Alia Ranbir Wedding : सात नव्हे तर केवळ चार फेऱ्यांमध्येच आलिया-रणबीरचा विवाह सोहळा संपन्न, पण का?
आलियाच्या भावानं म्हणजेच राहुल भटनं (Rahul Bhatt) एका मुलाखतीमध्ये आलिया (Alia Bhatt) आणि रणबीरच्या (Ranbir Kapoor) विवाह सोहळ्याबाबत सांगितलं.

Alia Ranbir Wedding : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि अभिनेत्री आलिया भट (Alia Bhatt) यांनी काल (15 एप्रिल) लग्नगाठ बांधली. मोजक्या लोकांच्या उपस्थितीत तसेच अगदी साध्या पद्धतीनं या दोघांचा विवाह सोहळा पार पडला. त्यांच्या वास्तू या घरामध्ये हा लग्नसोहळा पार पडला असून त्यांच्या चाहते त्यांना सोशल मीडियावर पोस्ट शेअर शुभेच्छा दिल्या. आलियाच्या भावानं म्हणजेच राहुल भटनं (Rahul Bhatt) एका मुलाखतीमध्ये आलिया आणि रणबीरच्या विवाह सोहळ्याबाबत सांगितलं. त्यांनी सांगितलं की, आलिया आणि रणबीरनं सात नाही तर केवळ चारचं फेरे घेतले. याचे कारण देखील राहुलनं सांगितलं.
मुलाखतीमध्ये राहुलनं सांगितलं, 'आलिया आणि रणबीरनं सात नाही तर चारचं फेरे घेतले. त्यांच्या लग्नाला विशेष पंडित हजर होते. हे पंडित गेली कित्येक वर्ष कपूर कुटुंबियांच्या कार्यक्रमांना उपस्थिती लावत आहेत. त्या पंडितांनी प्रत्येक फेऱ्याचे महत्व सांगितले. पण मी अशा कुटुंबाचा सदस्य आहे जिथे अनेक धर्माचे लोक राहतात. रेकॉर्डसाठी सात फेरे नाहीत, तर चार फेरे झाले आणि चारही फेरे होत असताना मी तिथे उपस्थिती होतो. '
View this post on Instagram
रिसेप्शन होणार का?
लग्नाचे सर्व विधी आटोपल्यानंतर नीतू कपूर मुलगी रिद्धिमा आणि जावई भरत साहनीसोबत मीडियासमोर आल्या. त्यांनी पापाराझींचे आभार मानले आणि आलिया-रणबीरवर प्रेमाचा वर्षाव केल्याबद्दल आनंद व्यक्त केला. याशिवाय त्यांना रिसेप्शनबाबत विचारण्यात आले असता, त्यांनी रिसेप्शन होणार नसल्याचे स्पष्ट केले. उलट त्या म्हणाल्या की, सगळं झालं आता तुम्ही आरामात घरी जाऊन झोपा.
हेही वाचा :
- Alia Ranbir Wedding : कपूर कुटुंबांकडून आलिया भट्टचं स्वागत, करीनासह आदर, रिद्धिमाच्या पोस्ट चर्चेत
- KGF 2 : यशच्या 'केजीएफ 2'ची दमदार सुरुवात, पहिल्याच दिवशी 4400 स्क्रीनवर प्रदर्शित
- Wedding : आलिया-रणबीरनंतर 'हे' मराठी सेलिब्रिटी अडकणार लग्नबंधनात
Before You Go
Arjun Tendulkar Weds Saaniya Chandhok : अर्जुन-सानिया लग्नबंधनात ! स्टायलिश लूकने वेधलं लक्ष






















