एक्स्प्लोर

Uddhav Thackeray on Devendra Fadnavis : ते फडण'वीस' असले तरी आपण '20' आहोत आपण पुरून उरू; उद्धव ठाकरेंनी पुन्हा रणशिंग फुंकले

Uddhav Thackeray on Devendra Fadnavis : शिवसेना ठाकरे गटाची आज नवनिर्वाचित 20 आमदारांची बैठक बोलावण्यात आली. या बैठकीमध्ये उद्धव ठाकरे यांनी आमदारांना पुन्हा एकदा आश्वस्त करण्याचा प्रयत्न केला.

Uddhav Thackeray on Devendra Fadnavis : विधानसभा निवडणुकीमध्ये प्रचंड अशा असतानाही दारुण पराभवला सामोरे गेलेल्या शिवसेना ठाकरे गटाकडून आज नवनिर्वाचित 20 आमदारांची बैठक बोलावण्यात आली. या बैठकीमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आमदारांना पुन्हा एकदा आश्वस्त करण्याचा प्रयत्न केला. ते फडण'वीस' असले तरी आपण 'वीस' आहोत, आपण त्यांना पुरून उरु, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. दरम्यान, आज शिवसेना ठाकरे गटाकडून ज्येष्ठ नेते भास्कर जाधव यांची गटनेतेपदी निवड करण्यात आली. पक्ष प्रतोदपदी सुनील प्रभू यांचीच निवड करण्यात आली. आदित्य ठाकरे यांची यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड करण्यात आली आहे.

उद्धव ठाकरे यांनी आमदारांच्या बैठकीत मार्गदर्शन करताना आश्वस्त करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान गटनेतेपदी निवड झाल्यानंतर भास्कर जाधव यांनी प्रतिक्रिया दिली. भास्कर जाधव यांनी सांगितले की, गटनेता म्हणून माझी नियुक्ती करण्यात आली आहे. मला सात टर्म आमदारकीचा अनुभव आहे. खरं तर माझं म्हणणं होतं की आदित्य ठाकरे यांना गटनेता म्हणून नियुक्त करण्यात यावे, पण उद्धव ठाकरे यांनी हा आदेश दिला. त्यामुळे मी गटनेता म्हणून शिवसेनेचं काम करणार असून सर्व प्रश्न मांडणार असल्याचे त्यांनी सांगितलं. दरम्यान विरोधी पक्षनेते पदावर बोलताना त्यांनी सांगितले की सरकार सक्षमपणे चालवण्यासाठी विरोधी पक्ष असावा आणि त्यासाठी विरोधी पक्षनेतेपद असावं. सत्ताधाऱ्यांनी सुद्धा अशा प्रकारचा विचार करून विरोधी पक्ष पदासाठी विचार करायला हवा, असं त्यांनी सांगितले. 

तर नक्कीच विरोधी पक्षनेता व्हायला आवडेल

सरकार स्थापन झाल्यानंतर हा सगळा निर्णय होईल. विधानसभा अध्यक्षांकडे आम्ही विरोधी पक्षनेता महाविकास आघाडीचा एकत्र मिळून व्हावा यासाठी विनंती करणार असल्याचे त्यांनी सांगितले. महाविकास आघाडीमध्ये संख्याबळ आमचं जास्त असल्याने विरोधी पक्षनेता आमचा म्हणजे शिवसेनेचा होईल. मला जबाबदारी दिली तर नक्कीच विरोधी पक्षनेता व्हायला आवडेल, असे त्यांनी यावेळी नमूद केले. ते म्हणाले की राज्यात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या संख्येने सत्ताधारी झाले आहेत आणि विरोधी पक्ष संख्येने छोटा झाला आहे. तरीपण विरोधी पक्ष हा सत्ताधाऱ्यांना पुरून होईल असा विश्वास सुद्धा त्यांनी व्यक्त केला.

दुसरीकडे अंबादास दानवे यांनीही विश्वास व्यक्त केला. ते म्हणाले की इतर पक्षांप्रमाणेच आमच्या पक्षातील विधिमंडळ नेत्यांची निवड करण्यात आली आहे. आमचा कोणी आमदार फुटणार नसल्याची ग्वाही त्यांनी दिली. शिंदेंकडून चुकीचे आरोप करण्यात येत असल्याचे ते म्हणाले. आदित्य ठाकरे यांची निवड नियमाप्रमाणे करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. 

इतर महत्वाच्या बातम्या 

एबीपी माझा वृत्तवाहिनीमध्ये मागील 7 वर्षांपासून कार्यरत
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Gokul Election: गोकुळच्या निवडणुकीत महायुतीमधील धुसफूस संपता संपेना! भाजप सर्व 25 जागांवर उमेदवारी अर्ज भरणार, हाॅटेलवरच्या बैठकीत काय काय ठरलं?
गोकुळच्या निवडणुकीत महायुतीमधील धुसफूस संपता संपेना! भाजप सर्व 25 जागांवर उमेदवारी अर्ज भरणार, हाॅटेलवरच्या बैठकीत काय काय ठरलं?
Gokul Election: गोकुळला महायुतीच्या कारभाऱ्यांमध्येच जुंपली! हसन मुश्रीफांचा थेट खासदार धनंजय महाडिकांवर हल्लाबोल, म्हणाले, 'आमची बार्गेनिंग पॉवर कशी कमी करता येईल यासाठीच..'
गोकुळला महायुतीच्या कारभाऱ्यांमध्येच जुंपली! हसन मुश्रीफांचा थेट खासदार धनंजय महाडिकांवर हल्लाबोल, म्हणाले, 'आमची बार्गेनिंग पॉवर कशी कमी करता येईल यासाठीच..'
Rajasthan Results : खोटेपणापुढे सत्याचा विजय; राजस्थानमधील पंचायत निवडणुका जिंकल्यानंतर पंतप्रधान मोदी काय म्हणाले? 
खोटेपणापुढे सत्याचा विजय; राजस्थानमधील पंचायत निवडणुका जिंकल्यानंतर पंतप्रधान मोदी काय म्हणाले? 
पत्नीसह आई वडिलांनीही नाकारलं! भाजपच्या उमेदवाराला मिळालं फक्त 1 मत, दारुन पराभव झाल्यानं देशभर चर्चा
पत्नीसह आई वडिलांनीही नाकारलं! भाजपच्या उमेदवाराला मिळालं फक्त 1 मत, दारुन पराभव झाल्यानं देशभर चर्चा

