एक्स्प्लोर

Cabinet Reshuffle | राज्य मंत्रिमंडळात जूनच्या सुरुवातीला फेरबदलाचे संकेत

लोकसभा निवडणुकीचा निकाल भाजपला अनुकूल लागल्यास राधाकृष्ण विखे पाटील, जयदत्त क्षीरसागर, विजयसिंह मोहिते पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश होऊ शकतो. त्यानंतर या दिग्गज नेत्यांना महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे.

मुंबई : लोकसभा निवडणुकांचे निकाल अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपले आहेत. निकालाआधीच राज्य मंत्रिमंडळात फेरबदलाचे वारे वाहू लागल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात राज्य मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. राज्यातील विधानसभा निवडणुकीआधी काही नवीन चेहऱ्यांना संधी मिळणार असल्याचा अनुमान वर्तवण्यात येत आहे. विशेष म्हणजे निवडणुकांच्या तोंडावर पक्षात आलेल्या काही 'आयाराम' नेत्यांना मंत्रिपदाची लॉटरी लागण्याची चिन्हं आहेत. लोकसभा निवडणुकीचा निकाल भाजपला अनुकूल लागल्यास राधाकृष्ण विखे पाटील, विजयसिंह मोहिते पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश होऊ शकतो. त्यानंतर या दिग्गज नेत्यांना महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. तर जयदत्त क्षीरसागर यांनाही शिवसेनेच्या कोट्यातून मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. Vikhe family disputes | विखे कुटुंबातील लढाई पुन्हा रस्त्यावर | अहमदनगर  राधाकृष्ण विखे पाटील दोन नंबरच्या मंत्रिपदाची म्हणजेच महसूल खात्याची मागणी करत असल्याची सूत्रांची माहिती आहे. मात्र चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडून महसूल खातं काढून विखेंना मिळण्याची शक्यता कमी असल्याचं म्हटलं जातं. मात्र पांडुरंग फुंडकर यांच्या निधनानंतर रिक्त असलेलं आणि चंद्रकांत पाटील यांच्याकडे अतिरिक्त भार असलेलं कृषी खातं विखेंना मिळण्याची दाट शक्यता आहे.
कोणतं दाबायचं? मतदानासाठी आलेल्या राधाकृष्ण विखे पाटलांच्या सवालाने हास्यकल्लोळ
दुसरीकडे, मराठवाड्यातील राष्ट्रवादीचे दिग्गज नेते आणि माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनाही कॅबिनेट मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अहमदनगर आणि मराठवाड्यात संघटनेला बळकटी देण्यासाठी आणि पक्ष विस्तारीकरणासाठी मंत्रिपद देणार असल्याची चर्चा आहे. त्याआधी 21 मे रोजी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली भाजपच्या निवडणूक आढावा बैठकीत लोकसभा निवडणुकीत डावलल्यांची नाराजी दूर करण्याचे प्रयत्न होणार आहेत.
सुजयने राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवावी असं राहुल गांधींनी सुचवलं, हे धक्कादायक : राधाकृष्ण विखे पाटील
राधाकृष्ण विखे पाटील भाजपच्या वाटेवर? सुजय विखे पाटील यांना अहमदनगरमधून लोकसभेची निवडणूक लढवायची इच्छा होती. त्यामुळे काँग्रेसने राष्ट्रवादीच्या कोट्यातील ही जागा मागितली. मात्र राष्ट्रवादीने ही जागा बदलून देण्यास नकार दिल्याने सुजय विखेंनी राष्ट्रवादीला रामराम ठोकत भाजपचा झेंडा खांद्यावर घेतला होता. भाजपने सुजय विखेंना तिकीट दिल्यानंतर राधाकृष्ण विखे पाटलांनी त्यांचा उघड प्रचारही केला होता. जयदत्त क्षीरसागरांचं बंडाचं निशाण याआधी जयदत्त क्षीरसागर यांनी राष्ट्रवादी विरोधात बंड करत भाजपच्या लोकसभेसाठीच्या उमेदवार प्रीतम मुंडे यांना विजयी करण्याचे आदेश कार्यकर्त्यांना दिले आहेत. गेल्या दोन-तीन वर्षांपासून राष्ट्रवादीत नाराज असलेल्या क्षीरसागर यांनी बीडमध्ये कार्यकर्त्यांची बैठक घेत प्रीतम मुंडेंना पाठिंबा देणार असल्याचं स्पष्ट केलं होतं. क्षीरसागरांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतल्यामुळे त्यांच्या शिवसेना प्रवेशाच्या चर्चाही रंगल्या होत्या.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

