एक्स्प्लोर

Loksabha Election 2019 : लोकशाहीच्या उत्सवावर नागरिकांचा बहिष्कार, 'या' गावांमध्ये मतदानच नाही

उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील बार्शी तालुक्यातील वानेवाडी तर लातूर मतदारसंघातील सुनेगाव शेंदरी आणि आनंदवाडीच्या ग्रामस्थांनी प्रशासनाकडून होणाऱ्या दुर्लक्षामुळे मतदान न करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे या गावांमध्ये मतदान प्रक्रियेसाठी गेलेली यंत्रणा ठप्प असून कर्मचारी देखील बसून आहेत.

मुंबई : लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानाला आज सकाळपासून सुरुवात झाली. महाराष्ट्रात दुसऱ्या टप्प्यात 10 लोकसभा मतदारसंघात मतदान होत आहे. यामध्ये बुलढाणा, अकोला, अमरावती, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर या मतदारसंघाचा समावेश आहे. दुसऱ्या टप्प्यात राज्यात अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
एकीकडे मतदानाचा उत्साह पाहायला मिळत असताना दुसरीकडे मात्र नागरिकांनी मतदानावर बहिष्कार घातला असल्याचे चित्र आहे. उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील बार्शी तालुक्यातील वानेवाडी तर लातूर मतदारसंघातील सुनेगाव शेंदरी आणि आनंदवाडीच्या ग्रामस्थांनी प्रशासनाकडून होणाऱ्या दुर्लक्षामुळे मतदान न करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे या गावांमध्ये मतदान प्रक्रियेसाठी गेलेली यंत्रणा ठप्प असून कर्मचारी देखील बसून आहेत.
वानेवाडीत सुविधांची 'वाणवा , 'उमेदवारा'च्या गावाचा बहिष्कार 
उस्मानाबाद मतदारसंघातील बार्शी तालुक्यातील वानेवाडी या गावातील ग्रामस्थांनी मतदान न करण्याचा निर्णय एकमताने घेतला आहे.  1300 लोकसंख्या आणि 800 मतदान असलेल्या या गावच्या ग्रामस्थांनी गावाच्या बाहेर एक फलक झळकावला आहे. त्यामध्ये वाणेवाडी ग्रामस्थांचा लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांवर बहिष्कार असे लिहिले आहे. उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात वानेवाडीच्या ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तो यशस्वीपणे पार पडत आहे. पाणी, रस्ते तसेच गावात स्वातंत्र्यापासून बससेवेपासून वंचित आहे, असे गावकऱ्यांनी सांगितले आहे. विशेष म्हणजे  युवक शेतकरी संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष आणि याच गावचे रहिवाशी शंकर गायकवाड हे देखील उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत. मात्र या उमेदवाराला त्याचे आईवडील सुद्धा मतदान करणार नाहीत.
VIDEO | लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्या, नांदेड मतदार संघातील | एबीपी माझा
आनंदवाडीत मतदानाचा 'आनंद' नाही 
लातूर मतदारसंघातील लातूर तालुक्यातील आनंदवाडी येथील पीकविमा प्रश्नी ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार घातला आहे. या गावात सकाळी सव्वादहा वाजेपर्यंत एकही मतदान झाले नाही. या गावात 1174 मतदान आहे. तहसीलदार अरविंद नरसीकर आनंदवाडी गावात पोहचले असून त्यांनी गावकऱ्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला आहे.
रस्त्यासाठी सुनेगाव ( शेंद्री ) आक्रमक, मतदानाविना गाव सुने सुने  
लातूर मतदार संघातील सुनेगाव (शेंदरी) ग्रामस्थ रस्त्यासाठी आक्रमक झाले आहेत. त्यामुळे गावातील सर्व 550 मतदारांनी मतदानावर बहिष्कार टाकला आहे. गावात कोणत्याही पक्षाचा पोलिंग एजंटही मिळालेला नाही. यामुळे मतदानासाठी आलेले  कर्मचारी बसून आहेत. गावकरी आक्रमक झाल्याने प्रशासन हतबल झाले आहे.
रस्ता नसल्याने हिंगोलीतील करवाडी ग्रामस्थांचा बहिष्कार
हिंगोली मतदारसंघातील कळमनुरी तालुक्यातील करवाडी गावाला रस्ता नसल्याकारणाने नागरिकांनी मतदानावर बहिष्कार घातला.  2 वाजले तरीही गावात एकही मतदान झालेले नाही. करवाडी हे गाव शंभर टक्के आदिवासी वस्ती आहे. 300 नागरिक या गावांमध्ये वास्तव्य करतात. गावातील नागरिकांना पुरेशा सुविधा मिळत नसल्यामुळे आणि रस्ता  नसल्यामुळे गावकऱ्यांनी हा निर्णय घेतला आहे. या गावातील नागरिकांना नांदापूर हे मतदान केंद्र आहे. येथील एकही मतदार या मतदान केंद्रावर फिरकले नसल्याचे दिसून आले.

महत्त्वाच्या बातम्या

Abhijeet Dipke : लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
Ajinkya Rahane : निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
Silver Foil On Sweets : मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
PM Modi : आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले

व्हिडीओ

Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke : लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
Ajinkya Rahane : निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
Silver Foil On Sweets : मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
PM Modi : आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
Bankipur by-election: बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
Devendra Fadnavis: तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Embed widget