एक्स्प्लोर

Devendra Fadnavis : विरोधकांना मी पुन्हा माफ केले, हाच माझा बदला, देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या; म्हणाले, माझी खलनायकी प्रतिमा...

Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्रि‍पदासाठी पुन्हा एकदा निवड झाल्यानंतर त्यांनी केलेल्या वक्तव्याची जोरदार चर्चा रंगली आहे.

मुंबई : महायुती सरकारचा शपथविधी (Mahayuti Oath Ceremony) सोहळा आज मुंबईच्या आझाद मैदानावर (Azad Maidan) पार पडणार आहे. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे राज्याच्या मुख्यमंत्रि‍पदी विराजमान होणार आहेत. त्यांच्यासोबत अजित पवार (Ajit Pawar) हे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील. तर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे देखील उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळत आहे. देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्रि‍पदासाठी पुन्हा एकदा निवड झाल्यानंतर त्यांनी एका मराठी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत केलेल्या वक्तव्याची जोरदार चर्चा रंगली आहे. 

2022 साली महाराष्ट्रात सत्तांतर झाले. एकनाथ शिंदे यांनी बंड करून त्यांनी भाजपसोबत सरकार स्थापन केले. परिणामी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. यानंतर विधानसभेत बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी वक्तव्य केले होते की, आपल्यावर टोकाची टीका केली, बदनामी करणाऱ्यांचा आपण बदला घेणार आहे. त्यांना माफ केले हाच आपला बदला आहे. असे वक्तव्य केले होते.

मी त्यांचा पुन्हा बदला घेणार 

या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांना यंदा देखील विरोधकांनी आपली भरपूर बदनामी केली. याबाबत तुमची प्रतिक्रिया काय असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. यावर "मी त्यांचा पुन्हा बदला घेणार आहे.  त्यांना मी पुन्हा माफ केले, हाच माझा बदला", असे वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. फडणवीसांच्या वक्तव्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. 

जनतेने विरोधकांना सडेतोड उत्तर दिले

देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की,  मी स्वल्प काय, अन् दीर्घ काय मी कोणताही द्वेषी कधीही नव्हतो. आपल्या राजकारणाच्या सोईसाठी काही नेत्यांनी माझी खलनायकी प्रतिमा तयार करण्याचे पुरेपूर प्रयत्न केले. महायुतीवर, भाजपवर आणि माझ्यावर जनतेने मोठा विश्वास विधानसभा निवडणुकीत टाकला आणि परस्पर  सडेतोड उत्तर दिल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे. 

मविआने अनेकदा विरोधकांचा आवाज दाबला

तर विरोधी पक्षांच्या आमदारांची संख्या यंदा विधानसभेत फारच कमी असून बहुमतातील सरकार विरोधकांचा आवाज दाबेल, असा आरोप सातत्याने होत आहे. याबाबत देखील देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाचे भाष्य केले आहे. त्यांनी म्हटलंय की, आम्ही कोणाचाही आवाज दाबणार नाही. विरोधकांची संख्या कमी आहे म्हणून त्यांच्याकडे दुर्लक्ष करणार नाही. त्यांचे प्रश्न मांडण्याची पुरेपूर संधी त्यांना दिली जाईल. महाविकास आघाडीने अनेकदा विरोधकांचा आवाज दाबला, आम्ही त्याविरोधात संघर्ष केला होता, आता आम्ही सत्तेत आल्यानंतर त्याचा आवाज दाबायचा हे मला मान्य नसल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. 

आणखी वाचा 

Devendra Fadnavis : एक अकेला सब पे भारी पड गया! लहानपणीच्या किस्स्यांपासून ते तिसऱ्यांदा मुख्यमंत्रि‍पदापर्यंत, 'देवाभाऊं'च्या लाडक्या बहिणी काय-काय म्हणाल्या?

