एक्स्प्लोर

Amit Shah : 'दुसऱ्या पक्षातून आलेल्या नेत्यांच्या जीवावर काँग्रेस लढतेय निवडणूक' अमित शाहांचा दावा; वक्तव्यामागे कसला संदर्भ?

Amit Shah : काँग्रेस दुसऱ्या पक्षातून आलेल्या नेत्यांना निवडणुकीसाठी उभे करुन विजयासाठीची लढाई लढते आहे. काँग्रेसकडे स्वत:च्या पक्षातील नेते नसल्याचा दावा केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी केला आहे.

Amit Shah : काँग्रेस (Congress) कडे निवडणूक लढवायला नेता नाही, म्हणून दुसऱ्या पक्षातून आयात केलेल्या उधार नेत्यांच्या जीवावर मैदानात उतरली आहे, अशी घणाघाती टीका केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी केली. कर्नाटकातील बागलकोटमध्ये दुपारी 35 अंश तापमानात अमित शाह (Amit Shah) यांचे भाषण सुरू होते. यावेळी अमित शाहांनी काँग्रेससोबतच भाजप सोडून गेलेल्या नेत्यांवरही निशाणा साधला.

निवडणुकीसाठी भाजप (BJP) सोडून काँग्रेसमध्ये गेलेल्या नेत्यांवर ते अवलंबून आहेत, यातूनच काँग्रेसची दिवाळखोरी कळते असे अमित शाहा भाषणादरम्यान म्हणाले. यादरम्यान, भाजपमधून काँग्रेसमध्ये गेलेले माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर (Jagdish Shettar) यांच्या पराभवावरुनही शाहा यांनी निशाणा साधला आहे.

भाजपकडून तिकीट न मिळाल्याने शेट्टर यांनी नुकताच पक्ष सोडला आणि काँग्रेसमध्ये प्रवेश केला. हुबळी सेंट्रल विधानसभेतून काँग्रेसने शेट्टर यांना तिकीट दिले आहे. शेट्टर यांच्याशिवाय भाजपमधून आलेल्या लक्ष्मण सवदी यांनाही काँग्रेसने उमेदवारी दिली आहे.

कर्नाटकात कोणत्या पक्षातील नेत्यांची पक्षांतरं?

कर्नाटकातील 224 जागांसाठी काँग्रेस, भाजप आणि जेडीएसने उमेदवार जाहीर केले आहेत. जेडीएसने सर्वाधिक 28 पक्षांतर केलेल्या नेत्यांना तिकीट दिले आहे. यामध्ये काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांतील नेत्यांचा समावेश आहे.

भाजपने इतर पक्षातून आलेल्या 17 नेत्यांना तिकीट दिले आहे. यात बहुतांश 2019 मध्ये ऑपरेशन लोटस दरम्यान भाजपमध्ये सामील झालेल्या नेत्यांचा समावेश आहे.

काँग्रेसचे दिग्गज नेते अनंत सिंह यांचा मुलगा सिद्धार्थ सिंह यालाही भाजपने तिकीट दिले आहे. अनंत सिंह हे बसवराज बोम्मई यांच्या सरकारमधले मंत्री आहेत. 

काँग्रेसने यावेळी पक्षांतर करणाऱ्यांना सर्वात कमी तिकिटे दिली आहेत. पक्षाने एकूण सहा तिकिटे इतर पक्षांतून आलेल्या नेत्यांना दिली आहेत. शेट्टर आणि लक्ष्मण सवदी यांच्या नावांचाही यात समावेश आहे.

काँग्रेसचे अध्यक्ष डीके शिवकुमार यांनी दिल्लीत पत्रकारांना सांगितले होते की, भाजपमधून 150 लोक येण्यास तयार आहेत, पण आमच्याकडे जागा नाही, त्यामुळे सर्वांनाच घेतले जात नाही.

