एक्स्प्लोर

Ausa Vidhan Sabha constituency : औसा मतदारसंघात अभिमन्यू पवारांचा विजय, ठाकरे गटाचे दिनकर माने पराभूत

Ausa Vidhan Sabha constituency Result : लातूर जिल्ह्यात महायुतीनं मोठी बाजी मारली आहे. जिल्ह्यातील औसा मतदारसंघात पुन्हा एकदा विद्यमान भाजपचे विद्यमान आमदार अभिमन्यू पवार विजयी झाले आहेत.

Ausa Vidhan Sabha constituency Result : लातूर जिल्ह्यात महायुतीनं मोठी बाजी मारली आहे. जिल्ह्यातील औसा मतदारसंघात पुन्हा एकदा विद्यमान भाजपचे विद्यमान आमदार अभिमन्यू पवार विजयी झाले आहेत. औसा मतदारसंघात अभिमन्यू पवारांविरोधात शिवसेना ठाकरे गटाचे दिनकर माने ( Dinkar Mane) निवडणूक लढवत होते. संपूर्ण राज्याचं या लढतीकडं लक्ष लागलं होतं. अखेर या मतदारसंघातून अभिमन्यू पवार यांनीच बाजी मारली आहे. 

विधानसभा निवडणुकीचा (Vidhasabha Election) रणसंग्राम सुरु झाला आहे. सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार प्रचाराला सुरुवात देखील केली आहे. राजकीय नेते ऐकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत. लातूर जिल्ह्यातही राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे. लातूर (Latur) जिल्ह्यात विधानसभेचे 6 मतदारसंघ आहेत. आज आपण औसा विधानसभा मतदारसंघाची (Ausa Vidhan Sabha constituency) माहिती पाहणार आहोत. या मतदारसंघाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. या मतदारसंघात भाजपचे विद्यमान आमदार अभिमन्यू पवार (Abhimanyu Pawar) हे पुन्हा निवडणूक लढवत आहेत. त्यांच्याविरोधात शिवसेना ठाकरे गटाचे दिनकर माने ( Dinkar Mane) निवडणूक लढवत आहेत.

औसा विधानसभा मतदारसंघातील लढत ही लक्षवेधी मानली जात आहे. कारण या मतदारसंघात भाजपचे विद्यमान आमदार अभिमन्यू पवार हे निवडणूक लढवत आहे. ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जातात. यावेळी त्यांच्याविरोधात शिवसेना ठाकरे गटाकडून दिनकर माने हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या दोघांमधील लढत ही अत्यंत चुरशीती होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.  

2019 च्या विधानसभा निवडणुकीत औसा विधानसभा मतदारसंघात काय झालं?

2019 च्या विधानसभा निवडणुकीत  औसा मतदारसंघ हा भारतीय जनता पक्षाने जिंकला होता. या मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे अभिमन्यू दत्तात्रय पवार यांनी विजय मिळवला होता. त्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या बसवराज महाद्वाराव पाटील यांचा 26714 मतांच्या फरकाने पराभव केला होता.  2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे अभिमन्यु पवार यांना 95340  मते मिळाली होती. त्यांनी काँग्रेसचे बसवराज माधवराव पाटील यांचा 68626 मतांनी पराभव केला होता. तर तिसऱ्या क्रमांकावर अपक्ष उमेदवार बजरंग जाधव होते. मात्र, यावेळी लोकसभा निवडुकीपूर्वी बसवराज पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यामुलं या मतदारसंघातून अभिमन्यू पवार यांच्या विरोधात कोण निवडणूक लढवणार याची चर्चा मतदारसंघात सुरु होती. मात्र, अखेर ठाकरे गटाचे दिनकर माने मैदानात उतरले आहेत. हा मतदारसंघ काँग्रेसचा गड मानला जातो कारण इथे काँग्रेसने अनेक वेळा विजय मिळवला आहे. औसा हे शहर लातूर महानगरापासून साधारणपणे 20 किमी अंतरावर आहे. येथे एक ऐतिहासिक किल्ला आहे. जो सध्या अवशेषांच्या रुपात उभा आहे. वीरनाथ महाराज यांचे एक मोठे पूजास्थळ देखील आहे. जे त्यांच्या वंशज मल्लीनाथ महाराज यांनी साधारणपणे 3 शतकांपूर्वी बनवले होते. औसा तालुक्यात सुमारे 2 लाखांहून अधिक ग्रामीण लोकवस्ती आहे. 

दरम्यान, औसा विधानसभा मतदारसंघ हा लातूर लोकसभा मतदारसंघात येतो. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार डॉ. शिवाजीराव काळगे यांनी लातूर लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाच्या सुधाकर तुकाराम श्रांगारे यांचा 61881 मतांनी पराभव करून विजय मिळवला.

महत्वाच्या बातम्या:

Latur Assembly Election : लातूर जिल्ह्याकडं सर्वांचं लक्ष, 6 मतदारसंघातील चित्र स्पष्ट, कोण मारणार मैदान?

