एक्स्प्लोर

आमिर खानचा सोशल मीडियाच नाही, तर मोबाईललाही बाय बाय, माझा कट्ट्यावर सांगितलं कारण...

आमिर खानने सोशल मीडियाला रामराम ठोकलाय तर फोन वापरणंदेखील बंद केलेले आहे. मोबाईल वापरणं बंद केल्यावर त्याच्यात कोणते बदल झाले ते जाणून घ्या...

मुंबई : बॉलिवूड अभिनेता आमिर खान हा नेहमी त्याच्या चित्रपटांद्वारे किंवा पाणी फाउंडेशनसाठी करत असलेल्या कामांमुळे लोकांसमोर येत असतो. आमिरने त्याच्या वाढदिवसाच्या दुसऱ्याच दिवशी सोशल मीडियाला रामराम ठोकला होता. पण, सोशल मीडियाला रामराम ठोकण्याआधीच सहा आठवडे त्याने मोबाईल फोन वापरणं बंद केलं होतं, असं त्याने माझा कट्ट्यावर सांगितलं. मोबाईल वापरणं बंद करण्याबाबत आमिर म्हणाला की, "सध्या आपल्याला मोबाईलची खूप सवय झाली आहे. पण पूर्वी आपण मोबाईल फोन वापरतच नव्हतो.मला असं जाणवलं की, मी मोबाईल फोनच्या खूप आहारी गेलोय. मी सतत फोनमध्ये घुसून असतो, ऑनलाईन बुद्धिबळ किंवा इतर ऑनलाईन खेळ खेळण्यात मग्न असतो,ऑनलाईन बातम्या बघतो, मित्रांच्या मेसेजला प्रत्युत्तर देतो किंवा 10-12 कौटुंबिक ग्रुपमध्ये अॅक्टिव्ह असतो. या सगळ्यामुळे मी दिवसभर खूप विचलित होतोय असं मला जाणवलं, त्यामुळे मी मोबाईल वापरणं बंद केलं".  

आमिर म्हणतो, 'जेव्हापासून मी मोबाईल फोन वापरणं बंद केलं आहे, तेव्हापासून माझ्या आयुष्यात मोठ्या प्रमाणात बदल घडून आले आहेत'. आमिर पुढे म्हणाला, जर माझ्याकडेफोन असता तर मी 28 जानेवारीपासून जो प्रवास केला आहे तो मी करूच शकलो नसतो.फोन सुरू असता तर हा पल्ला गाठायला मला दोन वर्ष लागली असती. पूर्वी मी गाडीत बसलेलो असताना मी फोनमध्ये रमलेलो असायचो.पण तेच आता मी माझ्या आयुष्याबद्दल, मुलांबद्दल, घरच्यांबद्दल, नवीन प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटाबद्दल विचार करतो. पुस्तकं वाचतो. मोबाईल फोन नसताना मला जाणवतय मी किती मोठं पाऊल उचललय. फोन असताना मला या कशाची जाणीवच झाली नव्हती. मोबाईलफोन न वापरल्याने होणाऱ्या फायद्यांमुळे मी सोशल मीडियापासूनही दूर होण्याचा निर्णय घेतला.

आमिरला लोकांसोबत संवाद साधणं आवडतं. तसेच त्याचे अनेक उपक्रम लोकांना एकत्रित आणून केलेलेच आहेत. आमिर म्हणतो, 'मला जास्तीतजास्त तीन लोकांसोबतच संवाद साधायला आवडतं. मला गावात जाऊन लोकांना प्रत्यक्ष भेटायला आवडतं. टीव्हीवर यायलाही आवडतं. परंतु ऑनलाईन कोणतीही गोष्ट करायला आवडत नाही. त्यात मजादेखील येत नाही'.

आमिर आणि सोशल मीडिया...

आमिरला असं वाटतं की, सोशल मीडिया हे माध्यम त्याच्यासाठी नाही. अनेक जणं सोशल मीडियाचा चांगला वापर करत आहेत. सध्याच्याघडीला सोशल मीडिया हे एक उत्तम प्लॅटफॉर्म तयार झाले आहे. पण, आमिर मात्र यासगळ्यापासून दूर राहणंच पसंत करतो. 

असा कोणता क्षण होता जेव्हा आमिरने सोशल मीडिया बंद करण्याचा निर्णय घेतला...

आमिर म्हणतो, "एकदिवशी मला जाणवलं की, मी सोशल मीडियावर खूपच जास्त अॅक्टिव्ह असतो. मी चित्रपट, सामाजिक कामं आणि फोनमध्ये खूप रमत चाललोय त्यामुळे माझं माझ्या मुलांवर अजिबात लक्ष नाही. म्हणून आता मुलांकडे लक्ष द्यायला हवं असा विचार करूनमोबाईल फोन बंद केला. मला कोणासोबत संपर्क साधायचा असेल तर माझ्यासोबत मॅनेजर, स्पॉट बॉय, सुरक्षारक्षक असतो. त्यांच्याकडे फोन असतोच. फक्त मी वापरत नाही". 

