एक्स्प्लोर

कांद्याच्या माळा घाला नाहीतर काहीही करा, पण कांद्याचे दर कमी होऊ देणार नाही, शरद पवारांनी सांगितला 'तो' किस्सा

आता विधानसभा निवडणुकीत (Vidhansabha Election) सत्ता बदल करण्यासाठी प्रयत्न करा असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी केलं.

Sharad Pawar : आता विधानसभा निवडणुकीत (Vidhansabha Election) सत्ता बदल करण्यासाठी प्रयत्न करा असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी केलं. महाराष्ट्र राज्य शेती प्रधान राज्य आहे. पण या सरकारच्या काळात महाराष्ट्रमध्ये 900 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे शरद पवार म्हणाले. डोक्यावर कर्ज झाले, सावकारी वाढली त्यामुळे शेतकरी आत्महत्या करत असल्याचे पवार म्हणाले. साधी गोष्ट आहे, तुमच्या भागात कांदा पीक येते, पण दोन पैसे शेतकऱ्यांना मिळाले पाहिजे ही भावना आहे. कांद्याची निर्यात केली तर पैसे वाढतात असे पवार म्हणाले. मी मंत्री असताना शरद पवार होश मे आवो, पॅज किमते कम करो च्या घोषणा दिल्या होत्या. कांद्याच्या माळा घालून आंदोलन केली होती. मी सांगितलं कांद्याच्या माळा घाला नाहीतर काहीही करा, कांदा दर कमी होऊ देणार नाही असे पवार म्हणाले. ते नाशिक जिल्ह्यातील सिन्नरमध्ये बोलत होते.  

 इंडिया आघाडीने लोकांना जागृत करण्याचे काम केले

महिला अत्याचाराच्या मुद्यावरुन देखील शरद पवारांनी सरकारवर टीका केली. मागील सहा महिन्यात शेकडो मुली गायब झाल्या आहेत. ठाणे जिल्ह्यातील दोन लहान मुलींवर अत्याचार झाले असल्याचे शरद पवार म्हणाले. दरम्यान, महाराष्ट्र सध्या सत्तेचा गैरवापर केला जात असल्याची टीका शरद पवार यांनी केली. महाराष्ट्राची स्थिती बदलत आहे. मागील लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला सर्व महाराष्ट्रमध्ये 2 जागा राष्ट्रवादीला 4 जागा मिळाल्या होत्या. त्यानंतर आम्ही कष्ट केले, संघर्ष करत नवीन आघडी स्थापन केली. दिल्लीत सर्व नेत्यांनी इंडिया आघडी तयार केली. अरविंद केजरीवाल, सोनिया गांधी, राहूल गांधी, आम्ही सर्वांनी मिळून बैठक घेतली. देशात लोकशाही आहे की नाही अशी परिस्थिती होती. मात्र, देश वाचविण्यासाठी इंडिया आघाडीने लोकांना जागृत करण्याचे काम केले. यामुळं राज्यात मागील वेळी ज्यांना 5 जागा मिळाल्या त्याच महाराष्ट्रमध्ये लोकसभेला 31 जागा मिळाल्याची माहिती शरद पवार यांनी दिली. 

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलच तापल्याचं पाहायला मिळत आहे, सर्वच राजकीय पक्षांचे दौरे, संवाद, बैठका सुरु आहेत. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार देखील राज्यभर प्रचार दौरे करत आहेत. 

महत्वाच्या बातम्या:

Sharad Pawar : राष्ट्रवादीमध्ये अंतर वाढवणारे दोन तीन लोक होते, त्यांनी पक्ष फोडला, शरद पवारांचं परळीत वक्तव्य, नेमका रोख कुणाकडे?

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Aaditya Thackeray: राज्यसभेसाठी दावा, जागा शरद पवारांना सुटली, फॉर्म भरायला दांडी का? आदित्य ठाकरेंनी सगळंच सांगितलं
राज्यसभेसाठी दावा, जागा शरद पवारांना सुटली, फॉर्म भरायला दांडी का? आदित्य ठाकरेंनी सगळंच सांगितलं
महाराष्ट्रानं दिलेलं प्रेम, विश्वास आणि पाठबळ हेच आयुष्याच्या ऊर्जेचे खरे स्रोत, शरद पवारांनी मित्रपक्षांचे मानले आभार 
महाराष्ट्रानं दिलेलं प्रेम, विश्वास आणि पाठबळ हेच आयुष्याच्या ऊर्जेचे खरे स्रोत, शरद पवारांनी मित्रपक्षांचे मानले आभार 
शेवाळे, किर्तीकर, अडसुळांपासून अनेक इच्छुक; पण उमेदवारी न मागणाऱ्या वाघमारेंना राज्यसभेवर पाठवलं, एकनाथ शिंदेंनी नेमकं कारण सांगितलं!
शेवाळे, किर्तीकर, अडसुळांपासून अनेक इच्छुक; पण उमेदवारी न मागणाऱ्या वाघमारेंना राज्यसभेवर पाठवलं, एकनाथ शिंदेंनी नेमकं कारण सांगितलं!
मोठी बातमी : शरद पवार स्वत: आले नाहीत, निवडणूक अधिकाऱ्यांकडून घरी जाऊन प्रक्रिया पूर्ण, महाराष्ट्राच्या इतिहासातील पहिली घटना
शरद पवार स्वत: आले नाहीत, निवडणूक अधिकाऱ्यांकडून घरी जाऊन प्रक्रिया पूर्ण, महाराष्ट्राच्या इतिहासातील पहिली घटना

