एक्स्प्लोर

कुडाळ विधानसभा मतदारसंघ | नारायण राणे आपला गड परत मिळवणार का?

राणेंचा दोनदा पराभव झाल्यानंतर राणे पुन्हा एकदा 2019 च्या कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघात निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे संकेत त्यांचे सुपुत्र आमदार नितेश राणे यांनी दिले आहेत. त्यामुळे या मतदारसंघात राजकीय आखाडा चांगलाच रंगणार असल्याचे चित्र पाहायला मिळणार.

तळकोकणात सध्या तीन विधानसभा मतदारसंघ आहेत. कणकवली, देवगड, वैभववाडी विधानसभा मतदारसंघ, कुडाळ - मालवण विधानसभा मतदारसंघ, सावंतवाडी, दोडामार्ग, वेंगुर्ला विधानसभा मतदारसंघ असे एकूण तीन मतदारसंघ सिंधुदुर्गात आहेत. देशातील एकमेव पर्यटन जिल्हा म्हणून सिंधुदुर्ग जिल्हा घोषित केला गेला आहे. मात्र पर्यटनाच्या माध्यमातून हवा तसा जिल्ह्याचा विकास झालेला नाही. पर्यटकांचे प्रमुख आकर्षण हे मालवण असल्याने आतापर्यंत कुठल्याही आमदार, खासदाराने लक्ष दिलेले नाही. जगभरातून मालवणमध्ये मोठ्या संख्येने पर्यटक येत असतात. मात्र पर्यटनाच्या पायाभूत सुविधांचा वाणवा पाहायला मिळतो. कुडाळ विधानसभा मतदारसंघात जातीय समीकरणं प्रांतानुसार बदलतात. मालवण किनारपट्टी भागात गाबीत समाजाचे वर्चस्व आहे. तर अन्य भागात दोन्ही तालुक्यात सर्वच जातीचे लोक राहतात. या मतदारसंघात मच्छीमार समाजाचा प्रभाव असल्याने ज्या पक्षाच्या बाजूने हा समाज असेल तो उमेदवार निश्चित निवडून येतो, असे गणित आहे.  कारण 2014 च्या निवडणुकीत मच्छीमार समाज राणेंच्या विरोधात होता त्याचा परिणाम म्हणून राणेंचा पराभव झाला. त्यामुळे मच्छीमार समाजाची मत निर्णायक ठरू शकतात. 2009 साली कुडाळ - मालवण विधानसभा मतदार निवडणुकीत नारायण राणे (काँग्रेस), वैभव नाईक (शिवसेना), डॉ. प्रसाद वैंगणकर (अपक्ष), रविंद्र कासळकर (बसपा), सुरेंद्र बोरकर (रासप) असे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. मात्र त्यावेळी नारायण राणे आणि वैभव नाईक यांच्यातच मुख्य लढत होती. नारायण राणे यांना 71 हजार 921 तर वैभव विजय नाईक यांना 47 हजार 666 मतं पडली. याच मोठ्या मताधिक्क्याने नारायण राणे यांनी विजय मिळवला. महाराष्ट्रातील वजनदार नेत्यांपैकी नारायण राणे हे एक नाव आहे. कोकणातील सर्वांत जास्त जनपाठिंबा असलेले नेते. आक्रमक भाषाशैली आणि महाराष्ट्रातील ताकदीचे नेते म्हणून त्यांची ओळख आहे. मात्र नारायण राणे यांचा 2014 साली शिवसेनेचे वैभव नाईक यांनी पराभव केला. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत नारायण राणे (काँगेस), वैभव नाईक (शिवसेना), पुष्पसेन सावंत (काँगेस) निवडणुकीच्या रिंगणात होते. या निवडणुकीत नारायण राणेंना 60,206 मते, वैभव नाईक 70,502 मतं पडली. 10,376 मतांनी वैभव नाईक यांनी नारायण राणेंचा पराभव केला आणि 2014 साली राणेंचा बालेकिल्ला ढासळला. आता 2019 च्या निवडणुकीत नारायण राणे निवडणूक रिंगणात उतरून कमबॅक करतील का? याकडे जिल्ह्यासह संपूर्ण राज्याचा लक्ष लागला आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाकडून नारायण राणे, युती झाल्यास शिवसेनेकडून विद्यमान आमदार वैभव नाईक, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून परशुराम उपरकर मैदानात असतील. युती न झाल्यास भाजपकडून अतुल काळसेकर, आघाडीकडून काँगेसचे माजी आमदार पुष्पसेन सावंत, काका कुडाळकर हे इच्छुक उमेदवार आहेत. राणेंच्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाकडून नारायण राणे निवडणूक रिंगणात उतरले नाही तर महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत, सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत, विशाल परब हेही या कुडाळ मालवण मतदारसंघात इच्छुक आहेत. त्यामुळे नारायण राणे या निवडणूक रिंगणात उतरले नाही तर राणेंचा कस लागणार आहे. कारण पक्षातून एकाच मतदारसंघात अनेकजण इच्छुक असल्याने नाराजी नाट्य पाहायला मिळू शकतं. नारायण राणे 1996 मध्ये शिवसेना भाजप सरकारमध्ये महाराष्ट्राचे महसूल मंत्री झाले. 1999 मध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले. 2005 पर्यंत ते शिवसेनेचे सदस्य होते. 2005 ला शिवसेना सोडून राष्ट्रीय काँग्रेसमध्ये त्यांनी प्रवेश केला. 2009 मध्ये महाराष्ट्राचे महसूल मंत्री म्हणून त्यांनी काम पाहिलं. 2014 मध्ये शिवसेनेकडून कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघात वैभव नाईक यांनी त्यांचा पराभव केला. त्यानंतर दोनच वर्षात त्यांनी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची स्थापना केली. नारायण राणे आत्तापर्यंत मुख्यमंत्री, महसूल मंत्री, उद्योग, वस्त्रोद्योग मंत्री अशी अनेक पदे भूषवली आहेत. मात्र त्यांचा 2014 ला कुडाळ - मालवण विधानसभा मतदारसंघात पराभव झाल्यानंतर राणे कुठेतरी बॅकफूटवर गेल्याचे चित्र सिंधुदुर्गात पाहायला मिळालं. 2014 मध्ये कुडाळ-मालवण मतदारसंघात पराभव झाल्यानंतर वांद्रे येथील पोटनिवडणुकीत सुद्धा राणे यांचा पराभव झाला. राणेंचा दोनदा पराभव झाल्यानंतर राणे पुन्हा एकदा 2019 च्या कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघात निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याबाबतचे संकेत त्यांचे सुपुत्र आमदार नितेश राणे यांनी दिले आहेत. त्यामुळे या मतदारसंघात राजकीय आखाडा चांगलाच रंगणार असल्याचे चित्र पाहायला मिळणार. 2009 च्या विधानसभा निवडणुकीतील चित्र नारायन राणे (काँग्रेस) - 71921 वैभव नाईक (शिवसेना) -  47666 डॉ. प्रसाद वैंगणकर (अपक्ष) - 1947 रवींद्र कासळकर (बसपा)  - 1503 सुरेंद्र बोरकर  (रासप) - 1427 2009 च्या विधानसभा निवडणुकीतील चित्र वैभव नाईक  (शिवसेना) - 70502 नारायन राणे  (काँगेस) - 60206 2019 च्या विधानसभेसाठी संभावित उमेदवार महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष - नारायण राणे, राणेंच्या पक्षातून इच्छुक उमेदवार जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत, जिल्हा बँक अध्यक्ष सतिश सावंत, विशाल परब युती असल्यास शिवसेनेकडून वैभव नाईक, युती न झाल्यास भाजपकडून अतुल काळसेकर काँगेस- माजी आमदार पुष्पसेन सावंत, काका कुडाळकर महाराष्ट्र नवनिर्माण सेना- परशुराम उपरकर जाणून घ्या या मतदारसंघाविषयी

