एक्स्प्लोर

समीर भुजबळ ठाकरे गटात प्रवेश करणार का? नांदगावमधून उमेदवारी मिळणार का? नेमकं काय म्हणाले भुजबळ?

नांदगाव विधानसभा मतदारसंघातून (Nandgaon Assembly Constituency) मी राष्ट्रवादी काँग्रेसकडे उमेदवारी मागितली आहे, अशी माहिती माजी खासदार समीर भुजबळ यांनी दिली आहे.

Sameer Bhujbal : नांदगाव विधानसभा मतदारसंघातून (Nandgaon Assembly Constituency) मी पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे. माझ्या कार्यकर्त्यांनी देखील पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेत माहिती दिली आहे. त्यावर आता काय बोलणार, अशी प्रतिक्रिया माजी खासदार समीर भुजबळ (Sameer Bhujbal) यांनी दिली आहे. ते येवल्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. शिवसेना ठाकरे गटाकडून उमेदवारी करण्याबाबत त्यांना विचारले असता ते म्हणाले की, ही केवळ मीडियात चर्चा आहे. सूत्रांची माहिती असल्याचे सांगत त्यावर अधिक भाष्य करण्याचे त्यांनी टाळले. 

दरम्यान, मंत्री छगन भुजबळ हे उद्या येवल्यातून उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील घटक पक्ष व कार्यकर्ते यांच्या बैठका घेण्यासाठी व नियोजनासाठी माजी खासदार समीर भुजबळ हे येवल्यात दाखल झाले आहेत. यावेळी प्रसारमाध्यमांनी त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. 

समीर भुजबळ महाविकास आघाडीच्या संपर्कात असल्याच्या चर्चा

गेल्या दोन ते अडीच वर्षात राज्यानं अभूतपूर्व सत्तासंघर्ष अनुभवला आहे. राज्यातील दोन मोठे पक्ष, शिवसेना (Shiv Sena) आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (NCP) उभी फूट पडली आणि राज्यातील राजकारणात भूकंप झाला. अशातच पक्षांतर्गत फुटीनंतरची यंदाची पहिलीच विधानसभा निवडणूक (Vidhan Sabha Election 2024) असल्यामुळे मोठी चुरस पाहायला मिळणार आहे. अशातच राज्यानं एक काका पुतण्यातील बंड पाहिला आहे, अशातच यंदाच्या विधानसभेत राज्याला पुन्हा एकदा काका-पुतण्यातील संघर्ष पाहायला मिळू शकतो. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेले ज्येष्ठ नेते आणि मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना त्यांचे पुतणे समीर भुजबळ (Sameer Bhujbal) मोठा धक्का देऊ शकतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु होती. मंत्री छगन भुजबळांचे पुतणे समीर भुजबळ यांनी यापूर्वीच शड्डू ठोकला असून नांदगाव मतदारसंघातून विधानसभेसाठी इच्छुक असल्याचं जाहीर केलं आहे. त्यामुळे महायुतीकडून संधी मिळण्याची चिन्ह न दिसल्यामुळे आता माजी खासदार समीर भुजबळ महाविकास आघाडीच्या संपर्कात असल्याची माहिती सूत्रांच्या वतीनं मिळत आहे. नाशिक जिल्ह्यातल्या नांदगाव मतदारसंघातून लढण्यासाठी समीर भुजबळ इच्छुक असल्याचीही माहिती मिळत आहे. 

समीर भुजबळ अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. उमेदवारी न मिळाल्यास भुजबळ इतर पर्यायांचा विचार करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ते राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि शिवसेना ठाकरे गटाकडून निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

महत्वाच्या बातम्या:

छगन भुजबळांना घरातूनच धक्का? पुतणे समीर भुजबळ महाविकास आघाडीच्या संपर्कात, नांदगावमधूनच लढण्यास इच्छुक, सुत्रांची माहिती

महत्त्वाच्या बातम्या

Abhijeet Dipke: 'अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीची चौकशी करा, मुलाच्या परदेशातील शिक्षणासाठी पैसा कसा पुरवला?' निवडणूक आयोगासह टॅक्स अधिकाऱ्यांना सुद्धा कोणी लिहिलं पत्र?
'अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीची चौकशी करा, मुलाच्या परदेशातील शिक्षणासाठी पैसा कसा पुरवला?' निवडणूक आयोगासह टॅक्स अधिकाऱ्यांना सुद्धा कोणी लिहिलं पत्र?
Ambernath Shiv Sena News: 'आमदार संध्याकाळी फार्म हाऊसवर जाऊन बसतात'; अंबरनाथमध्ये शिवसेनेतील अंतर्गत धुसफूस पुन्हा उफाळली; शहरप्रमुखांची आमदार किणीकरांवर बोचरी टीका
'आमदार संध्याकाळी फार्म हाऊसवर जाऊन बसतात'; अंबरनाथमध्ये शिवसेनेतील अंतर्गत धुसफूस पुन्हा उफाळली; शहरप्रमुखांची आमदार किणीकरांवर बोचरी टीका
Maharashtra Freedom of Religion Act 2026: महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा राज्यात लागू; कायद्याचे उल्लंघन केल्यास सात वर्षांपर्यंतच्या कारावासाची तरतूद
महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा राज्यात लागू; कायद्याचे उल्लंघन केल्यास सात वर्षांपर्यंतच्या कारावासाची तरतूद
Delhi Jantar Mantar protests: जंतर मंतरवरील आंदोलनाबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वरिष्ठ नेत्याचा गंभीर आरोप, 'हे आंदोलन देशविरोधी होतं, संविधानविरोधात...'
जंतर मंतरवरील आंदोलनाबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वरिष्ठ नेत्याचा गंभीर आरोप, 'हे आंदोलन देशविरोधी होतं, संविधानविरोधात...'

