एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
अब्दुल सत्तारांची काँग्रेसमधून हकालपट्टी, विखेंबाबत लवकरच निर्णय, अशोक चव्हाणांचा सूचक इशारा
विधानसभेचे विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासंदर्भात लवकरच निर्णय घेऊ, असा सूचक इशाराही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांनी दिला.
![अब्दुल सत्तारांची काँग्रेसमधून हकालपट्टी, विखेंबाबत लवकरच निर्णय, अशोक चव्हाणांचा सूचक इशारा Abdul Sattar removed from Congress, tells Ashok Chavhan, soon to take decision on Radhakrishna Vikhe Patil अब्दुल सत्तारांची काँग्रेसमधून हकालपट्टी, विखेंबाबत लवकरच निर्णय, अशोक चव्हाणांचा सूचक इशारा](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2019/04/20153037/Ashok-Chavhan-Radhakrishna-Vikhe-Patil-Abdul-Sattar.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
जालना : औरंगाबादमधील काँग्रेसचे बंडखोर आमदार अब्दुल सत्तार यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी जालन्यात याविषयी घोषणा केली. विधानसभेचे विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासंदर्भात लवकरच निर्णय घेऊ, असा सूचक इशाराही यावेळी चव्हाणांनी दिला.
जालन्यातून काँग्रेसचे लोकसभा उमेदवार विलास औताडे यांची प्रचारसभा भोकरदनमध्ये आयोजित करण्यात आली होती. या सभेनंतर पत्रकारांशी बोलताना अशोक चव्हाणांनी ही घोषणा केली. विखे हे अहमदनगरमधील महायुतीचे उमेदवार सुजय विखेंचा प्रचार करत असल्याची तक्रार राष्ट्रवादीने केली होती. राधाकृष्ण विखे पाटील भाजपच्या वाटेवर असल्याचंही म्हटलं जातं.
सुजय विखेंचा भाजपप्रवेशाचा निर्णय योग्यच, वडील राधाकृष्ण विखे पाटलांचं मत
अब्दुल सत्तार यांनी लोकसभा निवडणुकीतील अपक्ष उमेदवार आणि शिवसेना बंडखोर हर्षवर्धन जाधव यांना पाठिंबा जाहीर केला आहे. हर्षवर्धन जाधव हे भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे जावई आहेत. अब्दुल सत्तार यांनी औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून अपक्ष अर्ज भरला होता. मात्र दिलजमाई झाल्यानंतर सत्तार यांनी अर्ज मागे घेतला. मध्यंतरी रावसाहेब दानवे आणि अब्दुल सत्तार हे मुंबईला मुख्यमंत्र्यांना भेटले होते. VIDEO | भाजपमधून हकालपट्टी केल्याने अनिल गोटेंचा संताप | धुळे दरम्यान, अशोक चव्हाण यांनी साध्वी प्रज्ञासिंगच्या शहीद हेमंत करकरे विषयक वक्तव्याचा निषेध केला आहे. साध्वीचं वक्तव्य अतिशय गंभीर असून यामुळे भाजपचा खरा चेहरा उघड झाला आहे. निवडणूक आयोगाने याची दखल घेऊन त्यांची उमेदवारी रद्द करावी अशी मागणी काँग्रेसने केली आहे.संबंधित बातम्या
अब्दुल सत्तार-रावसाहेब दानवे एकाच विमानाने मुंबईत, भाजप प्रवेशाच्या चर्चांना उधाण
अब्दुल सत्तार यांची बंडखोरी अशोक चव्हाणांच्या गुप्त सूचनेनुसार?
औरंगाबाद काँग्रेसमध्ये खुर्च्यांवरुन राजकारण, राजीनाम्यानंतर अब्दुल सत्तारांनी पक्ष कार्यालयातील खुर्च्या सोबत नेल्या
औरंगाबाद लोकसभेच्या तिकीटावरुन काँग्रेसमध्ये जुंपली, आमदार अब्दुल सत्तारांनी बंड पुकारलं, अपक्ष लढणार
Khelo khul ke, sab bhool ke - only on Games Live
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ठाणे
मुंबई
राजकारण
करमणूक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![सिद्धेश ताकवले](https://cdn.abplive.com/imagebank/editor.png)
सिद्धेश ताकवलेप्रतिनिधी
Opinion