एक्स्प्लोर

मुख्यमंत्रीपद आमची प्रथम मागणी, उपमुख्यमंत्रीपद नंतरचा विषय : शिवसेना

मातोश्रीवरची शिवसेनेच्या आमदारांची आज बैठक पार पडली. शिवसेना-भाजपला अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्री पद मिळावं, अशी मागणी शिवसेना आमदारांनी केली आहे. तसेच भाजपकडून लेखी प्रस्ताव घ्यावा अशी मागणीही शिवसेनेच्या आमदारांनी केली आहे.

मुंबई : राज्याच्या सत्तेत समसमान वाटा मिळावा अशी मागणी शिवसेना आमदारांची केली आहे. मातोश्रीवर आज शिवसेनेच्या आमदारांची बैठक पार पडली. या बैठकीत आमदारांनी सर्व अधिकार उद्धव ठाकरेंना दिले आहेत. तसेच सत्ता स्थापनेबाबत युतीत जो निर्णय होईल, तो भाजपकडून लिहून घ्यावा अशी मागणीही शिवसेना आमदारांनी केली आहे, अशी माहिती शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी दिली.

लोकसभा निवडणुकीदरम्यान अमित शाह आणि उद्धव ठाकरे यांच्यात झालेल्या बैठकीत शिवसेना-भाजपचा 50-50 चा फॉर्म्युला ठरला होता. याशिवाय अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्री पद मिळावं, असंही ठरलं होतं, अशी माहिती उद्धव ठाकरेंनी आमदारांना बैठकीत दिली. त्यामुळे आता भाजपकडून लेखी प्रस्ताव येणं अपेक्षित आहे. त्यामुळे लेखी निर्णय येत नाही, तोपर्यंत उद्धव ठाकरे कुठलाही निर्णय घेणार नाहीत. तसेच उद्धव ठाकरे जो निर्णय घेतील तो सर्व आमदारांना मान्य असेल, असं प्रताप सरनाईक यांनी सांगितलं.

उद्धव ठाकरे काय काय म्हणाले?
शिवसेना पक्षप्रमुखाचं धन मला आज भेटायला आलेलं आहे.  लोकसभेला जे ठरलं होतं ते मी आज तुम्हाला सांगतोय. लोकसभेला 50/50 चा फाॅर्म्युला ठरला होता. त्यानुसार अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्री आणि सर्व मंत्रीपदं  शिवसेनेच्या वाट्याला येतील. लोकसभा निवडणुकीवेळी अमित शहा आणि देवेंद्र फडणवीसांसोबत जे ठरलं होतं, त्यापेक्षा मला एक कण जास्त काही नको.  जे ठरलं ते भाजपच्या वरिष्ठांकडून आता लेखी स्वरुपात येणं अपेक्षित आहे. मला कोणतंही पाप करायचं नाही, हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिवसेना-भाजपची युती अभेद्य आहे. जे ठरलं होतं ते घडणार नसेल तर माझ्यासमोर अन्य पर्याय खुले आहेत. पण मला हे पाप करायचं नाही, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं. यावर सर्व आमदारांनी एकमतानं सत्ता स्थापनेचे निर्णय उद्धव ठाकरेंना दिले आहेत.
सर्वप्रथम आमची मागणी मुखमंत्रीपदाची

सर्वप्रथम आमची मागणी मुखमंत्रीपदाची आहे. उपमुख्यमंत्रीपद आमच्यासाठी नंतरचा विषय आहे. मुख्यमंत्री पदासाठी अडीच-अडीच वर्षाचा फॉर्म्युला भाजपने लोकसभा निवडणुकीआधी मान्य केला होता. 144-144 जागांचा फॉर्म्युलाही मान्य केला होता. मात्र जागावाटपाचा फॉर्म्युला काही गोष्टींमुळे मान्य होऊ शकला नाही. मात्र आता सत्तास्थापनेसाठी अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदाचा फॉर्म्युला कायम ठेवावा, अशी मागणी आमदारांनी केली आहे. त्यामुळे शिवसेनेनं उत्तम राजकीय टायमिंग साधत 'हीच ती वेळ' हे दाखवून दिलं आहे.

अमित शाह-उद्धव ठाकरे एकत्र निर्णय घेतली- रावसाहेब दानवे

कुठल्याही प्रकरची अडचण न येता दोन्ही पक्षाचे नेते बसून हा फॉर्म्युला ठरवतील. मात्र अमित शाह आणि उद्धव ठाकरे यांच्यात झालेल्या बैठकीत नेमंक काय झालं याची माहिती कुणालाही नाही. मात्र दिवाळीनंतर सगळे प्रश्न सुटतील, असं केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी म्हटलं आहे.

