एक्स्प्लोर

पंजाबमध्ये काँग्रेसने चन्नी की सिद्धू कोणाच्या नेतृत्वात निवडणूक लढवावी? पाहा सर्वेतून काय आले समोर...

काँग्रेसने पंजाबमध्ये मुख्यमंत्रीपदाचा चेहरा निश्चित केला नाही. काँग्रेसकडून सध्याचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी आणि प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंह सिद्धू हे मुख्यमंत्रीपदाचे दावेदार मानले जात आहेत.

Punjab Election 2022: सध्या पाच राज्यांमध्ये विधानसभांच्या निवडणुका लागल्या आहेत. यामुळे तेथील राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळत आहे. उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, मणिपूर आणि गोवा या राज्यांमध्ये सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराला सुरूवात केली आहे. पंजाबमध्ये चांगलेच राजकीय वातावरण तापल्याचे पाहायला मिळत आहे. पंजाबमध्ये काँग्रेसने त्यांच्या उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. मात्र, काँग्रेसने पंजाबमध्ये मुख्यमंत्रीपदाचा चेहरा निश्चित केला नाही. काँग्रेसकडून सध्याचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी आणि प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंह सिद्धू हे मुख्यमंत्रीपदाचे दावेदार मानले जात आहेत. काँग्रेसचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असावा? कोणाच्या नेतृत्वात काँग्रसने निवडणूक लढवावी, यासाठी पंजाबमध्ये सी वोटरने एक सर्वे केला आहे. 

पंजाबमध्ये काँग्रेसने कोणाच्या नेतृत्वात निवडणूक लढवावी या प्रश्नावर 40 टक्के लोकांनी चरणजीत सिंह चन्नी यांच्या नावाला पसंती दिली आहे. चन्नी यांच्या नेतृत्वातच पंजाबमध्ये काँग्रेसने निवडणूक लढवावी असे लोकांचे म्हणणे आहे. तर 21 टक्के लोकांनी सिद्धू यांच्या नावाला पसंती दिली आहे. सिद्धू यांच्या नेतृत्वात निवडणूक लढवली पाहिजे असे 21 टक्के लोकांचे म्हणणे आहे. तर 27 टक्के लोकांनी दोघांच्याही नावाला नकार दिला आहे. तर 12 टक्के लोकांनी याबाबत माहित नसल्याचे उत्तर दिले आहे. 

काँग्रेसने कोणाच्या नेतृत्वात निवडणूक लढवावी

चरणजीत सिंह चन्नी - 40 टक्के
सिद्धू - 21 टक्के
दोन्ही नको - 27 टक्के
माहित नाही - 12 टक्के

दरम्यान, दोन्ही नेते मुख्यमंत्री पदाच्या प्रश्नाबाबत विचारल्यावर टाळाटाळ करत आहेत. मागच्या काही दिवसापूर्वी एबीपी न्यूजशी बोलताना नवज्योत सिद्धू यांना मुख्यमंत्रीपदाबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. यावेळी त्यांनी सांगितले की, माझ्या नशीबात जे लिहले आहे ते कोणीच हिरावू शकत नाही. मी कायम पंजाबच्या कल्याणासाठी काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

पंजाब विधानसभेसाठी 20 फेब्रुवारीसाठी मतदान होणार आहे. तर  10 मार्चला मतमोजणी पार पडणार आहे. या निवडणुकीत काँग्रेसला आम आदमी पार्टी (आप), शिरोमणी अकाली दल (शिअद) और भाजप-पंजाब लोक काँग्रेस या पक्षांचा सामना करावा लागणार आहे. आम आदमी पार्टीने भगवंत मान यांच्या नेतृत्वात निवडणुका लढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर अकाली दलाने सुखबीर बादल यांना पुढे केले आहे. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही : निलेश लंके
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, निलेश लंकेंचं प्रचारावेळी मोठं वक्तव्य
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
Aaditya Thackeray : आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू

व्हिडीओ

Sanjay Raut Full PC : शिवाजी पार्कात आमची सभा होऊ नये यासाठी विरोधकांचे प्रयत्त सुरु
Uddhav Thackeray-Raj Thackeray PC: वचनामा जाहीर,महायुतीवर निशाणा, ठाकरे बंधूंची रोखठोक पत्रकार परिषद
Dhananjay Mahadik Kolhapur : काँग्रेसची कुठेही सत्ता नाही मग शहरासाठी निधी कसे आणणार? महाडिकांचं भाषण
Rajesh Kshirsagar Kolhapur : विरोधक हे निगेटिव्ह नरेटिव्हचे किंग आहेत, राजेश क्षीरसागरांचं भाषण
Devendra Fadnavis On Mahapaur : मुंबईचा महापौर महायुतीचाच आणि मराठीचाच होणार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही : निलेश लंके
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, निलेश लंकेंचं प्रचारावेळी मोठं वक्तव्य
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
Aaditya Thackeray : आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
उद्धव ठाकरेंनी मला शिवी नाही दिली, प्रत्येक मराठी माणसाला शिवी दिली, मराठी माणसाचा अपमान केला : अमित साटम
उद्धव ठाकरेंनी मला शिवी नाही दिली, प्रत्येक मराठी माणसाला शिवी दिली, मराठी माणसाचा अपमान केला : अमित साटम
Gold Silver Rate : आठवड्यात सोने आणि चांदीचे दर घसरले, सोनं 4000 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर किती रुपयांवर? जाणून घ्या
आठवड्यात सोने आणि चांदीचे दर घसरले, सोनं 4000 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर किती रुपयांवर? जाणून घ्या
ज्ञानगंगा अभयारण्यात 4 वर्षानंतर आला वाघ, सर्वत्र आनंदी आनंद; नव्या 'टायगर'चे नाव काय?
ज्ञानगंगा अभयारण्यात 4 वर्षानंतर आला वाघ, सर्वत्र आनंदी आनंद; नव्या 'टायगर'चे नाव काय?
Embed widget