पक्षांतर करणाऱ्यांमुळे तीन राज्यांत भाजपचे सरकार

गेल्या पाच वर्षात पक्षांतर करणाऱ्यांमुळे भाजपला तीन राज्यात सरकार बनवता आले. कर्नाटकमध्ये 2019 मध्ये प्रथमच भाजप काँग्रेस आणि जेडीएसमधील पक्ष बदलणाऱ्यांमुळे सत्तेत आला. कर्नाटकमध्ये जेडीएसच्या एचडी कुमारस्वामी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे सरकार होते.

काँग्रेसचे 17 आमदार त्यावेळचे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांच्याविरोधात एकत्र आले आणि पाठिंबा काढून घेण्याची घोषणा केली. आमदारांनी पाठिंबा काढून घेतल्याने कुमारस्वामी यांचे सरकार पडले आणि भाजपचे सरकार स्थापन झाले. त्यानंतर सर्व बंडखोर आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

कर्नाटकानंतर मध्य प्रदेशातही 2019 मध्येच काँग्रेसचे सरकार पक्षांतर करणाऱ्यांमुळे पडले. ज्योतिरादित्य शिंदे यांच्या नेतृत्वाखाली 27 आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर राज्यात भाजपचे सरकार स्थापन झाले.

कर्नाटक आणि मध्य प्रदेशप्रमाणेच महाराष्ट्रातही भाजपचे सरकार पक्षांतर करणाऱ्यांमुळेच स्थापन झाले. 2022 मध्ये शिवसेनेच्या एकनाथ शिंदेंनी 40 आमदारांना सोबत घेऊन बंड पुकारला आणि उद्धव ठाकरे यांचे सरकार पाडले. यानंतर शिंदेंनी भाजपसोबत युती केली आणि महाराष्ट्रात भाजपचे सरकार सत्तेवर आले.

काँग्रेसचे अध्यक्ष डीके शिवकुमार यांनी दिल्लीत पत्रकारांना सांगितले होते की, भाजपमधून 150 लोक येण्यास तयार आहेत, पण आमच्याकडे जागा नाही, त्यामुळे सर्वांनाच घेतले जात नाही.

संबंधित बातम्या:

राज्याच्या राजकारणात पुन्हा भूकंप? ठाकरे गटातील उरलेले सर्व 13 आमदार मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात, उदय सामंतांचा गौप्यस्फोट