दिवाळीनंतर राज्यात शिवसेना-भाजप सत्तास्थापन करेल. मात्र मुख्यमंत्री भाजपचाच असेल असं, भाजपच्या महाराष्ट्र प्रभारी यांनी सरोज पांडे यांनी म्हटलं. मात्र शिवसेनेच्या भूमिकेनंतर भाजपला सहजासहजी मुख्यमंत्री मिळेल, अशी शक्यता फार कमी आहे. त्यामुळे मुख्यमंत्री पदासाठी शिवसेना-भाजपमध्ये किती ओढाताण होते हे पाहावं लागेल.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

CBSE Date Sheet : सीबीएसईकडून दहावी आणि बारावीच्या संभाव्य वेळापत्रक जाहीर, यंदा परीक्षा दोन टप्प्यात होणार  
सीबीएसईकडून दहावी आणि बारावीच्या संभाव्य वेळापत्रक जाहीर, यंदा परीक्षा दोन टप्प्यात होणार
Asaram Bapu : शेम! गुजरातमध्ये बलात्कारी आसाराम बापूची पूजा, डॉक्टरांनी आरतीही म्हटली, नवरात्रीच्या कार्यक्रमावेळी प्रकार
शेम! गुजरातमध्ये बलात्कारी आसाराम बापूची पूजा, डॉक्टरांनी आरतीही म्हटली, नवरात्रीच्या कार्यक्रमावेळी प्रकार
पावसाने उध्वस्त झालेल्या बळीराजासाठी राज ठाकरेंच्या पत्रात भरभरुन काळजी; मुख्यमंत्र्यांकडे 5 महत्त्वाच्या मागण्या
पावसाने उध्वस्त झालेल्या बळीराजासाठी राज ठाकरेंच्या पत्रात भरभरुन काळजी; मुख्यमंत्र्यांकडे 5 महत्त्वाच्या मागण्या
10-15 मिनिटांत तयार हो, माझ्यासोबत शारिरीक संबंध ठेवायचे; CMO चा महिला डॉक्टरला कॉल, गुन्हा दाखल
10-15 मिनिटांत तयार हो, माझ्यासोबत शारिरीक संबंध ठेवायचे; CMO चा महिला डॉक्टरला कॉल, गुन्हा दाखल
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Omraje Nimbalkar Video : गळ्याएवढ्या पाण्यात बाजी लावली,  'कोहीनूर' ओमराजेंचा UNCUT व्हिडीओ
Sharad Pawar| Gorakshak मुळे शेतकऱ्यांचे हाल: म्हशी विकल्या तरी अडवणूक : शरद पवार
Azam Khan Bail : आझम खान दोन वर्षांनंतर तुरुंगातून सुटणार? शेवटच्या गुन्ह्यातही मिळाला जामीन
Parbhani Lower Dhudhna : परभणीलाही पावसाने झोडपलं, लोअर दुधना प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग
Heavy Rain In Marathwada : मराठवाड्यात जनजीवन ठप्प, Dharashiv, Beed, Jalna मध्ये थैमान!

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CBSE Date Sheet : सीबीएसईकडून दहावी आणि बारावीच्या संभाव्य वेळापत्रक जाहीर, यंदा परीक्षा दोन टप्प्यात होणार  
सीबीएसईकडून दहावी आणि बारावीच्या संभाव्य वेळापत्रक जाहीर, यंदा परीक्षा दोन टप्प्यात होणार
Asaram Bapu : शेम! गुजरातमध्ये बलात्कारी आसाराम बापूची पूजा, डॉक्टरांनी आरतीही म्हटली, नवरात्रीच्या कार्यक्रमावेळी प्रकार
शेम! गुजरातमध्ये बलात्कारी आसाराम बापूची पूजा, डॉक्टरांनी आरतीही म्हटली, नवरात्रीच्या कार्यक्रमावेळी प्रकार
पावसाने उध्वस्त झालेल्या बळीराजासाठी राज ठाकरेंच्या पत्रात भरभरुन काळजी; मुख्यमंत्र्यांकडे 5 महत्त्वाच्या मागण्या
पावसाने उध्वस्त झालेल्या बळीराजासाठी राज ठाकरेंच्या पत्रात भरभरुन काळजी; मुख्यमंत्र्यांकडे 5 महत्त्वाच्या मागण्या
10-15 मिनिटांत तयार हो, माझ्यासोबत शारिरीक संबंध ठेवायचे; CMO चा महिला डॉक्टरला कॉल, गुन्हा दाखल
10-15 मिनिटांत तयार हो, माझ्यासोबत शारिरीक संबंध ठेवायचे; CMO चा महिला डॉक्टरला कॉल, गुन्हा दाखल
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 सप्टेंबर 2025 | बुधवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 सप्टेंबर 2025 | बुधवार 
Asia Cup Super-4 IND vs BAN: सपाटून मार खालेल्या पाकिस्तानचा सूर बदलला, आज टीम इंडियाच्या विजयासाठी प्रार्थना करणार! असं आहे आशिया कप फायनलचे संपूर्ण गणित
सपाटून मार खालेल्या पाकिस्तानचा सूर बदलला, आज टीम इंडियाच्या विजयासाठी प्रार्थना करणार! असं आहे आशिया कप फायनलचे संपूर्ण गणित
आम्ही पाहणीपूर्वीच 2200 कोटी रिलीज केली, विरोधकांनी कधीही भरपाई दिली नाही; बांधावरुन देवाभाऊंचा बळीराजाला धीर
आम्ही पाहणीपूर्वीच 2200 कोटी रिलीज केली, विरोधकांनी कधीही भरपाई दिली नाही; बांधावरुन देवाभाऊंचा बळीराजाला धीर
Rahul Gandhi: राहुल गांधींनी दणक्यावर दणका देताच निवडणूक आयोगाचा 'करेक्ट कार्यक्रम' सुरुच! आता मतदारयादीत नावे जोडण्याची आणि वगळण्याची प्रक्रिया बदलली
राहुल गांधींनी दणक्यावर दणका देताच निवडणूक आयोगाचा 'करेक्ट कार्यक्रम' सुरुच! आता मतदारयादीत नावे जोडण्याची आणि वगळण्याची प्रक्रिया बदलली
Embed widget