एक्स्प्लोर

K Annamalai : ठाकरे बंधू मूर्ख, मी मुंबईत येणारच, तुम्हाला काय करायचं ते करा; तामिळनाडूतील भाजप नेते अण्णामलाईंचे उघड आव्हान

K Annamalai On Mumbai : आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भारताचे नेते म्हणतो, तर याचा अर्थ ते गुजराती राहात नाहीत का? असं सांगत आपल्या वाक्याचा चुकीचा अर्थ लावल्याचं के अण्णामलाई यांनी स्पष्ट केलं.

मुंबई : मुंबई महाराष्ट्राचे शहर नाही म्हणणाऱ्या तामिळनाडू भाजपचे नेते के अण्णामलाई (K Annamalai) यांनी त्यावर स्पष्टीकरण देताना ठाकरे बंधूंवर टीका केली. आपल्यावर टीका करणारे ठाकरे बंधू मूर्ख आहेत, त्यांना मूलभूत समज नाही असं अण्णामलाई म्हणाले. आपल्याला मुंबईत येण्यापासून कुणी रोखू शकत नाही, आपण मुंबईत येणारच, तुम्हाला काय करायचं ते करा असं जाहीर आव्हानही दिलं आहे. के अण्णामलाई यांच्या या वक्तव्यानंतर आता पुन्हा वाद वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मुंबई महापालिकेच्या प्रचारासाठी आलेल्या तामिळनाडूतील भाजपचे नेते के अण्णामलाई यांनी मुंबई शहर महाराष्ट्राचं नसल्याची मुक्ताफळे उधळली होती. त्यावरुन राज ठाकरे यांनी त्यांच्यावर टीका केली. तसेच शिवसेनेचे मुखपत्र 'सामना'तूनही त्यांच्यावर टीका झाली.

सर्वबाजूंनी टीका होत असल्याने के अण्णामलाई यांनी तामिळ माध्यमांमध्ये त्यांची बाजू स्पष्ट केली. तामिळ भाषेतून बोलताना के अण्णामलाई म्हणाले की, "माझ्यावर टीका करणारे लोक मूर्ख आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींना भारताचे पंतप्रधान म्हणताना ते गुजराती नाहीत असा अर्थ होतो का? आपण मुंबईला जगाची राजधानी म्हणतो, तर याचा अर्थ ते महाराष्ट्रीयांनी उभारलेले शहर नाही का?"

K Annamalai On Thackeray : ठाकरेंना आव्हान

के अण्णामलाई पुढे म्हणाले की, "माझ्यावर टीका करणारे लोक मूर्ख आहेत आणि त्यांना मूलभूत समजही नाही. मी मुंबईत आलो तर माझे पाय तोडण्यात येतील असं सामना वृत्तपत्रात लिहिलंय. मी मुंबईत येणार आहे, तुम्हाला जे करायचं ते करा. मी अशा धमक्यांना घाबरत नाही."

K Annamalai Statement On Mumbai : नेमकं काय म्हणाले के अण्णामलाई?

"राज ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे दोघे जण सध्या कोणतेही ठोस काम नसल्याने इकडे-तिकडे फिरत आहेत. माझ्या मनात बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल प्रचंड आदर आहे. मी जेव्हा तामिळनाडू भाजपचा प्रदेशाध्यक्ष होतो, तेव्हा माझ्या कार्यालयात लावलेल्या छायाचित्रांपैकी एक छायाचित्र छत्रपती शिवाजी महाराजांचे होते.

जसे आमच्या राज्यात ‘मुरासोली’ हे वृत्तपत्र आहे, तसेच शिवसेनेचे ‘सामना’ नावाचे वृत्तपत्र आहे. त्या वृत्तपत्रात असे लिहिण्यात आले की, मी मुंबईत प्रवेश केला तर माझा पाय तोडतील. मी मुंबईत येणार आहे, तुम्हाला जे करायचे आहे ते करा. जर मी अशा धमक्या आणि दहशतीला घाबरलो असतो, तर मला आयुष्यभर माझ्या गावी घरातच बसून राहावे लागले असते.

आज आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भारताचे नेते म्हणतो, तर याचा अर्थ ते गुजराती राहात नाहीत का? आपण कामराज यांना भारताचे महान नेते म्हणतो, तर याचा अर्थ ते तामिळ नाहीत का?

त्याचप्रमाणे, आपण मुंबईला जगाची राजधानी म्हणतो, तर याचा अर्थ ते महाराष्ट्रीयांनी उभारलेले शहर नाही का? मराठी बांधव-भगिनींच्या कष्टातून मुंबई उभी राहिली नाही का? हे सगळे या शहराच्या अभिमान आणि ओळखीशी संबंधित विषय आहेत.

माझ्यावर टीका करणारे लोक मूर्ख आहेत आणि त्यांना मूलभूत समजही नाही. आज जर बाळासाहेब ठाकरे जिवंत असते, तर या लोकांना काहीही स्थान राहिले नसते. हे लोक फक्त आपल्या वडिलांच्या वारशाला नुकसान पोहोचवण्यासाठीच काम करत आहेत."

