एक्स्प्लोर

लोकसभेच्या 22 जागांवर शिंदेंचा दावा, जागा सोडण्याची भाजपचीही तयारी, पण अजित पवार गटाची भूमिका काय?

Maharashtra Politics: लोकसभेच्या 22 जागांवर शिवसेनेच्या शिंदे गटाचा दावा, शिंदे गटाबरोबर असलेल्या 13 खासदारांसाठी मतदारसंघ सोडण्याची भाजपची योजना, पण अजित पवार गटाची भूमिका काय?

Maharashtra Politics: शिवसेनेतील (Shiv Sena Crisis) बंडानंतर राज्याच्या राजकारणाला (Maharshtra Political Updates) अभूतपूर्व कलाटणी मिळाली. गेल्या लोकसभा निवडणुका (Lok Sabha Elections 2024) शिवसेना (Shiv Sena) आणि भाजपनं (BJP) युती म्हणून लढवलेल्या, आता त्याच 22 जागांवर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या नेतृत्त्वाखालील शिवसेनेनं दावा केला आहे. शिंदे गटाबरोबर (Shinde Group) असलेल्या 13 खासदारांसाठी मतदारसंघ सोडण्याची तयारीही भाजपनं दाखवली असून तशी योजनाच आखण्यात आली आहे.

शिंदे गटाकडून लोकसभा निवडणुकीसाठी थेट 22 जागांवर दावा करण्यात आल्यामुळे महायुतीमधील जागावाटप अर्थातच कळीचा मुद्दा ठरण्याची शक्यता आहे. दरम्यान, भाजप आणि अजित पवार गटासोबत चर्चा करूनच जागा वाटपाचं सूत्र ठरवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र, याबाबत अजित पवार गटाची भूमिका काय असणार? याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. तर यासंदर्भात शिंदे गट, भाजप आणि अजित पवार गट एकत्र चर्चा करुन मार्ग काढेल, असं राहुल शेवाळे (Rahul Shewale) यांनी म्हटलं आहे. 

शिंदे गटातील विद्यमान खासदारांची जागा सोडणार नाही, राहुल शेवाळेंकडून स्पष्ट 

शिवसेना शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांचा महाराष्ट्रातील लोकसभेच्या 22 जागांवरचा दावा कायम आहे. तसेच, समर्थक तेरा खासदारांच्या जागांवर पुन्हा लढणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी पार पडलेल्या खासदारांच्या बैठकीत सर्व 22 जागांचा आढावा घेण्यात आला. प्रत्येक लोकसभा मतदारसंघात मंत्र्यांची नेमणूक करून त्यांना जबाबदारीचं वाटप केलं जाणार आहे. प्रत्येक मंत्र्याला एक किंवा दोन लोकसभा मतदार संघाची जबाबदारी दिली जाणार आहे. तसेच, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटासोबत चर्चा करूनच जागा वाटपाचं सूत्र ठरवणार असल्याचंही राहुल शेवाळेंनी सांगितलं. त्याचप्रमाणे विद्यमान खासदारांची जागा सोडणार नाही, हेदेखील राहुल शेवाळेंनी स्पष्ट केलं आहे. 

शिवसेना शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी लोकसभा जागा वाटपाबाबत बोलताना सांगितलं की, "गेल्या लोकसभेत शिवसेनेनं ज्या 22 जागांवर लोकसभा निवडणूक लढवली होती. त्या 22 जागांपैकी तटकरेंची जागा आहे, त्याठिकाणी गितेंनी निवडणूक लढवली होती. त्यासंदर्बातील निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस हे एकत्र निर्णय घेतील. आढळराव पाटलांनी निवडणूक लढवली होती, त्यासंदर्भातील निर्णयही चर्चेतून घेतला जाईल. 13 खासदारांबाबतचा प्रश्नच उपस्थित होऊ शकत नाही. कारण ते 13 खासदार आता शिवसेनेचे उमेदवार असणार आहेत."

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

सर्वोच्च न्यायालयानं फटकारल्यानंतर राहुल नार्वेकर ठाम, आधीचंच वेळापत्रक सादर करणार, 'ABP माझा'ला खात्रीलायक सुत्रांची माहिती

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

'लोकं कुत्र्यांच्या त्रास किती काळ सहन करतील? शाळा आणि न्यायालयाच्या परिसरात त्यांचं काय काम? त्यांच्या चावण्याने मुलं, माणसं मरत आहेत' सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
'लोकं कुत्र्यांच्या त्रास किती काळ सहन करतील? शाळा आणि न्यायालयाच्या परिसरात त्यांचं काय काम? त्यांच्या चावण्याने मुलं, माणसं मरत आहेत' सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
Nawab Malik: मुंबईत 50 वर्षांपासून बांगलादेशींचा तपास केला जातोय, शेख हसीना यांना भारतातून पहिल्यांदा बाहेर काढावं, त्यांच्यामुळे तिथं हिंदू अडचणीत; नवाब मलिकांचा हल्लाबोल
मुंबईत 50 वर्षांपासून बांगलादेशींचा तपास केला जातोय, शेख हसीना यांना भारतातून पहिल्यांदा बाहेर काढावं, त्यांच्यामुळे तिथं हिंदू अडचणीत; नवाब मलिकांचा हल्लाबोल
व्हायरल व्हिडिओवर राहुल नार्वेकर पहिल्यांदाच बोलले; 'उमेदवारी मागे घेण्यासाठी 5-5 कोटी मागण्याचे प्रयत्न'
व्हायरल व्हिडिओवर राहुल नार्वेकर पहिल्यांदाच बोलले; 'उमेदवारी मागे घेण्यासाठी 5-5 कोटी मागण्याचे प्रयत्न'
खेळण्याच्या वयात चहाच्या दुकानात भांडी घासली, मित्रानं हात धरल्यामुळे इंडस्ट्रीची वाट गवसली, दिग्गज अभिनेत्याला ओळखलं का?
खेळण्याच्या वयात चहाच्या दुकानात भांडी घासली, मित्रानं हात धरल्यामुळे इंडस्ट्रीची वाट गवसली, दिग्गज अभिनेत्याला ओळखलं का?

