एक्स्प्लोर

विधानसभेसाठी आघाडीचा फॉर्म्युला ठरला, काँग्रेस-राष्ट्रवादी 125-125 जागा लढवणार

विधानसभा निवडणुकीत राज्यातील विधानसभेच्या 288 जागांपैकी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस हे दोनही प्रमुख पक्ष 125-125 जागांवर आपले उमेदवार उभे करणार आहेत. तर मित्रपक्षांना 38 जागा सोडण्यात येणार आहे, अशी माहिती शरद पवार यांनी दिली आहे.

नाशिक : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचं बिगुल कोणत्याही क्षणी वाजणार आहे. येत्या काही दिवसांत होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी आणि मित्रपक्षांच्या आघाडीचा फॉर्म्युला ठरला आहे. विधानसभेला काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस हे दोनही प्रमुख पक्ष 125-125 जागा लढवणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज नाशिक दौऱ्यावर असताना ही माहिती दिली आहे. त्यामुळे विरोधी पक्षाच्या जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला असून आता युतीच्या जागावाटपाकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. येत्या विधानसभा निवडणुकीत राज्यातील विधानसभेच्या 288 जागांपैकी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस हे दोनही प्रमुख पक्ष 125-125 जागांवर आपले उमेदवार उभे करणार आहेत. तर मित्रपक्षांना 38 जागा सोडण्यात येणार आहे, अशी माहिती शरद पवार यांनी दिली आहे. यामध्ये काही जागांची अदलाबदल करण्यात येणार आहे. तसेच यंदा नव्या चेहऱ्यांना संधी देणार असल्याचंही शरद पवार यांनी म्हटलं आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आणि शेकाप, जोगेंद्र कवाडे, राजू शेट्टी, आणि इतर डावे पक्ष एकत्र येऊन निवडणूक लढवणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचा फॉर्म्युला ठरला असताना युतीच्या जागावाटपाबाबत मात्र अजुनही चर्चाच सुरु आहे. दोन्ही पक्षांनी किती जागा लढवायच्या आणि मित्र पक्षांना किती जागा द्यायच्या यावरुन युतीमध्ये आणखी मतभेद आहेत. भारतीय जनता पक्ष शिवसेनेला 120 जागा देण्यास तयार आहे मात्र शिवसेनेनं 135 जागांची मागणी लावून धरली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. तसेच युतीतील मित्रपक्षांना नेमक्या किती जागा देण्यात येणार, याबद्दलही चर्चा आहे. युतीतील मित्रपक्षांनी भाजपच्या चिन्हावर विधानसभा निवडणूक लढवावी असा प्रस्ताव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याचंही बोललं जात आहे.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Diela : अल्बानियात जगातील पहिली AI मंत्री, संसदेतील पहिलंच भाषण गाजवलं; म्हणाली, संविधानाला धोका मशिनपासून नव्हे तर चुकीच्या निर्णयामुळे
अल्बानियात जगातील पहिली AI मंत्री, संसदेतील पहिलंच भाषण गाजवलं; म्हणाली, संविधानाला धोका मशिनपासून नव्हे तर चुकीच्या निर्णयामुळे
Jan Dhan account KYC : जनधन खातेधारकांना 30 सप्टेंबरपर्यंत केवायसी करावी लागणार, अन्यथा खात्यात पैसे येणं बंद होणार  
जनधन खातेधारकांना 30 सप्टेंबरपर्यंत केवायसी करावी लागणार, अन्यथा खात्यात पैसे येणं बंद होणार  
सांगोला तालुक्यात ढगफुटी, शेकडो घरांमध्ये शिरलं पाणी, शेती पिकांचंही नुकसान 
सांगोला तालुक्यात ढगफुटी, शेकडो घरांमध्ये शिरलं पाणी, शेती पिकांचंही नुकसान 
Nashik Crime : वर्चस्वाच्या लढाईतूनच नाशिकमध्ये 'तो' गोळीबार, 11 जणांना बेड्या; आतापर्यंत काय-काय घडलं?
वर्चस्वाच्या लढाईतूनच नाशिकमध्ये 'तो' गोळीबार, 11 जणांना बेड्या; आतापर्यंत काय-काय घडलं?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 6 AM : एबीपी माझा हेडलाईन्स : TOP Headlines : 15 Sep 2025 : ABP Majha
Ind beat Pak Asia Cup 2025 : दुबईती 'ऑपरेशन विजय'...भारतीय संघाकडून पाकचा धुव्वा
Navi Mumbai Airport Special Report : नवीमुंबई विमानतळाच्या नावाचा वाद पेटला, भूमीपुत्र एकवटले
Animal Cruelty | Pimpri Chinchwad मध्ये Siberian Husky ला अमानुष मारहाण, जीव घेतला
Private University Row | नाशिकमध्ये MVP संस्थेच्या सभेत गोंधळ, धक्काबुक्की