ही बातमी वाचा:

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Ramdas Athawale: आठवले कुठेही जाणार नाहीत, ते दगा करत नाहीत याचा अर्थ मला गृहीत धरावे असा नाही; रामदास आठवलेंचा निर्वाणीचा इशारा
आठवले कुठेही जाणार नाहीत, ते दगा करत नाहीत याचा अर्थ मला गृहीत धरावे असा नाही; रामदास आठवलेंचा निर्वाणीचा इशारा
अनिकेत तटकरेंचा मार्ग होणार सोपा, कोकणातील शिवसेनेचं बंड होणार थंड, जुईली दळवी घेणार माघार, सुत्रांची माहिती
अनिकेत तटकरेंचा मार्ग होणार सोपा, कोकणातील शिवसेनेचं बंड होणार थंड, जुईली दळवी घेणार माघार, सुत्रांची माहिती
Pune : भाजपचे बंडखोर उमेदवार प्रदीप कंद यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शक्यता
Pune : भाजपचे बंडखोर उमेदवार प्रदीप कंद यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शक्यता
Gokul Election : कोल्हापुरात 'गोकुळ'वरून बंटी विरुद्ध मुन्ना आमनेसामने; सतेज पाटलांचा 25-0 ने पराभव करणार, महाडिकांचा निर्धार
कोल्हापुरात 'गोकुळ'वरून बंटी विरुद्ध मुन्ना आमनेसामने; सतेज पाटलांचा 25-0 ने पराभव करणार, महाडिकांचा निर्धार

व्हिडीओ

Girish Mahajan Jalgaon : राऊत, वडेट्टीवार बोल बच्चन नेते, त्यांनी निवडणूक लढवून दाखवावी
Devendra Fadnavis On Ladki Bahin : लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेल्या पुरुषांकडून सगळे पैसे वसूल करणार
Dilip Walse Patil Pimpari : विलास लांडेंच्या घरी दिलीप वळसे पाटील, नाराजांची मनधरणी होणार?
Shiv Sena Merger Talks : दोन्ही शिवसेना पुन्हा एकत्र येणार? चर्चांना नवं इंधन | ABP Majha
Vidhan Parishad Election 2026 : अर्जाच्या शेवटच्या दिवशी बंडखोरीचा स्फोट, महायुती-मविआत धुसफूस! | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Surat Bardoli Bus Accident : जोरदार धडकेनंतर बस पलटली अन् आग लागली, सात जणांचा होरपळून मृत्यू, ST महामंडळाच्या दोन बसचा भिषण अपघात
जोरदार धडकेनंतर बस पलटली अन् आग लागली, सात जणांचा होरपळून मृत्यू, ST महामंडळाच्या दोन बसचा भिषण अपघात
Beed Crime : घरासमोर लघुशंका आणि जुगाराला विरोध, महिलेच्या गुप्तांगावर अमानुष मारहाण; बीडमध्ये वाल्मिक कराडच्या गुंडांची दहशत कायम
घरासमोर लघुशंका आणि जुगाराला विरोध, महिलेच्या गुप्तांगावर अमानुष मारहाण; बीडमध्ये वाल्मिक कराडच्या गुंडांची दहशत कायम
ठाकरेंच्या शिवसेना मेळाव्याला खासदार अनुपस्थित; चंद्रकांत खैरेंनी सुनावलं, म्हणाले, त्यांनी कुठेही जाऊ नये, बाकी...
ठाकरेंच्या शिवसेना मेळाव्याला खासदार अनुपस्थित; चंद्रकांत खैरेंनी सुनावलं, म्हणाले, त्यांनी कुठेही जाऊ नये, बाकी...
धक्कादायक! अमरावतीत युवतीचा अर्धवट जळालेला मृतदेह आढळला, पोलीस घटनास्थळी दाखल 
धक्कादायक! अमरावतीत युवतीचा अर्धवट जळालेला मृतदेह आढळला, पोलीस घटनास्थळी दाखल 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 जून 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 जून 2026 | मंगळवार
Ramdas Athawale : सहज उपलब्ध होणारी हातभट्टीची दारू अधिकृत करा, शासनाला महसूल मिळेल : रामदास आठवले
सहज उपलब्ध होणारी हातभट्टीची दारू अधिकृत करा, शासनाला महसूल मिळेल : रामदास आठवले
1200 एकरवर जगातील सर्वात मोठी कृषी बाजारपेठ महाराष्ट्रात उभारणार, निर्यात व्यवस्था बळकट करणार : जयकुमार रावल
1200 एकरवर जगातील सर्वात मोठी कृषी बाजारपेठ महाराष्ट्रात उभारणार, निर्यात व्यवस्था बळकट करणार : जयकुमार रावल
Nashik Bus Fire: मुंबई-आग्रा महामार्गावर बर्निंग बसचा थरार, 54 प्रवासी बालंबाल बचावले; PHOTO
मुंबई-आग्रा महामार्गावर बर्निंग बसचा थरार, 54 प्रवासी बालंबाल बचावले; PHOTO
Embed widget