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Dhule: हृदयद्रावक! आईची पोटच्या दोन्ही चिमुकल्यांना घेऊन विहिरीत उडी, 30 फुट खोल पाण्यात बुडून मृत्यू
हृदयद्रावक! आईची पोटच्या दोन्ही चिमुकल्यांना घेऊन विहिरीत उडी, 30 फुट खोल पाण्यात बुडून मृत्यू
Shivdeep Lande: आई ती आईच... शिवदीप लांडेंच्या मातोश्री म्हणाल्या पोरानं IPS नोकरी राजीनामा नव्हता द्यायला पाहिजे
Shivdeep Lande: आई ती आईच... शिवदीप लांडेंच्या मातोश्री म्हणाल्या पोरानं IPS नोकरी राजीनामा नव्हता द्यायला पाहिजे
दोन कोटी भारतीयांच्या नोकऱ्या जाऊ शकतात, AI आणि व्यापारातील अस्थिरतेमुळे मध्यमवर्गीयांसमोर मोठं संकट
दोन कोटी भारतीयांच्या नोकऱ्या जाऊ शकतात, AI आणि व्यापारातील अस्थिरतेमुळे मध्यमवर्गीयांसमोर मोठं संकट
लोकांनी राहुल गांधींना गटांगळ्या खायला लावल्या;राधाकृष्ण विखे पाटलांची बोचरी टीका,शरद पवारांनाही टोला
लोकांनी राहुल गांधींना गटांगळ्या खायला लावल्या;राधाकृष्ण विखे पाटलांची बोचरी टीका,शरद पवारांनाही टोला
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Mahapalikecha Mahasangram Pune गुन्हेगारीवर आळा कधी? वाहतूक कोंडी कधी सुटणार?;पालिका निवडणूक चुरशीची
Mahapalikecha Mahasangram Jalna जालन्यात व्यापाऱ्यांच्या पक्षांकडून अपेक्षा काय? कोण मारणार बाजी?
Mahapalikecha Mahasangram Mira Bhayandar : कोण मारणार मिरा-भाईंदरमध्ये बाजी? स्थानिकांना काय वाटतं?
Mahapalikecha Mahasangram Solapur : सोलापूर महापालिकेतील राजकीय गणित बदलणार? कोण बाजी मारणार?
Mahapalikecha Mahasangram Vasai Virar पालिकेत कोणाची बाजी? अनधिकृत बांधकामामुळे पालिका चर्चेत

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dhule: हृदयद्रावक! आईची पोटच्या दोन्ही चिमुकल्यांना घेऊन विहिरीत उडी, 30 फुट खोल पाण्यात बुडून मृत्यू
हृदयद्रावक! आईची पोटच्या दोन्ही चिमुकल्यांना घेऊन विहिरीत उडी, 30 फुट खोल पाण्यात बुडून मृत्यू
Shivdeep Lande: आई ती आईच... शिवदीप लांडेंच्या मातोश्री म्हणाल्या पोरानं IPS नोकरी राजीनामा नव्हता द्यायला पाहिजे
Shivdeep Lande: आई ती आईच... शिवदीप लांडेंच्या मातोश्री म्हणाल्या पोरानं IPS नोकरी राजीनामा नव्हता द्यायला पाहिजे
दोन कोटी भारतीयांच्या नोकऱ्या जाऊ शकतात, AI आणि व्यापारातील अस्थिरतेमुळे मध्यमवर्गीयांसमोर मोठं संकट
दोन कोटी भारतीयांच्या नोकऱ्या जाऊ शकतात, AI आणि व्यापारातील अस्थिरतेमुळे मध्यमवर्गीयांसमोर मोठं संकट
लोकांनी राहुल गांधींना गटांगळ्या खायला लावल्या;राधाकृष्ण विखे पाटलांची बोचरी टीका,शरद पवारांनाही टोला
लोकांनी राहुल गांधींना गटांगळ्या खायला लावल्या;राधाकृष्ण विखे पाटलांची बोचरी टीका,शरद पवारांनाही टोला
मुंबईत इमारतीच्या पायाभरणीवेळी दुर्घटना, मातीच्या ढिगाऱ्याखाली 2 कामगारांचा मृत्यू, 3 जखमी
मुंबईत इमारतीच्या पायाभरणीवेळी दुर्घटना, मातीच्या ढिगाऱ्याखाली 2 कामगारांचा मृत्यू, 3 जखमी
Bihar Election Result 2025: नितीश कुमार सरकारवर 62 हजार कोटींच्या घोटाळ्यांचा आरोप केला अन् निकाल लागताच भाजपकडून माजी केंद्रीय मंत्र्याची हकालपट्टी
नितीश कुमार सरकारवर 62 हजार कोटींच्या घोटाळ्यांचा आरोप केला अन् निकाल लागताच भाजपकडून माजी केंद्रीय मंत्र्याची हकालपट्टी
PM नरेंद्र मोदी चंद्रावरही शिवशक्ती कॉलनी उघडणार; भाजपच्याच मंत्र्यांचा दावा, आदित्य ठाकरेंना टोला 
PM नरेंद्र मोदी चंद्रावरही शिवशक्ती कॉलनी उघडणार; भाजपच्याच मंत्र्यांचा दावा, आदित्य ठाकरेंना टोला 
Bihar Election Result 2025: बिहारमधील दारुण पराभवानंतर राहुल गांधी थेट मल्लिकार्जुन खरगेंच्या घरी पोहोचले; दोन आठवड्यात पुरावे मांडणार
बिहारमधील दारुण पराभवानंतर राहुल गांधी थेट मल्लिकार्जुन खरगेंच्या घरी पोहोचले; दोन आठवड्यात पुरावे मांडणार
Embed widget