पक्ष संघटनेसाठी नीलम गोऱ्हेंनी काहीही केलं नाही, त्यांना विधान परिषदेची उमेदवारी देऊ नये, महिला आघाडीचं एकनाथ शिंदेंना पत्र 
पक्ष संघटनेसाठी नीलम गोऱ्हेंनी काहीही केलं नाही, त्यांना विधान परिषदेची उमेदवारी देऊ नये, महिला आघाडीचं एकनाथ शिंदेंना पत्र 
Bacchu Kadu And Eknath Shinde: प्रहार जनशक्ती पक्ष शिवसेनेत विलीन होणार?; विधान परिषदेच्या निवडणुकीआधी मोठ्या घडामोडी, एकनाथ शिंदे-बच्चू कडूंच्या भेटीत काय काय घडलं?
प्रहार जनशक्ती पक्ष शिवसेनेत विलीन होणार?; विधान परिषदेच्या निवडणुकीआधी मोठ्या घडामोडी, एकनाथ शिंदे-बच्चू कडूंच्या भेटीत काय काय घडलं?
Maharashtra Vidhan Parishad Election 2026: नीलम गोऱ्हे , बच्चू कडू नको...; विधान परिषदेसाठी 'त्यांना' संधी द्या, शिंदेंच्या मंत्र्यांनी स्पष्ट सांगितलं!
नीलम गोऱ्हे , बच्चू कडू नको...; विधान परिषदेसाठी 'त्यांना' संधी द्या, शिंदेंच्या मंत्र्यांनी स्पष्ट सांगितलं!
West Bengal Elections : बांग्लादेशी घुसखोरांना बंगालमधून हाकलून देऊ, ममता बॅनर्जी त्यांना वाचवू शकणार नाहीत; पंतप्रधान मोदींचे आश्वासन
बांग्लादेशी घुसखोरांना बंगालमधून हाकलून देऊ, ममता बॅनर्जी त्यांना वाचवू शकणार नाहीत; पंतप्रधान मोदींचे आश्वासन

व्हिडीओ

Auto Driver On Pratap Sarnaik : मराठी सक्तीचा मुदतीवर उद्या निर्णय, सरनाईक काय निर्णय घेणार?
Mumbai Food Poison Case : कलिंगडमुळे एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू Special Report
Pune Case : पुण्यातील अंमली पदार्थावर सर्जिकल स्ट्राईक, 50 लाखांचा मुद्देमाल जप्त Special Report
Solapur fraud : सोलापुरात अविवाहित शेतकरी तरुणाला फसवलं Special Report
Chhagan Bhujbal Nashik : अशोक खरात प्रकरणी जे कोणी आरोपी आहेत त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे- भुजबळ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ladki Bahin Yojana : ई-केवायसी दुरुस्तीसाठी राहिले शेवटचे तीन दिवस, लाडक्या बहिणींना मार्च महिन्याचे 1500 रुपये कधी मिळणार?
ई-केवायसी दुरुस्तीसाठी राहिले शेवटचे तीन दिवस, लाडक्या बहिणींना मार्च महिन्याचे 1500 रुपये कधी मिळणार?
दिग्गज अभिनेते भरत कपूर यांचं निधन, वयाच्या 80 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, चित्रपटसृष्टीत शोककळा
दिग्गज अभिनेते भरत कपूर यांचं निधन, वयाच्या 80 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, चित्रपटसृष्टीत शोककळा
Solapur : विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी सोलापूरमध्ये रस्सीखेच, ‘या’ चार नावांची जोरदार चर्चा
विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी सोलापूरमध्ये रस्सीखेच, ‘या’ चार नावांची जोरदार चर्चा
Iran US Talks : अमेरिकेशी तणावात इराणचा नवा डाव; पाकिस्तानला बाजूला ठेवत रशियाकडे मध्यस्थीची सूत्रे?
अमेरिकेशी तणावात इराणचा नवा डाव; पाकिस्तानला बाजूला ठेवत रशियाकडे मध्यस्थीची सूत्रे?
Virat Kohli : विराट कोहलीनं इतिहास रचला, आयपीएलमध्ये 9000 धावांची नोंद, अनोख्या विक्रमाला गवसणी घालणारा एकमेव खेळाडू ठरला
विराट कोहलीनं इतिहास रचला, आयपीएलमध्ये 9000 धावांची नोंद, अनोख्या विक्रमाला गवसणी
पुण्यातील बुधवार पेठेत पोलिसांची कारवाई, 4 फ्लॅट सील; 3 बांगलादेशी महिलांना अटक
पुण्यातील बुधवार पेठेत पोलिसांची कारवाई, 4 फ्लॅट सील; 3 बांगलादेशी महिलांना अटक
मुंबई-सोलापूर वंदे भारत ट्रेनला पुणे स्थानकाजवळ अपघात, कोच रुळावरुन घसरला; रेल्वे वाहतुकीवर परिणाम
मुंबई-सोलापूर वंदे भारत ट्रेनला पुणे स्थानकाजवळ अपघात, कोच रुळावरुन घसरला; रेल्वे वाहतुकीवर परिणाम
Home Loan : गृहकर्ज काढून घर खरेदीचा विचार करताय, 20-30-40 चा फॉर्म्युला कसा फायदेशीर ठरतो? जाणून घ्या
गृहकर्ज काढून घर खरेदीचा विचार करताय, 20-30-40 चा फॉर्म्युला कसा फायदेशीर ठरतो? जाणून घ्या
Embed widget