एक्स्प्लोर

विनोद तावडेंना उमेदवारी नाकारल्यावर जितेंद्र आव्हाडांना 'तो' किस्सा आठवला, आव्हाड म्हणतात...

आम्ही एकमेकांवर राजकीय टीका केल्या असतील मात्र तरीही विनोद तावडे माझे चांगले मित्र आहेत. मी रागीट आहे, फटकळ आहे, त्यामुळे विधानसभेत त्यावेळी तसं बोलून गेलो. मात्र विनोद तावडे यांना राजकीय दृष्ट्या असा धक्का मिळेल, असं माझ्या ध्यानी, मनी, स्वप्नीही नव्हतं, असेही आव्हाड म्हणाले.

मुंबई : विधानसभेच्या शेवटच्या सत्रात मी बोलत असताना माझं भाषण थांबवून मी आरडाओरड केल्यावर विनोद तावडे यांनी म्हटलं होतं की 'अध्यक्ष महोदय, त्यांना बोलू द्या. ते पुढच्या वेळेस विधानसभेत येतील की नाही याची शाश्वती नाही'. त्यावेळी मी म्हटलं होत की 'विनोदजी माझ्या मतदारसंघात या. तुमचा जर 75 हजार मतांनी पराभव केला नाही तर बापाचं नाव सांगणार नाही', मी अर्थात रागात बोललो होतो. मला त्याबद्दल नंतर वाईट वाटलं होतं. मात्र आज विनोद तावडे यांचंच तिकीट कापलं गेलं. हे खूपच धक्कादायक आणि आश्चर्यकारक आहे, अशी भावना राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एबीपी माझाची बोलताना व्यक्त केली आहे. काहीही असो विद्यार्थी दशेपासून भाजप आणि अभाविपचे काम करणारे आणि सेवा केलेले कार्यकर्ते आहेत, असेही ते म्हणाले. आम्ही एकमेकांवर राजकीय टीका केल्या असतील मात्र तरीही विनोद तावडे माझे चांगले मित्र आहेत. मी रागीट आहे, फटकळ आहे, त्यामुळे विधानसभेत त्यावेळी तसं बोलून गेलो. मात्र विनोद तावडे यांना राजकीय दृष्ट्या असा धक्का मिळेल, असं माझ्या ध्यानी, मनी, स्वप्नीही नव्हतं, असेही आव्हाड म्हणाले. आव्हाड म्हणाले की, मी त्यांच्याशी याबाबत बोललेलो नाही आणि बोलणार देखील नाही. मी काही त्यांना तिकीट देऊ शकत नाहीही किंवा मी त्यांच्या पक्षात कुणाला बोलू शकत नाही. या क्षणाला त्यांच्या परिवारात काय भावना असतील हे मला कळतंय. अशी वेळ कुणावरही येऊ नये, ते मंत्री असताना माझी चार काम केली चार केली नाहीत. मात्र आज माणूस म्हणून ज्या भावना असाव्यात त्याच माझ्या आहेत, असेही ते यावेळी म्हणाले. उमेदवारी नाकारण्याचे कारण पक्षाने सांगितलं नाही, पण निवडणुकीनंतर चर्चा करेन : विनोद तावडे  विधानसभा निवडणुकीसाठी बोरिवली विधानसभेचे विद्यमान आमदार आणि मंत्री विनोद तावडे यांची उमेदवारी कापत सुनील राणे यांना संधी देण्यात आली आहे. तावडे यांचा पत्ता कट केल्यानंतर त्यांनी उमेदवारी नाकारण्याचे कारण पक्षाने सांगितलं नसल्याचं एबीपी माझाशी बोलताना स्पष्ट केलं आहे. एबीपी माझाशी बोलताना तावडे म्हणाले की, आपण मंत्री नाहीत म्हणजे काम थांबणार नाही. आम्हाला नेशन फस्ट असं सांगितलं आहे. त्यामुळं इथून पुढं जी जबाबदारी दिली जाईल ती मनापासून पूर्ण केली जाईल, असे तावडे म्हणाले. तावडे म्हणाले की, बोरिवलीसह राज्यातील सर्व उमेदवार निवडून येतील. स्पष्ट बहुमताने आम्ही सत्तेत येऊ. सध्या मला उमेदवारी का दिली नाही याच्या विश्लेषणाची वेळ नाही, मात्र याबाबत वरिष्ठ स्तरावर नक्की चर्चा होईल. आता निवडणुकांची वेळ आहे. मी नेता नाही मी कार्यकर्ता आहे. जे काम दिलं जाईल ते चांगल्या पद्धतीने करेन, असेही ते म्हणाले. आमचे काम राष्ट्रनिर्माणाचं आहे. बरेच जण आमदार नाहीत तरी काम करतात. विद्यार्थी परिषद आणि संघाने आम्हाला राष्ट्रहिताचे काम करायचं शिकवलं आहे. मला उमेदवारी न देण्याचे कारण नक्की असेल मात्र अजून  बोलता आलेलं नाही, मात्र पक्षनेतृत्वाची चर्चा केली जाईल. काही चुकलं असेल तर पक्ष सांगेल आणि नंतर संधी देईल, असेही तावडे म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

Parth Pawar : तुम्ही आज आमच्यात नाही, ही उणीव फक्त पवार कुटुंबालाच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राला जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
प्रत्येक पावलावर तुमची उणीव जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
Sonam Wangchuk: ...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी

व्हिडीओ

Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Parth Pawar : तुम्ही आज आमच्यात नाही, ही उणीव फक्त पवार कुटुंबालाच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राला जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
प्रत्येक पावलावर तुमची उणीव जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
Sonam Wangchuk: ...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
Rahul Gandhi: मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
Embed widget