व्हिडीओ

Mumbai IIT Students Protest : विद्यार्थ्याचा मृत्यू, कॅम्पस हादरला; IIT बॉम्बेच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन
Nithari Kand Surendra Koli : 'निठारी'तून मुक्तता सुटकेनंतर शेवट! | Special Report ABP Majha
Mamata Banerjee TMC News : ठाकरे आणि पवार आता ममताही बेजार? | Special Report ABP Majha
Manoj Jarange Attack : मनोज जरांगेंनी उपोषण सोडलं, आरोपांनी घेरलं Special Report
El Nino : दुष्काळामुळे दैना, शरद पवारांच्या सूचना Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Crime News: शटर तोडले, लाॅकर फोडले! भांडारकर रोडवरील साडीच्या शोरूममध्ये चोरी; सीसीटीव्ही फुटेज आले समोर
शटर तोडले, लाॅकर फोडले! भांडारकर रोडवरील साडीच्या शोरूममध्ये चोरी; सीसीटीव्ही फुटेज आले समोर
Disha Salian Case: 'कॉमन मॅनची ताकद दाखवू'; मातोश्रीवर जाण्यापूर्वी दिशा सालियनच्या वडिलांचं मोठं वक्तव्य, वकिलांचाही मोठा दावा; म्हणाले...
'कॉमन मॅनची ताकद दाखवू'; मातोश्रीवर जाण्यापूर्वी दिशा सालियनच्या वडिलांचं मोठं वक्तव्य, वकिलांचाही मोठा दावा; म्हणाले...
Amit Shah Kolhapur Visit: केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांचा दोन दिवसीय कोल्हापूर दौरा रद्द; हुबळीतून थेट दिल्लीला रवाना, नेमकं काय घडलं?
केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांचा दोन दिवसीय कोल्हापूर दौरा रद्द; हुबळीतून थेट दिल्लीला रवाना, नेमकं काय घडलं?
Sanjay Shirsat: दुष्काळाच्या बैठकीत नेत्यांसाठी काजू-बदामांची मेजवानी, संजय शिरसाट संतापले 'अधिकारी काजू बदाम आणतात आणि बदनाम...'
दुष्काळाच्या बैठकीत नेत्यांसाठी काजू-बदामांची मेजवानी, संजय शिरसाट संतापले 'अधिकारी काजू बदाम आणतात आणि बदनाम...'
Gokul Election: गोकुळच्या निवडणुकीत महायुतीमधील धुसफूस संपता संपेना! भाजप सर्व 25 जागांवर उमेदवारी अर्ज भरणार, हाॅटेलवरच्या बैठकीत काय काय ठरलं?
गोकुळच्या निवडणुकीत महायुतीमधील धुसफूस संपता संपेना! भाजप सर्व 25 जागांवर उमेदवारी अर्ज भरणार, हाॅटेलवरच्या बैठकीत काय काय ठरलं?
नंदीग्रानंतर आता रेजीनगरमधील ममतांच्या उमेदवाराची पोटनिवडणुकीतून माघार; उमेदवारी अर्ज माघारीच्या अंतिम दिवशीच माघारीचा निर्णय घेतल्याने भूवया उंचावल्या, आता नवा उमेदवार देण्याचा पर्याय सुद्धा नाही
नंदीग्रानंतर आता रेजीनगरमधील ममतांच्या उमेदवाराची पोटनिवडणुकीतून माघार; उमेदवारी अर्ज माघारीच्या अंतिम दिवशीच माघारीचा निर्णय घेतल्याने भूवया उंचावल्या, आता नवा उमेदवार देण्याचा पर्याय सुद्धा नाही
15 ऑक्टोबरपासून UPI वर चार्चेस लागू होणार; SIP, शेअर बाजारातील गुंतवणूक आणि FD करणे महाग होणार का? आपल्याला पडलेल्या 9 प्रश्नांची उत्तरे
15 ऑक्टोबरपासून UPI वर चार्चेस लागू होणार; SIP, शेअर बाजारातील गुंतवणूक आणि FD करणे महाग होणार का? आपल्याला पडलेल्या 9 प्रश्नांची उत्तरे
Mumbai Powai IIT Student Death: आयआयटी मुंबईत शिकायला गेलेल्या लेकानं आयुष्य संपवलं, साहिल वाकोडेची आई म्हणाली,
आयआयटी मुंबईत शिकायला गेलेल्या लेकानं आयुष्य संपवलं, साहिल वाकोडेची आई म्हणाली, "माझ्या मुलाचा छळ करून त्याला मारलं..."
Embed widget