एक्स्प्लोर

Bhushan Kadu :'आमची "कादंबरी" वाचायची अर्धीच राहिली', मुलाची जबाबदारी अन् आयुष्य संपवण्याचा निर्णय; भूषण कडू पहिल्यांदाच झाला व्यक्त

Bhushan Kadu : अभिनेता भूषण कडू याने त्याच्या पत्नीला गमावल्यानंतर आयुष्यातला सगळ्यात कठिण काळ अनुभवला. त्याविषयी पहिल्यांदाच भूषण व्यक्त झाला आहे. 

Bhushan Kadu : कलाकार हा रंगभूमीवर जितका सहज वारवरतो, तितकचं त्याच्या खऱ्या आयुष्यातला वावर हा सोपा नसतो. अनेकदा अनेक अडचणींचा सामना कलाकारांना करावा लागतो. असाच काहीसा अनुभव अभिनेता भूषण कडूचा (Bhushan Kadu) आहे. 22 व्यावसायिक नाटकं, 7 ते 8 सिनेमे करणारा हा विनोदवीर मागील काही वर्ष त्याच्या आयुष्यातला सगळ्यात कठिण काळ अनुभवत होता. त्यातच कोविडच्या काळात भूषणच्या बायकोनेही साथ सोडली. त्यानंतर मात्र भूष पुरता हादरला. स्वत:ला संपवण्याचा निर्णय, आर्थिक अचडणींचा सामना करत आता पुन्हा एकदा भूषण प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यास सज्ज झाला आहे. पण या त्याच्या अनुभवाविषयी भूषणने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये भाष्य केलं आहे. 

भूषणने नुकतीच लोकमत फिल्मीला मुलाखत दिली. त्यामुळे त्याने आयुष्यातल्या अनेक अडचणी देखील सांगितल्या आहेत. बायको गेल्यानंतर स्वत:ला सावरणं, मुलाची जबाबदारी निभावणं अशा अनेक गोष्टींविषयी भूषण पहिल्यांदाच व्यक्त झालाय. त्याच्या अनेक अनुभवांनी चाहत्यांना बराच धक्का बसला आहे. गाडी होती पण त्यात डिझेल भरायला पैसे नव्हते, मित्राकडे एकदा 850 रुपये मागितले, वडापाव खाण्यासाठीही पैसे नसायचे, अशा अनेक धक्कायदायक गोष्टी भूषणने यावेळी सांगितल्या.


माझी कादंबरी वाचायची अर्धवटच राहिली - भूषण कडू

भूषणने म्हटलं की, 'प्रत्येक माणसाच्या आयुष्यात अनेक चढउतार असतात. तसंच कलाकाराच्या बाबतीतही असतं. अनेक दु:ख पचवली होती.वडिलांचं जाणं, आईचं जाणं मग आजीचं जाणं. सगळं छान सुरु असताना, चांगला संसार सुरु असताना अचानक लॉकडाऊनचा काळ आला आणि आमची कादंबरी वाचायची अर्धवटचं राहून गेली. कोविडच्या शेवटच्या लाटेमध्ये ती देवाघरी गेली. मग मात्र आयुष्यामध्ये खूप मोठा हादरा बसला. मुलाची जबाबदारी होती, अकरा वर्षांचं लेकरु. अचानक हे सगळं घडल्यामुळे थोडा हललो मी. कारण कलाकार हा संवदेनशील असतो. जर त्याच्याकडे संवेदना नसतील तर तो काहीच करु शकत नाही. नकळत हा होईना, जेव्हा सगळं जग सुरु झालं तेव्हा कादंबरीने या जगाचा निरोप घेतला.' 