व्हिडीओ

Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही
Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report
Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report
Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke: 'अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीची चौकशी करा, मुलाच्या परदेशातील शिक्षणासाठी पैसा कसा पुरवला?' निवडणूक आयोगासह टॅक्स अधिकाऱ्यांना सुद्धा कोणी लिहिलं पत्र?
'अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीची चौकशी करा, मुलाच्या परदेशातील शिक्षणासाठी पैसा कसा पुरवला?' निवडणूक आयोगासह टॅक्स अधिकाऱ्यांना सुद्धा कोणी लिहिलं पत्र?
Ambernath Shiv Sena News: 'आमदार संध्याकाळी फार्म हाऊसवर जाऊन बसतात'; अंबरनाथमध्ये शिवसेनेतील अंतर्गत धुसफूस पुन्हा उफाळली; शहरप्रमुखांची आमदार किणीकरांवर बोचरी टीका
'आमदार संध्याकाळी फार्म हाऊसवर जाऊन बसतात'; अंबरनाथमध्ये शिवसेनेतील अंतर्गत धुसफूस पुन्हा उफाळली; शहरप्रमुखांची आमदार किणीकरांवर बोचरी टीका
Maharashtra Freedom of Religion Act 2026: महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा राज्यात लागू; कायद्याचे उल्लंघन केल्यास सात वर्षांपर्यंतच्या कारावासाची तरतूद
महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा राज्यात लागू; कायद्याचे उल्लंघन केल्यास सात वर्षांपर्यंतच्या कारावासाची तरतूद
Delhi Jantar Mantar protests: जंतर मंतरवरील आंदोलनाबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वरिष्ठ नेत्याचा गंभीर आरोप, 'हे आंदोलन देशविरोधी होतं, संविधानविरोधात...'
जंतर मंतरवरील आंदोलनाबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वरिष्ठ नेत्याचा गंभीर आरोप, 'हे आंदोलन देशविरोधी होतं, संविधानविरोधात...'
Jalgaon Crime News: झोपलेल्या चिमुरड्यांवर जन्मदात्या बापाकडूनच जीवघेणा हल्ला, मुलीचा जागीच अंत, मुलगा गंभीर जखमी; जळगाव हादरलं!
झोपलेल्या चिमुरड्यांवर जन्मदात्या बापाकडूनच जीवघेणा हल्ला, मुलीचा जागीच अंत, मुलगा गंभीर जखमी; जळगाव हादरलं!
ज्यांनी आपलं मूल गमावलं अशा एका तरी शोकाकुल कुटुंबाला मोदी भेटले का? भारताच्या विद्यार्थ्यांना पंतप्रधानांच्या माफीची गरज नाही, मोदींनीच त्यांची माफी मागावी; राहुल गांधींचा प्रहार
ज्यांनी आपलं मूल गमावलं अशा एका तरी शोकाकुल कुटुंबाला मोदी भेटले का? भारताच्या विद्यार्थ्यांना पंतप्रधानांच्या माफीची गरज नाही, मोदींनीच त्यांची माफी मागावी; राहुल गांधींचा प्रहार
Yavatmal Rain Farmar: मातीच उरली नाही तर शेती करायची कशी? पावसानं पिकांसह सुपीक मातीही खरडून नेली, यवतमाळ जिल्ह्यातील 26 हजार हेक्टरवरील पिके बाधित, बळीराजा रडकुंडीला
मातीच उरली नाही तर शेती करायची कशी? पावसानं पिकांसह सुपीक मातीही खरडून नेली, यवतमाळ जिल्ह्यातील 26 हजार हेक्टरवरील पिके बाधित, बळीराजा रडकुंडीला
'न्यायपालिकेत आपण अशा व्यक्तींचा समावेश करतो नंतर ते लोकांच्या गटांचे वर्णन 'मुंग्या' असे करत असंवैधानिक टिप्पण्या करतात..' सुप्रीम कोर्टातील न्यायमूर्ती उज्वल भुयान यांची काॅलेजियम सिस्टमवर सडकून टीका
'न्यायपालिकेत आपण अशा व्यक्तींचा समावेश करतो नंतर ते लोकांच्या गटांचे वर्णन 'मुंग्या' असे करत असंवैधानिक टिप्पण्या करतात..' सुप्रीम कोर्टातील न्यायमूर्ती उज्वल भुयान यांची काॅलेजियम सिस्टमवर सडकून टीका
Embed widget