एक्स्प्लोर

देवेंद्र फडणवीस की एकनाथ शिंदे, पुढचा मुख्यमंत्री कोण? कोणाचं पारडं जड; 3 मुद्द्यांत समजून घ्या! 

विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर आता राज्याचा पुढचा मुख्यमंत्री कोण, याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. महायुतीमध्ये मुख्यमंत्रिपदासाठी अनेकजण दावेदार आहेत.

मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकीचा (Vidhan Sabha Election 2024 Result) निकाल लागला आहे. या निकालात महायुतीला (Mahayuti) स्पष्ट बहुमत मिळालं आहे. राज्यात सत्ताबदल होईल, असा दावा विरोधक करत होते. मात्र हा अंदाज साफ फोल ठरला. महायुतीच्या तिन्ही पक्षांना मिळून 50 जागांचाही आकडा गाठता आलेला नाही. दुसरीकडे एकट्या भाजपाने तब्बल 132 जागांवर बाजी मारली आहे. दरम्यान, विधानसभा निवडणुकीचा निकाल पाहता राज्याचा पुढचा मुख्यमंत्री कोण होणार? असं विचारलं जात आहे. 3 प्रमुख मुद्द्यांत राज्यात मुख्यमंत्रिपदासाठी कोणाचं पारडं जड, हे समजून घेऊ या.. 

भाजपाला मिळणार मुख्यमंत्रिपद?

भाजपा सलग तिसऱ्यांदा राज्यातील सर्वांत मोठा पक्ष ठरला आहे. ही निवडणूक एकनाथ शिंदे यांची शिवसेना, अजित पवार यांची राष्ट्रवादी आणि भाजपा या तिन्ही पक्षांनी एकत्रितपणे लढवली होती. या पक्षांनी जागावाटपादरम्यान मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवारीबद्दल ठोसपणे काहीही ठरवलं नव्हतं. आता मात्र या निवडणुकीत भाजपा हा पक्ष सर्वांत जास्त जागा मिळवणारा पक्ष ठरला आहे. त्यामुळे मुख्यमंत्रिपद याच पक्षाकडे जाण्याची दाट शक्यता आहे. दुसरीकडे निकाल लागल्यानंतर भाजपाच्याच वाट्याला मुख्यमंत्रिपद यावे, अशी इच्छाही भाजपाचे नेते व्यक्त करताना दिसत आहेत.  

देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच मुख्यमंत्रिपद?

महायुतीमध्ये जागावाटपाच्या चर्चेदरम्यान मुख्यमंत्रिपदावर चर्चा झाली नव्हती. त्यामुळे पुढचा मुख्यमंत्री कोण होणार हा प्रश्न अद्याप कायम आहे. निकालानंतर महायुतीतील भाजपा हा सर्वांत मोठा पक्ष ठरला आहे. त्यामुळे पक्षीय बलाबलाचा विचार करायचा झाल्यास शिवसेना किंवा राष्ट्रवादीच्या तुलनेत भाजपा हाच पक्ष वरचढ ठऱत आहे. विशेष म्हणजे निकाल लागल्यानंतर भाजपाने मुख्यमंत्रिपदावर दावा करण्यास सुरुवातही केली आहे. भाजपाकडून मुख्यमंत्रिपदासाठी थेट देवेंद्र फडणवीस यांचे नाव पुढे केले जात आहे. फडणवीसांना विरोध करणारा कोणताही चेहरा सध्यातरी भाजपात नाही. त्यामुळे सध्या मुख्यमंत्रिपदाची माळ भाजपाच्याच गळ्यात पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

एकनाथ शिंदेही आग्रही, नेमकं काय होणार?

मुख्यमंत्रिपदासाठी एकनाथ शिंदे यांचा शिवसेना पक्षदेखील आग्रही आहे. निवडणुकीच्या निकालावर बोलताना खुद्द शिंदे यांनीच तसे संकेत दिले आहेत. जागावाटपादरम्यान मुख्यमंत्रिपदाबाबत काहीही ठरलं नव्हतं, आता आम्ही एकत्र बसून ठरवू, असं शिंदे यांनी म्हटलंय. तर दुसरीकडे शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते भाजपा युतीधर्म पाळेल, अशी अपेक्षा व्यक्त करत मुख्यमंत्रिपद शिवसेनेलाच मिळावे, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. त्यामुळे भविष्यात काय होणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

कोणत्या पक्षाला किती जागा?

महायुती- 236
मविआ- 49
---------------------
भाजपा- 132

शिवसेना (शिंदे गट)- 57

राष्ट्रवादी (अजित पवार गट)- 41

काँग्रेस- 16

राष्ट्रवादी (शरद पवार गट)- 10

शिवसेना (ठाकरे गट)- 20

समाजवादी पार्टी- 2

हेही वाचा :

Vidhan Sabha Election Result : भाजपाची मुसंडी, शरद पवारांची निराशा, जाणून घ्या विधानसभा निवडणुकीत नेमक्या कोणाला किती जागा मिळाल्या?

प्रज्वल ढगे हे 'एबीपी माझा ऑनलाईन'टीममध्ये 'कॉपी एडिटर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकारण, मनोरंजन, क्रीडाविषयक बातम्यांमध्ये विशेष रस आहे. त्यांनी याआधी 'लोकसत्ता', 'टीव्ही ९ मराठी' या माध्यमांत काम केलेले आहे.
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया

व्हिडीओ

Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
Embed widget