महत्त्वाच्या बातम्या

Devendra Fadnavis : ज्यांनी कुणबी जात प्रमाणपत्र मागितलं त्यांना मिळालं, प्रलंबित प्रकरणं कमी; मनोज जरांगेंच्या इशाऱ्यानंतर मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण
ज्यांनी कुणबी जात प्रमाणपत्र मागितलं त्यांना मिळालं, प्रलंबित प्रकरणं कमी; मनोज जरांगेंच्या इशाऱ्यानंतर मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण
मन हेलावणारी घटना... जलजीवन मिशनसाठीच्या खड्ड्यात पडून 3 वर्षीय चिमुकली ठार; आई-वडिलांचा आक्रोश, ग्रामस्थांचा संताप
मन हेलावणारी घटना... जलजीवन मिशनसाठीच्या खड्ड्यात पडून 3 वर्षीय चिमुकली ठार; आई-वडिलांचा आक्रोश, ग्रामस्थांचा संताप
ST च्या NCMC स्मार्ट कार्डसाठी आता 1 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ; बसच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी अनिवार्य
ST च्या NCMC स्मार्ट कार्डसाठी आता 1 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ; बसच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी अनिवार्य
धर्मेंद्र प्रधानांनी कधीच शिक्षण मंत्रालय चालवलं नाही ते फक्त आरएसएसनं चालवलं, देशातील प्रत्येक विद्यापीठाचा कुलगुरु आरएसएसचा माणूस, व्यवस्थेचा आत्माच ताब्यात घेतलाय; राहुल गांधींचा हल्लाबोल
धर्मेंद्र प्रधानांनी कधीच शिक्षण मंत्रालय चालवलं नाही ते फक्त आरएसएसनं चालवलं, देशातील प्रत्येक विद्यापीठाचा कुलगुरु आरएसएसचा माणूस, व्यवस्थेचा आत्माच ताब्यात घेतलाय; राहुल गांधींचा हल्लाबोल