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Azad Maidan Riots: मुंबईच्या आझाद मैदान दंगलीतील आरोपींना 14 वर्षांनंतरही शिक्षा नाहीच! पावणेदोन कोटी रुपयांची वसुलीही रखडली, नेमकं प्रकरण काय?
मुंबईच्या आझाद मैदान दंगलीतील आरोपींना 14 वर्षांनंतरही शिक्षा नाहीच! पावणेदोन कोटी रुपयांची वसुलीही रखडली, नेमकं प्रकरण काय?
पत्नीची इन्स्टा वापरावरून आणि ऑटो-रिक्षा चालवण्यावरून वाद टोकाला गेला; पती म्हणाला, ये घरी परत मी रिक्षा शिकवतो अन् पुढे घडू नये ते भयावह पद्धतीनं घडलं
पत्नीची इन्स्टा वापरावरून आणि ऑटो-रिक्षा चालवण्यावरून वाद टोकाला गेला; पती म्हणाला, ये घरी परत मी रिक्षा शिकवतो अन् पुढे घडू नये ते भयावह पद्धतीनं घडलं
Pune Chakan MIDC : चाकण औद्योगिक क्षेत्रातील अडथळे दूर करण्यासाठी शासनाचा मोठा निर्णय; पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठीत
चाकण औद्योगिक क्षेत्रातील अडथळे दूर करण्यासाठी शासनाचा मोठा निर्णय; पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठीत
Rahul Gandhi: लोकसभा सचिवालयाने राहुल गांधींना नोटीस धाडली, 28 ऑगस्टपर्यंत उत्तर मागितलं; नेमकं काय घडलं?
लोकसभा सचिवालयाने राहुल गांधींना नोटीस धाडली, 28 ऑगस्टपर्यंत उत्तर मागितलं; नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Azad Maidan Riots: मुंबईच्या आझाद मैदान दंगलीतील आरोपींना 14 वर्षांनंतरही शिक्षा नाहीच! पावणेदोन कोटी रुपयांची वसुलीही रखडली, नेमकं प्रकरण काय?
मुंबईच्या आझाद मैदान दंगलीतील आरोपींना 14 वर्षांनंतरही शिक्षा नाहीच! पावणेदोन कोटी रुपयांची वसुलीही रखडली, नेमकं प्रकरण काय?
पत्नीची इन्स्टा वापरावरून आणि ऑटो-रिक्षा चालवण्यावरून वाद टोकाला गेला; पती म्हणाला, ये घरी परत मी रिक्षा शिकवतो अन् पुढे घडू नये ते भयावह पद्धतीनं घडलं
पत्नीची इन्स्टा वापरावरून आणि ऑटो-रिक्षा चालवण्यावरून वाद टोकाला गेला; पती म्हणाला, ये घरी परत मी रिक्षा शिकवतो अन् पुढे घडू नये ते भयावह पद्धतीनं घडलं
Pune Chakan MIDC : चाकण औद्योगिक क्षेत्रातील अडथळे दूर करण्यासाठी शासनाचा मोठा निर्णय; पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठीत
चाकण औद्योगिक क्षेत्रातील अडथळे दूर करण्यासाठी शासनाचा मोठा निर्णय; पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठीत
Rahul Gandhi: लोकसभा सचिवालयाने राहुल गांधींना नोटीस धाडली, 28 ऑगस्टपर्यंत उत्तर मागितलं; नेमकं काय घडलं?
लोकसभा सचिवालयाने राहुल गांधींना नोटीस धाडली, 28 ऑगस्टपर्यंत उत्तर मागितलं; नेमकं काय घडलं?
Abhijit Dipke and Gulabrao Patil: अभिजीत दिपकेंचा सरकारी शाळांवरुन सरकारवर निशाणा, गुलाबराव पाटील म्हणाले, 'कुठेही राजकारण आणू नका'
अभिजीत दिपकेंचा सरकारी शाळांवरुन सरकारवर निशाणा, गुलाबराव पाटील म्हणाले, 'कुठेही राजकारण आणू नका'
पोटच्या 18 वर्षाच्या लेकाला आजारपणात गमावलं, पत्नी डिप्रेशनमध्ये गेली, पण पतीनं दत्तक मुलं घेण्यासाठी भलताच मार्ग निवडला अन् आता थेट जेलवारी
पोटच्या 18 वर्षाच्या लेकाला आजारपणात गमावलं, पत्नी डिप्रेशनमध्ये गेली, पण पतीनं दत्तक मुलं घेण्यासाठी भलताच मार्ग निवडला अन् आता थेट जेलवारी
'दिमागी' नक्षलींना ओळखलं पाहिजे, वेगळं पाडलं पाहिजे, ते समाजाची दिशाभूल करत आहेत, तरुण पिढीला विकसित राष्ट्र बनवण्याच्या मुख्य प्रवाहात जोडलं पाहिजे : पीएम मोदी
'दिमागी' नक्षलींना ओळखलं पाहिजे, वेगळं पाडलं पाहिजे, ते समाजाची दिशाभूल करत आहेत, तरुण पिढीला विकसित राष्ट्र बनवण्याच्या मुख्य प्रवाहात जोडलं पाहिजे : पीएम मोदी
PM Modi Independence Day speech: पंतप्रधान मोदींनी मांडला सेमीकंडक्टर चीप, अणुउर्जेचा मास्टरप्लॅन, पुढच्या 10 वर्षात काय करणार?
पंतप्रधान मोदींनी मांडला सेमीकंडक्टर चीप, अणुउर्जेचा मास्टरप्लॅन, पुढच्या 10 वर्षात काय करणार?
Embed widget