एक्स्प्लोर

Krishnaraaj Mahadik: कृष्णराज कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीतून घेणार माघार! खासदार धनंजय महाडिकांचा तगडा निर्णय!

Krishnaraaj Mahadik: भाजपकडून अजून कोल्हापुरात उमेदवारी निश्चिती झाली नसतानाही कृष्णराज महाडिक यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. 

Krishnaraaj Mahadik: कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर उमेदवार कृष्णराज महाडिक यांनी दुसऱ्याच दिवशी माघार घेतली आहे. महापालिकेची निवडणूक कार्यकर्त्यांची असल्यामुळे खासदार धनंजय महाडिक यांनी हा निर्णय घेतला आहे. काल अर्ज दाखल केल्यानंतर कुटुंबीयांचा आशीर्वाद आणि मित्रांच्या सहकार्याने आपण निवडणुकीच्या मैदानात उतरलो असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं. भाजपकडून अजून कोल्हापुरात उमेदवारी निश्चिती झाली नसतानाही कृष्णराज महाडिक यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. 

काय म्हणाले कृष्णराज महाडिक?

भारतीय जनता पक्ष ही अत्यंत शिस्तबद्ध संघटना आहे. पक्षाचा आदेश शिरसावंद्य मानून, या पक्षातील कार्यकर्ते काम करत असतात. त्यानुसार पक्षीय पातळीवर झालेल्या निर्णयाचा आदर राखत, मी कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक लढवणार नाही, असे जाहीर करत आहे. महापालिकेची निवडणूक महायुती एकत्र लढवणार आहे. अशावेळी इच्छुक कार्यकर्त्यांची संख्या मोठी आहे. त्यापैकी आणि कोणालाही निवडणूक लढवण्याची संधी मिळावी, या विचारातून मी महापालिका निवडणूक लढवणार नाही. वरिष्ठ नेत्यांच्या आदेशानुसार, मी निवडणूक लढवण्याचे घोषित केले होते. आता पक्षीय पातळीवर झालेल्या निर्णयानुसार मी निवडणूक लढवणार नाही. तथापि या निवडणुकीसाठी पक्षीय पातळीवर माझ्या नावाचा विचार झाला, ही सुद्धा माझ्यासाठी जमेची आणि समाधानाची बाब आहे. यापुढेही समाजकारणात मी नेहमीच कार्यरत राहीन. माझ्यावर प्रेम करणाऱ्या आणि पाठबळ देणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचा, कुटुंबातील सदस्यांचा मी ऋणी आहे.

खासदार धनंजय महाडिक यांचा आशीर्वाद आणि मार्गदर्शन कायम

दरम्यान, काल (28 डिसेंबर) बोलताना ही निवडणूक आपण पूर्णपणे स्वतःच्या ताकदीवर लढवत असल्याचं सांगताना, खासदार धनंजय महाडिक यांचा आशीर्वाद आणि मार्गदर्शन कायम असल्याचं त्यांनी नमूद केलं. सध्या खासदार धनंजय महाडिक यांच्यावर अनेक जिल्ह्यांची जबाबदारी असल्याने ते किती वेळ देऊ शकतील हे माहित नसले, तरी कुटुंबीय आणि मित्रपरिवाराच्या साथीनं आपण ही निवडणूक समर्थपणे लढवणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कृष्णराज महाडिक म्हणाले की, सोशल मीडियाच्या माध्यमातून समाजातील विविध प्रश्नांवर सक्रियपणे काम केल्याचा अनुभव आहे. नागरिकांकडून मिळणारा विश्वास हीच आपली मोठी ताकद असल्याचं महाडिक यांनी नमूद केलं. सर्वांच्या आशीर्वादाने आणि पाठबळावरच ही निवडणूक लढवणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

वारंवार एकाच कामासाठी निधी खर्च

ते म्हणाले की, शहराच्या सर्वांगीण विकासासाठी महानगरपालिका आणि लोकप्रतिनिधी यांच्यात योग्य समन्वय आवश्यक आहे. टाऊन प्लॅनिंगच्या माध्यमातून नियोजनबद्ध विकास करण्याचा मानस आहे. कोल्हापुरात मागील अनेक वर्षांत विकासकामं झाली असली तरी त्यांची देखभाल न झाल्याने वारंवार एकाच कामासाठी निधी खर्च केला जात असल्याकडे त्यांनी लक्ष वेधलं. ही प्रक्रिया थांबवून शाश्वत विकासावर भर देणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. खेळांमुळे शिस्त, नेतृत्व आणि जीवनमूल्ये घडतात, जी केवळ पुस्तकातून शिकता येत नाहीत, असं ते म्हणाले. विरोधकांवर टीका करण्याऐवजी विकासकामांवर लक्ष केंद्रित करणार असल्याचं सांगत, विरोधकांकडून होणाऱ्या आरोप-प्रत्यारोपांकडे आपण दुर्लक्ष करणार असल्याची भूमिका महाडिक यांनी स्पष्ट केली. अन्य 80 उमेदवारांसाठी विरोधकांची टीका सहन करण्यास आपण तयार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

