एक्स्प्लोर

आमिर खानचा सोशल मीडियाच नाही, तर मोबाईललाही बाय बाय, माझा कट्ट्यावर सांगितलं कारण...

आमिर खानने सोशल मीडियाला रामराम ठोकलाय तर फोन वापरणंदेखील बंद केलेले आहे. मोबाईल वापरणं बंद केल्यावर त्याच्यात कोणते बदल झाले ते जाणून घ्या...

मुंबई : बॉलिवूड अभिनेता आमिर खान हा नेहमी त्याच्या चित्रपटांद्वारे किंवा पाणी फाउंडेशनसाठी करत असलेल्या कामांमुळे लोकांसमोर येत असतो. आमिरने त्याच्या वाढदिवसाच्या दुसऱ्याच दिवशी सोशल मीडियाला रामराम ठोकला होता. पण, सोशल मीडियाला रामराम ठोकण्याआधीच सहा आठवडे त्याने मोबाईल फोन वापरणं बंद केलं होतं, असं त्याने माझा कट्ट्यावर सांगितलं. मोबाईल वापरणं बंद करण्याबाबत आमिर म्हणाला की, "सध्या आपल्याला मोबाईलची खूप सवय झाली आहे. पण पूर्वी आपण मोबाईल फोन वापरतच नव्हतो.मला असं जाणवलं की, मी मोबाईल फोनच्या खूप आहारी गेलोय. मी सतत फोनमध्ये घुसून असतो, ऑनलाईन बुद्धिबळ किंवा इतर ऑनलाईन खेळ खेळण्यात मग्न असतो,ऑनलाईन बातम्या बघतो, मित्रांच्या मेसेजला प्रत्युत्तर देतो किंवा 10-12 कौटुंबिक ग्रुपमध्ये अॅक्टिव्ह असतो. या सगळ्यामुळे मी दिवसभर खूप विचलित होतोय असं मला जाणवलं, त्यामुळे मी मोबाईल वापरणं बंद केलं".  

आमिर म्हणतो, 'जेव्हापासून मी मोबाईल फोन वापरणं बंद केलं आहे, तेव्हापासून माझ्या आयुष्यात मोठ्या प्रमाणात बदल घडून आले आहेत'. आमिर पुढे म्हणाला, जर माझ्याकडेफोन असता तर मी 28 जानेवारीपासून जो प्रवास केला आहे तो मी करूच शकलो नसतो.फोन सुरू असता तर हा पल्ला गाठायला मला दोन वर्ष लागली असती. पूर्वी मी गाडीत बसलेलो असताना मी फोनमध्ये रमलेलो असायचो.पण तेच आता मी माझ्या आयुष्याबद्दल, मुलांबद्दल, घरच्यांबद्दल, नवीन प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटाबद्दल विचार करतो. पुस्तकं वाचतो. मोबाईल फोन नसताना मला जाणवतय मी किती मोठं पाऊल उचललय. फोन असताना मला या कशाची जाणीवच झाली नव्हती. मोबाईलफोन न वापरल्याने होणाऱ्या फायद्यांमुळे मी सोशल मीडियापासूनही दूर होण्याचा निर्णय घेतला.

आमिरला लोकांसोबत संवाद साधणं आवडतं. तसेच त्याचे अनेक उपक्रम लोकांना एकत्रित आणून केलेलेच आहेत. आमिर म्हणतो, 'मला जास्तीतजास्त तीन लोकांसोबतच संवाद साधायला आवडतं. मला गावात जाऊन लोकांना प्रत्यक्ष भेटायला आवडतं. टीव्हीवर यायलाही आवडतं. परंतु ऑनलाईन कोणतीही गोष्ट करायला आवडत नाही. त्यात मजादेखील येत नाही'.

आमिर आणि सोशल मीडिया...

आमिरला असं वाटतं की, सोशल मीडिया हे माध्यम त्याच्यासाठी नाही. अनेक जणं सोशल मीडियाचा चांगला वापर करत आहेत. सध्याच्याघडीला सोशल मीडिया हे एक उत्तम प्लॅटफॉर्म तयार झाले आहे. पण, आमिर मात्र यासगळ्यापासून दूर राहणंच पसंत करतो. 

असा कोणता क्षण होता जेव्हा आमिरने सोशल मीडिया बंद करण्याचा निर्णय घेतला...

आमिर म्हणतो, "एकदिवशी मला जाणवलं की, मी सोशल मीडियावर खूपच जास्त अॅक्टिव्ह असतो. मी चित्रपट, सामाजिक कामं आणि फोनमध्ये खूप रमत चाललोय त्यामुळे माझं माझ्या मुलांवर अजिबात लक्ष नाही. म्हणून आता मुलांकडे लक्ष द्यायला हवं असा विचार करूनमोबाईल फोन बंद केला. मला कोणासोबत संपर्क साधायचा असेल तर माझ्यासोबत मॅनेजर, स्पॉट बॉय, सुरक्षारक्षक असतो. त्यांच्याकडे फोन असतोच. फक्त मी वापरत नाही". 

