एक्स्प्लोर

Hindi Language Controversy : किच्चा सुदीप-अजय देवगणच्या ‘हिंदी’ वादात कंगना रनौतची एण्ट्री, म्हणाली ‘तमिळ ही तर...’

Kangana Ranaut : नुकताच कंगनाच्या ‘धाकड’ या आगामी चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा पार पडला. या सोहळ्यात कंगनाने ‘हिंदी’ भाषेच्या या वादावर मोठं वक्तव्य केलं आहे.

Hindi Language Controversy : बॉलिवूड अभिनेता अजय देवगण (Ajay Devgn) आणि साऊथ अभिनेता किच्चा सुदीप (Kiccha Sudeep) यांच्यातील ट्विटर वॉर सध्या चांगलेच चर्चेत आहे. हिंदी भाषेच्या मुद्द्यावरून या दोघांमध्ये जोरदार तूतू-मैंमैं झाली होती. अगदी नेटकरीदेखील प्रतिक्रियांच्या माध्यमातून या वादात सामील झाले होते. मात्र, आता ‘पंगा क्वीन’ अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) हिने या वादात उडी घेतली आहे. कंगनाने देखील या प्रकरणावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

अभिनेत्री कंगना रनौत तिच्या बेधडक शैलीसाठी ओळखली जाते. कोणत्याही विषयावर आपलं मत मांडायला अभिनेत्री मागे राहत नाही. नुकताच कंगनाच्या ‘धाकड’ या आगामी चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा पार पडला. या सोहळ्यात कंगनाने ‘हिंदी’ भाषेच्या या वादावर मोठं वक्तव्य केलं आहे.

काय म्हणाली कंगना?

या वादावर एबीपीला प्रतिक्रिया देताना कंगना म्हणाली की, ‘या प्रकरणावर माझ्याकडे थेट उत्तर नाही. आपला देश विविधतेने, विविध भाषांनी आणि विविध संस्कृतींनी बनलेला आहे. प्रत्येकाला आपल्या संस्कृतीचा अभिमान वाटणे हा जन्मसिद्ध अधिकार आहे. मात्र, आपल्या देशाला एकत्र बांधून ठेवण्यासाठी एक धागा हवा आहे. संविधानाचा आदर करायचा असेल, तर हा आपल्या राज्यघटनेने हिंदीला राष्ट्रभाषा केली आहे. मात्र, तमिळ हिंदीपेक्षा जुनी आहे आणि संस्कृत तर त्याहून जुनी आहे. मला असे वाटते आपली राष्ट्रभाषा संस्कृत असली पाहिजे. कारण, कन्नड, तमिळ, गुजराती ते हिंदी सर्व भाषा संस्कृतमधून आल्या आहेत.

आता संस्कृत सोडून, हिंदी का बनवली गेली याचे उत्तर माझ्याकडे नाही. हे त्यावेळी घेतलेले निर्णय आहेत. पण जेव्हा खलिस्तानची मागणी होते, तेव्हा ते म्हणतात की आमचा हिंदीवर विश्वास नाही. तरुणांची दिशाभूल करत असताना, ते संविधान नाकारत आहेत. वेगळे राष्ट्र व्हावे यासाठी तमिळांचे आंदोलनही झाले. तुम्ही बंगाल वेगळा अक्र्ण्याची मागणी करता आणि तुम्ही हिंदीला ओळखत नाही असे म्हणता. मग, तुम्ही हिंदी नाकारत नसून, दिल्लीला सत्तेचे केंद्र म्हणून नाकारत आहात. या गोष्टीला अनेक बाजू आहेत आणि जेव्हा तुम्ही त्याबद्दल बोलता तेव्हा तुम्हाला या सर्व गोष्टींची कल्पना यायला हवी.

जेव्हा तुम्ही हिंदी नाकारता, तेव्हा तुम्ही दिल्लीच्या सरकार आणि आपले संविधानही नाकारता. तुमचा सरकारवर विश्वास नाही, मग ते सर्वोच्च न्यायालय असो, कोणत्याही प्रकारचे कायदा असो... दिल्लीत सरकार जे काही करते, ते हिंदीत करते, नाही का? जर्मन, फ्रेंच, स्पॅनिश असो, त्यांना त्यांच्या भाषांचा अभिमान वाटतो. वसाहतीचा इतिहास कितीही काळा असला, तरी सुदैवाने आणि दुर्दैवाने इंग्रजी हा संवादाचा दुवा बनला आहे. इंग्रजी ही एकात्म भाषा असावी का? की हिंदी, संस्कृत किंवा तमिळ ही जोडणारी भाषा असावी? हे आपण ठरवायचे आहे.’

