एक्स्प्लोर

वाराणसीतून निवडणूक का नको लढवू? प्रियांका गांधींचा कार्यकर्त्यांना सवाल

प्रत्यक्ष रायबरेलीत कार्यकर्त्यांच्या भेटीला येऊ न शकल्यामुळे सोनिया गांधी चिंतेत होत्या, असं प्रियांकांनी सांगितलं. त्यावर, रायबरेली मतदारसंघातून तुम्हीच निवडणूक लढवावी, अशी गळ कार्यकर्त्यांनी प्रियांका गांधींना घातली.

रायबरेली (उत्तर प्रदेश) : लोकसभा निवडणुकांच्या रिंगणात न उतरण्याचा निर्णय घेणाऱ्या काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी निर्णयाचा फेरविचार करणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. कारण वाराणसीतून निवडणूक का नको लढवू? असा सवाल प्रियांका गांधींनी कार्यकर्त्यांना केला. प्रियांका गांधी वाराणसीतून लोकसभेच्या रिंगणात उतरल्या, तर ती यंदाच्या लोकसभा निवडणुकीतील सर्वात हायव्होल्टेज लढत ठरेल. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत प्रियांकांची थेट टक्कर होईल. प्रियांका गांधी रायबरेलीत काँग्रेस कार्यकर्त्यांच्या भेटीला आल्या होत्या. आपल्या मातोश्री, अर्थात काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी प्रत्यक्ष भेटीला येऊ न शकल्यामुळे चिंतेत होत्या, असं प्रियांकांनी कार्यकर्त्यांना सांगितलं. त्यावर, रायबरेली मतदारसंघातून तुम्हीच निवडणूक लढवावी, अशी गळ कार्यकर्त्यांनी प्रियांका गांधींना घातली. त्यावर 'वाराणसीतून निवडणूक का नको लढवू?' असा प्रतिप्रश्न प्रियांकांनी हसत विचारला. रायबरेली मतदारसंघातील कामाकडे आपण लक्ष देऊ, अशी हमी सोनिया गांधींना दिल्याचंही प्रियांका यांनी सांगितलं. पक्षाची इच्छा असल्यास निवडणूक लढवण्यास तयार असल्याचं प्रियांका गांधी यांनी एक दिवस आधीच सांगितलं होतं. प्रियांका गांधींनी राजकारणात उडी घेतली, तेव्हापासूनच त्या रायबरेलीतून निवडणूक लढवण्याच्या शक्यता वर्तवल्या जात होत्या. मात्र प्रियांकांनी त्याबाबत सकारात्मकता दाखवली नव्हती. अखेर काँग्रेसच्या पहिल्या उमेदवार यादीत गांधी मायलेकाचं नाव आल्यावर प्रियांका रायबरेलीतून निवडणूक लढवण्याची शक्यता मावळली. उत्तर प्रदेशमध्ये 11 एप्रिल ते 19 मे अशा सातही टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. 23 मे रोजी लोकसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होतील.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
Advertisement
metaverse

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 26 June 2024Nagesh Patil Ashtikar Lok Sabha Oath : बाळासाहेबांना स्मरुन शपथ, अध्यक्षांनी रोखलंRamesh Kir on Eknath Shinde : मी कोण हे मुख्यमंत्र्यांना हळूहळू कळेल, रमेश किर यांचा इशाराNilesh Lanke Oath : इंग्रजीत शपथ, निलेश लंकेंनी करुन दाखवलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
Amol Mitkari : प्रत्येकाला जर 100 जागा हव्या असतील तर स्वबळावर लढावं लागेल, अमोल मिटकरींचं महत्वपूर्ण वक्तव्य
प्रत्येकाला जर 100 जागा हव्या असतील तर स्वबळावर लढावं लागेल, अमोल मिटकरींचं महत्वपूर्ण वक्तव्य
Pune : पुण्यात ड्रग्ज घेणाऱ्या दोन्ही तरूणांची ओळख पटली, मुंबईचा तरूण आर्किटेक्ट तर दुसरा सॉफ्टवेअर इंजिनिअर
पुण्यात ड्रग्ज घेणाऱ्या दोन्ही तरूणांची ओळख पटली, मुंबईचा तरूण आर्किटेक्ट तर दुसरा सॉफ्टवेअर इंजिनिअर
''बेट्या, तुझा टांगा उलटवणार'', मनोज जरांगेंचा भुजबळांना इशारा; मराठा-ओबीसी समाजाला महत्त्वाचं आवाहन
''बेट्या, तुझा टांगा उलटवणार'', मनोज जरांगेंचा भुजबळांना इशारा; मराठा-ओबीसी समाजाला महत्त्वाचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 जून 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 जून 2024 | मंगळवार
Embed widget