एक्स्प्लोर

Anup Soni Struggle Story : काम मिळत नसल्याने अनुप सोनी मुंबई सोडणार होता, पण ओशोंच्या 'या' तीन ओळींनी अवघं आयुष्य बदलून गेलं!

Anup Soni : 'क्राइम पेट्रोल' (Crime Petrol) या मालिकेच्या माध्यमातून घराघरांत पोहोचलेला अभिनेता अनुप सोनीची (Anup Soni) स्ट्रगल स्टोरी अंगावर शहारे आणणारी आहे. काम मिळत नसल्याने अनुपवर मुंबई सोडण्याची वेळ आली होती.

Anup Soni : अनुप सोनी (Anup Soni) आज एक यशस्वी अभिनेता आहे. पण त्याचा अभिनयप्रवास सोपा नव्हता. मेहनतीच्या जोरावर, संघर्ष करत त्याने आज स्वत:ला सिद्ध केलं आहे. 'क्राइम पेट्रोल' (Crime Petrol) या सुपरहिट मालिकेने त्याला खऱ्या अर्थाने ब्रेक मिळाला. त्यानंतर त्याने कधीही मागे वळून पाहिलं नाही.

हिरो बनण्याचं स्वप्न पाहत मायानगरीत आला अन्...

अनुप सोनीचं बालपण जयपूरमध्ये गेलं. जयपूरमध्ये असताना त्यांची ओळख सिनेमे आणि रंगभूमीसोबत झाली. सिनेसृष्टीतील ग्लॅमरने त्यांचं लक्ष वेधून घेतलं. कॉलेजमध्ये असताना त्यांनी आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धांमध्ये भाग घेतला. पुढे NSD मध्ये त्यांनी अभिनय प्रशिक्षण घेतलं. त्यानंतर जयपूरला न जाता त्यांना मायानगरी मुंबईचा (Mumbai) मार्ग निवडला. 90 च्या दशकात हिरो होण्याचं स्वप्न पाहत मुंबईत आलेल्या अनुपला अनेक आव्हानांचा सामना करावा लागला.

अनुप सोनी स्वप्ननगरी मुंबईत आला तेव्हा तो फक्त 25 वर्षांचा होता. त्यावेळी इंडस्ट्रीमध्ये हीरोची एक वेगळी परिभाषा होती. दिसायला सुंदर असणाऱ्यांनाच 'हीरो' म्हटले जात असे. पुढे सलमान खान (Salman Khan) आणि संजय दत्तमुळे (Sanjay Dutt) बॉडी बिल्डिंगची क्रेझ सुरू झाली. अनुप सोनी या कोणत्याच गटात फिट बसत नव्हता. त्यावेळी मोबाईल फोन घ्यायलाही त्याच्याकडे पैसे नव्हते. 

इंडस्ट्रीतील प्रवासाबद्दल बोलताना अनुप सोनी म्हणाला,"इंडस्ट्रीमध्ये हीरो-हिरोइन आणि मुख्य भूमिकेत असणाऱ्या कलाकारांना निर्माते किंवा दिग्दर्शक निवडत असे. तर इतर कलाकारांना कास्टिंग डिरेक्टर कास्ट करत असे. त्यामुळे चांगल्या कास्टिंग दिग्दर्शकांना भेटायला सुरुवात केली. तिथेच हा प्रवास थांबला नाही. मुंबईत धक्के मिळायला सुरुवात झाली. त्यामुळे मुंबई सोडण्याचा विचार मनात आला. त्यावेळी चांगलं जेवणदेखील मिळत नसे". 

अनुप सोनीला मुंबईत करावा लागलेला आर्थिक अडचणींचा सामना

अनुप म्हणाला,"दिल्लीतून मुंबईत येताना अनुप सोनी ठरावीक पैसे घेऊन आलो होतो. पैसे संपले तरी हाताशी काम नव्हतं. प्रत्येकवेळी घरच्यांकडून पैसे मागू शकत नव्हतो. त्यावेळी फोटोशूट करायलाही माझ्याकडे पैसे नव्हते. झोप उडवणारे दिवस कधी संपतात असं झालं होतं". 

