एक्स्प्लोर

आमिर खानचा सोशल मीडियाच नाही, तर मोबाईललाही बाय बाय, माझा कट्ट्यावर सांगितलं कारण...

आमिर खानने सोशल मीडियाला रामराम ठोकलाय तर फोन वापरणंदेखील बंद केलेले आहे. मोबाईल वापरणं बंद केल्यावर त्याच्यात कोणते बदल झाले ते जाणून घ्या...

मुंबई : बॉलिवूड अभिनेता आमिर खान हा नेहमी त्याच्या चित्रपटांद्वारे किंवा पाणी फाउंडेशनसाठी करत असलेल्या कामांमुळे लोकांसमोर येत असतो. आमिरने त्याच्या वाढदिवसाच्या दुसऱ्याच दिवशी सोशल मीडियाला रामराम ठोकला होता. पण, सोशल मीडियाला रामराम ठोकण्याआधीच सहा आठवडे त्याने मोबाईल फोन वापरणं बंद केलं होतं, असं त्याने माझा कट्ट्यावर सांगितलं. मोबाईल वापरणं बंद करण्याबाबत आमिर म्हणाला की, "सध्या आपल्याला मोबाईलची खूप सवय झाली आहे. पण पूर्वी आपण मोबाईल फोन वापरतच नव्हतो.मला असं जाणवलं की, मी मोबाईल फोनच्या खूप आहारी गेलोय. मी सतत फोनमध्ये घुसून असतो, ऑनलाईन बुद्धिबळ किंवा इतर ऑनलाईन खेळ खेळण्यात मग्न असतो,ऑनलाईन बातम्या बघतो, मित्रांच्या मेसेजला प्रत्युत्तर देतो किंवा 10-12 कौटुंबिक ग्रुपमध्ये अॅक्टिव्ह असतो. या सगळ्यामुळे मी दिवसभर खूप विचलित होतोय असं मला जाणवलं, त्यामुळे मी मोबाईल वापरणं बंद केलं".  

आमिर म्हणतो, 'जेव्हापासून मी मोबाईल फोन वापरणं बंद केलं आहे, तेव्हापासून माझ्या आयुष्यात मोठ्या प्रमाणात बदल घडून आले आहेत'. आमिर पुढे म्हणाला, जर माझ्याकडेफोन असता तर मी 28 जानेवारीपासून जो प्रवास केला आहे तो मी करूच शकलो नसतो.फोन सुरू असता तर हा पल्ला गाठायला मला दोन वर्ष लागली असती. पूर्वी मी गाडीत बसलेलो असताना मी फोनमध्ये रमलेलो असायचो.पण तेच आता मी माझ्या आयुष्याबद्दल, मुलांबद्दल, घरच्यांबद्दल, नवीन प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटाबद्दल विचार करतो. पुस्तकं वाचतो. मोबाईल फोन नसताना मला जाणवतय मी किती मोठं पाऊल उचललय. फोन असताना मला या कशाची जाणीवच झाली नव्हती. मोबाईलफोन न वापरल्याने होणाऱ्या फायद्यांमुळे मी सोशल मीडियापासूनही दूर होण्याचा निर्णय घेतला.

आमिरला लोकांसोबत संवाद साधणं आवडतं. तसेच त्याचे अनेक उपक्रम लोकांना एकत्रित आणून केलेलेच आहेत. आमिर म्हणतो, 'मला जास्तीतजास्त तीन लोकांसोबतच संवाद साधायला आवडतं. मला गावात जाऊन लोकांना प्रत्यक्ष भेटायला आवडतं. टीव्हीवर यायलाही आवडतं. परंतु ऑनलाईन कोणतीही गोष्ट करायला आवडत नाही. त्यात मजादेखील येत नाही'.

आमिर आणि सोशल मीडिया...