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

BMC Election : मतदान ओळखपत्र नाही? चिंता नको, या 11 ओळखीच्या पुराव्यांपैकी एक सोबत न्या
मतदान ओळखपत्र नाही? चिंता नको, या 11 ओळखीच्या पुराव्यांपैकी एक सोबत न्या
संभाजीगरमध्ये 115 जागांवरील मतदानासाठी प्रशासन सज्ज; 5588 पोलिंग कर्मचारी, 537 ठिकाणी वेबकास्टिंग
संभाजीगरमध्ये 115 जागांवरील मतदानासाठी प्रशासन सज्ज; 5588 पोलिंग कर्मचारी, 537 ठिकाणी वेबकास्टिंग
मोठी बातमी! अजित पवार म्हणाले, पार्टी फंडसाठी 100 कोटी; ती फाईल काढली असती तर हाहाकार माजला असता
मोठी बातमी! अजित पवार म्हणाले, पार्टी फंडसाठी 100 कोटी; ती फाईल काढली असती तर हाहाकार माजला असता
झेडपीच्या उमेदवाराला 9 लाख खर्चमर्यादा, पंचायत समितीच्या किती? निवडणूक आयोगाने दिली आकडेवारी
झेडपीच्या उमेदवाराला 9 लाख खर्चमर्यादा, पंचायत समितीच्या किती? निवडणूक आयोगाने दिली आकडेवारी

व्हिडीओ

Mahapalika Parishad Thane :अंगावर घेऊ नका, 'त्या' नेत्याचं नावं घेतलं तर शिंदेंची शिवसेना बदनाम होईल
Shrikant Shinde Majha Katta : पळवापळवी, राजकीय कलह ते युती, श्रीकांत शिंदेंसोबत माझा कट्टावर चर्चा
Uddhav Thackeray Full Speech : मुंबईचा घास भाजपला गिळू देणार नाही, 20 वर्षानंतर भावासमोर तुफान भाषण
Aaditya Thackeray Speech ShivajiPark: भरसभेत फडणवीसांची मिमिक्री, कोस्टल रोडवरून हल्लाबोल
Praniti Shinde on BJP :  काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेची देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BMC Election : मतदान ओळखपत्र नाही? चिंता नको, या 11 ओळखीच्या पुराव्यांपैकी एक सोबत न्या
मतदान ओळखपत्र नाही? चिंता नको, या 11 ओळखीच्या पुराव्यांपैकी एक सोबत न्या
संभाजीगरमध्ये 115 जागांवरील मतदानासाठी प्रशासन सज्ज; 5588 पोलिंग कर्मचारी, 537 ठिकाणी वेबकास्टिंग
संभाजीगरमध्ये 115 जागांवरील मतदानासाठी प्रशासन सज्ज; 5588 पोलिंग कर्मचारी, 537 ठिकाणी वेबकास्टिंग
मोठी बातमी! अजित पवार म्हणाले, पार्टी फंडसाठी 100 कोटी; ती फाईल काढली असती तर हाहाकार माजला असता
मोठी बातमी! अजित पवार म्हणाले, पार्टी फंडसाठी 100 कोटी; ती फाईल काढली असती तर हाहाकार माजला असता
झेडपीच्या उमेदवाराला 9 लाख खर्चमर्यादा, पंचायत समितीच्या किती? निवडणूक आयोगाने दिली आकडेवारी
झेडपीच्या उमेदवाराला 9 लाख खर्चमर्यादा, पंचायत समितीच्या किती? निवडणूक आयोगाने दिली आकडेवारी
Kolhapur ZP Election: कोल्हापूर झेडपी अन् 12 पंचायत समित्यांसाठी निवडणुकीचा धुरळा; अवघ्या 25 दिवसात गावगाड्यातून 'कारभारी' ठरणार! कोणत्या गटात कोणतं आरक्षण?
कोल्हापूर झेडपी अन् 12 पंचायत समित्यांसाठी निवडणुकीचा धुरळा; अवघ्या 25 दिवसात गावगाड्यातून 'कारभारी' ठरणार! कोणत्या गटात कोणतं आरक्षण?
प्रचाराची सांगात होताच रिक्षात आढळली बॅग; अपक्ष उमेदवाराने पकडली 50 लाखांची रोकड
प्रचाराची सांगात होताच रिक्षात आढळली बॅग; अपक्ष उमेदवाराने पकडली 50 लाखांची रोकड
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 जानेवारी 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 जानेवारी 2025 | मंगळवार
ब्लिंकिटने सर्व डिजिटल प्लॅटफॉर्मवरून ‘10 मिनिटांत डिलिव्हरी’चा दावा काढला; स्विगी, झेप्टोवरही दबाव वाढला
ब्लिंकिटने सर्व डिजिटल प्लॅटफॉर्मवरून ‘10 मिनिटांत डिलिव्हरी’चा दावा काढला; स्विगी, झेप्टोवरही दबाव वाढला
Embed widget