व्हिडीओ

Uddhav Thackeray Eknath Shinde Vidhabhavan :उद्धव ठाकरे - एकनाथ शिंदे आमनेसामने;विधानभवनात काय घडलं?
Devendra Fadnavis Budget 2026 : 2 लाखांपर्यंत कर्ज थकीत असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी, मोठी घोषणा
Sanjay Raut PC : मोदींनी इस्रायल-इराणचं युद्ध थांबवावं, युद्धाचे परिणाम भारताला भोगावे लागणार - राऊत
Gold Silver Rate Update : अमेरिका इजरायल आणि इराणमधील युद्धामुळे सोनं आणि चांदीच्या दरात मोठी घसरण
Amol Mitkari On Ajit Pawar : अजितदादांशिवाय अर्थसंकल्प ही कल्पनाच असह्य, मिटकरींच्या डोळ्यात अश्रू

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'सात बारा कोरा, कोरा ,कोरा म्हणत टाहो फोडून मते घेतली, मात्र दोन लाखांपर्यंतची तकलादू कर्जमाफी देत शेतकऱ्यांचा विश्वासघात केला, अटी आणि शर्तींमुळे..' ; राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर हल्लाबोल
'सात बारा कोरा, कोरा ,कोरा म्हणत टाहो फोडून मते घेतली, मात्र दोन लाखांपर्यंतची तकलादू कर्जमाफी देत शेतकऱ्यांचा विश्वासघात केला, अटी आणि शर्तींमुळे..' ; राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर हल्लाबोल
IND vs NZ : टी 20 वर्ल्ड कपच्या फायनलसाठी भारतीय संघात बदल? वरुण चक्रवर्तीला बाहेरचा रस्ता? कोणाला संधी मिळणार? 
टी 20 वर्ल्ड कपच्या फायनलसाठी भारतीय संघात बदल? वरुण चक्रवर्तीला बाहेरचा रस्ता? कोणाला संधी मिळणार? 
Eknath Shinde : लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार? देवेंद्र फडणवीसांसमोरचं एकनाथ शिंदे म्हणाले...
लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार? देवेंद्र फडणवीसांसमोरचं एकनाथ शिंदे म्हणाले...
Maharashtra Budget 2026:कोणतीही चालू योजना बंद केली जाणार नाही; देशातील पहिली 1 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याचे उद्दिष्ट महाराष्ट्र लवकरच पूर्ण करेल; मुख्यमंत्र्यांची ग्वाही
कोणतीही चालू योजना बंद केली जाणार नाही; देशातील पहिली 1 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याचे उद्दिष्ट महाराष्ट्र लवकरच पूर्ण करेल; मुख्यमंत्र्यांची ग्वाही
BMC : मनसेच्या यशवंत किल्लेदारांसाठी ठाकरेंच्या उमेदवाराची माघार, सहा प्रभाग समित्यांच्या निवडणुका बिनविरोध 
मनसेच्या यशवंत किल्लेदारांसाठी ठाकरेंच्या उमेदवाराची माघार, सहा प्रभाग समित्यांच्या निवडणुका बिनविरोध 
Maharashtra Budget 2026: लाडकी बहीण योजनेबाबत अर्थसंकल्पात महत्त्वाची घोषणा, 2100 रुपयांबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
लाडकी बहीण योजनेबाबत अर्थसंकल्पात महत्त्वाची घोषणा, 2100 रुपयांबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Loan Waiver : शेतकऱ्यांसाठी दोन लाखांपर्यंत कर्जमाफी जाहीर; कोणते शेतकरी पात्र? 
शेतकऱ्यांसाठी दोन लाखांपर्यंत कर्जमाफी जाहीर; कोणते शेतकरी पात्र? 
मोठी बातमी: जेसीबीच्या बाजूला जेवायला बसले, कामगारांना ट्रकने उडवलं, छत्रपती संभाजीनगर समृद्धी महामार्गावर दोघांचा जागीच मृत्यू, 3 जखमी
मोठी बातमी: जेसीबीच्या बाजूला जेवायला बसले, कामगारांना ट्रकने उडवलं, छत्रपती संभाजीनगर समृद्धी महामार्गावर दोघांचा जागीच मृत्यू, 3 जखमी
Embed widget