एक्स्प्लोर

Bhandara : चालकाला आली झोपेची डूलकी अन् क्षणात होत्याचं झालं नव्हतं! DJ वाहनाचा भीषण अपघात, एकाचा जागीच मृत्यू तर, तीन गंभीर 

अमरावतीकडून भंडाऱ्याच्या दिशेनं येणाऱ्या डीजे वाहनावरील चालकाचं नियंत्रण सुटल्यानं भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या भीषण अपघातात वाहनातील एकाचा घटनास्थळीच मृत्यू झालाय तर, तीन जण गंभीर जखमी झालेय

Bhandara Accident News : अमरावतीकडून भंडाऱ्याच्या दिशेनं येणाऱ्या डीजे धुमाल वाहनावरील चालकाचं नियंत्रण सुटल्यानं भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या भीषण अपघातात वाहनातील एकाचा घटनास्थळीच मृत्यू झालाय तर, तीन जण गंभीर जखमी झालेत. ही घटना आज (4 जानेवारी) सकाळी नागपूर जिल्ह्यातील रामटेक लगतच्या मोहदूला गावाजवळ घडली. मयूर मेश्राम (वय 22) असं मृतकाचं नाव असून तो मोहाडी तालुक्यातील पालोरा येथील रहिवासी आहे. 

तर, जखमींमध्ये तुषार मेश्राम, निकेश ठवकर आणि ईश्वर भेलावे असं गंभीर असलेल्यांची नावं आहेत. भंडाऱ्याच्या मोहाडी तालुक्यातील कुशारी येथील ईश्वर भेलावे यांचं शिव डीजे धुमाल आहे. अमरावती येथून रात्रीचा कार्यक्रम आटोपून पहाटेच्या सुमारास भंडाऱ्याकडं परतीचा प्रवास करत असताना चालकाला झोपेची डूलकी आली असावी आणि यात वाहनावरील नियंत्रण सुटल्यानं हा अपघात घडल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. सध्या या घटनेचा अधिक तपास पोलिस करत आहे. मात्र या अपघाताच्या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

समृद्धी महामार्गावर ट्रॅव्हल्स व ट्रक चा भीषण अपघात

दरम्यान, अशीच एक घटना वर्ध्याच्या विरुळ गावाजवळच्या समृद्धी महामार्गावर घडली आहे. यात  ट्रॅव्हल्स व ट्रकचा भीषण अपघात झालाय. ट्रक मुंबई कॉरिडॉरवरून जात असताना चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटले आणि ट्रक बॅरिगेड तोडून नागपूर कॉरिडॉरवर येत ट्रॅव्हल्सवर धडकला आहे. यात ट्रक चालक जखमी झाला असून सहा प्रवासी देखील किरकोळ जखमी झाले असल्याची माहिती आहे. अपघातग्रस्त प्रवाशांना पुलगाव व सावंगी येथे रुग्णालयात रेफर करण्यात आले आहे. धामणगाव, वर्धा,वेरूळ येथून रुग्णवाहिकेची व्यवस्था करण्यात आली. आज(4 जानेवारी)  सकाळच्या सुमारास हा अपघात झालाय. 

धरणाचे पाणी नदीपात्रात सोडण्यासाठी शेतकऱ्यांचे आमरण उपोषण       

यवतमाळच्या उमरखेड तालुक्यातील विदर्भ आणि मराठवाडा सीमेवर असलेली पेनगंगा नदी पात्रात पाणी नसल्याने शेतकऱ्यांचे पिके हे करपून जात आहे. दरम्यान, परिसरातील गावाला भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.  तसेच जंगलातील प्राणी पाण्यासाठी भटकंती करत आहे. वारंवार लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्याकडे पाणी प्रश्न  सोडण्याची मागणी केली. मात्र प्रश्न न सुटल्याने आणि पाणी नदीपात्रात न आल्याने परिसरातील 12 गावातील शेतकऱ्यांनी नदी पात्रात आमरण उपोषणला बसले आहे. पाणी जो पर्यत सोडत नाही तोपर्यंत आमरण उपोषण न सोडण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी केला आहे.