 

महत्त्वाच्या बातम्या

Kareena Kapoor Khan On NEET Paper Leak Row: 'गेल्या काही दिवसांपासून मी विचार करतच होते, पण...'; अखेर करिना कपूरनं मौन सोडलं, विद्यार्थी आंदोलनावर थेटच भाष्य
'गेल्या काही दिवसांपासून मी विचार करतच होते, पण...'; अखेर करिना कपूरनं मौन सोडलं, विद्यार्थी आंदोलनावर थेटच भाष्य
R. Madhavan Shared Delay Post On CJP Student Protests: उशिरा का होईना, आर. माधवनला विद्यार्थी आंदोलनावर बोलायला सुचलं, त्यानंतरही नेटकऱ्यांनी 'ते' हेरलं अन् झोड झोड झोडलं, नेमकं काय घडलं?
आर. माधवनची विद्यार्थ्यांना सहानुभूती, पण नेटकऱ्यांनी हेरलं भलतंच काहीतरी, झोड झोड झोडलं, नेमकं काय घडलं?
Tejaswini Kolhapure On IVF Struggles: प्रचंड त्रास, 1000 हून जास्त इंजेक्शन्स, शरीराचा आकारच बदलून गेलेला...; श्रद्धा कपूरची बहीण 'टेस्ट ट्यूब बेबी', आईनं IVF च्या असंख्य वेदना सहन करुन दिलेला जन्म
प्रचंड त्रास, 1000 हून जास्त इंजेक्शन्स, शरीराचा आकारच बदलून गेलेला...; श्रद्धा कपूरची बहीण 'टेस्ट ट्यूब बेबी', आईनं IVF च्या असंख्य वेदना सहन करुन दिलेला जन्म
Bollywood Music Director Struggle Life: बॉलिवूडचा 'तो' दिग्गज संगीत दिग्दर्शक, जो किशोर कुमारांना म्हणायचा 'शोर कुमार', तर लतादीदींचाही केलेला अपमान, वादग्रस्त स्वभावामुळे मृत्यूनंतरही सर्वांनी फिरवेली पाठ
बॉलिवूडचा 'तो' दिग्गज संगीत दिग्दर्शक, जो किशोर कुमारांना म्हणायचा 'शोर कुमार', तर लतादीदींचाही केलेला अपमान, वादग्रस्त स्वभावामुळे मृत्यूनंतरही सर्वांनी फिरवेली पाठ

व्हिडीओ

Sonam Wangchuk Hunger Strike : 26 दिवसांनंतर अखेर सोनम वांगचुक यांचं उपोषण मागे; मंत्री जेपी नड्डा आणि जितेंद्र सिंह यांच्या चर्चेनंतर निर्णय
Mumbai Police Threat Drugs Case : वर्दीतील ‘पावडर’मामा, विद्यार्थ्यांना धमकी Special Report
Maharashtra CJP Protets | सीजेपीच्या समर्थनार्थ महाराष्ट्रात आंदोलनं | ABP Majha Special Report
CJP Protest Vs Modi Government : सरकार आणि आंदोलकांची कोंडी कशी फुटणार? | ABP Majha Special Report
NEET Protest Jantar Mantar :सकाळच्या चहापासून जेवणापर्यंत,आंदोलनात विद्यार्थ्यांचाच एकमेकांना आधार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : भारताच्या विद्यार्थ्यांसोबत उभं राहताना आम्हाला कोणी रोखू शकत नाही, राहुल गांधी इंडिया आघाडीच्या  खासदारांसह गांधी स्मृती स्थळावर 
विद्यार्थी रस्त्यावर त्यांना विरोधी पक्षांच्या खासदारांचा पाठिंबा, राहुल गांधींसह INDIA आघाडीचे खासदार गांधी स्मृती स्थळावर
मॅगीने भरलेला मालवाहू ट्रक जगबुडी नदीत कोसळला; नदीच्या प्रवाहात ड्रायव्हरसह 400 मीटरपर्यंत वाहून गेला
मॅगीने भरलेला मालवाहू ट्रक जगबुडी नदीत कोसळला; नदीच्या प्रवाहात ड्रायव्हरसह 400 मीटरपर्यंत वाहून गेला
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद; पोलिसांची व्हॅन अडवणारी रिया कोण? आंदोलनावर काय म्हणाली
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद; पोलिसांची व्हॅन अडवणारी रिया कोण? आंदोलनावर काय म्हणाली
IND vs ZIM: टीम इंडिया पुन्हा विजयाच्या ट्रॅकवर, वैभव सूर्यवंशीचा हरारेत पुन्हा धमाका, झिम्बाब्वेला पराभूत करत मालिकेत आघाडी  
टीम इंडिया पुन्हा विजयाच्या ट्रॅकवर, वैभव सूर्यवंशीचा हरारेत पुन्हा धमाका, झिम्बाब्वेला पराभूत करत मालिकेत आघाडी  
Salman khan Delhi Protest: प्लीज गो बॅक टू होम.. सलमान खानचं दिल्लीतील आंदोलकांना आवाहन; सोनम वांगचुकांनाही घरचं जेवण पाठवणार
प्लीज गो बॅक टू होम.. सलमान खानचं दिल्लीतील आंदोलकांना आवाहन; सोनम वांगचुकांनाही घरचं जेवण पाठवणार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 जुलै 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 जुलै 2026 | गुरुवार
मुंबईकरांसाठी गुडन्यूज; मुंबईला पाणीपुरवठा करणारे मोडकसागर अन् तानसा धरण 100 टक्के भरले, मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू
मुंबईकरांसाठी गुडन्यूज; मुंबईला पाणीपुरवठा करणारे मोडकसागर अन् तानसा धरण 100 टक्के भरले, मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू
संपूर्ण देशातील तरुण रस्त्यावर असताना मोदी संसदेत येत नाहीत, अमित शाहांना विचारलं लाठीचार्ज का केला? एनएसए का लावला, ते दहशवादी आहेत?? आणि मला विचारता संसद का चालत नाही? प्रियांका गांधींचा संताप
संपूर्ण देशातील तरुण रस्त्यावर असताना मोदी संसदेत येत नाहीत, अमित शाहांना विचारलं लाठीचार्ज का केला? एनएसए का लावला, ते दहशवादी आहेत?? आणि मला विचारता संसद का चालत नाही? प्रियांका गांधींचा संताप
Embed widget