एक्स्प्लोर

Rajasthan Election Result : राजस्थानमध्ये काँग्रेसच्या पराभवाची मुख्य कारणे कोणती? 'हे' आहेत पाच कारणं?

Rajasthan Assembly Election Results 2023 : ताज्या ट्रेंडवरून राजस्थान राज्यातील काँग्रेस पक्ष सत्तेतून बाहेर पडण्याचे संकेत मिळत आहेत.

Rajasthan Assembly Election Results 2023 : राजस्थान विधानसभा निवडणुकीची मतमोजणी (Rajasthan Assembly Election Results) सुरू झाली आहे. सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये विरोधी पक्षात असलेला भारतीय जनता पक्ष (BJP) बहुमतासह सत्तेत परतताना दिसत आहे. भाजप 117 जागांवर आघाडीवर आहे. ताज्या ट्रेंडनुसार सत्ताधारी काँग्रेस 66 जागांवर आघाडीवर आहे. सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये भाजपने बहुमताचा आकडा पार केला आहे. त्यामुळे ताज्या ट्रेंडवरून राजस्थान राज्यातील काँग्रेस पक्ष सत्तेतून बाहेर पडण्याचे संकेत मिळत आहेत. या पराभवाचे कारणं काय? काँग्रेसचा पराभव होत असेल तर त्याची पाच कारणे कोणती? जाणून घेऊ यात...

गटबाजी: विधानसभा निवडणुकीच्या काही महिन्यांपूर्वीपर्यंत काँग्रेस पक्षात गटबाजी पाहायला मिळत होती. मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांच्यातील वादाचा परिणाम कार्यकर्त्यांवरही झाला आणि जनतेमध्ये चुकीचा संदेश गेला. मात्र, निवडणुकीपूर्वीच दोन्ही नेते आम्ही एकत्र आहोत, असा संदेश देताना दिसले. परंतु, तोपर्यंत खूप उशीर झाला होता.

मोदी विरुद्ध गेहलोत निवडणूक : राजस्थानमध्ये मोदी विरुद्ध गेहलोत अशी निवडणूक काँग्रेसला महागात पडतांना दिसत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या चेहऱ्याने काँग्रेसच्या जात जनगणनेच्या मुद्याला देखील अयशस्वी ठरवलं. पंतप्रधान मोदींनी राजस्थानमध्ये निवडणूक रॅली घेतल्या, तर दुसरीकडे काँग्रेसच्या प्रचाराचा भार सीएम गेहलोत यांच्या खांद्यावर अधिक असल्याचे दिसून आले. राहुल गांधी निवडणुकीच्या प्रचारासाठी मैदानात उतरले पण तेही मोजक्याच ठिकाणी. निवडणूक पूर्णपणे मोदी विरुद्ध गेहलोत अशी झाली आणि भाजपलाही याचा फायदा झाला. 

कन्हैयालाल खून प्रकरणाचा मोठा परिणाम : राजस्थान निवडणुकीत भाजपने उदयपूरच्या कन्हैयालाल हत्या प्रकरणाचा मुद्दा बराच उचलून धरला. भाजपची ही रणनीतीही प्रभावी ठरताना दिसत आहे. मारवाड भागात उदयपूर येते. जो मेवाड जिंकतो तो राजस्थान जिंकतो असे राजस्थानच्या राजकारणात म्हटले जाते. तर, कन्हैयालाल खून प्रकरणासोबतच कायदा आणि सुव्यवस्थेचा मुद्दा भाजपने उचलून धरला आणि त्याचाच फायदा भाजपला होतांना दिसत आहे. 

पेपर लीक आणि लाल डायरी : अशोक गेहलोत यांच्या सरकारने निवडणुकीपूर्वी अने योजनांची घोषणा केली. चिरंजीवी योजनेंतर्गत त्यांनी आरोग्य विम्याची मर्यादा 50 लाखांपर्यंत वाढवण्याचे आश्वासन दिले. पण त्यांच्या योजनांवर पेपर लीक प्रकरण, लाल डायरीची चर्चा आणि भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे पडदा पडला. 

बंदोखोरीचा मोठा फटका: काँग्रेसच्या पराभवामागे बंडखोर हेही प्रमुख कारण मानले जात आहे. काँग्रेसकडून तिकीट न मिळाल्याने अनेक नेत्यांनी पक्षाविरोधात बंडखोरी करून अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. काहींनी भाजप आणि इतर पक्षांच्या तिकिटावर निवडणूकही लढवली. या बंडखोरांनी काँग्रेसलाही खिंडार पाडले. याउलट भाजपने प्रत्येक बंडखोराला मनवण्याची जबाबदारी बड्या नेत्यांवर दिली आणि त्यांना मनवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. अनेक बंडखोरांनी सहमती दर्शवल्याने भाजपला याचा फायदा होताना दिसत आहे.

इतर महत्वाच्या बातम्या: 

Election Results 2023 LIVE updates : मध्यप्रदेश, राजस्थानमध्ये भाजप मजबूत, तेलंगणात काँग्रेस; छत्तीसगडमध्ये निकराची लढत

About the author मोसीन शेख

मोसीन शेख
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते

व्हिडीओ

Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
Embed widget