हे ही वाचा 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

जयकुमार गोरेंवरील आरोप प्रकरणी महिलेनंतर शिवसेना उप जिल्हाप्रमुखास अटक; अनेक मोठ-मोठी नावे पुढे येणार
जयकुमार गोरेंवरील आरोप प्रकरणी महिलेनंतर शिवसेना उप जिल्हाप्रमुखास अटक; अनेक मोठ-मोठी नावे पुढे येणार
मुंबईतील धारावीची एक इंचही जागा अदानीला देणार नाही;  मंत्री आशिष शेलार यांची विधानसभेत ग्वाही
मुंबईतील धारावीची एक इंचही जागा अदानीला देणार नाही; मंत्री आशिष शेलार यांची विधानसभेत ग्वाही
Aaditya Thackeray : भाजपच्या प्रत्येक नेत्यांची, मंत्र्यांची मुलं परदेशात शिकली, ते येणार आहेत का कबर खोदायला? आगी लावणाऱ्यांचे काही जात नाही; आदित्य ठाकरेंकडून 'रोखठोक' व्हिजन
भाजपच्या प्रत्येक नेत्यांची, मंत्र्यांची मुलं परदेशात शिकली, ते येणार आहेत का कबर खोदायला? आगी लावणाऱ्यांचे काही जात नाही; आदित्य ठाकरेंकडून 'रोखठोक' व्हिजन
खोली भरुन रोकड सापडताच न्यायमूर्तींची बदली, वकील संघटना म्हणाली आम्ही कचरा नाही, आमच्याकडे नको; SC चे स्पष्टीकरण
खोली भरुन रोकड सापडताच न्यायमूर्तींची बदली, वकील संघटना म्हणाली आम्ही कचरा नाही, आमच्याकडे नको; SC चे स्पष्टीकरण
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pankaja Munde Majha Vision|संतोष देशमुख, धनूभाऊंचा राजीनामा,माझा व्हिजनवर पंकजा मुंडे भरभरून बोलल्याAjit Pawar Majha Vision: धनंजय मुंडेंचा राजीनामा ते नितेश राणेंवर रोखठोक भाष्य, अजित पवारांचं व्हिजनSpecial Report Jaykumar Gorhe : जयकुमार गोरेवर गंभीर आरोप, आता खंडणीसाठी अटक नेमकं प्रकरण काय?Imtiaz Jaleel Majha Vision| नागपूर दंगल ते औरंगजेब, माझा व्हिजनमध्ये जलीलांचा भाजप, आझमींवर निशाणा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जयकुमार गोरेंवरील आरोप प्रकरणी महिलेनंतर शिवसेना उप जिल्हाप्रमुखास अटक; अनेक मोठ-मोठी नावे पुढे येणार
जयकुमार गोरेंवरील आरोप प्रकरणी महिलेनंतर शिवसेना उप जिल्हाप्रमुखास अटक; अनेक मोठ-मोठी नावे पुढे येणार
मुंबईतील धारावीची एक इंचही जागा अदानीला देणार नाही;  मंत्री आशिष शेलार यांची विधानसभेत ग्वाही
मुंबईतील धारावीची एक इंचही जागा अदानीला देणार नाही; मंत्री आशिष शेलार यांची विधानसभेत ग्वाही
Aaditya Thackeray : भाजपच्या प्रत्येक नेत्यांची, मंत्र्यांची मुलं परदेशात शिकली, ते येणार आहेत का कबर खोदायला? आगी लावणाऱ्यांचे काही जात नाही; आदित्य ठाकरेंकडून 'रोखठोक' व्हिजन
भाजपच्या प्रत्येक नेत्यांची, मंत्र्यांची मुलं परदेशात शिकली, ते येणार आहेत का कबर खोदायला? आगी लावणाऱ्यांचे काही जात नाही; आदित्य ठाकरेंकडून 'रोखठोक' व्हिजन
खोली भरुन रोकड सापडताच न्यायमूर्तींची बदली, वकील संघटना म्हणाली आम्ही कचरा नाही, आमच्याकडे नको; SC चे स्पष्टीकरण
खोली भरुन रोकड सापडताच न्यायमूर्तींची बदली, वकील संघटना म्हणाली आम्ही कचरा नाही, आमच्याकडे नको; SC चे स्पष्टीकरण
स्तन पकडणे, पायजम्याची नाडी खोलणे बलात्कार नाही; अलाहाबाद कोर्टाच्या निकालावर संताप, नीलम गोऱ्हेंचं सर्वोच्च न्यायालयास पत्र
स्तन पकडणे, पायजम्याची नाडी खोलणे बलात्कार नाही; अलाहाबाद कोर्टाच्या निकालावर संताप, नीलम गोऱ्हेंचं सर्वोच्च न्यायालयास पत्र
राज्यातील एकही लाडकी बहीण वंचित राहणार नाही; एकनाथ शिंदेंचा शब्द; म्हणाले, कुठलीच योजना बंद नाही
राज्यातील एकही लाडकी बहीण वंचित राहणार नाही; एकनाथ शिंदेंचा शब्द; म्हणाले, कुठलीच योजना बंद नाही
आग्र्यात शिवाजी महाराजांचं भव्य स्मारक, शासनाचा GR निघाला; पर्यटन विभागाकडे जबाबदारी, असणार 'लय भारी'
आग्र्यात शिवाजी महाराजांचं भव्य स्मारक, शासनाचा GR निघाला; पर्यटन विभागाकडे जबाबदारी, असणार 'लय भारी'
Video: उद्धव ठाकरेंनी नारायण राणेंना फोन केला का?  दिशा सालियनप्रकरणी आदित्य ठाकरे म्हणाले, शीsss..
Video: उद्धव ठाकरेंनी नारायण राणेंना फोन केला का? दिशा सालियनप्रकरणी आदित्य ठाकरे म्हणाले, शीsss..
Embed widget