एक्स्प्लोर

CBSE :  सीबीएसईचा त्रिभाषा सूत्रासंदर्भात मोठा निर्णय, नववीपासून विद्यार्थ्यांना तीन भाषा शिकाव्या लागणार, दोन भारतीय भाषा अनिवार्य

CBSE : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजेच सीबीएसईनं नववीपासून तीन भाषा अनिवार्य केल्या आहेत. याचं अधिकृत नोटिफिकेशन जारी करण्यात आलं आहे. 

नवी दिल्ली : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानं म्हणजेच सीबीएसईनं इयत्ता नववीपासून तीन भाषांचं शिक्षण अनिवार्य केलं आहे. सीबीएसईनं 16 मे 2016 ला  यासंदर्भातील अधिकृत नोटिफिकेशन जारी केलं आहे. बोर्डाच्या अधिकृत नोटिफिकेशननुसार 1 जुलै 2026 पासून सुरु होणाऱ्या नववीच्या वर्गापासून तीन भाषांचं अध्ययन अनिवार्य करण्यात आलं आहे. या तीन भाषांमधील दोन भाषा भारतीय असाव्यात तर एक भाषा विदेशी असावी. मात्र, दहावीच्या बोर्ड परीक्षेत तिसऱ्या पेपरमधून सूट देण्यात आली आहे. तिसऱ्या भाषेचं मूल्यांकन फक्त शालेय पातळीवर मर्यादित असेल. 

सीबीएसईच्या परिपत्रकानुसार नववी आणि दहावीच्या विद्यार्ध्यांना तीन भाषा शिकवण्यासंदर्भात सूचना देण्यात आल्या आहेत. बोर्डानं स्पष्ट केलं की भाषा शिक्षण एनएसीईआरटीच्या नव्या अभ्यासक्रमानुसार केलं जाईल. बोर्डानं म्हटलं की, 1 जुलै 2026 पासून इयत्ता नववीसाठी तीन भाषाचं अध्ययन आवश्यक असेल. यापैकी दोन भाषा भारतीय असाव्यात. तर, एक भाषा विदेशी असावी. बोर्डानं वेगवेगळ्या भाषांची निवड करण्यासाठी R1, R2 आणि R3 चे पर्याय देण्यात आले आहेत. 

सीबीएसई बोर्डानं म्हटलं की मध्यम स्तरावर आणि  सेकेंडरी स्टेजवर अभ्यासासाठी रीडिंग कॉम्प्रिहेंशन, ओरल कम्युनिकेशन, व्याकरण आणि लेखन कौशल्य यामध्ये जवळपास 75 ते 80 टक्के ओवरलॅप आहे. जोपर्यंत R3 ची पुस्तकं येत नाहीत तोपर्यंत नववीचे विद्यार्थी 2026-27 च्या शैक्षणिक वर्षासाठी निवडलेल्या भाषेचं सहावीच्या वर्गाच्या R3 या पुस्तकाचा अभ्यास करतील.  शाळांना या पुस्तकांसोबत स्थानिक किंवा राज्यातील साहित्य देखील देण्यास सांगण्यात आलं आहे, ज्यात कविता, छोट्या गोष्टींचा समावेश असेल. 

सीबीएसईनं परिपत्रकात म्हटलं की अभ्यासावर लक्ष ठेवावं आणि विद्यार्थ्यांनी कोणत्याही प्रकारचा दबाव घेऊ नये. दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी R3 मधील भाषेसाठी परीक्षा द्यावी लागणार नाही. म्हणजेच विद्यार्थ्यांना तिसऱ्या भाषेची बोर्ड परीक्षा द्यावी लागणार नाही. मात्र, शालेय मूल्यांकनातील गुण गुणपत्रकात दिसणार असल्यानं विद्यार्थ्यांनी दक्षता घेणं आवश्यक आहे.

दरम्यान, नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार तीन भाषा शिक्षण धोरण निश्चित करण्यात आलं आहे. त्यानुसार सीबीएसईकडून आता इयत्ता नववीपासून तीन भाषांचं अध्ययन जुलै 2026 पासून लागू करण्यात आलं आहे.  

