एक्स्प्लोर

मुख्यमंत्रीपद आमची प्रथम मागणी, उपमुख्यमंत्रीपद नंतरचा विषय : शिवसेना

मातोश्रीवरची शिवसेनेच्या आमदारांची आज बैठक पार पडली. शिवसेना-भाजपला अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्री पद मिळावं, अशी मागणी शिवसेना आमदारांनी केली आहे. तसेच भाजपकडून लेखी प्रस्ताव घ्यावा अशी मागणीही शिवसेनेच्या आमदारांनी केली आहे.

मुंबई : राज्याच्या सत्तेत समसमान वाटा मिळावा अशी मागणी शिवसेना आमदारांची केली आहे. मातोश्रीवर आज शिवसेनेच्या आमदारांची बैठक पार पडली. या बैठकीत आमदारांनी सर्व अधिकार उद्धव ठाकरेंना दिले आहेत. तसेच सत्ता स्थापनेबाबत युतीत जो निर्णय होईल, तो भाजपकडून लिहून घ्यावा अशी मागणीही शिवसेना आमदारांनी केली आहे, अशी माहिती शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी दिली.

लोकसभा निवडणुकीदरम्यान अमित शाह आणि उद्धव ठाकरे यांच्यात झालेल्या बैठकीत शिवसेना-भाजपचा 50-50 चा फॉर्म्युला ठरला होता. याशिवाय अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्री पद मिळावं, असंही ठरलं होतं, अशी माहिती उद्धव ठाकरेंनी आमदारांना बैठकीत दिली. त्यामुळे आता भाजपकडून लेखी प्रस्ताव येणं अपेक्षित आहे. त्यामुळे लेखी निर्णय येत नाही, तोपर्यंत उद्धव ठाकरे कुठलाही निर्णय घेणार नाहीत. तसेच उद्धव ठाकरे जो निर्णय घेतील तो सर्व आमदारांना मान्य असेल, असं प्रताप सरनाईक यांनी सांगितलं.

उद्धव ठाकरे काय काय म्हणाले?
शिवसेना पक्षप्रमुखाचं धन मला आज भेटायला आलेलं आहे.  लोकसभेला जे ठरलं होतं ते मी आज तुम्हाला सांगतोय. लोकसभेला 50/50 चा फाॅर्म्युला ठरला होता. त्यानुसार अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्री आणि सर्व मंत्रीपदं  शिवसेनेच्या वाट्याला येतील. लोकसभा निवडणुकीवेळी अमित शहा आणि देवेंद्र फडणवीसांसोबत जे ठरलं होतं, त्यापेक्षा मला एक कण जास्त काही नको.  जे ठरलं ते भाजपच्या वरिष्ठांकडून आता लेखी स्वरुपात येणं अपेक्षित आहे. मला कोणतंही पाप करायचं नाही, हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिवसेना-भाजपची युती अभेद्य आहे. जे ठरलं होतं ते घडणार नसेल तर माझ्यासमोर अन्य पर्याय खुले आहेत. पण मला हे पाप करायचं नाही, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं. यावर सर्व आमदारांनी एकमतानं सत्ता स्थापनेचे निर्णय उद्धव ठाकरेंना दिले आहेत.
सर्वप्रथम आमची मागणी मुखमंत्रीपदाची

सर्वप्रथम आमची मागणी मुखमंत्रीपदाची आहे. उपमुख्यमंत्रीपद आमच्यासाठी नंतरचा विषय आहे. मुख्यमंत्री पदासाठी अडीच-अडीच वर्षाचा फॉर्म्युला भाजपने लोकसभा निवडणुकीआधी मान्य केला होता. 144-144 जागांचा फॉर्म्युलाही मान्य केला होता. मात्र जागावाटपाचा फॉर्म्युला काही गोष्टींमुळे मान्य होऊ शकला नाही. मात्र आता सत्तास्थापनेसाठी अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदाचा फॉर्म्युला कायम ठेवावा, अशी मागणी आमदारांनी केली आहे. त्यामुळे शिवसेनेनं उत्तम राजकीय टायमिंग साधत 'हीच ती वेळ' हे दाखवून दिलं आहे.

अमित शाह-उद्धव ठाकरे एकत्र निर्णय घेतली- रावसाहेब दानवे

कुठल्याही प्रकरची अडचण न येता दोन्ही पक्षाचे नेते बसून हा फॉर्म्युला ठरवतील. मात्र अमित शाह आणि उद्धव ठाकरे यांच्यात झालेल्या बैठकीत नेमंक काय झालं याची माहिती कुणालाही नाही. मात्र दिवाळीनंतर सगळे प्रश्न सुटतील, असं केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी म्हटलं आहे.

