एक्स्प्लोर

SSC Examination 2023 :आजपासून दहावीच्या परीक्षेला सुरुवात, बोर्डाकडून चोख व्यवस्था; दोन विद्यार्थ्यांच्या अपघाती मृत्यूने हळहळ

SSC Examination 2023 : आजपासून राज्यात दहावीची परीक्षा सुरू झाली आहे. नाशिकमध्ये दोन विद्यार्थ्यांचा अपघाती मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. तर, काही ठिकाणी कॉपीचे प्रकार घडले आहेत.

SSC Examination 2023 : राज्यात आजपासून महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने (Maharashtra Board) घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षेला (SSC Exam) आजपासून सुरुवात झाली आहे. बोर्डाकडून परीक्षेसाठीची जय्यत तयारी करण्यात आली. या परीक्षेसाठी 15 लाख 77 हजार विद्यार्थी  बसले आहेत.   5000 केंद्रांवर ही परीक्षा पाडत आहे. यंदाची दहावीची परीक्षा 100 टक्के कॉपीमुक्त करण्यासाठी बोर्डाकडून मोहीम राबवली जात आहे. कॉपीचे गैरप्रकार टाळण्यासाठी विशेष खबरदारी प्रत्येक केंद्रावर घेतली गेली आहे. पहिलाच पेपर असल्याने विद्यार्थी काहीसे तणावात होते. विद्यार्थ्यांचे मनोधैर्य उंचावण्यासाठी पालकांनीदेखील परीक्षा केंद्रावर गर्दी केली होती. दरम्यान, नाशिकमध्ये दोन विद्यार्थ्यांचा अपघाती मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. 

मागील दोन वर्ष कोरोना लॉकडाउनमुळे दहावी बारावीची परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आली होती. मात्र यावर्षी कोरोनानंतर पहिल्यांदाच ऑफलाईन पद्धतीने परिक्षा होणार आहे. त्यादृष्टीने खबरदारी घेण्यात आली. विद्यार्थ्यांमध्येही ऑफलाइन परीक्षेबाबत उत्सुकता दिसून आली. 

नाशिकमध्ये दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू

आगासखिंड येथील माध्यमिक शाळेत दहावीत शिकणारे (SSC Exam) विद्यार्थी परीक्षेसाठी पांढुर्ली येथील परीक्षा केंद्राकडे येत असताना झालेल्या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला. शुभम रामदास बरकले आणि दर्शन शांताराम आरोटे हे दोन मित्र पांढुर्ली येथील जनता विद्यालय येथे आज (2 मार्च) आपल्या अॅक्टिव्हा या दुचाकीवरुन जात असताना आगासखिंड येथे भरधाव वेगाने येणाऱ्या एच पी गॅसचा टँकरने धडक दिल्यामुळे या दोघांचा ही जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरातील ग्रामस्थांमध्ये शोककळा पसरली आहे.

छ. संभाजीनगर विभागात 629 केंद्रांवर 1.80 लाख विद्यार्थी

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) विभागात 629 केंद्रांवर 1.80 लाख विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. तर अनेक परीक्षा केंद्रावर रात्री उशिरापर्यंत परीक्षेसाठी तयारी सुरु होती. दहावीच्या लेखी परीक्षेला 2 हजार 614 शाळांतील 99 हजार 549 विद्यार्थी तसेच 80 हजार 661 विद्यार्थिनी असे एकूण 1 लाख 80 हजार 210 परीक्षार्थी 629 परीक्षा केंद्रांवर परीक्षा देणार आहेत. तर या परीक्षा दरम्यान प्रशासनाकडून कॉपी रोखण्यासाठी भरारी पथकासह बैठेपथक नियुक्त करण्यात आले आहे. तर जिल्हा परिषद अधिकाऱ्यांसह महसूल पथकाची देखील या परीक्षांवर नजर असणार आहे. 

नाशिक विभागात एकूण 1 लाख 59 हजार परीक्षार्थी

नाशिक विभागात (Nashik Division) 1 लाख 59 हजार विद्यार्थी परीक्षा देत आहेत. कॉपीचे आणि इतर गैरप्रकार टाळण्यासाठी नाशिक विभागातील प्रत्येक जिल्ह्यात 4 अशा एकूण 16 भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. या पथकाद्वारे परीक्षेतील गैरप्रकारांना आळा घालण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात 53 हजार 675 परीक्षार्थी

कोल्हापूर जिल्ह्यात (Kolahpur News) 136 परीक्षा केंद्रे निश्‍चित केली आहेत. त्यात मुख्य, उपकेंद्रांचा समावेश आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील 976 शाळांतील 53 हजार 675 विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेसाठी नोंदणी केली आहे. 

लातूर जिल्ह्यात 38 हजार विद्यार्थी

लातूर जिल्ह्यातील 149  केंद्रांवर परीक्षा घेण्यात येणार आहेत. या परीक्षेला 38 हजार 155 विद्यार्थी सामोरे जाणार आहेत. कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा पार पडाव्यात, यासाठी 29 भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली असून, विभागीय मंडळाच्या वतीने परीक्षेचे नियोजन करण्यात आले आहे.

कॉपीमुक्त अभियान कागदावर?

कॉपीमुक्त परीक्षेसाठी शिक्षण मंडळाकडून पावले उचलली जात असताना दुसरीकडे याच अभियानाचा बोजवारा उडालेला दिसत आहे.  हिंगोली जिल्ह्यातील रामेश्वर तांडा येथील  माध्यमिक आश्रम शाळेच्या दहावीच्या परीक्षा केंद्रावर कॉपीचा सुळसुळाट पाहायला मिळाला. परीक्षा केंद्राच्या मागच्या बाजूने आणि खिडकीच्या जवळ कॉपी देताना नागरिक मोबाईल कॅमेरात कैद झाले आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

महत्त्वाच्या बातम्या

Bankipur, Datia Exit Poll : भाजप की जन सुराज, नितीन नवीन यांच्या बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
भाजप की जन सुराज,बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
Narendra Modi : हा सांस्कृतिक धक्का, मुली अशा प्रकारची भाषा कशी वापरू शकतात, मला मुलांना माफ करायचंय : नरेंद्र मोदी
जंतर मंतरवर जे झालं ते जगानं पाहिलं, भरकटलेल्या मुलांना मार्ग दाखवणं आपलं काम : नरेंद्र मोदी 
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा

व्हिडीओ

Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report
Nashik Potholes Mahajan vs Bhujbal : खड्ड्यांवरुन खळबळ; महाजन भुजबळ भिडले Special Report
Chandrakant Patil : बोटांचे ठसे, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून हसे Special Report
Parinay Fuke On Uddhav Thackeray : अभिजीत दिपके कृष्णाचे अवतार, तर उद्धव ठाकरे कंसाचे अवतार
Food Safety : फळं भाज्यांवरील 99% कीटकनाशके हटवणारे 'Sophab' द्रावण; पुण्यातील शास्त्रज्ञांचं संशोधन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bankipur, Datia Exit Poll : भाजप की जन सुराज, नितीन नवीन यांच्या बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
भाजप की जन सुराज,बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
Narendra Modi : हा सांस्कृतिक धक्का, मुली अशा प्रकारची भाषा कशी वापरू शकतात, मला मुलांना माफ करायचंय : नरेंद्र मोदी
जंतर मंतरवर जे झालं ते जगानं पाहिलं, भरकटलेल्या मुलांना मार्ग दाखवणं आपलं काम : नरेंद्र मोदी 
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
Nitin Gadkari on E20 Petrol: E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
Embed widget