स्वत:ला संपवण्याचा निर्णय घेतला - भूषण कडू 

यावर भूषनने म्हटलं की, 'कोविडच्या काळात पूर्ण इंडस्ट्री बंद पडली होती. प्रत्येकाच्या आर्थिक अडचणी होत्या. माझंही तेच होतं. जेव्हा कादंबरी आजारी होती, तेव्हा रोज थोडा थोडा आर्थिक संचय वापरत होतो. पण एका वेळेनंतर तो देखील संपला. त्यानंतर आयुष्यात खरी ओढाताण सुरु झाली.पण आम्हाला रसिकांसाठी चांगलचं रहावं लागतं. चांगली गाडी, कपडे. पण गंम्मत अशी होती की, गाडी आहे पण डीझेल भरायला पैसेच नव्हते.कामांसाठी जायचंय पण तिथपर्यंत पोहचायला पैसेच नव्हते.आपल्याला ही आर्थिक अडचण संपवायची असेल तर काम करणं गरजेचं आहे. खूप त्रासलो होतो, तेव्हा स्वत:ला संपवण्याचा निर्णय घेतला. कारण मुलाचं दु:ख पाहू शकत नव्हतो आणि त्याला काहीच देऊ शकत नव्हतो, याचं दु:ख होतं. मग एक दिवस ठरवलं की, हे सगळं संपवण्यासाठी स्वत:लाच संपवून टाकूया. पण ही समज जरा उशीरा आली. म्हणून मी सुसाईड नोट लिहायला  घेतली पण ती संपनेचा. मुलाला सांगायचो होतं, त्याच्यावर किती प्रेम आहे, बायकोचं महत्त्व. रोज लिहियचो. 8 ते 10 पान रोज लिहायचो.पण ती पूर्णच होत नव्हती.' 

सध्या भूषण काय करतो?

सध्या भूषण काय करतो हा प्रश्न मागील अनेक दिवसांपासून प्रेक्षकांना पडला आहे. याच उत्तर देताना भूषणने म्हटलं की, मुलाची जबाबदारी होती त्यामुळे अर्थकारण आलाचं. त्यामुळे कामही करायचं होतं. कलाकार हा रसिकांचा असतो, त्यांचं मनोरंजन करणं ही देवाने नेमून दिलेलं काम आहे.  त्याच रसिकांनी मला सांगितलं भूषण तुझ्यासारख्या कलाकाराची गरज आहे रंगभूमीला, सिनेमाला. अनेकांनी मला सोशल मीडियावर मेसेज करुन पुन्हा काम करण्याची विनंती केली. या प्रवासात प्रत्येकाने एकच प्रश्न विचारला सध्या काय करतोयस. पण त्याचं उत्तर माझ्याकडे नव्हतं. त्यानंतर ठरवलं की आपल्याला काम करायचं आहे. तेव्हा माझ्याबाबतीत अनेक अफवा पसरु लागल्या. तो या जगातच नाही, कोविडमध्ये तो देखील गेला, तो भारतातच नाही. पण मला काम कारयचं होतं. त्यानंतर काही चांगली लोकं माझ्या आयुष्यात आलीत. त्यामुळे सध्या अनेक सिनेमे करतोय. खूप काम सुरु आहे. 

ही बातमी वाचा : 

Jackie Shroff High Court: अभिनेता जॅकी श्रॉफची दिल्ली हायकोर्टात धाव, समोर आलं मोठं कारण

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

12 राज्यांच्या SIR-ड्राफ्ट यादीत 13 टक्के मतदारांची घट; उत्तर प्रदेशात सर्वाधिक 2.89 कोटी नावांवर फुली, राजस्थानमधील प्रत्येक 13 वी व्यक्ती मतदार यादीतून गायब
12 राज्यांच्या SIR-ड्राफ्ट यादीत 13 टक्के मतदारांची घट; उत्तर प्रदेशात सर्वाधिक 2.89 कोटी नावांवर फुली, राजस्थानमधील प्रत्येक 13 वी व्यक्ती मतदार यादीतून गायब
फडणवीसांच्या इशाऱ्यानंतर भाजप-एमआयएम युती तुटली; आमदाराला नोटीस, 5 MIM नगरसेवकांनीही काढला पाठिंबा
फडणवीसांच्या इशाऱ्यानंतर भाजप-एमआयएम युती तुटली; आमदाराला नोटीस, 5 MIM नगरसेवकांनीही काढला पाठिंबा
IND vs NZ : टीम इंडियासाठी मोठी गुड न्यूज, उपकॅप्टन श्रेयस अय्यर फिट, न्यूझीलंड विरुद्ध धमाकेदार कमबॅक करणार
टीम इंडियासाठी मोठी गुड न्यूज, उपकॅप्टन श्रेयस अय्यर फिट, न्यूझीलंड विरुद्ध धमाकेदार कमबॅक करणार
काँग्रेससोबत युती, देवेंद्र फडणवीसांचा इशारा; अंबरनाथमधील भाजप नेत्यानं स्पष्टीकरण, ही युती नाहीच
काँग्रेससोबत युती, देवेंद्र फडणवीसांचा इशारा; अंबरनाथमधील भाजप नेत्यानं स्पष्टीकरण, ही युती नाहीच

