एक्स्प्लोर

SSC HSC Exam : दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या पद्धतीत बदल होणार? नवीन राज्य अभ्यासक्रम आराखडा लागू झाल्यानंतर अंमलबजावणी होणार 

HSC SSC Exam Pattern : राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेनं राज्य अभ्यासक्रम आराखडा अंतिम केला आहे. त्याबाबत सूचना मागवण्यात आल्या होत्या.

पुणे: केंद्र सरकारनं देशभरात नवीन शिक्षण धोरण लागू केलं आहे. या शिक्षण धोरणाद्वारे शिक्षण प्रक्रियेत अनेक बदल प्रस्तावित आहेत. विविध राज्यांमधील शिक्षणाचा आकृतीबंध देखील बदलणार आहे. शिक्षण धोरणात सुचवल्या प्रमाणं शैक्षणिक स्तर 5+3+3+4 असे असणार आहेत. सध्या सुरु असलेल्या परीक्षा पद्धतीमध्ये विद्यार्थ्यांना त्यांना एखाद्या विषयाचं किती आकलन झालं हे लेखी परीक्षेद्वारे पडताळलं जातं. मात्र, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेनं इयत्ता तिसरी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी पाठ्यक्रम तयार केलेला आहे. 


राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेनं तिसरी ते बारावी या वर्गांसाठी अभ्यासक्रम आराखडा मंजूर केला आहे. त्यानुसार दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या पॅटर्नमध्ये देखील बदल होणार आहेत. सुरुवातीला नववी आणि अकरावीसाठी हा आराखडा लागू केला जाईल. त्यानंतर दहावी बारावी साठी हा आराखडा लागू  केला जाईल त्यानंतर बदललेल्या पॅटर्ननं परीक्षा होईल, अशी माहिती आहे. 
     

राज्य अभ्यासक्रम आराखाड्यानुसार माध्यमिक स्तराचे दोन गटात वर्गीकरण करण्यात आलं आहे. पहिल्या स्तरात नववी आणि दहावी, तर दुसऱ्या स्तरात अकरावी आणि बारावी असं वर्गीकरण असेल. नववी आणि दहावीला दोन भारतीय भाषा आणि एक विदेशी भाषा अभ्यासाला असेल. याशिवाय गणित, संगणकीय विचार, सामाजिक शास्त्रे, कला, शिक्षण, शारीरिक शिक्षण व निरामयता, व्यावसायिक शिक्षण आणि आंतरविद्याशाखीय क्षेत्रे हे विषय असतील. यैपैकी कला शिक्षण, शारीरिक शिक्षण आणि व्यावसायिक शिक्षणाचं स्थानिक पातळीवर परीक्षण होईल. 

 अकरावी आणि बारावी दुसऱ्या स्तरात असून यामध्ये विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम निवडची स्वातंत्र्य असेल. व्यावसायिक व शैक्षणिक असं विभाजन राहणार नाही. विद्यार्थ्यांवरील आशयाचं ओझं कमी करुन चिंतन करण्यास अधिक वेळ असेल. दोन भाषांचा अभ्यास करावा लागेल, त्यापैकी एक भारतीय असावी. विषय गट असतील त्यापैकी दोन गटातून चार विषयांची निवड करावी लागेल.

दहावी बारावीसाठी सत्र परीक्षा पद्धती 

दहावी आणि बारावीच्या परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांचा   जोर अनेकदा विषय समजावून न घेता केवळ पाठांतर करण्यावर असतो. त्याऐवजी विद्यार्थ्यांना विषय किती समजला आहे याचं आकलन, त्याचं वास्तव जीवनात किती उपयोजन करता येतं याची चाचणी घेतली जाणार आहे. 

सध्या दहावी आणि बारावीची परीक्षा वार्षिक पद्धतीनं होते.नव्या राज्य अभ्यासक्रम आराखड्यानुसार सत्र परीक्षा पद्धती स्वीकारावी, असं प्रस्तावित आहे. दहावी आणि बारावीची परीक्षा सत्र पद्धतीनं देखील घेतली जाऊ शकते. हे बदल 2025-26 नंतर अंमलात येतील. 


विद्यार्थ्यांमध्ये नववी ते बारावी या चार वर्षांच्या काळात विचार, शिक्षण सराव आणि सर्जनशील अभिव्यक्तीमध्ये परिप्कवता आणण्याचा प्रयत्न असेल. कामात सर्जनशीलता, नवकल्पनांना प्रोत्साहन हे अधिक महत्त्वाचं असेल.     

इतर बातम्या : 

जिल्हापरिषद शाळेचे 30 हजार विद्यार्थी अद्याप गणवेशापासून वंचित; स्वतंत्र दिनी विद्यर्थ्यांना जुन्याच गणवेशात झेंडावंदन करण्याची नामुष्की 

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

राज्यातील शाळांसाठी उन्हाळी सुट्टी जाहीर, 2 मे पासून ते 14 जून पर्यंत शाळा राहणार बंद 
राज्यातील शाळांसाठी उन्हाळी सुट्टी जाहीर, 2 मे पासून ते 14 जून पर्यंत शाळा राहणार बंद 
२०२६ मध्ये तुमचे करिअर बदलू शकणारे टॉप ग्लोबल फायनान्स सर्टिफिकेशन्स
२०२६ मध्ये तुमचे करिअर बदलू शकणारे टॉप ग्लोबल फायनान्स सर्टिफिकेशन्स
Bhandara Education News: वाघाच्या जबड्यात शिक्षणाची वाट! डिजिटल महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास, कोणी एसटीत घेईना, जंगलातून चालत शाळेपर्यंतचा प्रवास
वाघाच्या जबड्यात शिक्षणाची वाट! डिजिटल महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास, कोणी एसटीत घेईना, जंगलातून चालत शाळेपर्यंतचा प्रवास
सांगोला पेपर चोरी प्रकरण! भूगोलाचा अभ्यास झाला नसल्यानं पठ्ठ्यानं थेट पेपरचीच केली चोरी, पोलिसांनी घेतलं ताब्यात
सांगोला पेपर चोरी प्रकरण! भूगोलाचा अभ्यास झाला नसल्यानं पठ्ठ्यानं थेट पेपरचीच केली चोरी, पोलिसांनी घेतलं ताब्यात

