एक्स्प्लोर

Devendra Fadnavis: उद्धव ठाकरेंसाठी दरवाजे उघडणार का?; देवेंद्र फडणवीस म्हणाले, 23 तारखेची वाट बघा...

Devendra Fadnavis: मुख्यमंत्रि‍पदाबाबत आम्ही ठरवलं आहे. जो काही निर्णय होईल तो निकालानंतर होईल, असंही देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलं आहे.

Devendra Fadnavis Maharashtra Vidhan Sabha Election 2024: सध्या राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. महायुती आणि महाविकास आघाडीने जोरदार तयारी सुरु केली आहे. याचदरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आज एबीपी माझाच्या 'माझा महाराष्ट्र, माझं व्हिजन' या कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी देवेंद्र फडणवीसांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. 

विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर जागा कमी पडल्या तर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) की शरद पवार (Sharad Pawar), कोणासाठी दरवाजे उघडणार?, असा प्रश्न देवेंद्र फडणवीसांना विचारण्यात आला. यावर कुणाची गरज लागणार नाही, आम्ही तिघेच पुरेसे आहोत, तशी परिस्थितीची येणारच नाही...23 तारखेची वाट बघा, असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितले. तसेच मुख्यमंत्रि‍पदाचा फॉर्म्युला आम्ही निकालानंतर ठरवू. सरकार म्हणून आम्ही निवडणुकीला सामोरे जात आहोत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच आमचा चेहरा आहेत, असं देवेंद्र फडणवीसांनी यावेळी सांगितले. मुख्यमंत्रि‍पदाबाबत आम्ही ठरवलं आहे. जो काही निर्णय होईल तो निकालानंतर होईल. रोटेशनल मुख्यमंत्री अशी कोणतीही अट एकनाथ शिंदे यांनी ठेवली नाहीय, असंही देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. 

नवाब मलिकांबाबत आम्ही स्पष्टपणे सांगितलं होतं- देवेंद्र फडणवीस

महायुतीमध्ये सहभागी असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नवाब मलिक यांना राष्ट्रवादी काँग्रेसचा एबी फॉर्म दिल्यानं विरोधकांकडून भाजपला घेरण्याचा प्रयत्न केला जात आहे. यावर देखील देवेंद्र फडणवीस यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. आम्ही नवाब मलिकांचा प्रचार करणार नाही. नवाब मलिक यांना तिकीट देऊ नका, हे आम्ही अजित पवारांना सांगितलं होतं. मात्र अजित पवारांनी त्यांना एबी फॉर्म दिला. अजित पवारांनी असं का केलं, हे तेच सांगू शकतात, त्यांना विचारा, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

बाळासाहेबांनी दिलेलं हिंदुत्व उद्धव ठाकरे यांनी कधीच हरवलं- देवेंद्र फडणवीस

आमच्या हिंदुत्वाबद्दल बोलायची गरज नाही. स्वर्गीय बाळासाहेबांनी दिलेलं हिंदुत्व उद्धव ठाकरे यांनी कधीच हरवलं. आदित्य ना हिंदुत्व शिकवण्याची गरज नाही बरोबर आहे, कारण त्यांना शिकवण्यासाठी अबू आझमी आहेत. बाळासाहेबांना जनाब म्हटलं जातं, जे हिंदुत्व बाळासाहेबांचे होते, शिवसेनेचे होते ते हिंदुत्व  उद्धव ठाकरेंनी संपवलं, अशी टीका देवेंद्र फडणवीसांनी केली. तसेच ना मला ठाकरे संपवू शकतात, ना मी त्यांना संपवू शकत. कोणाला संपवायचं हे जनता ठरवते, असंही देवेंद्र फडणवीसांनी सांगितले. 

आम्हाला फेक नेरेटीव्हने हरवलं-

लोकसभेत तीन पक्षांनी आम्हाला हरवलं नाही. आम्हाला फेक नेरेटीव्हने हरवलं. तीन पक्ष आम्हाला हरवू शकलेच नसते. फेक नेरेटीव्ह कंट्रोल करण्यात आम्ही कमी पडलो. त्याचं आकलन नीट करु शकलो नाही. त्यामुळे या लोकसभा निवडणुकीतून आम्हाला चांगला अनुभव मिळाला, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. 

संबंधित बातमी:

Ajit Pawar: शरद पवारांनी केलेली नक्कल अजितदादांच्या जिव्हारी लागली; म्हणाले, प्रगल्भ नेत्याला असली कृती शोभत नाही

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2019 पासून लोकमत ऑनलाईनमधून पत्रकारितेची सुरुवात. राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा, क्राईम, क्रीडा, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस. 

Read More

महत्त्वाच्या बातम्या

Local Body Election: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील वर्षीच होण्याची शक्यता; SIRची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर निवडणुका घ्याव्या, केंद्रीय आयोगाची भूमिका
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील वर्षीच होण्याची शक्यता; SIRची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर निवडणुका घ्याव्या, केंद्रीय आयोगाची भूमिका
Prashant Kishor Bihar Bankipur By-Election 2026 Results: भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग, बांकीपूरातून विजयी होताच प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, महाराष्ट्राचंही नाव घेतलं!
भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग, बांकीपूरातून विजयी होताच प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, महाराष्ट्राचंही नाव घेतलं!
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
Bankipur byelection Result : भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग

व्हिडीओ

Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
Junnar Pimpalwandi Case: सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
Ind vs Pak Hockey: जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
Embed widget