'त्या' तीन ओळींनी बदललं आयुष्य

अनुपचे वाईट दिवस सुरू होते. त्यावेळी ओशो (Osho) यांचं एका प्रेरणा देणार पुस्तक वाचण्यात आलं. या पुस्तकातील तीन ओळींनी अनुपचं आयुष्य पूर्णपणे बदललं. त्या तीन ओळी होत्या,"आता तुम्ही ज्या ऐश्वर्यात जगत आहात, त्यापेक्षा अधिक चांगलं ऐश्वर्य तुम्हाला हवं असेल तर जुनं ऐश्वर्य सोडावं लागेल". ओशोच्या या तीन ओळी वाचल्यानंतर अनुपने पुन्हा एकदा सिनेसृष्टी एका वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिली आणि अभिनयक्षेत्रात काम करण्याचा निर्णय घेतला. 

लहान-मोठी कामे करत असताना अनुपची ओळख दिग्दर्शक अनुभव सिन्हासोबत झाली. त्यानंतर ऑडिशन दिल्यानंतर अनुपला मुंबईत त्याचं पहिलं काम मिळालं. त्यानंतर तीन-चार मालिकांमध्ये ते मुख्य भूमिकेत झळकले. अनेक कॉमेडी शोदेखील केले. पुढे 'गंगाजल', 'फिजा' सारख्या सिनेमांच्या माध्यमातून त्याने रुपेरी पडद्यावर पदार्पण केलं. पुढे 'क्राइम पेट्रोल' या मालिकेने त्याला खऱ्या अर्थाने ब्रेक मिळाला. पुढे दहा वर्षांच्या यशस्वी प्रवासानंतर त्याने ही मालिका सोडण्याचा निर्णय घेतला.