एबीपी माझामध्ये कोल्हापूर ब्युरो म्हणून गेल्या साडे तीन वर्षांपासून कार्यरत. तसेच टीव्ही 9 मराठी कोल्हापूर ब्युरो म्हणूनही कामाचा अनुभव. 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Ashadhi Wari : वारीत निधन झाल्यास एक लाखांचं अर्थसहाय्य; श्री संत तुकाराम महाराज संस्थानचा मोठा निर्णय!
वारीत निधन झाल्यास एक लाखांचं अर्थसहाय्य; श्री संत तुकाराम महाराज संस्थानचा मोठा निर्णय!
RBI : रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई, महाराष्ट्रातील सहकारी बँकेंवर निर्बंध लादले, आरबीआयनं कारवाई का केली?
रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई, महाराष्ट्रातील सहकारी बँकेंवर निर्बंध लादले, आरबीआयनं कारवाई का केली?
Sir Garry Sobers : क्रिकेट जगताला मोठा धक्का; महान अष्टपैलू सर गॅरी सोबर्स यांचं निधन, 89 व्या वर्षी घेतला अंतिम श्वास!
क्रिकेट जगताला मोठा धक्का; महान अष्टपैलू सर गॅरी सोबर्स यांचं निधन, 89 व्या वर्षी घेतला अंतिम श्वास!
Rahul Gandhi: 10 वर्षात 152 पेपर फुटले, एका व्यक्तीला शिक्षा नाही, साडे सात कोटी विद्यार्थ्यांचं नुकसान, राहुल गांधींचा हल्लाबोल 
10 वर्षात 152 पेपर फुटले, एका व्यक्तीला शिक्षा नाही, साडे सात कोटी विद्यार्थ्यांचं नुकसान, राहुल गांधींचा हल्लाबोल 

व्हिडीओ

Baramti Girl Got 5th Rank in state in NEET Exam : बारामतीची श्रावणी यशाला गवसणी | ABP Majha
Navneet Rana VS Uddhav Thackeray : ठाकरेंची रामरक्षा; राणांची हनुमान चालीसा | Special Report
Zero Hour Full : ठाकरेंचं आंदोलन ते वागंचुक यांच्या आंदोलनाचा २० वा दिवस; झिरो अवरमध्ये सखोल चर्चा
Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ashadhi Wari : वारीत निधन झाल्यास एक लाखांचं अर्थसहाय्य; श्री संत तुकाराम महाराज संस्थानचा मोठा निर्णय!
वारीत निधन झाल्यास एक लाखांचं अर्थसहाय्य; श्री संत तुकाराम महाराज संस्थानचा मोठा निर्णय!
RBI : रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई, महाराष्ट्रातील सहकारी बँकेंवर निर्बंध लादले, आरबीआयनं कारवाई का केली?
रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई, महाराष्ट्रातील सहकारी बँकेंवर निर्बंध लादले, आरबीआयनं कारवाई का केली?
Sir Garry Sobers : क्रिकेट जगताला मोठा धक्का; महान अष्टपैलू सर गॅरी सोबर्स यांचं निधन, 89 व्या वर्षी घेतला अंतिम श्वास!
क्रिकेट जगताला मोठा धक्का; महान अष्टपैलू सर गॅरी सोबर्स यांचं निधन, 89 व्या वर्षी घेतला अंतिम श्वास!
Rahul Gandhi: 10 वर्षात 152 पेपर फुटले, एका व्यक्तीला शिक्षा नाही, साडे सात कोटी विद्यार्थ्यांचं नुकसान, राहुल गांधींचा हल्लाबोल 
10 वर्षात 152 पेपर फुटले, एका व्यक्तीला शिक्षा नाही, साडे सात कोटी विद्यार्थ्यांचं नुकसान, राहुल गांधींचा हल्लाबोल 
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
गांजा विक्रीतील सराईत गुन्हेगारीने विष प्यायले; उपचारादरम्यान मृत्यू, व्हिडिओतून पोलिसांवर गंभीर आरोप
गांजा विक्रीतील सराईत गुन्हेगारीने विष प्यायले; उपचारादरम्यान मृत्यू, व्हिडिओतून पोलिसांवर गंभीर आरोप
RBI : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा कारवाईचा धडाका सुरुच, मुथूट फायनान्ससह 6 कंपन्यांना दणका, आर्थिक दंड ठोठावला
RBI चा कारवाईचा धडाका सुरुच, मुथूट फायनान्ससह 6 कंपन्यांना दणका, आर्थिक दंड ठोठावला
MSRTC Fare Hike : एसटी प्रवास महागला, एसटीच्या तिकीट दरात 13.56 टक्क्यांची वाढ, महामंडळानं भाडेवाढीसाठी कोणती कारणं दिली? जाणून घ्या
एसटी प्रवास महागला, एसटीच्या तिकीट दरात 13.56 टक्क्यांची वाढ, महामंडळानं भाडेवाढीसाठी कोणती कारणं दिली?
Embed widget