एक्स्प्लोर

West Bengal Election 2026: पश्चिम बंगालमध्ये भाजपच्या विजयानंतर अशोक चव्हाणांनी काँग्रेसची लाज काढली, म्हणाले, 'काँग्रेस हा नेतृत्त्वहीन पक्ष, आतातरी...'

West Bengal Election 2026: पश्चिम बंगाल आणि आसाममध्ये काँग्रेसचा मोठा पराभव झाला. काँग्रेस हा नेतृत्त्वहीन पक्ष झाला आहे. आतातरी त्यांनी शहाणं व्हावं, असंही अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे.

Assembly Election Results 2026: देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल आज (सोमवारी) जाहीर झाला. पश्चिम बंगाल, आसाम, पुद्दुचेरी, तामिळनाडू आणि केरळ या पाचही राज्यांमध्ये आज सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. यामध्ये पश्चिम बंगालमध्ये भाजपला (BJP) घवघवीत यश मिळाले. तर आसामध्येही भाजपने पुन्हा एकदा सत्ता राखण्यात यश मिळवले. तर केरळमध्ये डाव्यांचा शेवटचा गड पडला असून याठिकाणी काँग्रेसची सत्ता येण्याची शक्यता आहे. तर तामिळनाडूमध्ये विजय थलपति याच्या टीव्हीके पक्षाने मुसंडी मारत द्रमुक आणि अण्णाद्रमुकला मागे टाकले. तर पुद्दुचेरीमध्येही भाजपने यश मिळवले आहे. (Vidhansabha Election Result 2026) तर या ५ राज्याच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसने कमावलेल्या कामगिरीवरती भाजप नेते आणि राज्यसभा खासदार अशोक चव्हाण यांनी हल्लाबोल करत लाज काढली आहे.

माध्यमांशी बोलताना राज्यसभा खासदार अशोक चव्हाण म्हणाले की, मला अतिशय आनंद आहे की, आज ज्या राज्यांचे निकाल समोर आले, या पाच राज्यांच्या निवडणुकीत त्यामधून आपण पाहाल पश्चिम बंगालमध्ये  भाजपचा दणदणीत विजय झाला आहे. तृणमूल काँग्रेसचा फार मोठा पराभव झाला आहे. तीन टर्मपासून असलेली ममता बॅनर्जी यांची सत्ता गेली आहे. लोकांना वाटलं नव्हतं, पण आम्हाला खात्री होती. ज्या पद्धतीने मोदी साहेबांनी आणि अमित भाईंनी लोकांना भेटून आपली भूमिका पटवून दिली, अँटी इन्कन्म्बन्सी फॅक्टर त्याठिकाणी मोठ्या प्रमाणावर होता. पुद्दुचेरीत भाजप आघाडी सत्तास्थापन करेल. मोदीजींची एकूण विकसित भारताची संकल्पना आणि विकासकामं हे पाहून लोकांनी मोदींच्या नेतृत्त्वावर शिक्कामोर्तब केले असं म्हणत चव्हाणांनी भाजपचं कौतुक केलं आहे. 

तर मोदीजींच्या निर्णयाला प्रत्येक ठिकाणी विरोध करायचा प्रयत्न जो विरोधकांनी केला, त्याला लोकांनी जुमानलं नाही. महिला आरक्षण विधेयकाला विरोध केल्यामुळे महिलांचा विरोधकांविरोधात रोष दिसून आला. पश्चिम बंगालमध्ये महिलांनी मोठ्या प्रमाणावर तृणमूल काँग्रेसला विरोध केला असावा, आमचा अंदाज आहे. ऑपरेशन सिंदूरबाबत शंका व्यक्त करुन अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून देशाविषयी शंका उपस्थित करणाऱ्यांना चांगले उत्तर मिळाले आहे. पश्चिम बंगाल आणि आसाममध्ये काँग्रेसचा मोठा पराभव झाला. काँग्रेस हा नेतृत्त्वहीन पक्ष झाला आहे. आतातरी त्यांनी शहाणं व्हावं, असंही अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे.

West Bengal Election 2026: विकासाचे राजकारण चालते, हे बंगालमध्ये सिद्ध : विनोद तावडे

त्याचबरोबर भाजप नेते आणि खासदार विनोद तावडे यांनी भाजपच्या विजयावर प्रतिक्रिया देताना म्हटलं की, तुष्टीकरणाचे राजकारण चालणार नाही. विकासाचे राजकारण चालते, हे बंगालमध्ये सिद्ध झाले. आसाममध्ये पुन्हा एकदा भाजपचे सरकार येत आहे. तामिळनाडूत खूप चांगल्या पद्धतीने भाजपच्या जागा वाढल्या आहेत. त्याठिकाणी स्थानिक नवीन पक्ष पुढे आहे. स्वाभाविकपणे अँटी इन्कम्बन्सी दोघांमध्ये विभागली आहे. पुद्दुचेरीमध्ये भाजप आहे, केरळमध्ये आम्ही खातं उघडत आहोत, आमची मतांची टक्केवारी वाढत आहे. पण आजचा खरा विजय पश्चिम बंगालमधील आहे. कारण बंगाल केवळ एक राज्य नाही, एक सीमावर्ती प्रदेश आहे. तिथून मुंबईपर्यंत बांगलादेशी येतात आणि आपले उद्योग व्यवसाय बसवतात. बंगालच्या विजयाने आपल्या देशाचे अनेक प्रश्न सुटणार आहेत. 