संबंधित बातम्या

Struggle Story : रेड लाईट एरियात गेलं बालपण, भीक मागून काढले दिवस; दिलीप कुमारांनी दिली सिनेमाची ऑफर अन् झाले बॉलिवूडचे सुपरस्टार; जाणून घ्या कादर खान यांची स्ट्रगल स्टोरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ढुलकीच्या तालावर... 'लावणी'ला प्रोत्साहन, नवे कलाकार घडवणार; लोकनाट्य कला केंद्रासाठी शासनाची नवी नियमावली
ढुलकीच्या तालावर... 'लावणी'ला प्रोत्साहन, नवे कलाकार घडवणार; लोकनाट्य कला केंद्रासाठी शासनाची नवी नियमावली
धक्कादायक! सोयाबीन केंद्रावर अधिकाऱ्यांचा गैरव्यवहार; रिकाम्या पोत्यासाठी शेतकरीकन्येस रात्री उशिरापर्यंत ताटकळवले
धक्कादायक! सोयाबीन केंद्रावर अधिकाऱ्यांचा गैरव्यवहार; रिकाम्या पोत्यासाठी शेतकरीकन्येस रात्री उशिरापर्यंत ताटकळवले
मोठी बातमी! सोयाबीन खरेदीसाठी केंद्र सरकारकडून 24 दिवसांची मुदतवाढ, शेतकऱ्यांना दिलासा, किसान सभेकडून निर्णयाचं स्वागत 
मोठी बातमी! सोयाबीन खरेदीसाठी केंद्र सरकारकडून 24 दिवसांची मुदतवाढ, शेतकऱ्यांना दिलासा, किसान सभेकडून निर्णयाचं स्वागत 
Kolhapur News : बारावी परीक्षेच्या हॉल तिकिटावर वेगळे विषय आल्याने विद्यार्थी पालक हैराण; कोल्हापुरातील विमला गोयंका शाळेवर कारवाई होणार
बारावी परीक्षेच्या हॉल तिकिटावर वेगळे विषय आल्याने विद्यार्थी पालक हैराण; कोल्हापुरातील विमला गोयंका शाळेवर कारवाई होणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Suresh Dhas PC Beed | मी कुणाच्या बापाला भीत नाही, सुरेश धसांची आक्रमक पत्रकार परिषदABP Majha Marathi News Headlines 2 PM TOP Headlines 2PM 10 February 2025 दुपारी २ च्या हेडलाईन्सUday Samant PC : उद्योगमंत्री उदय सामंत नाराज? तातडीची पत्रकार परिषद घेत म्हणाले, तो माझा अधिकार!Devendra Fadnavis : अश्लीलतेचे पण काही नियम असतात... समय रैना-अल्लाहबादियावर फडणवीसांची प्रतिक्रिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ढुलकीच्या तालावर... 'लावणी'ला प्रोत्साहन, नवे कलाकार घडवणार; लोकनाट्य कला केंद्रासाठी शासनाची नवी नियमावली
ढुलकीच्या तालावर... 'लावणी'ला प्रोत्साहन, नवे कलाकार घडवणार; लोकनाट्य कला केंद्रासाठी शासनाची नवी नियमावली
धक्कादायक! सोयाबीन केंद्रावर अधिकाऱ्यांचा गैरव्यवहार; रिकाम्या पोत्यासाठी शेतकरीकन्येस रात्री उशिरापर्यंत ताटकळवले
धक्कादायक! सोयाबीन केंद्रावर अधिकाऱ्यांचा गैरव्यवहार; रिकाम्या पोत्यासाठी शेतकरीकन्येस रात्री उशिरापर्यंत ताटकळवले
मोठी बातमी! सोयाबीन खरेदीसाठी केंद्र सरकारकडून 24 दिवसांची मुदतवाढ, शेतकऱ्यांना दिलासा, किसान सभेकडून निर्णयाचं स्वागत 
मोठी बातमी! सोयाबीन खरेदीसाठी केंद्र सरकारकडून 24 दिवसांची मुदतवाढ, शेतकऱ्यांना दिलासा, किसान सभेकडून निर्णयाचं स्वागत 
Kolhapur News : बारावी परीक्षेच्या हॉल तिकिटावर वेगळे विषय आल्याने विद्यार्थी पालक हैराण; कोल्हापुरातील विमला गोयंका शाळेवर कारवाई होणार
बारावी परीक्षेच्या हॉल तिकिटावर वेगळे विषय आल्याने विद्यार्थी पालक हैराण; कोल्हापुरातील विमला गोयंका शाळेवर कारवाई होणार
Nashik Crime : गोवा फेडरेशनकडून 'नाफेड'ला साडेपाच कोटींना गंडा, 1500 टन कांद्याची चढ्या दराने परस्पर विक्री; नेमकं प्रकरण काय?
गोवा फेडरेशनकडून 'नाफेड'ला साडेपाच कोटींना गंडा, 1500 टन कांद्याची चढ्या दराने परस्पर विक्री; नेमकं प्रकरण काय?
हे नातं निवडणुकीपुरतं नाही, परमनंट; मोदींच्या फोनवरुन शुभेच्छा, एकनाथ शिंदेंनी सांगितलं काय म्हणाले?
हे नातं निवडणुकीपुरतं नाही, परमनंट; मोदींच्या फोनवरुन शुभेच्छा, एकनाथ शिंदेंनी सांगितलं काय म्हणाले?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 फेब्रुवारी 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 फेब्रुवारी 2025 | सोमवार
स्टेशनवर जागा नाही, ट्रेनमध्येही नाही, रस्त्यावर, तर नाहीच नाही; प्रयागराजच्या प्रत्येक एन्ट्री पॉईंटवर 20 किमी वाहनांच्या रांगा; 5 किमीच्या प्रवासाला 8 तास
स्टेशनवर जागा नाही, ट्रेनमध्येही नाही, रस्त्यावर, तर नाहीच नाही; प्रयागराजच्या प्रत्येक एन्ट्री पॉईंटवर 20 किमी वाहनांच्या रांगा; 5 किमीच्या प्रवासाला 8 तास
Embed widget