दिवाळीनंतर राज्यात शिवसेना-भाजप सत्तास्थापन करेल. मात्र मुख्यमंत्री भाजपचाच असेल असं, भाजपच्या महाराष्ट्र प्रभारी यांनी सरोज पांडे यांनी म्हटलं. मात्र शिवसेनेच्या भूमिकेनंतर भाजपला सहजासहजी मुख्यमंत्री मिळेल, अशी शक्यता फार कमी आहे. त्यामुळे मुख्यमंत्री पदासाठी शिवसेना-भाजपमध्ये किती ओढाताण होते हे पाहावं लागेल.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Satara Zilla Parishad: साताऱ्यात महायुतीत जुंपली, जिल्हा परिषद निवडणुकीचे पडसाद कॅबिनेट बैठकीत उमटणार; भाजप मंत्र्यांबाबत शिवसेना अन् राष्ट्रवादी नाराजी नोंदवणार
साताऱ्यात महायुतीत जुंपली, जिल्हा परिषद निवडणुकीचे पडसाद कॅबिनेट बैठकीत उमटणार; भाजप मंत्र्यांबाबत शिवसेना अन् राष्ट्रवादी नाराजी नोंदवणार
Baramati And Rahuri Constituency By Election 2026: सहानुभूतीची लाट की राजकीय सहमती?; बारामती आणि राहुरीच्या पोटनिवडणुकीत कोण जिंकणार, सर्व्हे आला समोर
सहानुभूतीची लाट की राजकीय सहमती?; बारामती आणि राहुरीच्या पोटनिवडणुकीत कोण जिंकणार, सर्व्हे समोर
TMC Candidate List : ममता बॅनर्जींचा धमाका, विधानसभेसाठी एका झटक्यात सर्व उमेदवार जाहीर
मोठी बातमी : ममता बॅनर्जींचा धमाका, एका झटक्यात सर्व उमेदवार जाहीर, नंदीग्राममधून स्वत: लढणार नाहीत!
Live Blog Updates: एकनाथ शिंदे संसदेत, रिजिजू म्हणाले, श्रीकांत मेरा छोटा भाई, नेमकं काय घडलं?
Live Blog Updates: एकनाथ शिंदे संसदेत, रिजिजू म्हणाले, श्रीकांत मेरा छोटा भाई, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Special Report US Benifiting from War : युद्ध लांबल्यामुळे अमेरिकेचा खर्च वाढतोय पण..
Special Report Iran Israel युद्धाबाबत ब्रिटननं भूमिका बदलल्यानं इराणचा संताप, प्रथमच खुलं आव्हान
Satara ZP Election : साताऱ्यात राजकीय राडा कसा घडला? Full VIDEO
Ashok Kharat Case : अशोक खरात प्रकरणावरुन महाराष्ट्राच्या राजकारणात घमासान, विरोधक आक्रमक
Sushma Andhare Pune : तटकरेंमुळे चाकणकरांना वाटलेलं कुणी त्यांचं बिघडवणार नाही, पण फडणवीसांनी..

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Satara : भाजपनं लोकशाही मार्गानं विजय मिळवला, “पोलीस आपलं काम करत होते, त्यात अडथळा का आणला?”, शिवेंद्रराजे भोसलेंचा शंभूराज देसाईंना सवाल
भाजपनं लोकशाही मार्गानं विजय मिळवला, “पोलीस आपलं काम करत होते, त्यात अडथळा का आणला?”: शिवेंद्रराजे भोसले
Maharashtra Live blog: पुण्यातील दरी पुलावर अपघात, गाड्या एकमेकांना धडकल्या
Maharashtra Live blog: पुण्यातील दरी पुलावर अपघात, गाड्या एकमेकांना धडकल्या
SIT कडून अशोक खरातची 7 तास चौकशी, नीरज जाधवसोबत खडांजगी; कॅमेरे पाहून गाडीत वाकला, पोलीस कोठडीत रवानगी
SIT कडून अशोक खरातची 7 तास चौकशी, नीरज जाधवसोबत खडांजगी; कॅमेरे पाहून गाडीत वाकला, पोलीस कोठडीत रवानगी
Home Loan : घर खरेदीचा विचार करताय, विविध बँकांचा गृहकर्जाचा व्याज दर जाणून घ्या, अन्यथा होईल मोठं नुकसान 
घर खरेदीचा विचार करताय, विविध बँकांचा गृहकर्जाचा व्याज दर जाणून घ्या, अन्यथा होईल मोठं नुकसान 
Ashok Kharat: अशोक खरातला कोर्टात नेताना पोलिसांकडून त्याचा एन्काऊंटर होऊ शकतो; तृप्ती देसाईंचा खळबळजनक दावा
Ashok Kharat: अशोक खरातला कोर्टात नेताना पोलिसांकडून त्याचा एन्काऊंटर होऊ शकतो; तृप्ती देसाईंचा खळबळजनक दावा
Jaykumar Gore : पालकमंत्र्यांनी लोकशाहीचा खून केला, प्रशासकीय अधिकाऱ्यांना घरगड्यासारखी वागणूक दिली जाते, जयकुमार गोरेंचा शंभूराज देसाईंवर आरोप
पालकमंत्र्यांनी लोकशाहीचा खून केला, पोलीस अधीक्षकांसोबत घरगड्याशी बोलल्यासारखं बोलतात : जयकुमार गोरे
Iran War Live Update: तिकडं पुतीन म्हणाले, इराण आमचा जिगरी दोस्त अन् इकडं मोदींनी सुद्धा इराणी राष्ट्राध्यक्षांना फोन फिरवला; कोंडी केलेल्या होर्मुझवरून काय म्हणाले? दोघांमध्ये कोणती चर्चा झाली??
तिकडं पुतीन म्हणाले, इराण आमचा जिगरी दोस्त अन् इकडं मोदींनी सुद्धा इराणी राष्ट्राध्यक्षांना फोन फिरवला; कोंडी केलेल्या होर्मुझवरून काय म्हणाले? दोघांमध्ये कोणती चर्चा झाली??
ह्रदयद्रावक... मुंबई-अहमदाबाद हायवेवर भीषण अपघात, दुचाकीवरील तिघे ठार, अज्ञात वाहनासह चालक फरार
ह्रदयद्रावक... मुंबई-अहमदाबाद हायवेवर भीषण अपघात, दुचाकीवरील तिघे ठार, अज्ञात वाहनासह चालक फरार
Embed widget