केरळ स्टोरी' या सिनेमाचा ट्रेलर गेल्या काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला. या ट्रेलरमध्ये 32000 मुली बेपत्ता झाल्याचा उल्लेख करण्यात आला होता. आता निर्मात्यांनी यात बदल केला आहे. या सिनेमाच्या नवीन टीझरच्या डिस्क्रिप्शनमध्ये मोठा बदल करण्यात आला आहे. 32000 मुलींच्या ऐवजी नव्या टीझरच्या डिस्क्रिप्शनमध्ये 3 महिलांचा ब्रेनवॉश करुन त्यांचे धर्मांतर करुन त्यांना भारत आणि परदेशातील दहशतवादी मोहिमांवर पाठवण्यात आले होते, असं म्हटलं आहे. 

'द केरळ स्टोरी'ला सेन्सॉर बोर्डने दिलं ए सर्टिफिकेट

सेन्सॉर बोर्डने 'द केरळ स्टोरी' या सिनेमातील 10 सीन्स काढून टाकण्यास सांगितले आहे. मीडिया रिपोर्टनुसार,"भारतीय कम्युनिस्ट सबसे बडे पाखंडी है' या डायलॉगमधील 'भारतीय' हा शब्द काढून टाकण्यासाठी सेन्सॉर बोर्डाने सांगितलं आहे. तसेच या सिनेमाला ए सर्टिफिकेटदेखील दिलं आहे. त्यामुळे आता हा सिनेमा वर्षांपुढील प्रेक्षकांना पाहता येणार आहे. 

मुस्लिम समाज 'द केरळ स्टोरी' या सिनेमाच्या कथानकावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे. तर दुसरीकडे हा सिनेमा म्हणजे प्रपोगंडा असल्याचं म्हटलं जात आहे. आता केरळ राज्यातील या गंभीर विषयावर भाष्य करणाऱ्या या सिनेमाची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. दरम्यान 'द केरळ स्टोरी' या सिनेमावर बंदी घालण्याची मागणी होत आहे. 

'द केरळ स्टोरी' या सिनेमाला प्रपोगंडा म्हटलं जात आहे. याबद्दल बोलताना निर्माते विपुल शाह म्हणाले की,"द केरळ स्टोरी' हा प्रपोगंडा असल्याचं म्हणण खूप सोपं आहे. पण या सिनेमावर टीका करणाऱ्यांनी मुळातच हा सिनेमा पाहिलेला नाही. सिनेमा न पाहताच ते वेगवेगळे अंदाज बांधत आहेत. 

'द केरळ स्टोरी' या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सुदीप्तो सेनने सांभाळली आहे. या सिनेमात अदा शर्मा मुख्य भूमिकेत आहे. तर योगिता बिहानी, सोनिया बालानी, सिद्धी इदनानी, विजय कृष्णा, प्रणव मिश्रा आणि प्रणय पचौरी हे कलाकारदेखील या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. 5 मे 2023 रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

संबंधित बातम्या

The Kerala Story : 'द केरळ स्टोरी'चं कथानक सत्य असल्याचं सिद्ध करणाऱ्याला 1 कोटींचं बक्षीस; मुस्लिम युथ लीगचं आव्हान

महत्त्वाच्या बातम्या

Preity Zinta On CJP Student Protest: प्रीति झिंटाला सतावतेय विद्यार्थ्यांचं आंदोलन 'हायजॅक' होण्याची भिती; विद्यार्थ्यांना पाठींबा दिला, पण सरकारलाही केलं कळकळीचं आवाहन
प्रीति झिंटाला सतावतेय विद्यार्थ्यांचं आंदोलन 'हायजॅक' होण्याची भिती; विद्यार्थ्यांना पाठींबा दिला, पण सरकारलाही केलं कळकळीचं आवाहन
Kangana Ranaut on Rahul Gandhi Protest At PM Modi Residence: पंतप्रधान मोदी हे जगातील सर्वात लोकप्रिय नेते आहेत, त्यांनी राजीनामा का द्यायचा? कंगना रनौत राहुल गांधींवर संतापली
पंतप्रधान मोदी हे जगातील सर्वात लोकप्रिय नेते आहेत, त्यांनी राजीनामा का द्यायचा? कंगना रनौत राहुल गांधींवर संतापली
Shreyas Talpade Kajal Aggarwal Meet Tukaram Mundhe: 'प्रामाणिकपणा, निष्ठा माझ्या DNA मध्येच...'; श्रेयस तळपदे, काजल अग्रवालनं घेतली तुकाराम मुंढेंची भेट, 'ते' उत्तर ऐकून अभिनेत्रीनं थेट ठोकला सलाम
'प्रामाणिकपणा, निष्ठा माझ्या DNA मध्येच...'; श्रेयस तळपदे, काजल अग्रवालनं घेतली तुकाराम मुंढेंची भेट, 'ते' उत्तर ऐकून अभिनेत्रीनं थेट ठोकला सलाम
Actor Saurabh Gokhale Opposed Student Protest: जंतर-मंतरवर दिल्ली पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीचार्ज, अभिनेता सौरभ गोखले म्हणाला, 'आंदोलनात हिंदू धर्माबद्दल वाईट बोललं गेलं....'
जंतर-मंतरवर दिल्ली पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीचार्ज, अभिनेता सौरभ गोखले म्हणाला, 'आंदोलनात हिंदू धर्माबद्दल वाईट बोललं गेलं....'

व्हिडीओ

Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Parth Pawar : तुम्ही आज आमच्यात नाही, ही उणीव फक्त पवार कुटुंबालाच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राला जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
प्रत्येक पावलावर तुमची उणीव जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
Sonam Wangchuk: ...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
Rahul Gandhi: मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
Embed widget