एक्स्प्लोर

VIDEO : ...तेव्हा बाळासाहेबांच्या शिवसेनेमुळे माझे प्राण वाचले : बिग बी

'माँ'ने ज्यापद्धतीनं जयाचं स्वागतं केलं ते मला आजही लक्षात आहे. स्वत:च्या सुनेचं स्वागत करावं तसं स्वागत त्यांनी जयाचं केलं होतं. त्या दिवसापासून मी बाळासाहेबांना वडिलांप्रमाणे मानू लागलो.’

मुंबई : दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आयुष्यावर बेतलेला सिनेमा ‘ठाकरे’चं आज टीझर रिलीज करण्यात आलं. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि बिग बी अमिताभ बच्चन यांच्या उपस्थित या सिनेमाचं पोस्टर आणि टीझर लाँच करण्यात आलं. या कार्यक्रमादरम्यान, बोलताना बिग बी अमिताभ बच्चन यांनी बाळासाहेबांच्या अनेक आठवणींना उजाळा दिला. यावेळी बाळासाहेबांच्या काही आठवण सांगताना बिग बी देखील भावूक झाले होते. ‘1982मध्ये कुली सिनेमाच्या शुटींगदरम्यान मी गंभीर जखमी झालो होतो. तेव्हा बंगळुरुतील एका रुग्णालयात अनेक दिवस मी बेशुद्ध अवस्थेत होतो. तेव्हा पुढील उपचारासाठी मला मुंबईत आणायचं ठरलं. त्यानंतर तिथून विमानानं मला मुंबईला आणलं. तेव्हा मुंबईत जोरदार पाऊस सुरु होता. त्यावेळी विमानतळावरुन थेट मला ब्रीच कॅण्डी रुग्णालयात नेलं जाणार होतं. पण तेव्हा एकही रुग्णवाहिका उपलब्ध नव्हती. त्यावेळी बाळासाहेबांच्या शिवसेनेची रुग्णवाहिका माझ्यासाठी धावून आली होती. त्या रुग्णवाहिकेमुळे मी वेळेत ब्रीच कॅण्डीला पोहचू शकलो आणि माझ्यावर वेळीच उपचार झाले. म्हणून मी त्यांचा कायम ऋणी राहिन. कारण जर ती रुग्णवाहिका त्यावेळी तिथं आली नसती तर माझी अवस्था आणखी बिकट झाली असती.’ अशी आठवण यावेळी अमिताभ यांनी सांगितली. अमिताभ बच्चन यांचं भाषण जसंच्या तसं बाळासाहेबांसोबत माझं कायमच कौटुंबिक नातं होतं. त्यांचा कोणत्याही कार्यक्रम असला की ते मला नेहमी बोलवायचे. आजही मी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिलो कारण की, बाळासाहेब ठाकरेंशी निगडीत हा कार्यक्रम आहे. पण याला दुसरंही एक कारण आहे. ते म्हणजे संजय राऊत यांची लेखणी. कधीकधी त्यांची लेखणी मला तलवारीसारखी वाटते आणि त्याच्या भीतीनंच मी इथं आलो. दरम्यान, हा सिनेमा फक्त तीन तासापुरता मर्यादित ठेऊ नका. या सिनेमाचे अनेक भाग यावेत अशी माझी इच्छा आहे. कारण की, फक्त तीन तासात बाळासाहेब समजून घेता येणार नाही. त्यामुळे त्यांच्यावर एखादी वेब सीरीज तयार व्हावी अशी माझी इच्छा आहे. ‘त्या दिवसापासून मी बाळासाहेबांना वडिलांप्रमाणे मानू लागलो’ ‘मी ज्या दिवसापासून  बाळासाहेबांना भेटलो. तेव्हापासून त्यांना वाटलं की, मी त्यांच्या कुटुंबातीलच कुणीतरी एक आहे. जवळजवळ 40 वर्षापूर्वी माझी त्यांच्याशी भेट झाली होती. त्याच दरम्यान, माझं लग्न झालं होतं. तेव्हा त्यांनी मला आणि माझ्या पत्नीला घरी येण्याचं निमंत्रण दिलं. मी जेव्हा ‘मातोश्री’वर गेलो. त्यावेळी 'माँ'ने ज्यापद्धतीनं जयाचं स्वागतं केलं ते मला आजही लक्षात आहे. स्वत:च्या सुनेचं स्वागत करावं तसं स्वागत त्यांनी जयाचं केलं होतं. त्या दिवसापासून मी बाळासाहेबांना वडिलांप्रमाणे मानू लागलो.’ ‘...त्यावेळी बाळासाहेबांची शिवसेना माझ्यासाठी धावून आली’ ‘अनेकदा बाळसाहेब कुटुंबाप्रमाणे माझ्या पाठिशी उभे राहिले. अनेक गोष्टी अशा आहेत की, ज्या आजवर कुणालाही माहित नाही. तशा त्या फार वैयक्तिक आहे म्हणा... 1982मध्ये कुली सिनेमाच्या शुटींगदरम्यान मी गंभीर जखमी झालो होतो. तेव्हा बंगळुरुतील एका रुग्णालयात अनेक दिवस मी बेशुद्ध अवस्थेत होतो. तेव्हा पुढील उपचारासाठी मला मुंबईत आणायचं ठरलं. त्यानंतर तिथून विमानानं मला मुंबईला आणलं. तेव्हा मुंबईत जोरदार पाऊस सुरु होता. त्यावेळी विमानतळावरुन थेट मला ब्रीच कॅण्डी रुग्णालयात नेलं जाणार होतं. पण तेव्हा एकही रुग्णवाहिका उपलब्ध नव्हती. त्यावेळी बाळासाहेबांच्या शिवसेनेची रुग्णवाहिका माझ्यासाठी धावून आली होती. त्या रुग्णवाहिकेमुळे मी वेळेत ब्रीच कॅण्डीला पोहचू शकलो आणि माझ्यावर वेळीच उपचार झाले. म्हणून मी त्यांचा कायम ऋणी राहिन. कारण जर ती रुग्णवाहिका त्यावेळी तिथं आली नसती तर माझी अवस्था आणखी बिकट झाली असती.’ ‘...तेव्हा बाळासाहेबांएवढा धीर मला कुणीच दिला नव्हता’ ‘माझ्या आयुष्यात अनेक चढ-उतार यायचे. त्यावेळी बाळासाहेब नेहमी माझ्यासोबत असयाचे. अनेकदा माझ्यावर काही आरोपही व्हायचे त्यावेळी बाळासाहेब मला फोन करुन विचारायचे. हे चूक आहे की बरोबर?. एकदा माझ्यावर आणि माझ्या कुटुंबांवर असाच एक आरोप झाला होता. त्यावेळी त्यांनी मला फोन करुन मातोश्रीवर बोलावून घेतलं आणि विचारलं की, हे आरोप खरे आहेत का? मी त्यांना सांगितलं की, हे आरोप चुकीचे आहेत. त्यानंतर त्यांनी तडक मला सांगितलं. आता घाबरु नकोस, मी तुझ्यासोबत आहे.  एवढा धीर त्यावेळी दुसरा कोणत्याच व्यक्तीनं मला दिला नाही.’ ‘त्या’ क्षणी बाळासाहेबांच्या बाजूला माझा फोटो होता! ‘बाळासाहेब जेव्हा शेवटच्या क्षणी जेव्हा अंथरुणाला खिळले होते तेव्हा त्यांच्या खोलीत जाण्याची परवानगी मला उद्धव यांनी दिली. एका प्रबळ व्यक्तीला जेव्हा आपण अशा अवस्थेत बघतो त्यावेळी अक्षरश: हेलावून जातो. तेव्हा आम्ही प्रार्थना करत होतो की, ते पुन्हा एकदा जिवंत व्हावे. तो क्षण मी कधीही विसरु शकत नाही. मला कधीही वाटत नव्हतं की, मी त्यांना अशा अवस्थेत पाहिन. पण त्यावेळी मी आणखी एक आश्चर्याची गोष्ट त्यांच्या खोलीत पाहिली. मला माहिती होतं की, बाळासाहेबांचं माझ्यावर प्रेम होतं. पण मी पाहिलं की, ते जिथे झोपले होते तिथे त्यांच्या उजव्या बाजूला एक फोटो होता. तो फोटो माझा होता. ते दृश्य पाहून मला फार भरुन आलं. ती घटना कायम माझ्या स्मरणात राहिल. मी त्यांना शतश: नमन करतो. या सिनेमासाठी कधीही कोणत्याही प्रकारची मदत हवी असल्यास मला आवर्जून सांगा. मी माझ्या परिने होईल तेवढी मदत करेन.’ VIDEO :  संबंधित बातम्या : VIDEO: 'बाळासाहेब ठाकरे मला प्रेरणा देतील', नवाजुद्दीनचं मराठीत भाषण 'ठाकरे' सिनेमाचा टीझर लाँच, रिलीजचा मुहूर्तही ठरला! 