साऊथचे चित्रपट इतके यशस्वी का?

या प्रश्नावर उत्तर देताना कंगना म्हणाली, ‘आम्ही आमचे चित्रपट तामिळ, तेलुगु आणि कन्नडमध्ये डब करतो. आम्ही आमचे चित्रपट देशातील इतर राज्यांमध्ये घेऊन जात आहोत. दाक्षिणात्य आणि उत्तर किंवा दक्षिण भारतातील चित्रपटांमधला वाद हा अत्यंत दुर्दैवी आहे. त्यांना नेहमीच सावत्र आईची वागणूक मिळाली आणि त्यामुळेच आज त्यांना विजयी झाल्यासारखे वाटत आहे. त्यांच्यावर असा अन्याय व्हायला नको होता. हिंदी चित्रपटसृष्टीत दक्षिण भारतातील एकही आघाडीचा नायक नाही... मी एका अतिशय यशस्वी नायकाबद्दल बोलत आहे.’

‘मी नेहमीच हा मुद्दा मांडत आलो आहे की, इथले वर्तुळ खूप लहान आहे. बाहेरच्या लोकांना कसे आत येऊ दिले जात नाही, याचेही हे उदाहरण आहे. आता ते त्यांचे हक्क व्यक्त करत आहेत, जे त्यांच्याकडे आधीच आहेत... हा त्यांचा देश आहे... म्हणून ते त्यांचे हक्क मागत आहेत. हा संपूर्ण देश त्यांचाही आहे. आपण सगळे भारतीय आहेत. त्यांच्याकडे पाहण्याचा आपला दृष्टीकोन बदलला पाहिजे. जे इथे सर्वेसर्वा म्हणून बसले आहेत, त्यांच्या तोंडावर ही एक मोठी चपराक आहे. मला खूप आनंद होतोय की, त्यांना त्यांचे हक्क मिळत आहेत’, असे कंगना म्हणाली.

हेही वाचा :

महत्त्वाच्या बातम्या

TV Actress Divorce: लग्नाच्या 5 वर्षांनंतर प्रसिद्ध TV अभिनेत्री होणार नवऱ्यापासून विभक्त; भावनिक पोस्ट शेअर करत म्हणाली...
लग्नाच्या 5 वर्षांनंतर प्रसिद्ध TV अभिनेत्री होणार नवऱ्यापासून विभक्त; भावनिक पोस्ट शेअर करत म्हणाली...
Aamir - Gauri Wedding: आमिर - गौरीच्या लग्नाला जाताना अंबानींच्या ताफ्यासमोर भयंकर घडलं, गाडीसमोर झाड कोसळलं अन् मग...
आमिर - गौरीच्या लग्नाला जाताना अंबानींच्या ताफ्यासमोर भयंकर घडलं, गाडीसमोर झाड कोसळलं अन् मग...
Aamir Khan Marries Gauri Spratt: आमिर अन् गौरीची साता जन्माची गाठ! घरच्या घरीच अभिनेता तिसऱ्यांदा लग्नाच्या बेडीत; पहिला PHOTO व्हायरल
आमिर अन् गौरीची साता जन्माची गाठ! घरच्या घरीच अभिनेता तिसऱ्यांदा लग्नाच्या बेडीत; पहिला PHOTO व्हायरल
Rupali Chakankar on Maharashtra Epstein Files: 'महाराष्ट्र एपस्टीन फाइल्स'च्या टीमला रुपाली चाकणकरांचा दणका; निर्माते, दिग्दर्शक अन् दिपाली सय्यद यांच्याविरोधात नोटीस
'महाराष्ट्र एपस्टीन फाइल्स'च्या टीमला रुपाली चाकणकरांचा दणका; निर्माते, दिग्दर्शक अन् दिपाली सय्यद यांच्याविरोधात नोटीस