West Bengal Election 2026:  दिवा विझताना मोठा होतो : संजय राऊत

पश्चिम बंगालमध्ये भाजपचा विजय झाला. दिवा विझताना मोठा होतो, आता त्यांचं कार्य संपलेले आहे. बंगालमध्ये  30 ते 35 मतदान केंद्रावर मतमोजणी थांबली आहे. अनेक मतदान केंद्रावर भाजपचे कार्यकर्ते लूट करत आहेत. सीआरपीएफची मदत भाजपच्या कार्यकर्त्यांना आहे. भारतीय जनता पक्ष पश्चिम बंगालमध्ये सत्ता घेताना दिसत आहे.  मोदी आणि शहा यांचं स्वप्न अखेरचं पूर्ण झालं आहे. त्यामुळे मोदी- शहा यांचं राष्ट्रीय स्तरावरच कार्य संपलेले दिसत आहे. एसआयआर, धर्मांतर या सगळ्या विषयावर त्यांचा पराभव रोखण्यात आला. भाजपला सरळ मार्गाने हा विजय मिळालेला नाही, असं शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

AI Deepfake Ban Rules : एआय डीपफेकवर केंद्र सरकारचा सर्जिकल स्ट्राईक; आक्षेपार्ह फोटो-व्हिडीओ 3 तासांत हटवावे लागणार
एआय डीपफेकवर केंद्र सरकारचा सर्जिकल स्ट्राईक; आक्षेपार्ह फोटो-व्हिडीओ 3 तासांत हटवावे लागणार
टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला
टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला
Womens Asia Cup 2026 : आशिया कपचं वेळापत्रक जाहीर, भारत पाकिस्तान 'या' दिवशी आमने सामने, दुबईत स्पर्धा रंगणार
आशिया कपचं वेळापत्रक जाहीर, भारत पाकिस्तान 'या' दिवशी आमने सामने, दुबईत स्पर्धा रंगणार
Mohan Bhagwat : खुल्या वर्गातील मुलांचं कटऑफ लिस्टमध्ये नाव खाली, आरक्षण कधीपर्यंत ठेवणार? Gen Z चे थेट प्रश्न, मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर
खुल्या वर्गातील मुलांचं कटऑफ लिस्टमध्ये नाव खाली, आरक्षण कधीपर्यंत ठेवणार? Gen Z चे थेट प्रश्न, मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर

व्हिडीओ

Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
AI Deepfake Ban Rules : एआय डीपफेकवर केंद्र सरकारचा सर्जिकल स्ट्राईक; आक्षेपार्ह फोटो-व्हिडीओ 3 तासांत हटवावे लागणार
एआय डीपफेकवर केंद्र सरकारचा सर्जिकल स्ट्राईक; आक्षेपार्ह फोटो-व्हिडीओ 3 तासांत हटवावे लागणार
टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला
टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला
Womens Asia Cup 2026 : आशिया कपचं वेळापत्रक जाहीर, भारत पाकिस्तान 'या' दिवशी आमने सामने, दुबईत स्पर्धा रंगणार
आशिया कपचं वेळापत्रक जाहीर, भारत पाकिस्तान 'या' दिवशी आमने सामने, दुबईत स्पर्धा रंगणार
Mohan Bhagwat : खुल्या वर्गातील मुलांचं कटऑफ लिस्टमध्ये नाव खाली, आरक्षण कधीपर्यंत ठेवणार? Gen Z चे थेट प्रश्न, मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर
खुल्या वर्गातील मुलांचं कटऑफ लिस्टमध्ये नाव खाली, आरक्षण कधीपर्यंत ठेवणार? Gen Z चे थेट प्रश्न, मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर
Mohan Bhagwat: मुलांना देवाचं रूप मानलं जाते, तरीही आंदोलनात लाठीचार्ज, पेलेट गन फायर करण्यात आल्या, Gen Z चर्चेत थेट प्रश्न विचारताच सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले? पहिल्यांदाच जाहीर भाष्य
मुलांना देवाचं रूप मानलं जाते, तरीही आंदोलनात लाठीचार्ज, पेलेट गन फायर करण्यात आल्या, Gen Z चर्चेत थेट प्रश्न विचारताच सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले? पहिल्यांदाच जाहीर भाष्य
Eknath Shinde :
एकनाथ शिंदे अचानक दरे गावातून मुंबईकडे रवाना, अमित शाहांच्या भेटीसाठी दौरा आटोपल्याची सूत्रांची माहिती
Arvind Kejriwal: इथेनॉल, पेपरफुटीविरोधात बोलणाऱ्यांची खाती बंद करण्यासाठी सरकारचा मेटावर दबाव, मेटाने असली बदमाशी करत मोदींसमोर गुडघे टेकवू नयेत; केजरीवालांचा गंभीर आरोप
इथेनॉल, पेपरफुटीविरोधात बोलणाऱ्यांची खाती बंद करण्यासाठी सरकारचा मेटावर दबाव, मेटाने असली बदमाशी करत मोदींसमोर गुडघे टेकवू नयेत; केजरीवालांचा गंभीर आरोप
Rahul Gandhi: राहुल गांधींचा Gen Z सोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न; इन्स्टावर 'आस्क मी एनीथिंग' सेशन सुरू, म्हणाले, तुम्ही मला काहीही विचारू शकता
राहुल गांधींचा Gen Z सोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न; इन्स्टावर 'आस्क मी एनीथिंग' सेशन सुरू, म्हणाले, तुम्ही मला काहीही विचारू शकता
Embed widget