आमिरला असं वाटतं की, सोशल मीडिया हे माध्यम त्याच्यासाठी नाही. अनेक जणं सोशल मीडियाचा चांगला वापर करत आहेत. सध्याच्याघडीला सोशल मीडिया हे एक उत्तम प्लॅटफॉर्म तयार झाले आहे. पण, आमिर मात्र यासगळ्यापासून दूर राहणंच पसंत करतो. 

असा कोणता क्षण होता जेव्हा आमिरने सोशल मीडिया बंद करण्याचा निर्णय घेतला...

आमिर म्हणतो, "एकदिवशी मला जाणवलं की, मी सोशल मीडियावर खूपच जास्त अॅक्टिव्ह असतो. मी चित्रपट, सामाजिक कामं आणि फोनमध्ये खूप रमत चाललोय त्यामुळे माझं माझ्या मुलांवर अजिबात लक्ष नाही. म्हणून आता मुलांकडे लक्ष द्यायला हवं असा विचार करूनमोबाईल फोन बंद केला. मला कोणासोबत संपर्क साधायचा असेल तर माझ्यासोबत मॅनेजर, स्पॉट बॉय, सुरक्षारक्षक असतो. त्यांच्याकडे फोन असतोच. फक्त मी वापरत नाही". 

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Daniel Balaji Mother Leaves 80 Crore Bungalow: 'माझा मुलगाच जगात नाही, तर महाल काय कामाचा...'; सुपरस्टार लेकाच्या निधनानं आई खचली, 80 कोटींच्या बंगल्याचा त्याग करुन झोपडीत राहायला गेली
'माझा मुलगाच जगात नाही, तर महालाचं काय करू...?'; सुपरस्टार लेकाच्या निधनानं आई खचली, 80 कोटींच्या बंगल्याचा त्याग करुन झोपडीत राहायला गेली
रितेश देशमुख याच्या 'राजा शिवाजी' सिनेमाची रिलीजपूर्वीच धुवांधार कमाई; कमाईत 'धुरंधर 2'ला मागे टाकणार?
रितेश देशमुख याच्या 'राजा शिवाजी' सिनेमाची रिलीजपूर्वीच धुवांधार कमाई; कमाईत 'धुरंधर 2'ला मागे टाकणार?
Sidharth Bhardwaj Life Story: 'कुत्राच्या चैननं वडिलांना मारलेलं...'; अभिनेत्याचा कबुलीनामा, अंगावर शहारे आणणाऱ्या 'त्या' गोष्टींबाबत स्वतःच केलाय खळबळजनक खुलासा
'कुत्राच्या चैननं वडिलांना मारलेलं...'; अभिनेत्याचा कबुलीनामा, अंगावर शहारे आणणाऱ्या 'त्या' गोष्टींबाबत स्वतःच केलाय खळबळजनक खुलासा
Saif Ali Khan First Love: ना ही करिना, ना ही अमृता सिंह; 'या' दिग्गज अभिनेत्रीवर जडलेलं सैफ अली खानचं पहिलं प्रेम, 60 फिल्म अन् 40 शो करुन बनलेली सुपरस्टार, ओळखलं का कोण?
ना ही करिना, ना ही अमृता सिंह; 'या' दिग्गज अभिनेत्रीवर जडलेलं सैफ अली खानचं पहिलं प्रेम, 60 फिल्म अन् 40 शो करुन बनलेली सुपरस्टार