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Diela : अल्बानियात जगातील पहिली AI मंत्री, संसदेतील पहिलंच भाषण गाजवलं; म्हणाली, संविधानाला धोका मशिनपासून नव्हे तर चुकीच्या निर्णयामुळे
अल्बानियात जगातील पहिली AI मंत्री, संसदेतील पहिलंच भाषण गाजवलं; म्हणाली, संविधानाला धोका मशिनपासून नव्हे तर चुकीच्या निर्णयामुळे
Jan Dhan account KYC : जनधन खातेधारकांना 30 सप्टेंबरपर्यंत केवायसी करावी लागणार, अन्यथा खात्यात पैसे येणं बंद होणार  
जनधन खातेधारकांना 30 सप्टेंबरपर्यंत केवायसी करावी लागणार, अन्यथा खात्यात पैसे येणं बंद होणार  
सांगोला तालुक्यात ढगफुटी, शेकडो घरांमध्ये शिरलं पाणी, शेती पिकांचंही नुकसान 
सांगोला तालुक्यात ढगफुटी, शेकडो घरांमध्ये शिरलं पाणी, शेती पिकांचंही नुकसान 
Nashik Crime : वर्चस्वाच्या लढाईतूनच नाशिकमध्ये 'तो' गोळीबार, 11 जणांना बेड्या; आतापर्यंत काय-काय घडलं?
वर्चस्वाच्या लढाईतूनच नाशिकमध्ये 'तो' गोळीबार, 11 जणांना बेड्या; आतापर्यंत काय-काय घडलं?
Ladki Bahin Yojana e-KYC : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये मिळवण्यासाठी e-KYC बंधनकारक,  ई केवायसी कशी पूर्ण करायची? जाणून घ्या प्रक्रिया
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये मिळवण्यासाठी e-KYC बंधनकारक, ई केवायसी कशी पूर्ण करायची?
वाचाळ गोपीचंद पडळकरांना जयंत पाटलांनी अनुल्लेखानं मारलं; खासदार विशाल पाटील म्हणाले, या व्यक्तीला मोकळीक कोणी दिली, त्याच्या मागे कोण हे पाहिलं पाहिजे
वाचाळ गोपीचंद पडळकरांना जयंत पाटलांनी अनुल्लेखानं मारलं; खासदार विशाल पाटील म्हणाले, या व्यक्तीला मोकळीक कोणी दिली, त्याच्या मागे कोण हे पाहिलं पाहिजे
Ajit Pawar: पक्षाला वेळ द्यावा लागेल, मी कोण काम करतं याची नोंद घेतलीय; अजितदादांचा आपल्याच मंत्र्यांना सूचक इशारा
पक्षाला वेळ द्यावा लागेल, मी कोण काम करतं याची नोंद घेतलीय; अजितदादांचा आपल्याच मंत्र्यांना सूचक इशारा
Laxman Hake : इंग्रजी शिकून रिझर्वेशनचे स्पेलिंग लिहून दाखवा, दिल्ली नव्हे, अमेरिका-अफ्रिकन देशात जावं; लक्ष्मण हाकेंचं मनोज जरांगेंना आव्हान
इंग्रजी शिकून रिझर्वेशनचे स्पेलिंग लिहून दाखवा, दिल्ली नव्हे, अमेरिका-अफ्रिकन देशात जावं; लक्ष्मण हाकेंचं मनोज जरांगेंना आव्हान
Embed widget