महत्त्वाच्या बातम्या

Salman Khan in Alliance: 'मला असं वाटतंय रितेश देशमुखची नोकरी धोक्यात...' सलमान खानची 'अलायन्स'मध्ये एन्ट्री, भावाची विचारपूस करत म्हणाला...
'मला असं वाटतंय रितेश देशमुखची नोकरी धोक्यात...' सलमान खानची 'अलायन्स'मध्ये एन्ट्री, भावाची विचारपूस करत म्हणाला...
Prapti Redkar on harassment: 'डोक्यात फोन टाकला अन् प्रायव्हेट पार्टवर मारलं'; प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने छेड काढणाऱ्याला घडवली अद्दल, रेल्वे स्थानकावर काय घडलं?
'डोक्यात फोन टाकला अन् प्रायव्हेट पार्टवर मारलं'; प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने छेड काढणाऱ्याला घडवली अद्दल, रेल्वे स्थानकावर काय घडलं?
Maitreya Marathi Film: मैत्रीच्या रंगांची नवी गोष्ट! ‘मैत्रेया’चा पोस्टर आऊट; प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला
मैत्रीच्या रंगांची नवी गोष्ट! ‘मैत्रेया’चा पोस्टर आऊट; प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला
Saurabh Choughule Ajinkya Rahane: अजिंक्य राहाणेचा क्रिकेटला अखेरचा रामराम, अन् मराठी अभिनेत्याला आलं भरून, लहानपणीचा फोटो केला शेअर, म्हणाला...
अजिंक्य राहाणेचा क्रिकेटला अखेरचा रामराम, अन् मराठी अभिनेत्याला आलं भरून, लहानपणीचा फोटो केला शेअर, म्हणाला...

व्हिडीओ

Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke : लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
Ajinkya Rahane : निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
Silver Foil On Sweets : मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
PM Modi : आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
Bankipur by-election: बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
Devendra Fadnavis: तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Embed widget