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

CBSE :  सीबीएसईचा त्रिभाषा सूत्रासंदर्भात मोठा निर्णय, नववीपासून विद्यार्थ्यांना तीन भाषा शिकाव्या लागणार, दोन भारतीय भाषा अनिवार्य
सीबीएसईचा त्रिभाषा सूत्रासंदर्भात मोठा निर्णय, नववीपासून विद्यार्थ्यांना तीन भाषा शिकाव्या लागणार
NEET पेपर लीक प्रकरणी महत्वाची बातमी समोर, CBI कडून आणखी एका मास्टरमाइंडला दिल्लीतून अटक 
NEET पेपर लीक प्रकरणी महत्वाची बातमी समोर, CBI कडून आणखी एका मास्टरमाइंडला दिल्लीतून अटक 
NEET Exam paper leak: नीट परीक्षा रद्द झाल्याचा धसका, नैराश्याच्या भरात तीन विद्यार्थ्यांनी उचललं टोकाचं पाऊल
नीट परीक्षा रद्द झाल्याचा धक्का सहन झाला नाही, नैराश्याच्या भरात तीन विद्यार्थ्यांनी उचललं टोकाचं पाऊल
MAHATET : नीट यूजी परीक्षा 21 जूनला होणार, महाटीईटीच्या तारखेत बदल, महाराष्ट्र  राज्य परीक्षा परिषदेचा मोठा निर्णय
महाटीईटीच्या तारखेत नीट परीक्षेमुळं बदल, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचा मोठा निर्णय
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Special Report Pimpri Chinchwad Teddy bear case : टेडी की बॉम्ब, प्रियकराचा गिफ्टनं सुटला घाम
Special Report Mumbai Goa Highway Toll Naka : मुंबई-गोवा महामार्ग अजून अपूर्णच, पण टोलवसुलीही सुरू
Coffee with Kaushik : Rohit Pawar : बारामतीचा पुढचा दादा कोण? तटकरे-पटेलांचा 'तो' ऑडिओ कोणता?
Dhananjay Munde Speech : मी जात-पात-धर्म सोडून राजकारण केलं, पण मला लाथा मारून हाकलायचा प्रयत्न झाला
Manoj Jarange On Maratha Reservation : २९ तारखेपर्यंत मागण्या पूर्ण करा, नाहीतर ३० मे रोजी टेकायचं म्हणजे टेकायचं: जरांगे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PM Modi Speech : स्थिती सुधारली नाही तर सगंळं काही संपेल, ऊर्जा संकटावर पंतप्रधान मोदींचा इशारा
स्थिती सुधारली नाही तर सगंळं काही संपेल, ऊर्जा संकटावर पंतप्रधान मोदींचा इशारा
Kalyan : बाप रेकी करायचा, मुलं घर फोडायची; कल्याणमध्ये बाप-लेकांची घरफोडी टोळी जेरबंद, 21 लाखांचे दागिने जप्त
बाप रेकी करायचा, मुलं घर फोडायची; कल्याणमध्ये बाप-लेकांची घरफोडी टोळी जेरबंद, 21 लाखांचे दागिने जप्त
CJI सूर्यकांत म्हणाले, माझ्या 'झुरळ' टिप्पणीचा विपर्यास केला, ती टीका बोगस डिग्रीवाल्यांवर होती, बेरोजगार तरुणांवर नव्हे
CJI सूर्यकांत म्हणाले, माझ्या 'झुरळ' टिप्पणीचा विपर्यास केला, ती टीका बोगस डिग्रीवाल्यांवर होती, बेरोजगार तरुणांवर नव्हे
Rahul Gandhi : 22 लाख विद्यार्थ्यांची मेहनत वाया, परीक्षेपूर्वी दोन दिवस NEET चा पेपर व्हाटसअपवर वाटला गेला, धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा : राहुल गांधी
धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्या, त्यांना पदावरुन काढावं, अन्यथा पंतप्रधानांनी जबाबदारी घ्यावी : राहुल गांधी 
Silver News:  सोन्यावरील आयात शुल्क वाढवल्यानंतर सरकारचं चांदी आयातीबाबत कठोर धोरण, नवा नियम लागू
सोन्यावरील आयात शुल्क वाढवल्यानंतर सरकारचं चांदी आयातीबाबत कठोर धोरण, नवा नियम लागू
Andhra Pradesh : आंध्र प्रदेशात तिसऱ्या मुलासाठी 30 हजार तर चौथ्या मुलासाठी 40 हजार रुपयांचा प्रोत्साहन भत्ता मिळणार,चंद्राबाबू  नायडूंची मोठी घोषणा 
आंध्र प्रदेशात तिसऱ्या मुलासाठी 30 हजार तर चौथ्या मुलासाठी 40 हजार रुपयांचा भत्ता मिळणार:चंद्राबाबू  नायडू
भारताला दुष्काळ अन् भीषण उष्णतेचा सामना करावा लागणार; सुपर एल निनो मे-जुलैमध्ये सक्रिय होण्याची शक्यता, हिवाळ्यापर्यंत प्रभाव, मान्सून कमकुवत होण्याची भीती
भारताला दुष्काळ अन् भीषण उष्णतेचा सामना करावा लागणार; सुपर एल निनो मे-जुलैमध्ये सक्रिय होण्याची शक्यता, हिवाळ्यापर्यंत प्रभाव, मान्सून कमकुवत होण्याची भीती
Devendra Fadnavis :
भारताचा आध्यात्मिक महासत्ता बनवण्याचा मार्ग गुरुदेवांच्या मार्गदर्शनानेच प्रशस्त : देवेंद्र फडणवीस
Embed widget