व्हिडीओ

Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं
Manoj Jarange Patil Protest Maratha Reservation: कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?
Abhijeet Dipke On Andolan : ..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा
Sharad Pawar To Meet PM Modi | वाढल्या भेटी, जुळणार गाठी? | ABP Majha Special Report
Dharmendra Pradhan Welcome After Resignation: गमावला पदभार... तरी हार, तुरे, सत्कार | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnavis : ज्यांनी कुणबी जात प्रमाणपत्र मागितलं त्यांना मिळालं, प्रलंबित प्रकरणं कमी; मनोज जरांगेंच्या इशाऱ्यानंतर मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण
ज्यांनी कुणबी जात प्रमाणपत्र मागितलं त्यांना मिळालं, प्रलंबित प्रकरणं कमी; मनोज जरांगेंच्या इशाऱ्यानंतर मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण
मन हेलावणारी घटना... जलजीवन मिशनसाठीच्या खड्ड्यात पडून 3 वर्षीय चिमुकली ठार; आई-वडिलांचा आक्रोश, ग्रामस्थांचा संताप
मन हेलावणारी घटना... जलजीवन मिशनसाठीच्या खड्ड्यात पडून 3 वर्षीय चिमुकली ठार; आई-वडिलांचा आक्रोश, ग्रामस्थांचा संताप
ST च्या NCMC स्मार्ट कार्डसाठी आता 1 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ; बसच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी अनिवार्य
ST च्या NCMC स्मार्ट कार्डसाठी आता 1 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ; बसच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी अनिवार्य
धर्मेंद्र प्रधानांनी कधीच शिक्षण मंत्रालय चालवलं नाही ते फक्त आरएसएसनं चालवलं, देशातील प्रत्येक विद्यापीठाचा कुलगुरु आरएसएसचा माणूस, व्यवस्थेचा आत्माच ताब्यात घेतलाय; राहुल गांधींचा हल्लाबोल
धर्मेंद्र प्रधानांनी कधीच शिक्षण मंत्रालय चालवलं नाही ते फक्त आरएसएसनं चालवलं, देशातील प्रत्येक विद्यापीठाचा कुलगुरु आरएसएसचा माणूस, व्यवस्थेचा आत्माच ताब्यात घेतलाय; राहुल गांधींचा हल्लाबोल
पॅलेटगन वापराचे आदेश गृहमंत्र्यांचेच, राहुल गांधींचा दावा, तर तुम्ही एखाद्याची हत्या केली असं आम्ही म्हणू का? रिजीजूंचा पलटवार!
पॅलेटगन वापराचे आदेश गृहमंत्र्यांचेच, राहुल गांधींचा दावा, तर तुम्ही एखाद्याची हत्या केली असं आम्ही म्हणू का? रिजीजूंचा पलटवार!
Manoj Jarange Patil Maratha Reservation: ते नऊ ओबीसी मंत्री एक आले अन् म्हणाले मराठा समाजाला स्वतंत्र मंत्रालय देऊ नका, 29 ऑगस्टला नावं सांगेन: मनोज जरांगे पाटील
ते नऊ ओबीसी मंत्री एक आले अन् म्हणाले मराठा समाजाला स्वतंत्र मंत्रालय देऊ नका, 29 ऑगस्टला नावं सांगेन: मनोज जरांगे पाटील
Delhi Student Protest: चलो संसद आंदोलनात पेलेट गनमधून सात फैरी झाडल्या; पाच आंदोलकांना लागल्या, एका पत्रकारासह दोन विद्यार्थी रक्तबंबाळ; त्या जवानावर कारवाई होणार की नाही?
चलो संसद आंदोलनात पेलेट गनमधून सात फैरी झाडल्या; पाच आंदोलकांना लागल्या, एका पत्रकारासह दोन विद्यार्थी रक्तबंबाळ; त्या जवानावर कारवाई होणार की नाही?
ट्रेनी IPS अधिकाऱ्यावर छेडछाड ब्लॅकमेलिंगचा गंभीर आरोप! महिला ट्रेनी IPS अधिकारी म्हणाली, बळजबरीने खोलीत नेत तीन कंडोम पाकिटे तोंडावर फेकली, व्हिडिओ करून पतीला पाठवला अन्
ट्रेनी IPS अधिकाऱ्यावर छेडछाड ब्लॅकमेलिंगचा गंभीर आरोप! महिला ट्रेनी IPS अधिकारी म्हणाली, बळजबरीने खोलीत नेत तीन कंडोम पाकिटे तोंडावर फेकली, व्हिडिओ करून पतीला पाठवला अन्
Embed widget