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या निवडणूक मतमोजणीत गैरप्रकार, परिवर्तन उत्कर्ष आघाडीचा आरोप,  उच्च न्यायालयात रिट अर्ज दाखल
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या निवडणूक मतमोजणीत गैरप्रकार, परिवर्तन उत्कर्ष आघाडीचा आरोप,  उच्च न्यायालयात रिट अर्ज दाखल
West Bengal Assembly Elections 2026: पश्चिम बंगालसाठी काँग्रेसची पहिली यादी जाहीर, ममता बॅनर्जींविरोधात काँग्रेसनं उमेदवार दिला
पश्चिम बंगालसाठी काँग्रेसची पहिली यादी जाहीर,अधीर रंजन चौधरी विधानसभेच्या रिंगणात   
Satara ZP Election: सातारा जिल्हा परिषद निवडणूक अपहरण प्रकरणात महत्त्वाची अपडेट, पोलिसांच्या कारभारावर न्यायालयाने ओढले ताशेरे, राष्ट्रवादीच्या सदस्यांचा जामीन मंजूर
सातारा जिल्हा परिषद निवडणूक अपहरण प्रकरणात महत्त्वाची अपडेट, पोलिसांच्या कारभारावर न्यायालयाने ओढले ताशेरे, राष्ट्रवादीच्या सदस्यांचा जामीन मंजूर
ECI : निवडणूक आयोगाच्या पत्रावर भाजपचा शिक्का, विरोधी पक्षांचं जोरदार टीकास्त्र,निवडणूक आयोगाकडून एकाचं निलंबन, नेमकं काय घडलं?
निवडणूक आयोगाच्या पत्रावर भाजपचा शिक्का, विरोधी पक्षांचं जोरदार टीकास्त्र, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Eknath Khadse Jalgaon : महार वतनाच्या जमीन हडपल्याचा आरोप, एकनाथ खडसे काय म्हणाले?
Ashok Kharat Book : खरातची अंधभक्ती, आत्मचरित्रात स्तुती, पुस्तकातली भाकणूक, भोळ्या भक्तांची फसवणूक Special Report
Satara SP Tushar Doshi Compulsory Leave : सक्तीची सुट्टी वादाची मुक्ती? Special Report
Mohit Kamboj Aditya Thackeray : राजकीय खुन्नस ते बर्थडे पार्टी,चर्चांना जोर... Special Report
Ashok Kharat Mobile : मोबाईल 'उघडणार' कोण कोण अडकणार? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
राज्यात अवकाळीचा तडाखा! गारपीट, विजांचा कडकडाट अन् वादळी पाऊस; गहू, मका, आंबा जमीनदोस्त, आज कुठे हाय अलर्ट?
राज्यात अवकाळीचा तडाखा! गारपीट, विजांचा कडकडाट अन् वादळी पाऊस; गहू, मका, आंबा जमीनदोस्त, आज कुठे हाय अलर्ट?
Rupali Chakankar and Ashok Kharat: नाशिकला पदराने अशोक खरातचे पाय पुसायला जायचात अन् आता म्हणताय, 'मी महिला, प्रवास जमणार नाही'; अंजली दमानियांची रुपाली चाकणकरांवर टीका
तेव्हा नाशिकला जायचात अन् आता म्हणताय, 'मी महिला, प्रवास जमणार नाही'; दमानियांची चाकणकरांवर टीका
Electricity Rates Decrease In Mumbai मोठी बातमी: बेस्ट, टाटा, अदानीच्या वीजदरात कपात, 1 एप्रिलपासून नवे दर लागू, पाहा जुने आणि नवीन दर!
मोठी बातमी: बेस्ट, टाटा, अदानीच्या वीजदरात कपात, 1 एप्रिलपासून नवे दर लागू, पाहा जुने आणि नवीन दर!
Share Market Crash : मार्च महिन्यात भारतीय शेअर बाजार घसरणीचे वारे , गुंतवणूकदारांचे तब्बल 44 लाख कोटी बुडाले, पुढं काय?
मार्च महिन्यात भारतीय शेअर बाजार घसरणीचे वारे , गुंतवणूकदारांचे तब्बल 44 लाख कोटी बुडाले, पुढं काय?
Maharashtra Live blog updates: मुंबईतील गृहिणीला तोतया पोलिसांनी लुटले, 2 लाख घेऊन पसार
Maharashtra Live blog updates: मुंबईतील गृहिणीला तोतया पोलिसांनी लुटले, 2 लाख घेऊन पसार
South Cinema Actress Net Worth: ना अनुष्का शेट्टी, ना समंथा अन् ना तमन्ना भाटीया; 'ही' साऊथची सर्वात श्रीमंत अभिनेत्री, एकूण संपत्ती 200 कोटी
ना अनुष्का शेट्टी, ना समंथा अन् ना तमन्ना भाटीया; 'ही' साऊथची सर्वात श्रीमंत अभिनेत्री, एकूण संपत्ती 200 कोटी
Fairness Cream Alert : गोरं होण्यासाठी पाकिस्तानी क्रीम वापरली अन् किडनी खराब, छत्रपती संभाजीनगरमध्ये तीन व्यापारी अटकेत
गोरं होण्यासाठी पाकिस्तानी क्रीम वापरली अन् किडनी खराब, छत्रपती संभाजीनगरमध्ये तीन व्यापारी अटकेत
Ashok Kharat: अशोक खरातचे 45 नेत्यांशी घनिष्ट संबंध, भोंदूबाबाच्या सल्ल्याशिवाय पानही हलायचं नाही, एसआयटीच्या तपासात धक्कादायक माहिती समोर
अशोक खरातचे 45 नेत्यांशी घनिष्ट संबंध, भोंदूबाबाच्या सल्ल्याशिवाय पानही हलायचं नाही, एसआयटीच्या तपासात धक्कादायक माहिती समोर
Embed widget