व्हिडीओ

Imtiyaz Jaleel Sambhajinagar : संजय शिरसाट आणि अतुल सावे यांच्या गुंडांनी हल्ला केला, जलीलांचा आरोप
Imtiyaj Jaleel Sambhajinagar: काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Santosh Dhuri on Bala Nandgaonkar : Sandeep Deshpande जावे यासाठी नांदगावकरांचे प्रयत्न
Kolhapur Pregnant Candidate Congress : 9 महिन्यांची गरोदर महिला कोल्हापुरातून निवडणुकीच्या रिंगणात
Nilesh Rane on Thackeray Alliance : ठाकरे बंधुंची एक्सपायरी डेट संपली, निलेश राणेंचा प्रहार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
12 राज्यांच्या SIR-ड्राफ्ट यादीत 13 टक्के मतदारांची घट; उत्तर प्रदेशात सर्वाधिक 2.89 कोटी नावांवर फुली, राजस्थानमधील प्रत्येक 13 वी व्यक्ती मतदार यादीतून गायब
12 राज्यांच्या SIR-ड्राफ्ट यादीत 13 टक्के मतदारांची घट; उत्तर प्रदेशात सर्वाधिक 2.89 कोटी नावांवर फुली, राजस्थानमधील प्रत्येक 13 वी व्यक्ती मतदार यादीतून गायब
फडणवीसांच्या इशाऱ्यानंतर भाजप-एमआयएम युती तुटली; आमदाराला नोटीस, 5 MIM नगरसेवकांनीही काढला पाठिंबा
फडणवीसांच्या इशाऱ्यानंतर भाजप-एमआयएम युती तुटली; आमदाराला नोटीस, 5 MIM नगरसेवकांनीही काढला पाठिंबा
IND vs NZ : टीम इंडियासाठी मोठी गुड न्यूज, उपकॅप्टन श्रेयस अय्यर फिट, न्यूझीलंड विरुद्ध धमाकेदार कमबॅक करणार
टीम इंडियासाठी मोठी गुड न्यूज, उपकॅप्टन श्रेयस अय्यर फिट, न्यूझीलंड विरुद्ध धमाकेदार कमबॅक करणार
काँग्रेससोबत युती, देवेंद्र फडणवीसांचा इशारा; अंबरनाथमधील भाजप नेत्यानं स्पष्टीकरण, ही युती नाहीच
काँग्रेससोबत युती, देवेंद्र फडणवीसांचा इशारा; अंबरनाथमधील भाजप नेत्यानं स्पष्टीकरण, ही युती नाहीच
'लोकं कुत्र्यांच्या त्रास किती काळ सहन करतील? शाळा आणि न्यायालयाच्या परिसरात त्यांचं काय काम? त्यांच्या चावण्याने मुलं, माणसं मरत आहेत' सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
'लोकं कुत्र्यांच्या त्रास किती काळ सहन करतील? शाळा आणि न्यायालयाच्या परिसरात त्यांचं काय काम? त्यांच्या चावण्याने मुलं, माणसं मरत आहेत' सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
Share Market : सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात घसरण, सेन्सेक्स  102 अंकांनी घसरला, मिडकॅप-स्मॉलकॅपमध्ये तेजी 
सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात घसरण, सेन्सेक्स  102 अंकांनी घसरला, मिडकॅप-स्मॉलकॅपमध्ये तेजी 
Nawab Malik: मुंबईत 50 वर्षांपासून बांगलादेशींचा तपास केला जातोय, शेख हसीना यांना भारतातून पहिल्यांदा बाहेर काढावं, त्यांच्यामुळे तिथं हिंदू अडचणीत; नवाब मलिकांचा हल्लाबोल
मुंबईत 50 वर्षांपासून बांगलादेशींचा तपास केला जातोय, शेख हसीना यांना भारतातून पहिल्यांदा बाहेर काढावं, त्यांच्यामुळे तिथं हिंदू अडचणीत; नवाब मलिकांचा हल्लाबोल
व्हायरल व्हिडिओवर राहुल नार्वेकर पहिल्यांदाच बोलले; 'उमेदवारी मागे घेण्यासाठी 5-5 कोटी मागण्याचे प्रयत्न'
व्हायरल व्हिडिओवर राहुल नार्वेकर पहिल्यांदाच बोलले; 'उमेदवारी मागे घेण्यासाठी 5-5 कोटी मागण्याचे प्रयत्न'
Embed widget