व्हिडीओ

Imtiyaj Jaleel Sambhajinagar: काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Santosh Dhuri on Bala Nandgaonkar : Sandeep Deshpande जावे यासाठी नांदगावकरांचे प्रयत्न
Kolhapur Pregnant Candidate Congress : 9 महिन्यांची गरोदर महिला कोल्हापुरातून निवडणुकीच्या रिंगणात
Nilesh Rane on Thackeray Alliance : ठाकरे बंधुंची एक्सपायरी डेट संपली, निलेश राणेंचा प्रहार
Akhil Chitre On Nitesh Rane : नितेश राणे ढोंगी आणि लोचट व्यक्ती, त्यांनी आमच्याबद्दल बोलू नये..

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'लोकं कुत्र्यांच्या त्रास किती काळ सहन करतील? शाळा आणि न्यायालयाच्या परिसरात त्यांचं काय काम? त्यांच्या चावण्याने मुलं, माणसं मरत आहेत' सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
'लोकं कुत्र्यांच्या त्रास किती काळ सहन करतील? शाळा आणि न्यायालयाच्या परिसरात त्यांचं काय काम? त्यांच्या चावण्याने मुलं, माणसं मरत आहेत' सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
Nawab Malik: मुंबईत 50 वर्षांपासून बांगलादेशींचा तपास केला जातोय, शेख हसीना यांना भारतातून पहिल्यांदा बाहेर काढावं, त्यांच्यामुळे तिथं हिंदू अडचणीत; नवाब मलिकांचा हल्लाबोल
मुंबईत 50 वर्षांपासून बांगलादेशींचा तपास केला जातोय, शेख हसीना यांना भारतातून पहिल्यांदा बाहेर काढावं, त्यांच्यामुळे तिथं हिंदू अडचणीत; नवाब मलिकांचा हल्लाबोल
व्हायरल व्हिडिओवर राहुल नार्वेकर पहिल्यांदाच बोलले; 'उमेदवारी मागे घेण्यासाठी 5-5 कोटी मागण्याचे प्रयत्न'
व्हायरल व्हिडिओवर राहुल नार्वेकर पहिल्यांदाच बोलले; 'उमेदवारी मागे घेण्यासाठी 5-5 कोटी मागण्याचे प्रयत्न'
खेळण्याच्या वयात चहाच्या दुकानात भांडी घासली, मित्रानं हात धरल्यामुळे इंडस्ट्रीची वाट गवसली, दिग्गज अभिनेत्याला ओळखलं का?
खेळण्याच्या वयात चहाच्या दुकानात भांडी घासली, मित्रानं हात धरल्यामुळे इंडस्ट्रीची वाट गवसली, दिग्गज अभिनेत्याला ओळखलं का?
इम्तियाज जलील यांच्यावर 4 जणांकडून हल्ला करण्याचा प्रयत्न; छत्रपती संभाजीनगरमधील 10 थरारक फोटो
इम्तियाज जलील यांच्यावर 4 जणांकडून हल्ला करण्याचा प्रयत्न; छत्रपती संभाजीनगरमधील 10 थरारक फोटो
BMC Election 2026 Rahul Narvekar: 'उमेदवारी मागे घे, मी कुठल्या पदावर माहितीये ना, मुख्यमंत्र्यालाही मी बोलवल्यावर यावं लागतं'; राहुल नार्वेकरांवर धमकावल्याचा आरोप
'उमेदवारी मागे घे, मी कुठल्या पदावर माहितीये ना, मुख्यमंत्र्यालाही मी बोलवल्यावर यावं लागतं'; राहुल नार्वेकरांवर धमकावल्याचा आरोप
Devendra Fadnavis & Vilasrao Deshmukh Latur: मोठी बातमी : रवींद्र चव्हाणांची चूक लातूरमध्ये जाऊन सुधारली, फडणवीस म्हणाले, आमची लढाई काँग्रेसशी, पण विलासरावांबद्दल आम्हाला नितांत आदर
मोठी बातमी : रवींद्र चव्हाणांची चूक लातूरमध्ये जाऊन सुधारली, फडणवीस म्हणाले, आमची लढाई काँग्रेसशी, पण विलासरावांबद्दल आम्हाला नितांत आदर
भाजपची काँग्रेस-एमआयएमसोबत युती, फडणवीस म्हणाले कारवाई करणार; हर्षवर्धन सपकाळांनी करुन दाखवलं
भाजपची काँग्रेस-एमआयएमसोबत युती, फडणवीस म्हणाले कारवाई करणार; हर्षवर्धन सपकाळांनी करुन दाखवलं
Embed widget