व्हिडीओ

Dr. Budhajirao Mulik On Majha Katta :शेतकरी राजा कधी होईल? कृषितज्ज्ञ बुधाजीराव मुळीक माझा कट्ट्यावर
Coffee With Kaushik Sachin Ahir : ठाकरेंना का सोडलं? सचिन अहिरांचे मोठे खुलासे!
CM Devendra Fadnavis On Missing link : मिसिंग लिंकवर खड्डे पडले? मुख्यमंत्री म्हणाले...
Ashwini Bhide Special Report : अश्विनी भिंडेंना शिवसेनेकडून टार्गेट, भाजप-ठाकरे गटाचा एकच सूर
Zero Hour : मुंबईच्या मॅनहोल अपघातावरून थेट महापालिका आयुक्तांचा राजीनामा मागणं योग्य वाटतं का?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mutual Fund : गेल्या एका वर्षातील सर्वोत्तम कामगिरी कोणत्या म्युच्युअल फंड्सनं केली, जाणून घ्या यादी
गेल्या एका वर्षातील सर्वोत्तम कामगिरी कोणत्या म्युच्युअल फंड्सनं केली, जाणून घ्या यादी
Raigad Palghar Rain Alert : रायगड आणि पालघरमध्ये पावसाचा 'रेड अलर्ट', सोमवारी शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर!
रायगड आणि पालघरमध्ये पावसाचा 'रेड अलर्ट', सोमवारी शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर!
Ram Mandir: राम मंदिरातील राजरोस लूट समोर आली, 'श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट'ला RTI अंतर्गत आणा, खासदाराचे थेट अमित शाहांना पत्र
राम मंदिरातील राजरोस लूट समोर आली, 'श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट'ला RTI अंतर्गत आणा, खासदाराचे थेट अमित शाहांना पत्र
Sensex : सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 6 कंपन्यांची पाच दिवसात 1 लाख कोटींची कमाई, भारती एअरटेलला सर्वाधिक फायदा तर एल अँड टी आणि रिलायन्सला फटका
सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 6 कंपन्यांचे गुंतवणकदार मालामाल, 1 लाख कोटींची कमाई, चार कंपन्यांना फटका
Ayatollah Ali Khamenei: इराणचे सर्वोच्च धर्मगुरु अयातुल्ला खामेनींना शेवटचा निरोप देण्यासाठी कोट्यवधी देशवासी जनता फक्त काळ्या रंगाच्या पोशाखातच का पोहोचली?
इराणचे सर्वोच्च धर्मगुरु अयातुल्ला खामेनींना शेवटचा निरोप देण्यासाठी कोट्यवधी देशवासी जनता फक्त काळ्या रंगाच्या पोशाखातच का पोहोचली?
Bhiwandi Rain : भिवंडीत पावसात पालिका गायब, मदतीला 'स्पायडरमॅन' हजर! जलमय रस्त्यांवर उतरून नागरिकांना दिला आधार
भिवंडीत पावसात पालिका गायब, मदतीला 'स्पायडरमॅन' हजर! जलमय रस्त्यांवर उतरून नागरिकांना दिला आधार
'तर तुम्हाला मला मारावं लागेल, गद्दारीला सुद्धा मर्यादा असते, जर तुमच्यात हिंमत असेल..' फुटीर आमदार खासदारांना ममता बॅनर्जींचे ओपन चॅलेंज!
'तर तुम्हाला मला मारावं लागेल, गद्दारीला सुद्धा मर्यादा असते, जर तुमच्यात हिंमत असेल..' फुटीर आमदार खासदारांना ममता बॅनर्जींचे ओपन चॅलेंज!
Nashik Crime News: कट लागल्याचा जाब विचारताच कारचालकाचा संताप अनावर, दुचाकीस्वाराला भर रस्त्यात भोसकलं, नंतर पोलिसांनाही चिरडण्याचा प्रयत्न; नाशिकमधील धक्कादायक घटना
कट लागल्याचा जाब विचारताच कारचालकाचा संताप अनावर, दुचाकीस्वाराला भर रस्त्यात भोसकलं, नंतर पोलिसांनाही चिरडण्याचा प्रयत्न; नाशिकमधील धक्कादायक घटना
Embed widget