व्हिडीओ

Uday Samant On Bachchu Kadu : कडू शिवसेनेत दाखल होतायत ही आनंदाची गोष्ट- सामंत
Bachchu Kadu Will Join Shiv Sena : मी शेतकरी, मजुरांसाठी शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेतोय, कडूंच ठरलं
Ambadas Danve Vidhanparishad : उद्धव ठाकरेंकडून अंबादास दानवेंनाच उमेदवारी का?
Raj Thackeray Speech Pune : भैय्यांना मराठी शिकवलं तर उद्या मराठी पुरस्कार घेताना भैय्या दिसतील
Beed MassaJog Election : संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव कसा झाला?  Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: हेलिकॉप्टरमधून प्रथमच नौदल जहाजविरोधी मिसाईल यशस्वी प्रक्षेपित; काही सेकंदांत दोन मिसाईली डागल्या, गरज पडल्यास दिशा सुद्धा बदलणार
Video: हेलिकॉप्टरमधून प्रथमच नौदल जहाजविरोधी मिसाईल यशस्वी प्रक्षेपित; काही सेकंदांत दोन मिसाईली डागल्या, गरज पडल्यास दिशा सुद्धा बदलणार
जम्मू आणि श्रीनगर दरम्यान वंदे भारत एक्स्प्रेस आजपासून सुरु; कसा असेल मार्ग आणि वैशिष्ट्ये काय
जम्मू आणि श्रीनगर दरम्यान वंदे भारत एक्स्प्रेस आजपासून सुरु; कसा असेल मार्ग आणि वैशिष्ट्ये काय
Maharashtra Vidhan Parishad Election 2026: एकनाथ शिंदेंकडून अधिकचा उमेदवार देण्याची हूल अन् उबाठाची बत्तीगुल; ज्योती वाघमारेंची बोचरी टीका, म्हणाल्या, 'मविआचे भविष्य...'
एकनाथ शिंदेंकडून अधिकचा उमेदवार देण्याची हूल अन् उबाठाची बत्तीगुल; ज्योती वाघमारेंची बोचरी टीका, म्हणाल्या, 'मविआचे भविष्य...'
Donald Trump: 'ट्रम्पचं डोकं ठिकाणावर आहे असं वाटतं का?' थेट खासदाराने खोचक सवाल करताच संरक्षण मंत्र्यांनी दिलेल्या उत्तरानं भूवया उंचावल्या!
'ट्रम्पचं डोकं ठिकाणावर आहे असं वाटतं का?' थेट खासदाराने खोचक सवाल करताच संरक्षण मंत्र्यांनी दिलेल्या उत्तरानं भूवया उंचावल्या!
'माझा पक्ष विलीन करायला मी मूर्ख आहे का? असं बच्चू कडू म्हणाले होते, आता पाहावं लागेल कोण मूर्ख आहे ते, विधानसभेला निवडून येण्याची क्षमता संपली का?' संजय राऊतांचा खोचक सवाल
'माझा पक्ष विलीन करायला मी मूर्ख आहे का? असं बच्चू कडू म्हणाले होते, आता पाहावं लागेल कोण मूर्ख आहे ते, विधानसभेला निवडून येण्याची क्षमता संपली का?' संजय राऊतांचा खोचक सवाल
एक्स्प्रेसवेवर धावत्या कारला आग लागून अल्पवयीन मुलीसह 5 जण जिवंत जळाले; फक्त हाडं सापडली, मुलाची नोकरीची इच्छा पूर्ण झाली म्हणून गेले होते वैष्णो देवीच्या दर्शनाला
एक्स्प्रेसवेवर धावत्या कारला आग लागून अल्पवयीन मुलीसह 5 जण जिवंत जळाले; फक्त हाडं सापडली, मुलाची नोकरीची इच्छा पूर्ण झाली म्हणून गेले होते वैष्णो देवीच्या दर्शनाला
राष्ट्रीय महामार्गावर शंभरीच्या स्पीडने सुसाट, टायर फुटताच पिकअप पलटीवर पलटी मारत दुभाजकाच्या पल्याड जात समोरुन येणाऱ्या स्कॉर्पिओवर धडकला; तब्बल 16 जणांचा करुण अंत
राष्ट्रीय महामार्गावर शंभरीच्या स्पीडने सुसाट, टायर फुटताच पिकअप पलटीवर पलटी मारत दुभाजकाच्या पल्याड जात समोरुन येणाऱ्या स्कॉर्पिओवर धडकला; तब्बल 16 जणांचा करुण अंत
Maharashtra News Live Updates: विधानपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस
Maharashtra News Live Updates: विधानपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस
Embed widget