व्हिडीओ

Amit Thackeray यांनी घेतली सरवदे कुटुंबाची भेट:मुलांच्या शिक्षणाची घेणार जबाबदारी
Ashok Kharat Case : भोंदू अशोक खरात प्रकरणात आता अधिकारी 'जात्यात'?
Mohit Kamboj Aditya Thackerayमोहित कंबोज यांच्या लेकीच्या वाढदिवसाला राज ठाकरेंसह आदित्य ठाकरेही हजर
Parth Pawar Meet Raj Thackeray : खासदार पार्थ पवारांनी घेतली राज ठाकरेंची भेट, एक ते दीड तास चर्चा
Prashant Padole Accident : गोंदियाचे खासदार डॉ. प्रशांत पडोळेंच्या वाहनाचा अपघात, पडोळे किरकोळ जखमी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
LPG Supply : ... तरच तीन महिन्यात LPG सिलेंडर बंद होणार, इंधन-गॅस तुटवड्याच्या चर्चेवर भुजबळांचं मोठं स्पष्टीकरण
... तरच तीन महिन्यात LPG सिलेंडर बंद होणार, इंधन-गॅस तुटवड्याच्या चर्चेवर भुजबळांचं मोठं स्पष्टीकरण
Mohit Kamboj Daughter Birthday Party: आदित्य ठाकरे, सुप्रिया सुळे, संजय दत्त, अंबानी, मोहित कंबोजांच्या लेकीच्या बर्थडे पार्टीला कोण कोण?
आदित्य ठाकरे, सुप्रिया सुळे, संजय दत्त, अंबानी, मोहित कंबोजांच्या लेकीच्या बर्थडे पार्टीला कोण कोण?
Tushar Doshi Shivsena: शिवसेनेशी पंगा महागात पडला, तुषार दोशी सक्तीच्या रजेवर, एकनाथ शिंदेंनी फडणवीसांना नेमकं काय सांगितलं? वाचा इनसाईड स्टोरी
शिवसेनेशी पंगा महागात पडला, तुषार दोशी सक्तीच्या रजेवर, शिंदेंनी फडणवीसांना काय सांगितलं? वाचा इनसाईड स्टोरी
विवाहित नेव्ही जवानाकडून प्रेयसीचे तीन तुकडे; शीर जाळून टाकलं, एक तुकडा पलंगाखाली अन् दुसरा फ्रिजमध्ये ठेवला; आरोपी स्वतः पोलीस ठाण्यात गेला
विवाहित नेव्ही जवानाकडून प्रेयसीचे तीन तुकडे; शीर जाळून टाकलं, एक तुकडा पलंगाखाली अन् दुसरा फ्रिजमध्ये ठेवला; आरोपी स्वतः पोलीस ठाण्यात गेला
Nitish Kumar: बिहारी राजकारणात नितिश पर्वाचा अखेर अस्त! तब्बल 20 वर्ष सभागृहात अन् फक्त 29 शब्दांत निरोप घेत आमदारकीचा राजीनामा; जेडीयू की भाजप? मुख्यमंत्रीपदाचं काय ठरलं?
बिहारी राजकारणात नितिश पर्वाचा अखेर अस्त! तब्बल 20 वर्ष सभागृहात अन् फक्त 29 शब्दांत निरोप घेत आमदारकीचा राजीनामा; जेडीयू की भाजप? मुख्यमंत्रीपदाचं काय ठरलं?
Mangalprabhat Lodha on LPG Gas Cylinder: लोक मदत मागायला आले, त्यांना गॅस सिलेंडर मिळवून देण्यासाठी मी प्रयत्न केलं तर काय चुकलं? मंगलप्रभात लोढांचा आर्त सवाल
मदतीसाठी आलेल्या लोकांना गॅस सिलेंडर देण्यासाठी प्रयत्न केलं तर काय चुकलं? मंगलप्रभात लोढांचा आर्त सवाल
PSL 2026 News : बळजबरीनं खोलीत नेलं...; शाहीन आफ्रिदी आणि सिकंदर रझावर गंभीर आरोप; पाकिस्तान सुपर लीगमध्ये भूकंप
बळजबरीनं खोलीत नेलं...; शाहीन आफ्रिदी आणि सिकंदर रझावर गंभीर आरोप; पाकिस्तान सुपर लीगमध्ये भूकंप
Cameron Green: तब्बल 25.20 कोटी मोजून केकेआरनं धुरंदर संघात आणला, पण बॉलिंगची संधी दिलीच नाही! कॅप्टन अजिंक्य रहाणेच्या उत्तरानं सुद्धा डोकं खाजवायची वेळ आली...
तब्बल 25.20 कोटी मोजून केकेआरनं धुरंदर संघात आणला, पण बॉलिंगची संधी दिलीच नाही! कॅप्टन अजिंक्य रहाणेच्या उत्तरानं सुद्धा डोकं खाजवायची वेळ आली...
Embed widget